शहरं
Join us  
Trending Stories
1
Ahmedabad Plane Crash Live Updates: हृदयद्रावक! मृत्यूंचे शब्दात वर्णन करता येणार नाही; अपघातस्थळ पाहून पंतप्रधान मोदी भावुक
2
अहमदाबाद प्लेन क्रॅशनंतर, व्हायरल होतेय या ज्योतिषाची भविष्यवाणी, मोठ्या नेत्याच्या मृत्यूचाही होता उल्लेख
3
Air India: मुंबईहून लंडनला निघालेलं विमान एअर इंडियानं अर्ध्यातूनच माघारी बोलावलं, कारण काय?
4
मुलाला वाचवण्यासाठी आगीशी झुंजत होती आई; अहमदाबाद विमान अपघाताचा हादरवून टाकणारा VIDEO
5
'मला माहित नाही मी कसा वाचलो', विमान अपघातात वाचलेला एकमेव प्रवासी; PM मोदींनी घेतली भेट
6
Sunjay Kapur: "या पृथ्वीवर तुमची वेळ निश्चित आहे...", मृत्यूनंतर संजय कपूर यांची 'ती' पोस्ट व्हायरल
7
Mumbai: लिव्ह-इन रिलेशनशिपला विरोध केला म्हणून वडिलांची हत्या, महिलेसह तिच्या प्रियकराला अटक
8
अपघातग्रस्त विमान Boeing कंपनीचं होतं, माहिती समोर येताच शेअर बाजारात झाली बिकट स्थिती 
9
"प्रवास टाळा, शेल्टरजवळच रहा अन्...!" इराणच्या आण्विक तळांवर इस्रायलचा हल्ला, भारताकडून अ‍ॅडव्हायजरी जारी; नेतन्याहूही स्पष्टच बोलले
10
विशेष लेख: ‘देवा’ की ‘भाऊ’? - राज ठाकरे कुठे जाणार?
11
आजचा अग्रलेख: आकाशातील आक्रोश
12
गुड बाय इंडिया...अपघातापूर्वी ब्रिटिश नागरिकांने काढला होता शेवटचा व्हिडिओ; विजय रुपाणीही दिसले
13
एअर इंडियाच्या अपघातग्रस्त विमानाची नुकसान भरपाई कोण देणार? इन्शुरन्स कंपनीचा नियम काय सांगतो?
14
शनि - मंगळ षडाष्टक योग अन् विमान अपघाताचे भाकित; २०२४ च्या दिवाळी अंकातील भविष्यवाणी व्हायरल
15
पायलट होता अनुभवी, मात्र विमान उतरविण्यासाठी वेळ मिळाला नाही, हवाई वाहतूक तज्ज्ञ शनिल देसाई यांचे मत
16
शेअर बाजारात हाहाकार, Sensex १२६४ तर निफ्टी ४१५ अंकांनी घसरला; काय आहेत यामागची कारणं?
17
आजचे राशीभविष्य, १३ जून २०२५: आजचा दिवस अनुकूलतेचा, घरात आनंदाचे वातावरण राहील!
18
Sunjay Kapur : एअर इंडिया विमान अपघातावर केलं ट्वीट, काही तासातच संजय कपूर यांचं हृदयविकाराच्या धक्क्याने निधन
19
Jio आणि Airtel चा ३० दिवसांचा व्हॅलिडिटी प्लान, कोण देतंय उत्तम सर्व्हिस; किमतीत फरक इतकाच
20
बंद पडलेलं बँक अकाऊंट सुरू करणं होणार सोपं, RBI नं सोपे केले KYC नियम; होम ब्रान्चला जायची गरज नाही

डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे रुग्णाचा मृत्यू ; संतप्त नातेवाइकांचा मृतदेह उचलण्यास नकार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 24, 2024 14:44 IST

