शहरं
Join us  
Trending Stories
1
थर्टी फर्स्टचा जल्लोष पहाटेपर्यंत! हॉटेल आणि बार पहाटे ५ वाजेपर्यंत सुरू राहणार; राज्य सरकारचा मोठा निर्णय
2
Solapur Municipal Corporation Election 2025 : सोलापूरात मोठी राजकीय खेळी! ठाकरेंच्या जिल्हाप्रमुखाने ऐनवेळेला भाजपाकडून भरला फॉर्म
3
Stock Market Holiday 2026 List: NSE-BSE नं जारी केली २०२६ ची सुट्ट्यांची यादी; पाहा किती आहेत लाँग वीकेंड्स?
4
Panvel Municipal Election 2026: पनवेलमध्ये 'मविआ'ला झटका! भाजपाचे नितीन पाटील बिनविरोध, मतदानाआधीच तीन ठिकाणी फुललं 'कमळ'
5
संतापजनक! चालत्या कारमध्ये दोन तास लैंगिक अत्याचार, तरुणीला मारहाण; मध्यरात्री रस्त्यावर फेकून दिले
6
“काँग्रेसमुक्त भारतची वल्गना करणारा भाजपा ‘कार्यकर्ता मुक्त भाजपा’ झाला”: हर्षवर्धन सपकाळ
7
लालू यादवांचा मुलगा तेज प्रताप यादव यांची तब्येत अचानक बिघडली, रुग्णालयात दाखल, काय झालं?
8
इंदूरमध्ये दूषित पाण्याचा कहर, विषारी पाण्यामुळे आतापर्यंत ८ जणांचा मृत्यू, हजारो जण बाधित
9
DSP संतोष पटेल यांनी 26 वर्षांनंतर फेडले ‘रक्ताचे ऋण’; संतु मास्टरच्या कुटुंबाची जबाबदारी स्वीकारली
10
आईशी भांडली, रागाने घराबाहेर पडली, नराधमाच्या तावडीत सापडली; तरुणीसोबत घडलं भयंकर
11
ऐन मनपा निवडणुकीत मनसेला मोठा धक्का! माजी नगरसेवकांचा पक्षाला रामराम, शिंदे गटात प्रवेश
12
भारत तिसऱ्या क्रमांकाची अर्थव्यवस्था कधी बनणार; पाकिस्तानचा समावेश टॉप १० मध्ये आहे का?
13
आता कितीही धुके असू दे, वेगवान वंदे भारत ट्रेन थांबणार नाही; भारतीय रेल्वेने उचलले मोठे पाऊल!
14
कोण होती तातियाना श्लॉसबर्ग? अमेरिकन माजी राष्ट्राध्यक्षांच्या नातीचा ३५व्या वर्षी मृत्यू
15
वाजत-गाजत आघाडी केली, आता काँग्रेसला डोक्यावर हात मारायची वेळ आली; ‘वंचित’मुळे मोठा धक्का!
16
"अहंकार दुखावल्याने त्याने मलाच सिनेमातून काढून टाकलं...", बॉलिवूड दिग्दर्शकाकडून अक्षय खन्नाची पोलखोल
17
शिंदेसेनेत उफाळली नाराजी; ५०० हून अधिक होते इच्छुक
18
Video: मराठी तरुणाला २ तास डांबल्याचा आरोप, भाईंदर रेल्वेस्टेशनवरील प्रकार, नेमकं काय घडलं?
19
मुंबईत मतदानापूर्वीच दोन प्रभागातून महायुती बाद, प्रभाग क्र. २११ आणि २१२ मध्ये काय घडलं?
20
'मुस्लीम मुंबई' करण्याचं षडयंत्र हिंदू हाणून पाडेल; किरीट सोमय्यांचा ठाकरे बंधूंवर हल्लाबोल
Daily Top 2Weekly Top 5

ऑनलाइन शिक्षणात गरीब विद्यार्थी माघारणार

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 05:01 IST

या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रतिसाद देतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल सुविधा उपलब्ध नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.

ठळक मुद्देस्मार्ट फोन घेणे गोरगरीब पालकांच्या आवक्या बाहेर : विद्यार्थ्यांची होतेय अडचण

लोकमत न्यूज नेटवर्ककेशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शिक्षण विभागाने दिलेल्या सूचनेनुसार शहराप्रमाणे ग्रामीण भागातील शिक्षकांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणालीद्वारे शिक्षण देणे सुरु केले आहे. ज्या विद्यार्थ्यांच्या पालकाकडे स्मार्ट मोबाईल फोन आहेत. त्या विद्यार्थ्यांसाठी ऑनलाइन प्रणालीचे शिक्षण शक्य आहे.परंतु ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट फोन उपलब्ध नाहीत किंवा ते घेवू शकत नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये माघारल्याशिवाय राहणार नाही. गरीब विद्यार्थ्यांची ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये कुचंबना होत आहे.या परिसरातील सर्वच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती बेताची असून काही मोजक्याच विद्यार्थ्यांची आर्थिक परिस्थिती चांगली असते. ज्यांची परिस्थिती चांगली असेल त्यांच्या पालकांकडे स्मार्ट मोबाईल असतील ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीला प्रतिसाद देतील. मात्र ज्या विद्यार्थ्यांकडे स्मार्ट मोबाईल सुविधा उपलब्ध नाही ते विद्यार्थी ऑनलाइन शिक्षण प्रणालीमध्ये वंचित राहण्याची परिस्थिती निर्माण झाली आहे.गरज म्हणून केवळ शिक्षणासाठी महागड्या किंमतीच्या स्मार्ट मोबाईल खरेदी करणे गरीब विद्यार्थ्यांना शक्यच नाही. कोरोना विषाणूच्या महामारीने थैमान घातले आहे. त्यामुळे शासनाने लॉकडाऊन ३१ जुुुलैपर्यंत वाढविले आहे. परिणामी अनेकांचा रोजगार हिरावला आहे. अशा अडचणीत उदरनिर्वाहासाठी कसरत करावी लागत आहे. यातच शहरी विभागासारखेच या ग्रामीण भागातील शाळांनी सुद्धा ऑनलाइन शिक्षण प्रणाली देण्याची सज्जता दाखविली आहे. यामुळे मात्र गरीब विद्यार्थी ऑनलाइन शिक्षणप्रणालीपासून वंचित राहण्याची वेळ आली आहे. काही विद्यार्थ्यांची कुंचबना होताना दिसत आहे.या परिसरात शेतकरी, शेतमजूर अधिक प्रमाणात आहेत. त्यामुळे आपल्या पाल्यांना सात आठ हजार रुपये किमतीचा स्मार्ट मोबाईल खरेदी करुन देणे शक्य होणार नाही. या ऑनलाइन शिक्षणप्रणालीमध्ये ग्रामीण भागातील गरीब विद्यार्थी माघारल्याशिवाय राहणार नाही.

टॅग्स :Studentविद्यार्थी