शहरं
Join us  
Trending Stories
1
नेपाळवर बोलण्यापूर्वी पक्षाची परवानगी घ्या; वादानंतर भाजपचे सर्व मंत्री, नेते अन् इतरांना निर्देश
2
धक्कादायक! तक्रार करणाऱ्याला गाडीने चिरडले, DMK नेत्याला पोलिसांनी केली अटक
3
नेपाळमध्ये भारतीय बसवर हल्ला, प्रवाशांना लुटले, पर्यटकांना विमानाने परत आणले
4
'पोलंडमध्ये रशियाची घुसखोरी चुकीची, हे सर्व लवकरच संपेल'; ट्रम्प यांनी नाराजी व्यक्त केली, फ्रान्सने राफेल पाठवले
5
ब्राझीलच्या माजी राष्ट्रपतींना सुनावली २७ वर्षांच्या तुरुंगवासाची शिक्षा, निवडणूक हरल्यानंतर केलेली ती कृती भोवली
6
Python Hunting: अजगर मारून त्याचं मांस शिजवलं, दोन जणांना अटक! 
7
सिक्कीममध्ये निसर्गाचा कोप! भूस्खलनात ४ जणांचा मृत्यू, ३ जण बेपत्ता, बचावकार्य सुरू
8
PPF अकाऊंट होल्डरचा अचानक मृत्यू झाल्यास कशी होईल सेटलमेंट? रक्कम मॅच्युअर होण्याची वाट पाहावी लागेल का?
9
सरकारचा जीआर कोणाला सरसकट आरक्षण देत नाही; मुख्यमंत्री फडणवीसांनी स्पष्ट केली भूमिका
10
नेपाळचा पुढचा पंतप्रधान कोण? जेन झी तरुणांची राष्ट्राध्यक्ष रामचंद्र पौडेल यांच्याशी दुसऱ्यांदा चर्चा
11
अमेरिकेत भारतीय वंशाच्या व्यक्तीची निर्घृण हत्या, पत्नी आणि मुलासमोरच केले कुऱ्हाडीने वार
12
नवरा सुपरस्टार तरीही पाय जमिनीवर, गर्वाचा लवलेशही नाही; भरत जाधव यांच्याप्रमाणेच त्यांची पत्नीही आहे अगदी साधी
13
नेपाळचा पंतप्रधान कोण? आंदोलकांमध्येच जुंपली; भारत समर्थक म्हणून सुशीला कार्की यांना एका गटाने नाकारले
14
आजचे राशीभविष्य- १२ सप्टेंबर २०२५: प्रकृतीची काळजी घ्या, वाहन चालवताना दक्ष राहा!
15
कोकणातला 'कांतारा' रंगला की फसला? कसा आहे दिलीप प्रभावळकरांचा 'दशावतार' सिनेमा? वाचा रिव्ह्यू
16
विशेष लेख: मशाल हाती घेऊन इंजिन धावेल असे दिसते; पण...
17
बस प्रवास स्वस्त? टोलमध्ये मिळणार सवलत, राष्ट्रीय महामार्गासाठी टोल धोरण लवकरच
18
लाखो मुंबईकर लवकरच होणार 'अधिकृत रहिवासी'; २५ हजारांहून अधिक इमारतींच्या 'ओसी'चा मार्ग अखेर मोकळा
19
बुलेट ट्रेनच्या १५७ किमीवरील कामांसाठी महत्त्वाकांक्षी करार, मुंबई-अहमदाबाद प्रवास होणार वेगाने
20
अग्रलेख: जागतिक खेडे ते खंडित जग! युद्धज्वर जगाला संपवून टाकेल

रेल्वे ट्रॅकवर प्रवाशांचा संताप, गोंदिया रेल्वे स्थानकावर तणावाचे वातावरण

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2023 20:21 IST

रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे.

गोंदिया : मागील तीन चार महिन्यांपासून प्रवासी गाड्यांचे वेळापत्रक पुर्णपणे बिघडले असून याचा फटका प्रवाशांना सहन करावा लागत आहे. रेल्वे विभागाच्या मालगाड्या फस्टच्या धोरणामुळे प्रवासी गाड्या पाच ते सहा तास उशीराने धावत आहेत. त्यामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी बुधवारी (दि.४) सायंकाळच्या ७.३० वाजताच्या सुमारास गोंदिया रेल्वे स्थानकावर मालगाडी येताच रेल्वे ट्रॅकवर उतरुन रेल्वे प्रशासनाच्या धोरणाचा संताप व्यक्त केला. यामुळे रेल्वे स्थानकावर तणावपूर्ण वातावरण निर्माण झाले होते.

रेल्वे विभागाने प्रवासी गाड्यांना थांबवून आधी मालगाड्या सोडण्याचे धोरण अवलंबिले आहे. यामुळे हावडा-मुंबई मार्गावरील सर्वच प्रवासी गाड्या विलंबनाने धावत आहे. गोंदिया ते नागपूर या दोन तासांच्या प्रवासाठी तब्बल सहा तास लागत असल्याने प्रवाशांना त्यांच्या नियोजित ठिकाणी पाेहचण्यास विलंब होत आहे. अनेकांना नागपूर रेल्वे स्थानकावरुन पोहचून तेथून पुढची गाडी पकडून पुढे जाणे शक्य होत नाही. तर दररोज अपडाऊन करणाऱ्या प्रवाशांना सुध्दा याची झळ बसत आहे.

हा प्रकार सातत्याने सुरु असून यासंदर्भात रेल्वे विभागाला निवेदन देवून सुध्दा यात कुठलीच सुधारणा झाली नाही. त्यामुळे बुधवारी सायंकाळच्या सुमारास शालीमार ओखा ही गाडी थांबवून मालगाडी सोडण्यात आली. याप्रकारामुळे संतप्त झालेल्या रेल्वे प्रवाशांनी रेल्वे ट्रॅकवर उतरुन आपल्या संतापाला वाट मोकळी करुन दिली. तर काहींनी मालगाडी दगडफेक केल्याची चर्चा आहे. दरम्यान या प्रकारामुळे गोंदिया रेल्वे स्थानकावर काही काळ तणावपुर्ण स्थिती निर्माण झाली होती. दरम्यान रेल्वे सुरक्षाबल आणि रेल्वे अधिकाऱ्यांनी मध्यस्थी करीत प्रवाशांची समजूत काढल्यानंतर प्रवासी शांत झाले.

मालगाड्या फस्टचे धोरण बदलारेल्वे विभागाने मालगाड्या फस्टचे धोरण अवलंबिले असून यामुळे प्रवासी गाड्यांना विलंब होत आहे. याची झळ प्रवाशांना बसत आहे. त्यामुळे रेल्वे विभागाने हे धोरण त्वरित बदलविण्याची मागणी प्रवाशांनी यावेळी रेल्वे विभागाकडे केली. 

 

टॅग्स :gondiya-acगोंदियाIndian Railwayभारतीय रेल्वे