शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:50 IST

वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांकडून निविदाच नाहीत : महावितरण आले अडचणीत

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याने ते वेटींगवर आहेत.विशेष म्हणजे, महावितरणने या कामासाठी कित्येकदा निविदा काढली. मात्र त्यात कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आली नाही. यामुळे वीज जोडणी करून देण्याची इच्छा असतानाही महावितरणची अडचण झाली आहे.जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची फटका सहन करावा लागत आहे. यात एका पाण्याअभावी पीक हातून गेल्याचे चित्रही कित्येकदा बघावयास मिळाले आहे. अशात सिंचनाची मदत घेऊन पीक वाचविण्याची पाळी शेतकºयांवर येते.विहिरीचे पाणी घेण्यासाठी कृषी पंपाची गरज असते. मात्र ज्यांच्याकडे कृषी पंप नाही असे शेतकरी अवैधरित्या जोडणी घेऊन पाण्याची सोय करतात. हा प्रकार कित्येकदा त्यांच्याच अंगलट येत असल्याचेही प्रकार घडतात.यामुळेच महावितरणकडून शेतकºयांना स्वत:च्या हक्काचे कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. महावितरणचा हा सौदा फायद्याचा असल्याने शेतकºयांनीही हक्काच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केले.त्यानुसार, मागील दोन वर्षांपासून महावितरणकडे सुमारे दोन हजार ७७९ अर्ज डिमांड भरलेले आहेत. या शेतकºयांना कृषी पंप जोडणी दिली जावी, यासाठी महावितरणने कित्येकदा निविदा काढली. मात्र कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आल्या नाहीत. अशात इच्छा असूनही महावितरणकडून जोडणी करण्यात आली नाही. परिणामी डिमांड भरूनही जिल्ह्यातील दोन हजार ७७९ शेतकरी वेटींगवरच आहेत.उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचडिव्हीएस) योजनेला सुरूवातशेतकºयांना योग्य दाब व अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली (एचहिडीएस) योजना राबविली जाणार आहे. यासह अन्य २ योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. यात, उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेची जिल्ह्यातही सुरूवात करण्यात आला असून गोरेगाव तालुक्यातील ग्राम झांजीया येथील शेतकरी जियालाल गणपत चन्ने यांना पहिले कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून आता कृषी पंप वीज जोडणीचे काम गती घेणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण