शहरं
Join us  
Trending Stories
1
पहलगाम हल्ल्यातील शहीदांना श्रद्धांजली, आजचा विजय भारतीय सैन्यदलाला समर्पित - सूर्यकुमार यादव
2
IND vs PAK : आम्ही काहीच विसरलेलो नाही! दुबईतून टीम इंडियाचा पाकला स्पष्ट संदेश
3
IND vs PAK : सूर्यानं सिक्सर मारत संपवली मॅच! टीम इंडियाचा दबावात दिमाखदार विजय
4
भारत कणखर, अमेरिका झाला हतबल; म्हणे, “आमच्याकडून २५ किलो मक्याचं एक पोतं घ्यायला तयार नाही”
5
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
6
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
7
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
8
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
9
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
10
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
11
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
12
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
13
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
14
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
15
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
16
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
17
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
18
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
19
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
20
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 

बिरसी विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेचा 'टेक ऑफ' पुन्हा केव्हा?

By अंकुश गुंडावार | Updated: November 19, 2022 15:33 IST

करार संपण्यापूर्वीच कंपनीने गुंडाळला गाशा; सहा महिन्यांतच सेवा पडली ठप्प

गोंदिया : तालुक्यातील बिरसी विमानतळावरून जवळपास सात-आठ वर्षांच्या कालावधीनंतर यंदा १३ मार्चपासून प्रवासी विमान वाहतूक सेवेला प्रारंभ करण्यात आला. सहा महिने सुरळीत सेवा दिल्यानंतर फ्लाय बिग कंपनीने देखभाल दुरुस्तीच्या नावावर ९ ऑगस्टपासून सेवा बंद केली. यानंतर सेवा परत सुरू करण्याऐवजी कंपनीने गाशा गुंडाळला. त्यामुळे ही सेवा जिल्हावासीयांसाठी केवळ औटघटकेचीच ठरली असून, पुन्हा प्रवासी विमान वाहतूक 'सेवेचा टेक ऑफ केव्हा होणार, असा प्रश्न जिल्हावासीयांकडून केला जात आहे. 

बिरसी येथे तत्कालीन विमान वाहतूक मंत्री प्रफुल्ल पटेल यांच्या पुढाकाराने आंतरराष्ट्रीय दर्जाचे विमानतळ उभारण्यात आले. याठिकाणी पायलट प्रशिक्षण केंद्रदेखील असून, ते सुरळीतपणे सुरू आहे. या आंतरराष्ट्रीय दर्जाच्या विमानतळावरून प्रवासी विमान वाहतूक सेवेला मात्र प्रारंभ झाला नव्हता. यानंतर खा. सुनील मेंढे यांनी मंत्रालयीन स्तरावर पाठपुरावा करून केंद्र शासनाच्या उड्डाण योजनेंतर्गत ही सेवा सुरू करण्यासाठी पाठपुरावा केला. त्याला यशदेखील आले. नोएडा येथील फ्लाय बिग कंपनीने प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्याचे कंत्राट घेतले.

१३ मार्चपासून गोंदिया-इंदूर- हैदराबाद या मार्गावर विमान सेवा प्रारंभ करण्यात आली. प्रवाशांचा चांगला प्रतिसाद मिळत होता. त्यानंतर या विमानतळावरून मुंबई, पुणे, गोवा, कोलकाता या मार्गावरसुद्धा प्रवासी विमान वाहतूक सेवा सुरू करण्यात यावी, यासाठी आग्रह केला जात होता; पण प्लाय बिग कंपनीने करार संपण्यापूर्वीच ९ ऑगस्टपासून प्रवासी विमान वाहतूक सेवा येथून बंद केली. त्यामुळे जिल्हावासीयांच्या आशेवर पाणी फेरले गेले.

करार ऑक्टोबरपर्यंतचा, सेवा बंद ऑगस्टमध्ये

कंपनीने पहिल्या टप्प्यात ऑक्टोबरपर्यंत सेवा देण्याचा करार केला; पण ९ ऑगस्टला विमानाच्या देखभाल दुरुस्तीच्या नावावर काही दिवस विमानसेवा बंद राहणार असल्याचे सांगितले. मात्र, त्यानंतर सेवा पूर्ववत न करता कंपनीचे कार्यालय बंद करीत या विमानतळावरील सेवा कायमस्वरुपी बंद करीत गाशा गुंडाळला. त्यामुळे ही सेवा जिल्हावासीयांसाठी औटघटकेची ठरली.

कार्गो सेवा सुरु करण्याला वाव

बिरसी विमानतळावरून कार्गो सेवा सुरू करण्याला वाव आहे. मध्य प्रदेश आणि छत्तीसगड राज्याची लागून असलेली सीमा आणि हावडा-मुंबई रेल्वे मार्गावरील गोंदिया रेल्वे स्थानक हे महत्त्वपूर्ण स्थानक आहे. त्यामुळे प्रवासी वाहतूक सेवेसह कार्गो सेवा सुरू करण्याससुद्धा चांगला वाव आहे. मात्र, यासाठी आता प्रबळ राजकीय इच्छाशक्ती आणि पाठपुराव्याची गरज आहे.

बिरसी विमानतळ प्राधिकरणाचे असहकार्य

विमानतळ प्राधिकरणाने नाईट लँडिंगसाठी आवश्यक असलेली येथील एएलएस (ऑटोमॅटिक लँडिंग सिस्टीम) ही यंत्रणा कोरोनाकाळात काढून कोलकाता येथे हलविली. त्यातच विमानतळावर लँडिंग करण्यासाठी कंपनीने अनेकदा हवामानाचे कारण पुढे करीत विमान लँड करू दिले नसल्याचा आरोप आहे. मात्र, दुसरीकडे पायलट प्रशिक्षण विमानांना उतरण्याची सेवा मात्र सुरळीतपणे सुरु आहे. विमानतळ प्राधिकरणाकडून सहकार्य मिळत नसल्याने सेवा बंद केल्याचे फ्लाय बिगच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

टॅग्स :Airportविमानतळgondiya-acगोंदिया