शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

धान उत्पादकांची सर्वांकडूनच लूट

By admin | Updated: November 3, 2014 23:27 IST

शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा

खरेदीचा तिढा कायम : व्यापाऱ्यांसोबत बाजार समित्यांतही कमी भावाने खरेदीगोंदिया : शासनाच्या हमीभावाने धानाची खरेदी करण्यासाठी सहकारी संस्था आणि साठवणुकीसाठी गोदाम मालक आपले गोदाम देण्यास तयार नाहीत. त्यामुळे यावर्षी शेतकऱ्यांकडील धान खरेदीचा मोठा तिढा निर्माण झाला आहे. याचा फायदा घेत व्यापाऱ्यांकडून शेतकऱ्यांचा धान मनमानी भावाने खरेदी केला जात आहे. दुसरीकडे काही ठिकाणच्या कृषी उत्पन्न बाजार समित्यांनीही हमीभावाला बगल देत कमी दराने खरेदी सुरू केल्याने शेतकरी वर्ग सर्वत्र नागवला जात आहे.आमगाव : यावर्षी धान उत्पादक शेतकऱ्यांनी चांगले उत्पादन घेतले आहे. हातात आलेले पीक योग्य भावाने विकून आर्थिक चणचण दूर करण्याचे नियोजन शेतकऱ्यांनी आखले होते. मात्र शासनाच्या धोरणाने त्यांचे नियोजन पार कोलमडले आहे. शेतकऱ्यांनी पिकांची कापणी करून स्वत:वरील कर्जाचे ओझे कमी करण्यासाठी धान विक्रीसाठी काढले आहे. परंतु आधारभूत किंमत जाहीर करूनही आधारभूत किमतीनुसार शासकीय धान खरेदी केंद्र सुरू झाले नाही. त्यामुळे नाईलाजाने गरजवंत शेतकरी व्यापाऱ्यांच्या लुटीला बळी पडून कवडीमोल भावाने धानाची विक्री करीत आहे.आमगाव तालुक्यातील शेतकऱ्यांना शेतमाल विक्रीसाठी कृषी उत्पन्न बाजार समिती वरदान ठरली आहे. शेतकरी दरवर्षी उत्पादित धानाला योग्य भाव मिळावा यासाठी बाजार समितीमध्ये विक्रीला आणतात. परंतु व्यवसायिकांची मक्तेदारी वाढल्याने शेतकऱ्यांचे धान कवडीमोल भावाने खरेदी-विक्री करण्यात येत आहे. आमगाव बाजार समितीमध्ये १ आॅक्टोबरपासून शेतकऱ्यांनी धान विक्रीला सुरूवात केली. जय श्रीराम, एचएमटी, आरपी, पारस, एक हजार दहा, एक हजार एक, आयआर या जातीचे धान बाजार समितीत विक्रीला आले. १ आॅक्टोबर ते १ नोव्हेंबरपर्यंत एकूण २९८० क्विंटल धान विक्री करण्यात आले. बाजार समितीत व्यापाऱ्यांची मक्तेदारी सुरू असल्याने शेतकऱ्यांना धानाचे आधारभूत मुल्यच मिळत नाही. त्यामुळे जय श्रीराम, एचएमटी, आरपी, पारस या जातीच्या धानाला किमान १४३९ ते २६७५ पर्यंत तर हलक्या जातीच्या धानाला १२०० ते १२८० पर्यंत भाव दिला जात आहे. बाजार समितीत व्यावसायिक शेतकऱ्यांच्या उत्पादित धानाला ओलसर व नरम असल्याचे कारण पुढे करून धानाला कमी भाव दिला जात आहे. त्यामुळे अपेक्षित किमतीला शेतकऱ्यांना मुकावे लागत आहे. त्यामुळे धान उत्पादनासाठी घेतलेले कर्ज फेडण्यासही ते असमर्थ ठरत आहेत. हातात पिक असूनसुध्दा किंमत मिळत नसल्याने बळीराजा पुन्हा कर्जाच्या ओझ्याखाली सापडण्याची वेळ आली आहे. (शहर प्रतिनिधी)