शहरं
Join us  
Trending Stories
1
"एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाल्याने वाईट वाटलं आणि घरी निघून गेलो,पण पुन्हा..."; रवींद्र चव्हाणांचा गौप्यस्फोट
2
शेवटच्या 3 सेकंदांत 'RUN' वरून 'CUTOFF' झालं 'फ्यूल कंट्रोल स्विच' अ्न...; एअर इंडिया प्लेन क्रॅशवेळी शेवटच्या क्षणाला नेमकं काय घडलं?
3
"माझा नातेवाईक का असेना, टायरमध्ये घालून झोडायला सांगणार"; बारामतीत अजित पवारांचा कडक इशारा
4
KL राहुलची विक्रमी सेंच्युरी; लॉर्ड्सच्या मैदानात अशी कामगिरी करणारा ठरला दुसरा भारतीय
5
भारतातील रस्त्यावरही टेस्लाच्या कार धावणार; या दिवशी पहिलं शोरूम सुरू होणार, लवकरच डिलिव्हरी सुरू होईल
6
Air India Plane Crash :'रिपोर्ट लीक कसा झाला?' अहमदाबाद विमान अपघाताच्या अहवालावर पायलट असोसिएशनने आक्षेप घेतला
7
पंतची मोठी चूक! चोरटी धाव घेण्याच्या नादात फुकटात फेकली विकेट! बेन स्टोक्सचा डायरेक्ट थ्रो अन्...
8
नरेंद्र मोदींनंतर PM म्हणून काँग्रेसकडून राहुल गांधींचा पर्याय? शं‍कराचार्यांचे मोठे विधान
9
“७५ वर्षांचा नियम RSSला लागू करायचा असेल, म्हणून मोहन भागवत तसे म्हणाले असतील”: शंकराचार्य
10
गुरु-चंद्र-राहुचा वसुमान ग्रहण योग: ७ राशींना भरभराट, भाग्योदय; पैसा-प्रतिष्ठा, कल्याण होईल!
11
सात वर्षांपूर्वीच दिला होता ७३७ जेटमधील स्विचच्या समस्येबद्दल इशारा; एअर इंडिया विमान अपघाताला ठरले कारण?
12
"जयंत पाटलांच्या राजीनाम्याची बातमी खोडसाळपणा...", प्रदेशाध्यक्षपदावरुन जितेंद्र आव्हाड यांनी स्पष्टच सांगितलं
13
पंतची कडक फटकेबाजी! चौकारासह जोफ्राचं स्वागत अन् स्टोक्सला उत्तुंग षटकार मारत साजरी केली फिफ्टी
14
Radhika Yadav : "मी मुलीचा वध केला, मला फाशी द्या"; राधिकाला संपवल्यावर भावासमोर काय म्हणाले वडील?
15
'तो मला बायको म्हणायचा', मुंबईतील शिक्षिकेचा विद्यार्थ्यासोबतच्या संबंधाबद्दल चक्रावून टाकणारा खुलासा
16
Sankashti Chaturthi 2025: चातुर्मासातली पहिली संकष्टी, बाराही राशींसाठी ठरणार खास; पूर्ण होणार प्रत्येक आस!
17
१८० प्रवाशांऐवजी केवळ १५५ जणांनाच घेऊन उडाले एअर इंडियाचे विमान! विमानतळावर गोंधळ,नेमके झाले काय?
18
पतीचा भर रस्त्यात तमाशा; पत्नीवर केले सपासप वार, जांघेत अडकली तलवार! कशावरून झाला वाद?
19
“२० देशांनी भारताच्या बाजूने मतदान केले, १२ किल्ले जागतिक वारसा स्थळ घोषित झाले”: CM फडणवीस
20
CHYD च्या नवीन पर्वात निलेश साबळेंना मिस करशील का? गौरव मोरे म्हणाला, "मी त्यांच्यासोबत..."

