शहरं
Join us  
Trending Stories
1
ISRO आणखी एक विक्रम रचणार! २०३५ पर्यंत भारतीय अंतराळ स्टेशन बनवणार, पाहा कसं दिसतं मॉडेल?
2
भाजपाला कधी मिळणार नवा राष्ट्रीय अध्यक्ष?; अचानक घडलेल्या घडामोडींमुळे झाला विलंब, काय आहे कारण?
3
भारतावरील 'टॅरिफ'वरून' ट्रम्प यांच्यावर टीका केली, माजी अमेरिकन राष्ट्रीय सुरक्षा सल्लागाराच्या घरावर एफबीआयचा छापा
4
टिकटॉक भारतात परत सुरू होणार? नवीन अपडेट आली, सोशल मीडियावर जोरदार चर्चा
5
Video: इलेक्टिक कारच्या ऑटोमेटिक फिचरनं घेतला मालकाचा जीव?; अंगावर काटा आणणारा व्हिडिओ व्हायरल
6
ऑनलाइन फॅन्टसी गेमिंगवर अखेर बंदी; नवीन विधेयकावर राष्ट्रपती द्रौपदी मुर्मूंची मोहोर
7
अबब! ३५ लाख जप्त, २० लाखांची रोकड जाळली; सरकारी इंजिनिअरचा 'काळा' प्रताप उघड, नेमकं काय घडलं?
8
सोलापूर: माहेराहून पैसे आण, चाबकाने मारले फटके; काजलने आयुष्य संपवले, वैष्णवी हगवणे घटनेची पुनरावृत्ती?
9
'ऑपरेशन सिंदूर'मधील शहीद जवान रामच्या घरी जन्मली 'लक्ष्मी'; ३ महिन्यांनी कुटुंबात पसरला आनंद
10
'पाकिस्तान अजूनही डंपर, असीम मुनीरनेही कबूल केले', राजनाथ सिंह यांनी मर्सिडीजच्या विधानाची खिल्ली उडवली
11
"मुख्यमंत्र्यांनी मला फोन केला होता, मात्र मी त्यांना..."; फडणवीसांसोबत शरद पवारांचा काय झाला संवाद?
12
Video: सुप्रीम कोर्टाचा निकाल लागला अन् नाशिकमधला राडा समोर आला; कुत्र्याने बिबट्यावरच केला हल्ला
13
लवकरच ममता बॅनर्जींचे सरकार जाणार अन्..; कोलकात्यातून PM मोदींचा हल्लाबोल
14
पुणे हादरले! 'तुला किंमत चुकवावी लागेल', मानलेल्या बहिणीच्या प्रियकरानेच केली इंजिनिअर सौरभची हत्या
15
बीडमध्ये खळबळ! सरकारी वकिलाने कोर्टातच संपवले आयुष्य, न्यायाधीशासह दोघांवर गुन्हा; प्रकरण काय?
16
चीनची मोठी तयारी! या देशाविरोधात लढणार,समुद्रात १४ लढाऊ जहाजे उतरवले; लष्कर हाय अलर्टवर
17
६० कोटींचा सायबर फ्रॉड, ९४३ बँक खात्यांचा वापर; मुंबई पोलिसांनी १२ आरोपींना घेतले ताब्यात
18
संपूर्ण देशाची फेव्हरिट बनली ही ₹9 लाखाहून कमी किंमतीची SUV; नेक्सन, पंच, फ्रोंक्सला टाकलं मागे; विक्री घटूनही ठरली नं. 1
19
विवाह नोंदणी कार्यालयात हायव्होल्टेज ड्रामा; मेहुणीसोबत दाजी करणार होता लग्न, तितक्यात...
20
या मल्टीबॅगर स्टॉकला मिळालं 499.95 कोटींचं काम, रेल्वे सेक्टरशी संबंधित आहे नवी वर्क ऑर्डर; जाणून घ्या सविस्तर

दोन महसूल मंडळात अतिवृष्टी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 9, 2020 05:00 IST

यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही.