ग्रामीण रुग्णालयातील प्रकार : महिला डॉक्टर व अधिपरिचारिकेवर कारवाईची मागणी

लोकमत न्यूज नेटवर्क देवरी: डॉक्टर व अधिपरिचारिकांच्या हलगर्जीपणामुळे योग्य उपचाराअभावी रुग्णाचा मृत्यू झाल्याचा प्रकार येथील ग्रामीण रुग्णालयात शुक्रवारी (दि.२३) सकाळी १० वाजता दरम्यान घडला. या प्रकारामुळे मात्र संतप्त नातेवाइकांनी मृतदेह उचलण्यास नकार दिला. तब्बल पाच तास चाललेल्या या गोंधळानंतर अखेर संबंधित डॉक्टर व अधिपरिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आल्यानंतर नातेवाइकांनी मृतदेह उचलला. मात्र डॉक्टर व अधिपरिचारिकांवर कारवाई करण्याची मागणी नातेवाइकांनी केली आहे. मृत रुग्णाचे नाव देवराम नारायण गावड (६०, रा. पालांदूर) असे आहे. 

तालुक्यातील ग्राम पालांदूर येथील रहिवासी देवराम गावड यांना गुरुवारी (दि.२२) रात्री झोपेत असताना अज्ञात किटकाने कानाला चावा घेतला. यानंतर शुक्रवारी (दि.२३) सकाळी त्यांना अस्वस्थ वाटून श्वास घ्यायला त्रास होत असल्याने नातेवाइकांनी त्यांना येथील ग्रामीण रुग्णालयात सकाळी ७ वाजता भरती केले. त्यावेळी डॉक्टर उर्वशी येडे यांची ड्यूटी असूनही त्या रुग्णालयात हजर नव्हत्या. यावर कार्यरत अधिपरिचारिका विजेता उके व आकांशा कुमार यांच्यातील एकीने देवराम यांना एक इंजेक्शन लावले. काही वेळाने डॉ. येडे रुग्णालयात आल्या व त्यानंतरही पाहिजे त्या पद्धतीने देवराम यांच्यावर उपचार होत नसल्याने त्यांची प्रकृती अधिकच बिघडली. यामुळे नातेवाइकांनी त्यांना रेफर करण्याची विनंती केली. परंतु डॉ उर्वशी येडे यांनी दुर्लक्ष केले. तीन तास देवराम यांना आवश्यक उपचार मिळाले नाही व त्यांच्याकडे दुर्लक्ष झाल्याने संतप्त नातेवाइकांनी आरडाओरड करून उपचार करण्यास डॉक्टरांना सांगितले तरीसुद्धा डॉक्टरांनी त्याकडे लक्ष दिले नाही असा आरोप देवराम यांच्या नातेवाइकांनी केला आहे. अखेर १० वाजता दुसऱ्या शिफ्टला ड्यूटीवर कार्यरत डॉक्टरांनी देवराम यांच्यावर उपचार सुरू केले. परंतु काही मिनिटांतच देवराम यांचा मृत्यू झाला.

देवराम यांच्या मृत्यूला जबाबदार असलेल्या डॉ. येडे व कार्यरत अधिपरिचारिका उके आणि कुमार यांच्यावर कारवाई करण्याची मागणी संतप्त नातेवाइकांनी केली. तसेच जोपर्यंत दोषीवर कारवाई होत नाही तोपर्यंत मृतदेहावर उत्तरीय तपासणी होऊ देणार नाही अशी कठोर भूमिका नातेवाईक व सामाजिक कार्यकर्ते कुलदीप लांजेवार, विलास शिंदे व राजेश चांदेवार यांनी घेतली. विशेष म्हणजे, रुग्णालयात जबाबदार असलेले वैद्यकीय अधीक्षक गगन गुप्ता हेसुद्धा हजर नसल्याने त्यांच्यावरसुद्धा कारवाईची मागणी नातेवाइकांनी केली. या घटनेमुळे सुमारे ५ तास ग्रामीण रुग्णालयात तणावाचे वातावरण होते व शेवटी दुपारी ३ वाजता डॉ. येडे तसेच अधिपरिचारिका उके व कुमार यांना कार्यमुक्त करण्याचे आदेश वैद्यकीय अधीक्षक गुप्ता यांनी मेलवर पाठविले. पन्नाची प्रत हातात घेतल्यावरच नातेवाइकांनी उत्तरीय तपासणीस होकार दिला.

