शहरं
Join us  
Trending Stories
1
रिझर्व्ह बँकेचा 100, 200 रुपयांच्या नोटांबद्दल महत्त्वाचा निर्णय, सर्वसामान्यांना मिळणार दिलासा
2
परप्रांतीय प्रियकराच्या मदतीनं पतीचा काढला काटा; हत्येनंतर अपघाताचा रचला बनाव, पण...
3
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
4
आजचे राशीभविष्य, २९ एप्रिल २०२५: सार्वजनिक क्षेत्रात मानहानी होण्याची शक्यता
5
तीन देशांत एकाच वेळी वीज गायब; सर्व काही थांबले; देशभरातील वाहतूक सिग्नलवर परिणाम
6
१६ पाकिस्तानी यूट्युब चॅनेलवर सरकारची बंदी; केंद्रीय गृहमंत्रालयाच्या शिफारशींनुसार बंदी
7
त्यांची जबाबदारी माझ्यावर होती, मी माफी कशी मागू, शब्द नाहीत; मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांनी दिली कबुली
8
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
9
गूढ कायम.. खरं, खोट्याचा होईना उलगडा; डॉ. वळसंगकरांच्या आत्महत्येला दहा दिवस ओलांडले
10
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
11
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
12
‘लिव्ह इन’, उत्तराखंड आणि समान नागरी संहिता
13
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
14
मुलांचा ताबा देताना धर्म विचारात घेतला जाऊ शकत नाही : हायकोर्ट
15
कान टोचले, बरे झाले ! केंद्राने विशेष पत्रक काढून माध्यमांना काही मार्गदर्शक सूचना दिल्या
16
पाण्यासाठी भारत-पाक युद्ध पेटण्याची वेळ येऊन ठेपली ?
17
मोठमोठे रस्ते बांधत आहात, इकडे लाेकांचा जीव जाताेय; जखमींवर कॅशलेस उपचारांवरून सर्वाेच्च न्यायालयाने केंद्राला फटकारले
18
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!

जिल्ह्यातील ५८३ गावांत एप्रिलमध्ये डोक्यावर येणार हंडा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 4, 2021 04:56 IST

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा ...

गोंदिया : मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला असला तरी आणि सिंचन प्रकल्पांमध्ये पुरेसा पाणी साठा असला तरी यंदा एप्रिल ते जून महिन्यात जिल्ह्यातील ५८३ गावांतील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे. जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या भूवैज्ञानिकांनी निरीक्षण विहिरींवरून ही बाब पुढे आली आहे.

ग्रामीण पाणीपुरवठा विभागातर्फे दरवर्षी तीन टप्प्यांत जिल्ह्यातील पाणीटंचाईचा आराखडा तयार केला जातो. यांतर्गत भूवैज्ञानिक जिल्ह्यात निश्चित केलेल्या निरीक्षण विहिरीची पाणी पातळी मोजून हा आराखडा तयार करीत असतात.

२४ फेब्रुवारीला तयार करण्यात आलेल्या आराखड्यानुसार जिल्ह्यातील ५८३ गावांमध्ये एप्रिल ते जून महिन्यादरम्यान पाणीटंचाईची समस्या निर्माण होणार आहे. यात ४४२ मोठी गावे, तर १३१ लहान गावांचा समावेश आहे. यावर उपाययोजना करण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी कृती आराखड्याला मंजुरी दिली आहे.

संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे.

जिल्ह्यात केवळ सहा विहिरींचे अधिग्रहण

जिल्ह्यात मार्च महिन्यापर्यंत पाणीटंचाईची फारशी समस्या जाणवणार नाही. मात्र, एप्रिल ते जूनदरम्यान काही गावांमध्ये पाणीटंचाईची समस्या अधिक बिकट हाेऊ शकते. त्यामुळे या गावांमध्ये उपाययोजना करणे आवश्यक आहे. त्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने उपाययोजना सुरू केल्या.

२२३ विंधनविहिरी तयार करणार

संभाव्य पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी १६४७ उपाययोजनांचा आराखडा तयार केला असून, त्याला जिल्हाधिकाऱ्यांनी मंजुरी दिली आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी २२३ बोअरवेलचे खोदकाम, ११९६ बोअरवेलची दुरुस्ती, १४६ विहिरींमधील गाळाचा उपसा करण्यात येणार आहे.

दरवर्षी केल्या जातात उपाययाेजना तरी समस्या

जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठ्यांतर्गत दरवर्षी पाणीटंचाईवर मात करण्यासाठी उपाययोजना करण्यासाठी कोट्यवधी रुपयांचा निधी खर्च केला जातोे. मात्र यानंतरही पाणीटंचाईची समस्या निर्माण होते. मागील वर्षी जिल्ह्यात समाधानकारक पाऊस झाला. पण यानंतरही पाणीटंचाईची समस्या कायम राहत आहे. त्यामुळे या उपाययोजनांवर नेमका खर्च केला जातो किंवा नाही, असा प्रश्न निर्माण झाला आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षित धोरणामुळे दरवर्षी ग्रामीण भागातील नागरिकांना पाणीटंचाईच्या समस्या तोंड द्यावे लागत आहे.

कायमस्वरूपी उपाययोजना करा

तलावांचा जिल्हा अशी ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात दरवर्षी पाणीटंचाईची समस्या गंभीर होत चालली आहे. मागील वर्षी जिल्ह्यातील ३०० गावात तर यंदा ५८३ गावात पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. त्यामुळे गावकऱ्यांना आतापासून याची चिंता लागली आहे. तहान लागली की विहिरी खोदणे, बोअरवेलचे खोदकाम केले जाते. दरवर्षी उन्हाळ्याच्या तोंडावर उपाययोजना केल्या जातात. त्यामुळे नियोजन ढासळत आहे. पाणीटंचाईच्या समस्येवर मात करण्यासाठी जिल्हा परिषद ग्रामीण पाणीपुरवठा विभागाने सर्व बाबींचा अभ्यास करून उपाययोजना करण्याची गरज आहे, तरच ही समस्या मार्गी लागू शकते.