शहरं
Join us  
Trending Stories
1
बाईक घसरली, रायडरचा मृत्यू, बसला आग... एक नव्हे दोन अपघात; कुर्नूलमध्ये नेमकं काय घडलं?
2
निवडणूक झाली की लगेच निकाल, तिन्हींची एकत्र मतमोजणी अशक्य; ईव्हीएम सांभाळून ठेवणे जिकिरीचे
3
Today Daily Horoscope : आजचे राशीभविष्य - २६ ऑक्टोबर २०२५; प्रत्येक कामात यश, अचानक धनलाभ होईल
4
"भाजपचे नेते काहीही बोलून जातात", बाहेरच्यांना आवरा, आम्ही शहर सांभाळतो : प्रताप सरनाईक
5
'मॅडम फिट प्रमाणपत्र द्या', पोलिसांचा सर्वत्र दबाव, पाच महिने 'ती' मागत होती न्याय; खासदार व पीएचाही उल्लेख
6
महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी बलात्काराचा आरोप असलेला PSI गोपाळ बदने अखेर पोलिसांना शरण
7
पुढील आठवडा पुन्हा पावसाचा; कोकण किनारपट्टीसह मराठवाडा, विदर्भाला इशारा
8
'तक्रार केल्याने दिला जास्त त्रास'; महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणी पीएसआय बदने, बनकर अटकेत
9
पबमध्ये ओळख, कॉलवरून वाद; तरुणीला नेले फरफटत! बोरिवलीतील पबसमोरील थरारक घटना
10
१० ते १५ राज्यांमध्ये होणार मतदार याद्यांची पडताळणी; एसआयआरचा पहिला टप्पा पुढील आठवड्यात सुरू
11
धार्मिक द्वेषाचा अजेंडा राबवण्याचा डाव, सणातही समाजामध्ये द्वेष पसरविण्याचे काम : वर्षा गायकवाड
12
जर शांतता करार झाला नाही तर थेट युद्ध होईल; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांची अफगाणिस्तानला धमकी
13
ज्या सिरपनं घेतला २६ मुलांचा जीव, 'त्या' औषध कंपनीनं भाजपाला दिले ९४५ कोटी?; काँग्रेस नेत्याचा दावा
14
पूर्ववैमनस्यातून कराडच्या नांदलापूर येथे युवकाचा खून; ५ जणांनी केला तलवार, कोयत्याने वार
15
वादग्रस्त प्रतिभा टॉवरच्या पुनर्विकासाचा मार्ग मोकळा; मुंबई उच्च न्यायालयाचा स्थगितीस नकार, निर्णयाने दिलासा
16
"रोहितसोबत फलंदाजी करणं सोपं गेलं, कारण..."; विराट कोहलीने सांगून टाकली 'मन की बात'
17
भारतासाठी धोका! 'चिकन नेक'जवळ चीन घुसण्याच्या तयारीत?; बांगलादेशी समर्थक रस्त्यावर उतरले
18
राज्यसभा निवडणुकीत भाजपा आमच्याकडे डील करायला आली होती, पण...; फारूख अब्दुल्लांचा गौप्यस्फोट
19
IND vs AUS: "आता घरचे लोक पण टोमणे मारतात..."; पत्रकाराच्या 'त्या' प्रश्नावर गिलचं उत्तर
20
Smartphones: १५ हजारांच्या बजेटमध्ये चांगला स्मार्टफोन शोधताय? 'हे' आहेत बेस्ट ऑप्शन!

जिल्ह्यातील ५८३ गावांत एप्रिलमध्ये डोक्यावर येणार हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा ...

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ५८३ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भूवैज्ञानिकांनी निरीक्षण विहिरींवरून ही बाब पुढे आली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. यांतर्गत भूवैज्ञानिक जिल्ह्यात निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीची पाणी पातळी मोजून हा आराखडा तयार करीत असतात.

२४ फेब्रुवारीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८३ गावांमध्ये एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यात ४४२ मोठी गावे, तर १३१ लहान गावांचा समावेश आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे.

संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात केवळ सहा विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाईची फारशी समस्या जाणवणार नाही. मात्र, एप्रिल ते जूनदरम्यान काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट हाेऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना सुरू केल्या.

२२३ विंधनविहिरी तयार करणार

संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी २२३ बोअरवेलचे खोदकाम, ११९६ बोअरवेलची दुरुस्ती, १४६ विहिरींमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे.

दरवर्षी केल्या जातात उपाययाेजना तरी समस्या

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठ्यांतर्गत दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातोे. मात्र यानंतरही पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. पण यानंतरही पाणीटंचाईची समस्या कायम राहत आहे. त्यामुळे या उपाययोजनांवर नेमका खर्च केला जातो किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे दरवर्षी ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्या तोंड द्यावे लागत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करा

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ३०० गावात तर यंदा ५८३ गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आतापासून याची चिंता लागली आहे. तहान लागली की विहिरी खोदणे, बोअरवेलचे खोदकाम केले जाते. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे नियोजन ढासळत आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्व बाबींचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची गरज आहे, तरच ही समस्या मार्गी लागू शकते.