शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठा आंदोलनात नियमांचे उल्लंघन, हायकोर्टाची नाराजी; राज्य सरकारला निर्देश, सुनावणीत काय घडले?
2
‘मतचोरीचा अणुबॉम्ब टाकला, आता हायड्रोजन बॉम्ब येणार, त्यानंतर नरेंद्र मोदी...', राहुल गांधींचा निशाणा
3
युरोपियन युनियनचे नेते बल्गेरियावरून जात होते, रशियाने विमानाचे रडारच जाम करून टाकले...
4
अंबानी कुटुंबाने घेतला मोठा निर्णय; वाढत्या तणावादरम्यान विशेष कार्यक्रम पुढे ढकलला !
5
Manoj Jarange Patil Maratha Morcha Live: मराठा आंदोलन: मुंबई हायकोर्टातील आजचे कामकाज संपले; उद्या दुपारी ३ वाजता पुन्हा सुनावणी
6
ड्रीम गर्ल हेमा मालिनी यांनी मुंबईत विकले २ फ्लॅट; 'एवढ्या' कोटींमध्ये झाला व्यवहार, बाजारभावापेक्षा दुप्पट नफा
7
हैदराबाद गॅझेट लागू करण्याबाबत मसुदा तयार, पण...; राधाकृष्ण विखे पाटील यांची महत्त्वाची माहिती
8
सेंट झेवियर्स कॉलेजच्या ‘मल्हार’ फेस्टिव्हलमध्ये तरुणाईचा कल्ला; 'या' टीमने मारली बाजी
9
गिलमुळे 'तळ्यात-मळ्यात' असलेल्या संजूचा 'फिफ्टी प्लस'चा चौकार! दावेदारी भक्कम केलीये खरी, पण...
10
AIने हे काय केलं, मुलाच्या हातून आईला संपवलं! नेमकं प्रकरण काय? जाणून बसेल धक्का
11
Maratha Morcha : मुख्यमंत्री साहेब, तुमच्या हातातली वेळ गेलेली नाही, महाराष्ट्र मुंबईत यायला निघण्याआधी निर्णय घ्या; मनोज जरांगेंचा इशारा
12
बिजुरिया बिजुरिया! सोनू निगमसोबत वरुण धवनचा जबरदस्त डान्स, अभिनेता म्हणाला...
13
वहिनीचा दीरावर जडला जीव; रात्री पतीला एका खोलीत कोंडून 'ती' दिराच्या खोलीत गेली अन्...
14
तुम्हीही तुमच्या पगारवाढीचा हिशोब लावताय? वेतनवाढ कशी ठरते? संपूर्ण गणित सोप्या भाषेत समजून घ्या
15
Manoj Jarange Patil: "माझ्या पोरांवर दादागिरी करायची नाही, एकालाही काठी लावली तर मुंबईसह महाराष्ट्र बंद करू"
16
चीनचे राष्ट्राध्यक्ष जिनपिंग यांची आवडती कार, मोदींनीही केली सफर! 'लाल झेंडा' असलेल्या 'या' गाडीत खास काय?
17
भारतात रस्ते अपघातात दर तासाला २० जणांचा मृत्यू, अहवालातून समोर आली धक्कादायक माहिती
18
GST कमी झाल्यास, किती स्वस्त होऊ शकते मोस्ट-सेलिंग Maruti Ertiga? किती रुपयांचा होऊ शकतो फायदा? जाणून घ्या
19
'आरक्षण बचाव'ची मागणी, मराठा आंदोलनाचे केंद्रबिंदू अंतरवाली सराटीत ओबीसींचे उपोषण
20
Mumbai Local: मराठा आंदोलनामुळे मुंबईची लाईफलाईन खोळंबली! सीएसएमटी स्टेशनवर पोलिसांचा मोठा बंदोबस्त

नळधारकांची आर्थिक लूट

By admin | Updated: October 31, 2015 02:44 IST

अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नळधारकांची खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने आर्थिक लूट करणे सुरू केले आहे.

नागरिकांचा आरोप : प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाचा गैरकारभारगोठणगाव : अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजनेच्या नळधारकांची खांबी प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने आर्थिक लूट करणे सुरू केले आहे. सविस्तर वृत्त असे की, अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाने सप्टेंबर २०११ पासून फेब्रुवारी २०१५ पर्यंत विद्युत बिलाच्या ५० टक्के अनुदानावर योजना चालविली जात होती. पण थकीत विद्युत बिलामुळे योजना बंद होती. त्यावेळी पाणी पट्टी ८० रूपयेप्रमाणे प्रति महिना वसुली होत असे. बंद पडलेली योजना सुरू करण्यासाठी जिल्हा परिषद प्रशासनाने जलस्वराज्य योजनेमध्ये समाविष्ट केले. ५ मे २०१५ पासून सदर योजनेचा विद्युत बिल शंभर टक्के व तुटफूट दुरूस्त्या शासनाकडून खर्च केल्या जाते. तरी पण संबंधित प्रादेशिक पाणी पुरवठा मंडळाने पाणी पट्टीकर कमी केले नाही. यावरून नळधारकांची लूट होत असल्याचे नळ धारकांकडून बोलल्या जात आहे. अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणी पुरवठा योजनेकडे एकूण एक हजार ३५० नळ कनेक्शन सुरू आहेत. त्यांचे ८० रूपये प्रमाणे एकूण मासिक वसुली सरासरी एक लाख आठ हजार रूपये होते. त्यापैकी सरासरी ४० हजार रूपये नोकर पगारावर खर्च केल्या जाते. उर्वरित ६८ हजार रूपये घशात उतरविले जात आहे.या प्रकारामुळे नळधारक नागरिकांची आर्थिक लूट मोठ्या प्रमाणात होत आहे. (वार्ताहर)वैऱ्याने साधला डावथकीत बिलामुळे बंद असलेली योजना जिल्हा परिषद प्रशासनाने स्वत:कडे हस्तांतरित केली. १०० टक्के विद्युत बिल व तुटफूट दुरूस्त्यावर खर्च करण्याची जबाबदारी स्वीकारली. हे लक्षात येताच संबंधित मंडळाने अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाच्या तत्कालीन अध्यक्षाला मंडळ बरखास्त झाल्याचे लिहून घेतले आणि डाव साधला. परंतु ग्रामीण पाणीपुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांनी मंडळ बरखास्तीचा ठराव नसताना लेखी निवेदनावर अध्यक्ष व सचिव यांच्या संयुक्त सहीविना असलेले पत्र कसे मंजूर केले, हे एक कोडेच आहे. वास्तविक जिल्हा परिषदेने योजना स्वत:कडे हस्तांतरित केल्यानंतर योजना चालविण्यासंबंधी नियमाने निविदा काढायला हवी होती. निविदेच्या माध्यमातून जो कुणी येईल त्यांना देणे आवश्यक होते. मात्र तसे न करता सरळ खांबी प्रादेशिक पाणीपुरवठा मंडळाला देण्यात आले. पाणीपट्टी वसूली मात्र अर्जुनी-मोरगाव प्रादेशिक पाणीपुरवठा योजना या नावाने वसूल केल्या जाते. नियमाला डावलण्यात आल्याचा आरोप नळधारकांनी केला आहे.