शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

स्वच्छतेसाठी लोकसहभाग गरजेचा

By admin | Updated: November 6, 2014 22:57 IST

राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून

गोंदिया : राष्ट्रीय स्वच्छता अभियानाची सुरुवात २ आॅक्टोबर २०१४ पासून संपूर्ण देशभरात झाली आहे. या अभियानासाची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याकरीता ग्रामीण व नागरी भागात नागरिकांमध्ये जनजागृती करून त्यांचा या अभियानात सहभाग मिळवावा, असे निर्देश जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डी.डी. शिंदे यांनी संबंधित अधिकाऱ्यांना दिले.स्वच्छ भारत अभियानांतर्गत जिल्हाधिकारी कार्यालय येथे बुधवारी सीईओ शिंदे यांच्या अध्यक्षतेखाली बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. यावेळी बालस्वास्थ अभियान व स्वच्छता अभियान यशस्वी करण्याच्या दृष्टीने पूर्वतयारी व मोहिमेमध्ये राबविण्यात येणाऱ्या कार्यक्रमाबाबत शिंदे यांनी उपस्थित अधिकाऱ्यांना सूचना केल्या. बैठकीला अपर जिल्हाधिकारी टी.एल. सोरमारे, निवासी उपजिल्हाधिकारी अनंत वालस्कर, प्र.पोलीस उपअधीक्षक (गृह) सुरेश भोयर उपस्थित होते.स्वच्छता अभियानाची अंमलबजावणी करण्याबाबत शिंदे यांनी सांगितले की, योग्य नियोजन व सक्रीय सहभागातून स्वच्छता मोहिम राबविण्यात येईल. या अभियानांतर्गत ७ ते १२ नोव्हेंबर दरम्यान गावपातळीवर स्वच्छता करण्यात येणार असून प्रथम सामुदायिक, सार्वजनिक व शालेय शौचालय व अंगणवाडी स्वच्छतागृहाची दुरुस्ती व वापर करण्यात यावा, तसेच येथे स्वच्छतेकरीता पाणी पुरवठ्याची व्यवस्था करण्यात यावी.गावाची सार्वजनिक साफसफाई करण्याकरीता सकाळी ७ ते १० या ठराविक वेळेत स्वच्छता मोहिम राबवावी. मोहिमेचे स्वरुप व्यापक करण्याकरीता गावाचे सर्वेक्षण करणे, ग्रामसभा घेऊन जनजागृती करावी असे त्यांनी सांगितले. गावपातळीवर स्वच्छता करण्याकरीता प्रत्येक गावाकरीता एक पथक करण्यात येणार असून त्यामध्ये विस्तार अधिकारी, पोलीस कर्मचारी, प्रमुख व विभागीय अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात येईल. तहसीलदार, गटविकास अधिकारी यांनी संबंधितांना स्वच्छतेबाबत निर्देश द्यावे व या मोहिमेमध्ये स्वत: सक्रीय सहभागी व्हावे, अशा सूचना शिंदे यांनी दिल्या. कार्यालयीन परिसरातील भिंतीवर लावलेली स्टीकर्स, भिंतीपत्रके काढून भिंती स्वच्छ कराव्या. सूचना फलकाचा वापर करावा, कचरा करताना आढळणाऱ्या व्यक्तीवर तत्काळ दंड स्वरुपात कारवाई करण्यासारख्या उपायाचा अवलंब करावा. ठिकठिकाणी स्वच्छता राखा असे सूचना फलक लावावे. आपले घर व आपल्या कार्यालयापासून स्वच्छतेची सुरुवात करण्यात यावी. यावेळी जि.प.च्या पाणी व स्वच्छता मिशन विभागाचे अतुल गजभिये यांनी हात स्वच्छता धुण्याचे प्रात्याक्षित करुन दाखविले. सभेला तहसीलदार गोंदियाचे संजय पवार, गोरेगावचे डी.ए. सपाटे, आमगावचे राजीव शक्करवार यांच्यासह गटविकास अधिकारी उपस्थित होते. (जिल्हा प्रतिनिधी)