शहरं
Join us  
Trending Stories
1
‘पीओके’मधील दहशतवादी नेटवर्कवर भारत करणार प्रहार; उच्चस्तरीय विचारविनिमय सुरू; ४२ सक्रिय दहशतवादी तळ केंद्राच्या रडारवर
2
नौदलाच्या ताफ्यात येणार फ्रान्सची २६ राफेल विमाने; ६४ हजार कोटींच्या खरेदी करारावर देशांच्या स्वाक्षऱ्या
3
‘म्हाडा’चे ५ हजार घरांचे दिवाळी गिफ्ट; जुन्या इमारतीचाही पुनर्विकास होणार
4
१९ चाळींचा पुनर्विकास एमएमआरडीए करणार; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत महत्त्वपूर्ण निर्णय
5
बुलेट ट्रेन २०२८ अखेरीस मुंबईतून धावणार सुसाट, नवी मुंबई विमानतळ गेम चेंजर ; मुख्यमंत्री फडणवीस
6
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
7
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
8
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
9
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
10
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
11
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
12
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
13
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
14
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
15
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
16
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
17
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
18
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
19
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
20
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय

तलावांच्या जलोद्यानाचे काम जोमात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 3, 2019 06:00 IST

गोंदिया व भंडारा हे तलावांचे जिल्हे आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी आणि सारस पक्ष्यांसाठी प्रसिद्ध होता. परंतु जलाशयांची गुणवत्ता घसरली व पक्ष्यांची संख्या ही कमी झाली.

