शहरं
Join us  
Trending Stories
1
'भारतीय सैन्याने 40 पाकिस्तानी सैनिक मारले', ऑपरेशन सिंदूरबाबत DGMO यांची मोठी माहिती
2
Eknath Shinde: ...तर जगाच्या नकाशातून पाकिस्तानचं नाव कायमचं गायब केलं जाईल, एकनाथ शिंदे पेटले
3
Operation Sindoor : "दहशतवाद्यांचा खात्मा करणं हे 'ऑपरेशन सिंदूर'चं उद्दिष्ट, १०० हून अधिक दहशतवाद्यांना केलं ठार"
4
...तर पाकिस्तानची खैर नाही, आणखी टेन्शन वाढणार; आता दरवर्षी 100 ब्रह्मोस तयार होणार! 
5
India Pakistan Latest Update: भारत पाकिस्तानातील दहशतवादी अड्डे उडवणार, अमेरिकेला आठ दिवस आधीच होती माहिती
6
पन्हाळगडावर पावसाची जोरदार हजेरी, पहिल्याच पावसात मुख्य रस्त्यावर २ मोठ्या शिळा कोसळल्या
7
"वहां से गोली चलेगी, यहां से गोला चलेगा"; PM मोदींचा उच्चस्तरीय बैठकीत लष्कराला स्पष्ट मेसेज
8
"२६ जणांच्या मृत्यूचा बदला घेतला, आम्हाला मोदींचा अभिमान..."; आदिल हुसेनच्या भावाचं विधान
9
Operation Sindoor Live Updates: "जर पाकिस्तानने आज रात्री शस्त्रसंधीचं उल्लंघन केलं तर आम्ही त्याला जोरदार प्रत्युत्तर देऊ"
10
कर्जावर जगणारा पाकिस्तान लढाऊ विमानं, ड्रोन अन् बॉम्ब खरेदीसाठी एवढा पैसा आणतो कुठूण? सैन्याचे उद्योगधंदे जाणून थक्क व्हाल!
11
"गर्व वाटतो... जे मी करू शकलो नाही, ते मुलानं करून दाखवलं...!"; हुतात्मा मेजर पवन यांच्या वडिलांचे शब्द वाचून तुमचेही डोळे पाणावतील
12
'...तर पाकिस्तानला विनाशकारी उत्तर दिलं जाईल', अमेरिकेच्या उपराष्ट्राध्यक्षांसोबत PM मोदींची चर्चा
13
लोणावळ्यात गुलाबी सुटकेसमध्ये आढळलेल्या मृतदेहाचे गूढ उकलले, दोघांना अटक, हत्येचे कारण...
14
दहशतवाद्यांना स्थानिकांची मदत; काश्मीरमध्ये 20 ठिकाणी छापे, स्लीपर सेल मॉड्यूलचा पर्दाफाश
15
मंदिरात दिवा लावण्यासाठी गेलेल्या वृद्ध महिलेची 8 ग्रँम सोने व १० ग्रँम चांदीसाठी हत्या
16
Seema Haider : "तुला कोणीही मारणार नाही, तू परत ये"; ढसाढसा रडली सीमाची बहीण, मोदींकडे मागितली मदत
17
१० वर्षांच्या प्रवासानंतर, एकमेकांचे झाले, अक्षय-साधनाचा सुंदर क्षण, पाहा भावूक करणारा Video
18
तिरंगी वनडे मालिकेत टीम इंडियाचा डंका! यजमान श्रीलंकेला पराभूत करत हरमनप्रीत ब्रिगेडनं जिंकली ट्रॉफी
19
Chandrapur Tiger Attack: चंद्रपुरात वाघाच्या हल्ल्यात ३ महिलांचा मृत्यू, गावकऱ्यांमध्ये घबराट
20
पर्सनल लोन फेडलं नाही तर बँक काय कारवाई करते? कर्ज घेताना काय काळजी घ्यावी?

स्वच्छतेसाठी लोकसहभाग गरजेचा

By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST

राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून

गोंदिया : राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांचा या अभियानात सहभाग मिळवावा, असे निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी सीईओ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालस्वास्थ अभियान व स्वच्छता अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी व मोहिमेमध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी टी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्र.पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भोयर उपस्थित होते.स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत शिंदे यांनी सांगितले की, योग्य नियोजन व सक्रीय सहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल. या अभियानांतर्गत ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान गावपातळीवर स्वच्छता करण्यात येणार असून प्रथम सामुदायिक, सार्वजनिक व शालेय शौचालय व अंगणवाडी स्वच्छतागृहाची दुरुस्ती व वापर करण्यात यावा, तसेच येथे स्वच्छतेकरीता पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी.गावाची सार्वजनिक साफसफाई करण्याकरीता सकाळी ७ ते १० या ठराविक वेळेत स्वच्छता मोहिम राबवावी. मोहिमेचे स्वरुप व्यापक करण्याकरीता गावाचे सर्वेक्षण करणे, ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले. गावपातळीवर स्वच्छता करण्याकरीता प्रत्येक गावाकरीता एक पथक करण्यात येणार असून त्यामध्ये विस्तार अधिकारी, पोलीस कर्मचारी, प्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येईल. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी संबंधितांना स्वच्छतेबाबत निर्देश द्यावे व या मोहिमेमध्ये स्वत: सक्रीय सहभागी व्हावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. कार्यालयीन परिसरातील भिंतीवर लावलेली स्टीकर्स, भिंतीपत्रके काढून भिंती स्वच्छ कराव्या. सूचना फलकाचा वापर करावा, कचरा करताना आढळणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ दंड स्वरुपात कारवाई करण्यासारख्या उपायाचा अवलंब करावा. ठिकठिकाणी स्वच्छता राखा असे सूचना फलक लावावे. आपले घर व आपल्या कार्यालयापासून स्वच्छतेची सुरुवात करण्यात यावी. यावेळी जि.प.च्या पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे अतुल गजभिये यांनी हात स्वच्छता धुण्याचे प्रात्याक्षित करुन दाखविले. सभेला तहसीलदार गोंदियाचे संजय पवार, गोरेगावचे डी.ए. सपाटे, आमगावचे राजीव शक्करवार यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)