शहरं
Join us  
Trending Stories
1
'कुठून मी या पुण्याचा पालकमंत्री झालो, जो तो उठतो अन्...'; अजित पवारांनी जोडले हात, असं काय घडलं?
2
'एकाच घराच्या पत्त्यावर 80 मतदार आहेत, कारण..."; राहुल गांधींचा आरोप, बूथ लेव्हल ऑफिसरने केला खुलासा 
3
'भारत आता कुणासमोरही झुकणार नाही', 'ट्रम्प टॅरिफ बॉम्ब'वर केंद्रीय मंत्री पीयुष गोयल काय बोलले?
4
"दिल्लीत ठाकरेंचा मान काय ते लक्षात आलं, आमच्यासोबत असताना ते..."; CM देवेंद्र फडणवीसांचा ठाकरेंवर बाण
5
'माझे मित्र पुतिन...', ट्रम्प यांच्या टॅरिफ वॉर दरम्यान PM मोदींनी रशियन राष्ट्राध्यक्षांशी संवाद साधला; भारत भेटीचे आमंत्रण दिले
6
"...नाहीतर भारताने अमेरिकेला गुड बाय म्हणावं"; शशी थरूर यांचा मोदी सरकारला मोलाचा सल्ला
7
'मतदार याद्यांमध्ये घोळ, आम्हालाही मान्य; आमची मागणी होती की...", CM फडणवीसांचं मोठं विधान
8
Nashik: पती-पत्नीने एक्स्प्रेस ट्रेनसमोर उडी मारत आयुष्य संपवले, लग्नाला झाली होती ११ वर्ष
9
Donald Trump Tariff News : ट्रम्प यांच्या टॅरिफविरोधात भारत 'अ‍ॅक्शन'मोडवर ! अमेरिकेकडून शस्त्र खरेदी थांबवली, राजनाथ सिंह यांचा USA दौराही पुढे ढकलला
10
'महादेवी हत्तीणीवर उपचार करण्यासाठी महाराष्ट्रात एकही केंद्र नाही', 'पेटा'ने जाहीर केली भूमिका
11
सरकारने आयकर विधेयक २०२५ मागे घेतले; टॅक्स स्लॅबमध्ये काय बदल होणार? जाणून घ्या...
12
तेल कंपन्यांना 30,000 कोटींचे अनुदान, उज्ज्वला योजनेसाठी...; केंद्र सरकारने घेतले पाच मोठे निर्णय
13
ज्या आदित्य श्रीवास्तवचं नाव घेऊन राहुल गांधींनी ECI ला घेरले; तोच आता समोर आला, सांगितलं 'सत्य'
14
DPL 2025 च्या नव्या हंगामात प्रितीच्या 'हिरो'नं केली हवा! १९८ च्या स्ट्राइक रेटनं कुटल्या १११ धावा
15
Eknath Shinde : ज्यांनी स्वाभिमान गुंडाळून ठेवला, त्यांचं....; उद्धव ठाकरेंना मागची जागा दिल्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
16
राहुल गांधींच्या आरोपानंतर काँग्रेस आक्रमक; दादरमध्ये रास्ता रोको, भाजपाविरोधात घोषणाबाजी
17
NASA : नासाचा मोठा निर्णय! इंटरनॅशनल स्पेस स्टेशन समुद्रात पाडणार! कारण ऐकून धक्का बसेल
18
अतुल परचुरेंच्या आठवणीत भावुक झाले दिलीप प्रभावळकर; म्हणाले, "डॉक्टरांनी त्याला..."
19
IND vs AUS: टीम इंडियाविरुद्ध ऑस्ट्रेलियाचा संघ जाहीर, भारतीय वंशाच्या दोन खेळाडूंना संधी!
20
हृदयस्पर्शी! "तुम्ही माझ्यासाठी श्रीकृष्णासारखे..."; महिलेने साडी फाडून मुख्यमंत्र्यांना बांधली राखी

गुणवत्तेसाठी जनतेने बांधकामांकडे लक्ष द्यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 17, 2018 22:19 IST

गेल्या वर्षभरापासून विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे शहरातील बांधकामे रखडली होती. आता त्या प्रकरणाचा निकाल नगर पालिकेच्या बाजूने लागला. पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपयांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे.