ठळक मुद्देराज्यातील पहिलाच प्रयोग : मग्रारोहयोच्या कामांमुळे जैवविविधतेला धोका

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : जलाशयांचे पर्यावरण व विविधतेतील इतर घटक निर्भर असतात. पण जलाशयांचे पर्यावरणच दुषीत असेल तर हे घटक पाठ फिरवितात. तलावांचा जिल्हा म्हणून ओळख असलेल्या गोंदिया जिल्ह्यात हीच स्थिती आहे. सारस आणि स्थलांतीत पक्ष्यांचे माहेरघर असलेल्या गोंदिया जिल्ह्यातील जलाशयांचे पर्यावरण टिकविण्यासाठी स्वयंसेवीनी सन २०१२ पासून धडपड सुरू केली. त्यातून परसवाडा, लोहारा व आमगाव येथील नवतलाव अशी तीन उत्कृष्ट जलोद्याने तयार झालीत. तर बाजारटोला, झालीया, झिलमीली यांच्यावर काम सुरू आहेत. हा राज्यातील पहिला प्रयोग ठरला आहे.गोंदिया व भंडारा हे तलावांचे जिल्हे आहेत. एकट्या गोंदिया जिल्ह्यात काही दशकापूर्वी ३० हजारांच्या जवळपास जलाशये होती. पण आता काहीच जलाशये शिल्लक राहिली आहेत. ज्या जलाशयांची जैवविविधता चांगली त्यावर पक्षी येतात. गोंदिया जिल्हा कधीकाळी स्थलांतरीत पक्षी आणि सारस पक्ष्यांसाठी प्रसिद्ध होता. परंतु जलाशयांची गुणवत्ता घसरली व पक्ष्यांची संख्या ही कमी झाली. सारस संवर्धनासाठी काम करणाऱ्या सेवा संस्थेच्या चमूने पक्ष्यांचा अधिवास असणारी जलाशये निवडली. परसवाडा, लोहारा आणि आमगाव येथील नवतलाव या तीन तलावांकरिता सामाजिक वनिकरण, जैवविविधता विभाग व वनविभागाची मदत घेवून या जलाशयाची स्थिती सुधारण्याचा प्रयत्न केला.जलाशयांची स्थिती, त्यांची जैवविविधता, त्यावर येणारे पक्षी आणि पर्यावरण याचा अभ्यास करुन जलाशय टिकविण्याच्या मूळ कारणांचा शोध घेण्यात आला. या तीन गावांनंतर जिल्ह्यातील ३० तलावांसाठी सेवा संस्थेच्या माध्यमातून समाज आधारीत संवर्धनावर अभ्यासपूर्ण व्यवस्थापन आणि कृती आराखडा तयार केला. यात अशाच गावातील जलाशये निवडण्यात आली. ज्यांना तिथल्या वनस्पती व पक्ष्यांचे ज्ञान आहे.तलाव वाचेल तर पक्षी वाचतील हे ज्यांना समजते त्यांना सोबत घेवून जिल्हा प्रशासनाकडे या संदर्भात प्रस्ताव ही पाठविला. सारसांच्या भवितव्याचा आणि गोंदिया जिल्ह्यातील स्थानिक व स्थलांतरीत पक्षी वैभव जागतिक पातळीवर नेवून ठेवण्यासाठी प्रशासनाच्यावतीने लवकरच सकारात्मक पावले उचलली जातील. नवेगावबांधच्या नवेगाव तलावाचे देखील पुर्नरजीवन केले जाणार आहे. सेवा संस्थेचे सावन बहेकार, चेतन जसानी, मुनेश गौतम, अविजीत परिहार, अंकित ठाकुर, शशांक लाडेकर, कन्हैया उदापुरे, दुष्यंत आकरे हे जुन्या तलावांना पुनर्जीवन देण्यासाठी प्रयत्न करीत आहेत.यामुळे नष्ट होतात जैवविविधतागेल्या काही वर्षात जलाशयांमध्ये बेशरम (ईकोर्निया) यासारख्या वनस्पतींचा प्रादुर्भाव होत आहे. त्यामुळे जलाशयाची जैवविविधता नष्ट होत आहे. मासेमारी संघटनांना जलाशयावर मासेमारी करण्यासाठी लिज दिली जाते. या जलशयांमध्ये कोणत्या प्रजातीच्या मासांचे आणि किती प्रमाणात त्यांचे बीज टाकले जावे यासंदर्भात नियम आहेत. परंतु नियमांचे पालन होत नाही आणि प्रशासनही याकडे दुर्लक्ष करते. प्रशासनाचे दुर्लक्ष असल्यामुळे याचाच फायदा घेत मासेमारी संघटना अधिक उत्पादन घेण्याच्या नादात झटपट वाढणाºया मास्यांचे बीज टाकतात. त्याचा दुष्परिणाम जलाशयांच्या जैवविविधतेवर होतो.मग्रारोहयोची कामे तलावांवर टाळाज्या जलाशयांवर पक्ष्यांचा अधिवास आहे त्या तलावांवर रोहयोची कामे करू नयेत. जलाशयाच्या आजुबाजूला असणाºया शेतांमध्ये रासायनिक खते आणि औषधांची फवारणी केली जाते. या शेतांमधील पाणी जलाशयात येत असल्यामुळे जलाशयातील पाण्याची गुणवत्ता खराब होते. मग्रारोहयो अंतर्गत व इतर योजनांच्या माध्यमातून करण्यात येणाºया जलाशयांचे खोलीकरण यामुळे जैवविविधतेला धोका पोहोचतो. तलावातील वनस्पती नष्ट होतात. परिणामी पक्ष्यांचे अधिवास असलेल्या तलावांवर खोलीकरणाची कामे करण्यात येऊ नयेत.जिल्ह्यातील ९० टक्के जलाशये संपलीशासकीय, मालगुजारी, मध्यम प्रकल्प, खासगी असे जलाशयांचे अनेक प्रकार आहेत. गोंदिया जिल्ह्यात हजारो जलाशये होती. परंतु अलिकडे आलेल्या अहवालानुसार गोंदिया जिल्ह्यातील ९० टक्के जलाशये संपली आहेत. हे जलाशय सिंचन व त्यातील मासेमारी मालकापुरतीच होते. मात्र कुटुंब विस्तारत गेले आणि जलाशयाची जागा शेतीने घेतली. माजी मालगुजारी जलाशय परिसरातील शेती अतिक्रमणाच्या विळख्यात सापडले. खासगी तलाव संपण्याच्या मार्गावर असले तरीही इतर तलाव कसे वाचविता येतील यासाठी प्रशासनाने ही गांभीर्याने घेणे गरजेचे आहे.तालवांचे रिस्टोरेशन आणि व्यवस्थापन आराखडा, त्यानंतर कृती आराखडा आणि अमंलबजावणी करून तीन तलावांचे पुनरूज्जीवन करण्यात आले. ग्रामस्थांना विश्वासात घेऊन कामे केली जातात. गावात जनजागृती म्हणून भिंतीवर चित्र काढून जनजागृती करण्यात येते. जिल्ह्यातील तीन जलाशये पक्ष्यांच्या संवर्धनासाठी ‘मॉडेल’ आहेत.सावन बहेकारवन्यजीवतज्ज्ञ तथा अध्यक्ष सेवा संस्था, गोंदिया. 

टॅग्स :birds sanctuaryपक्षी अभयारण्य