ठळक मुद्देजिल्हावासीयांना दमदार पावसाची प्रतीक्षा : गेल्या २४ तासात ३२२.२० मिमी पावसाची नोंद

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : हवामान खात्याने गुरूवारपासून जिल्ह्यात तीन दिवस मुसळधार पावसाचा अंदाज वर्तविला होता. गुरूवारी (दि.६) पावसाने गोंदिया, आमगाव, गोरेगाव तालुक्यात दमदार हजेरी लावली होती. त्यामुळे या भागातील शेतकऱ्यांना थोडा दिलासा मिळाला होता. त्यानंतर शुक्रवारी (दि.८) सायंकाळच्या सुमारास जिल्ह्यातील काही भागात दमदार हजेरी लावली होती. गेल्या २४ तासात सडक अर्जुनी तालुक्यातील सौंदड आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात अतिवृष्टीची नोंद झाली आहे. तर जिल्ह्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.ऑगस्ट महिन्याला सुरूवात होवून सात दिवसांचा कालावधी लोटला असला तरी अद्यापही सर्वत्र दमदार पावसाने हजेरी लावली नाही. परिणामी जिल्ह्यातील १ लाख हेक्टरवरील रोवणी खोळंबली आहे. तर पºहे सुध्दा वाळत असल्याचे चित्र काही भागात आहे. धानाची रोवणी करण्यासाठी १५ आॅगस्टपर्यंतचा कालावधी अनुकुल मानला जातो.मात्र यंदा जिल्ह्यात पावसाने सुरूवातीपासूनच पाठ फिरविली आहे. त्यामुळे जवळपास ४५ टक्के पावसाची तूट निर्माण झाली आहे. जिल्ह्यातील नदी, नाले अद्यापही कोरडे पडले असून सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा आहे. त्यामुळे यंदाचा खरीप हंगाम पूर्णपणे संकटात आला आहे. अर्जुनी मोरगाव, देवरी, गोंदिया, सालेकसा,तिरोडा या तालुक्यांमध्ये अद्यापही पावसाने सरासरी गाठलेली नाही. त्यामुळे खरिपातील धान पिकांवर अद्यापही संकट कायम आहे.जिल्ह्यात गेल्या २४ तासात ३२२ मिमी पावसाची नोंद झाली आहे. तर सकड अर्जुनी तालुक्यातील सौदंड महसूल मंडळात ६५.२० मिमी आणि सडक अर्जुनी महसूल मंडळात ७० मिमी पाऊस झाल्याने या दोन्ही ठिकाणी अतिवृष्टीची नोंद झाली आहे. गुरूवारी सुध्दा सडक अर्जुनी, गोरेगाव, आमगाव या तालुक्यात चांगला पाऊस झाल्याने या भागातील रोवणीच्या कामाला वेग आला आहे. मात्र उर्वरित भागातील शेतकऱ्यांना अद्यापही पावसाची प्रतीक्षा कायम आहे.उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यतायंदा आॅगस्ट महिन्याला सुरूवात झाली तरी रोवणीची कामे आटोपलेली नाही. अद्यापही जिल्ह्यातील ५० टक्के रोवणी शिल्लक आहे. पावसाला विलंब होत असल्याने रोवणीचा अनुकुल कालावधी निघून जात आहे.त्यामुळे रोवणीच्या कामाला विलंब होत असल्याने याचा धानाचा उत्पादनावर परिणाम होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.जिल्ह्यात मागील २४ तासात पडलेला पाऊसजिल्ह्यात मागील २४ तासात आठही तालुक्यात एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे. गोंदिया ७ मिमी, गोरेगाव २.८० मिमी, तिरोडा ६७.४० मिमी, अर्जुनी मोरगाव २२.२० मिमी, देवरी ६४ मिमी, आमगाव ८.८० मिमी, सालेकसा ६.८० मिमी, सडक अर्जुनी १४३.२० मिमी अशा एकूण ३२२.२० मिमी पावसाची नोंद झाली आहे.

टॅग्स :Rainपाऊसfloodपूर