ठळक मुद्दे२० कोटी रूपयांच्या विविध कामांचे संयुक्त भूमिपूजन

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : गेल्या वर्षभरापासून विविध न्यायालयीन प्रकरणांमुळे शहरातील बांधकामे रखडली होती. आता त्या प्रकरणाचा निकाल नगर पालिकेच्या बाजूने लागला. पहिल्या टप्प्यात २० कोटी रूपयांचे बांधकाम हाती घेण्यात आले आहे. त्यातून सिमेंट रस्ते, बगीचे आणि हुतात्मा स्मारकाचे बांधकाम करण्यात येणार आहे. त्याकरिता नगर पालिका सदस्य आणि नागरिकांनी सहकार्य करावे. ही कामे गुणवत्तापूर्ण व्हावे यासाठी जनतेने थर्ड पार्टी म्हणून कामाच्या गुणवत्तेकडे लक्ष द्यावे, असे आवाहन नगर पालिकेचे अध्यक्ष अशोक इंगळे यांनी केले.गोंदिया शहराच्या विविध प्रभागात विकासकामे मंजूर झाली आहेत. ती कामे २० कोटी रूपयांची आहेत. या कामांचे संयुक्त भूमिपूजन सोमवारी (दि.१६) सकाळी १२ वाजता गांधी प्रतिमा चौकात करण्यात आले. यावेळी ते बोलत होते.या वेळी व्यासपीठावर न.प. उपाध्यक्ष शिव शर्मा, सभापती शकील मंसुरी, सभापती रत्नमाला शाहू, सभापती दीपक बोबडे, सभापती विमल मानकर, गटनेता घनश्याम पानतावणे, गट नेता सतीश देशमुख, स्थायी समिती सदस्य सुनील तिवारी, नगर पालिकेचे मुख्याधिकारी चंदन पाटील प्रामुख्याने उपस्थित होते.इंगळे म्हणाले, २० कोटी रूपयांच्या कामाचे भूमिपूजन ही शहरवासीयांना छोटी भेट आहे. आता येत्या काळात असे अनेक भव्य आणि पालिकेच्या इतिहासात नोंदवली जाणारी कामे होतील. जनतेने विकासकामांच्या नावावर आम्हाला सत्ता दिली आहे. त्यांचा विश्वास आम्ही तळाला जाऊ देणार नाही. नगर पालिकेतील सदस्य यांनी देखील शहर विकासात राजकारण न आणता विकासकामांत सहकार्य करावे. या कामामुळे नागरिकांना थोडा अडचणींचा सामना करावा लागणार आहे. शहर विकासात तेवढे सहकार्य अपेक्षीत आहे.असे सांगून ते म्हणाले, शहरात घनकचरा व्यवस्थापनाचा मोठा प्रकल्प लवकरच उभा राहणार आहे. त्यामुळे शहरातील सांडपाण्याचा प्रश्न मार्गी लागणार आहे. नम्रतेने काम केल्यास सर्व कामे मार्गी लागतात, हा माझा अनुभव आहे. मी नगर पालिकेत काम करीत असताना चौथी पिढी आहे. त्यामुळे आता पालिकेत सदस्य असलेल्या सर्वांनी विकासकार्यात एकजूट आणि सहकार्याची भूमिका घ्यावी, असे आवाहन देखील अशोक इंगळे यांनी केले. उपस्थित अन्य मान्यवरांनी या वेळी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक मुख्याधिकारी चंदन पाटील यांनी मांडले. संचालन प्रशासकीय अधिकारी राणे यांनी केले. या वेळी नगरसेवक हेमंत पंधरे, कुंदा पंचबुद्धे,विवेक मिश्रा, अनिता मेश्राम, अफसना बेगम मुजीब पठान, भावना कदम, क्रांतिकुमार जयस्वाल, शिलू चव्हाण, श्वेता पुरोहित, जितेंद्र पंचबुद्धे, मैथुला बिसेन, हेमलता पतेह, धर्मेश अग्रवाल, मोसमी परिहार, सुनील भालेराव, गौसिया बेगम कलाम शेख, नितु बिरीया, दिलीप गोपलानी, वर्षा खरोले, नेहा नायक, मालती कापसे, दीपिका रु से, भागवत मेश्राम, दिनेश दादरीवल, भरत क्षत्रिय, पराग अग्रवाल, राकेश ठाकूर, माजी खासदार खुशाल बोपचे, माजी जि.प. अध्यक्ष नेतराम कटरे, दीपक कदम, भाजप जिल्हा महासचिव अमृत इंगळे, प्रदीप सिंग, अहमद मणियार, नंदू बिसेन, विजेंद्र जैन, प्रदीप ठाकरे, संजय कुलकर्णी, बालू बिसेन, विनोद किराड, चंद्रभान तरोने, मनोहर आस्वानी, ऋषी साहू, अभय मानकर, रतन वासनिक, दीपम देशमुख, पप्पू अरोरा, मुजीब पठान, पप्पू जसानी, पंकज खोब्रागडे, टेकचंद फेडारकार, राजू शुक्ला, जयंत शुक्ला, योगु गिरीया, संजय मुरकुटे, अशोक जियसंघनी, जगदीश मिश्रा, योगराज रहांगडाले, मनोज मेंढे, सोनू सावंत, बाल्या केकत, राहुल लोहाना, योगेश गिरीया, सुमीत तिवारी, पुष्कर सावंत, भरत कानोजिया, दुर्गेश रहांगडाले, राजा कदम आदी उपस्थित होते.