समर कॅम्पच्या नावावर पालकांची होत आहे लूट

By admin | Updated: May 11, 2014 00:26 IST

वार्षिक परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात उसंत मिळते. या नामी संधीचा लाभ उचलण्यासाठी संस्थांचे पेव फुटले आहे.

गोंदिया : वार्षिक परीक्षा संपल्या की विद्यार्थ्यांना काही प्रमाणात उसंत मिळते. या नामी संधीचा लाभ उचलण्यासाठी संस्थांचे पेव फुटले आहे. या संस्था विविध उन्हाळी शिबिरे भरविण्याच्या नावावर संस्थांचे प्रतिनिधी पालकांना विविध आमिष दाखवून हजारोची माया गोळा करीत आहेत. उल्लेखनीय म्हणजे अनेक अनधिकृत संस्थांचा उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात पुढाकार आहे. मात्र शासनस्तरावरून या संस्थांच्या विरोधात कोणतीही कारवाई केल्याचे दिसून येत नाही. उन्हाळ्याच्या दोन महिन्यांच्या सुट्ट्या या मुलांच्या हक्काच्या सुट्ट्या असतात. स्पर्धेच्या युगात याच सुट्ट्यांच्या बहाण्याने अनेक संस्था मैदानात उतरल्या आहेत. विविध संस्थामार्फत उन्हाळी शिबिरांचे आयोजन करण्यात येते. यात मुलांचा सर्वांगीण विकास व्हावा, या अनुषंगाने मुलांना विविध कला शिकविल्या जातात. यात प्रामुख्याने संगीत, चित्रकला, इंग्रजी संभाषण, कराटे, जलतरण, घोडेस्वारी, नृत्य इत्यादी अनेक कलांचा समावेश आहे. या उन्हाळी शिबिरांचा कालावधी १५-२० दिवसांचा असतो. या १५-२० दिवसांच्या कालावधीत मुलांना सदर उल्लेख केलेल्या सर्व कलात पारंगत करू, असे आमिष दाखवून या संस्थांचे प्रतिनिधी पालकांकडून भरमसाठ शुल्क वसूल करतात. उन्हाळी शिबिराचे शुल्क जवळपास चार ते पाच हजार रुपये असते. परंतु कलामध्ये पारंगत व्हायला एक-एक वर्ष लागते. त्याच कलेमध्ये मुलांना १५-२० दिवसांत पारंगत करण्याचे सांगितले जाते. त्यामुळे अल्पावधीत मुलांंना विविध कला शिकवून ‘एक ना धड, भाराभर चिंध्या’ यासारखी गत होत आहे. मुलांंना इंग्रजीची जोडाक्षरे शिकायला एक शैक्षणिक सत्र लागते. परंतु सदर शिबिरामध्ये १५ दिवसांत इंग्रजी संभाषण कशाप्रकारे शिकविणार, असा प्रश्न उपस्थित केला जात आहे. वास्तविक उन्हाळी शिबिराचे आयोजन करणार्‍या अनेक संस्था अनधिकृत असल्याचे आढळून आले आहे. काही संस्थांची नोंदणीही झाली नाही. तसेच उन्हाळी शिबिरात मुलांना काही कमी जास्त झाले तर त्याची जबाबदारी उचलण्यास सदर संस्था कचरत आहेत. अशा संस्थांमध्ये मुलांना दाखल करणे घातक आहे. या शिबिरांमध्ये मुलांचे धड शिकणेही होत नाही. त्यामुळे पालकांनी वेळीच सावध होऊन केवळ नोंदणीकृत संस्थामार्फत आयोजित केलेल्या उन्हाळी शिबिरांमध्येच मुलांना दाखल करावे आणि प्रशासनाने उन्हाळी शिबिर आयोजित करणार्‍या अनधिकृत संस्थावर कारवाई करावी, अशी मागणी जनसामान्यातून होत आहे. (प्रतिनिधी)