शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
3
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
4
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
5
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
6
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
7
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
8
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
9
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
10
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
11
Daund Local Body Election Result 2025: दौंडला दोन्ही गट सत्तेत; नगराध्यक्षपदी राष्ट्रवादी काँग्रेसच्या दुर्गादेवी जगदाळे
12
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
13
“नगरपालिका निवडणुकीतील महायुतीचा विजय निवडणूक आयोगाच्या आशिर्वादाने”: हर्षवर्धन सपकाळ
14
Nagpur Election News: CM फडणवीसांच्या जिल्ह्यात कोणाचे किती नगराध्यक्ष, भाजपने कुठे-कुठे उधळला गुलाल?
15
४० वर्षांची काँग्रेसची सत्ता उलथवली; धुळ्यात भाजपाचा ऐतिहासिक विजय, ३२ पैकी ३१ जागा आल्या
16
Sanjay Raut : "'तेच' आकडे, 'तेच' मशीन, १२०-१२५..."; संजय राऊतांचा वेगळाच तर्क! संपूर्ण निकालावरच प्रश्नचिन्ह
17
वीज बिल वसुलीसाठी गेलेल्या टीमवर लाठ्या-काठ्यांनी हल्ला; जीव वाचवण्यासाठी कर्मचाऱ्यांची पळापळ
18
IND vs PAK U19 Asia Cup Final : अपराजित युवा टीम इंडियाला फायनलमध्ये पराभवाचा धक्का! पाकनं १३ वर्षांनी उंचावली ट्रॉफी
19
नगर परिषदा, पंचायत निवडणुकीत भाजपाला भरघोस यश; प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण म्हणाले...
20
T20 World Cup 2026: शुभमन गिलला का वगळलं? गंभीरला एअरपोर्टवर प्रश्न; काय मिळालं उत्तर?
Daily Top 2Weekly Top 5

१० हजार हेक्टरवरील रोवण्या खोळंबल्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 29, 2020 05:00 IST

तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोना संकटाने अनेक उद्योगधंदे डबघाईस आले आहे. त्यावर शेतीत दगा मिळणे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

ठळक मुद्देहलक्या धानाचे पऱ्हे झाले मुदतबाह्य : पावसाच्या प्रतीक्षेत शेतकरी हवालदिल

विजय मानकर ।लोकमत न्यूज नेटवर्कसालेकसा : भात पिकाची रोवणी करण्यासाठी वाट पाहता-पाहता जुलै महिना संपत आला तरी पावसाने दमदार हजेरी लावली नाही. त्यामुळे तालुक्यातील जवळपास १० हजार हेक्टरवरील क्षेत्रात धान रोवणी रखडली आहे. आता पुढे पाऊस आला तरी हलक्या वाणाच्या धानाच्या उत्पादनावर याचा परिणाम होण्याची शक्यता आहे. जड धानाची रोवणी काही प्रमाणात आटोपली असली तरी फक्त ३६ टक्केच रोवणी झाले आहे.तालुक्यात १७ हजार ५०० हेक्टर एकूण लागवड क्षेत्र आहे. यापैकी १६ हजार हेक्टर शेतीमध्ये भातपीकघेतले जाते. अर्थात भाताची शेती ही तालुक्याच्या अर्थव्यवस्थेचा कणा आहे. अशात भाताची रोवणी खोळंबणे म्हणजे तालुक्याची अर्थव्यवस्था प्रभावित करणे होय. एकीकडे कोरोना संकटाने अनेक उद्योगधंदे डबघाईस आले आहे. त्यावर शेतीत दगा मिळणे मोठे आर्थिक संकट निर्माण होण्याची शक्यता नाकारता येत नाही. भातपिकाच्या हंगामाबाबत विचार केला तर जून व जुलै महिन्याच्या पावसावर खरीप हंगाम अवलंबून असतो. यामध्ये जून महिना पेरणीचा तर जुलै महिना रोवणीचा मानला जातो. परंतु मध्यला काळात एक दोनदा झालेल्या पावसाचा अपवाद वगळता संपूर्ण जुलै महिना कोरडा गेला. त्यामुळे वरथेंबी पावसावर अवलंबून असलेल्या शेतकऱ्यांची रोवणी पूर्णपणे खोळंबली आहेत. तालुक्यात ओलीत आणि कोरडवाहू क्षेत्र मिळून जवळपास १६ हजार हेक्टरवर धानाचे पीक घेतले जाते. यापैकी १००-२०० हेक्टर पर्यंत क्षेत्रात आवत्या टाकल्या जातो. बाकी मोठ्या प्रमाणावर नर्सरीची रोवणी करुनच भात लागवड केली जाते. आतापर्यंत तालुक्यात फक्त ५ हजार ९३१ हेक्टरवरच धान रोवणी करण्यात आली आहे. ज्या शेतकऱ्यांकडे ओलीत क्षेत्राची शेत जमीन आहे किंवा ज्या शेतकऱ्यांच्या शेतात बोअरवेल व विहिरीचे साधन त्यांनीच रोवणी केलेली आहे. यात एकमेकाला मदत करीत असताना ओलीत क्षेत्रव्यतिरीक्त ५०० हेक्टरवर कोरडवाहू क्षेत्रात ही धान रोवणी झालेली आहे.ज्या शेतकऱ्यांच्या शेतात कालव्याचे पाणी उशीरा पोहचले किंवा पऱ्हे उशीरा आले असे शेतकरी सध्या रोवणी करीत आहे. एकंदरीत विचार केला तर तालुक्यात अशीच परिस्थिती राहिली तर जेमतेम सात हजार हेक्टरपर्यंतच रोवणी पूर्ण होऊ शकेल.शेतकऱ्यांचा अंदाज चुकलादरवर्षी मृग नक्षत्र बहुतेक कोरडे जाते किंवा मृगाच्या उत्तरार्धात थोड्याफार मृगधारा बरसतात. परंतु यंदा मृृग नक्षत्राच्या आरंभी आणि मध्ये एक दोन वेळा पावसाने सामान्य हजेरी लावली. पुढे ही पाऊस समाधानकारक पडेल या अपेक्षेने शेतकºयांनी बऱ्याच प्रमाणात मृगातच पऱ्हे टाकले.त्यामुळे जुलै महिन्याच्या पहिला आठवड्यात रोवणी सुरु होणे आवश्यक होते. परंतु जुलै महिना संपत असून सुद्धा पाऊस आला नाही त्यामुळे शेतकरी फसला.पऱ्हे वाळण्याच्या मार्गावरहलक्या धानाची नर्सरी पेरणीपासून २० ते ३० दिवसात रोवणी झालेली उत्तम मानली जाते. परंतु हलक्या वाणाची नर्सरी दीड महिन्यापेक्षा जास्त कालावधी झाली असून रोवणीसाठी मुदतबाह्य झालेली आहे. अशात आता पुढे या नर्सरीची रोवणी केली तरी उत्पादनावर मोठा फटका बसेल एवढे नक्की.हवामान खात्याचा अंदाज फोलयंदा हवामान खात्याने दिलेला अंदाज पूर्णत: फोल ठरताना दिसत आहे. सरासरी पेक्षा जास्त पाऊस पडेल म्हणत असताना आतापर्यंत निम्मा पाऊसही पडला नाही. आतापर्यंत ६०० मिमी.पाऊस अपेक्षित होते.परंतु आतापर्यंत तालुक्यात २९८ मिमी. पाऊस पडला आहे.

टॅग्स :Rainपाऊसagricultureशेती