घडलेल्या प्रकाराला घेऊन वैद्यकीय अधीक्षक गुप्ता यांना दूरध्वनीवरून संपर्क केला असता त्यांनी फोन उचलला नाही. तर डॉ. येडे ड्यूटी संपल्यावर गोंदिया येथे घरी गेल्याची माहिती मिळाल्याने त्यांच्याशी फोनवर संपर्क केला असता फोन संपर्क क्षेत्राच्या बाहेर होता. 

रुग्णालयात रुग्णसेवा वाऱ्यावर एक वर्षापूर्वी येथील रुग्णालयाच्या भव्य इमारतीचे लोकार्पण करण्यात आले त्यावेळी पालकमंत्री धर्मरावबाबा आत्राम यांनी रुग्णालयात रुग्णांना योग्य ती रुग्णसेवा मिळेल असे आश्वस्त केले होते. परंतु स्थिती विपरीत असून ग्रामीण भागातील आदिवासी गरीब नागरिकांना येथे योग्य उपचार मिळत नसल्याने त्यांना आपला जीव गमवावा लागत आहे. डॉक्टर मुख्यालयी हजर राहत नसल्याने रुग्णांना वेळेवर उपचार मिळत नाही. तक्रार करूनही वरिष्ठ अधिकाऱ्यांचे याकडे दुर्लक्ष होत आहे. दोन दिवसांपूर्वीच रुग्णालयात एका इसमाने आपल्या मित्रावर उपचार होत नसल्याने डॉक्टरास धमकावले असून डॉक्टरांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. आता डॉक्टरांच्या व तेथील कर्मचाऱ्यांच्या लापरवाहीमुळे एका गरीब रुग्णाचा मृत्यू झाला. आता या डॉक्टरांवर मनुष्यवधाचा गुन्हा का दाखल करण्यात येऊ नये? असा सवाल संतप्त नागरिकांनी उपस्थित केला आहे.

"वडिलांना श्वास घ्यायला त्रास होत असल्याने मी सकाळी ७ वाजता ग्रामीण रुग्णालयात दाखल केले होते. त्यावेळी महिला डॉक्टर रुग्णालयात नव्हत्या व अधिपरिचारिकांनी त्यांना इंजेक्शन लावले. माझे बाबा त्यावेळेस बोलत होते मात्र काही वेळाने त्यांची प्रकृती खालावल्याने डॉक्टरांना सांगून त्यांना रेफर करण्याची विनंती करूनसुद्धा त्यांनी दुर्लक्ष केले. वडिलांना योग्य उपचार मिळाला नाही व शेवटी १० वाजता दुसन्या डॉक्टरांनी उपचार सुरू केले तोपर्यंत माझ्या वडिलांचा मृत्यू आला होता. माझ्या वडिलांच्या मृत्यूला जबाबदार महिला डॉक्टर व अधिपरिचारिका तसेच वैद्यकीय अधीक्षकांवर कार्यवाही करून आम्हाला न्याय द्यावा."- कृष्णा देवराम गावड, मुलगा

"देवरी ग्रामीण रुग्णालयात रुग्णाला योग्य उपचार न मिळाल्यामुळे त्याचा मृत्यू झाल्याची तक्रार आम्हाला प्राप्त झाली आहे. त्या अनुषंगाने सिव्हिल सर्जन यांना चौकशीचे आदेश देण्यात आले आहे. चौकशी होईपर्यंत कार्यरत महिला डॉक्टर व अधिपरिचारिकांना कार्यमुक्त करण्यात आले आहे. चौकशीमध्ये ते दोषी आढळून आल्यास त्यांच्यावर निलंबनाची कारवाई करण्यात येईल." - कांचन वानरे, आरोग्य उपसंचालिका नागपूर.

टॅग्स :gondiya-acगोंदिया