शहरं
Join us  
Trending Stories
1
'लाडकी बहीण'नंतर आणखी एका योजनेची घोषणा; महायुती सरकारची नोकरदार महिला वर्गाला मोठी भेट
2
"मर्सिडिज, महागडा फोन अन् ३५ लाख दिले तरीही..."; मृत्यूपूर्वी युवकाचा भाजपा नेत्यावर गंभीर आरोप
3
घर सोडले, गाव सोडले अन् निघाल्या थेट मुंबईकडे; टीसीच्या सतर्कतेमुळे 'त्या' दोघी सुखरूप बचावल्या
4
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
5
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
6
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
7
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
8
CSK च्या अकादमीत MI अन् RCB चे चाहते! ऋतुराज म्हणाला; प्रत्येकाचं नाव लक्षात ठेवीन! (VIDEO)
9
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
10
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
11
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
12
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
13
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
14
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
15
मोठी बातमी! पालघरमधील मेडली फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
16
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
17
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
18
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
19
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
20
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!

डिमांड भरूनही २८०० शेतकरी वेटिंगवर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 17, 2018 00:50 IST

वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे.

ठळक मुद्देकंत्राटदारांकडून निविदाच नाहीत : महावितरण आले अडचणीत

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वीज चोरी व त्यामुळे होणारे अपघात टाळण्यासाठी महाराष्ट्र वीज वितरण कंपनीकडून शेतकऱ्यांना वीज जोडणी घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. त्यानुसार, जिल्हयातील दोन हजार ७७९ शेतकºयांनी कृषी पंप जोडणीसाठी डिमांड भरले आहे. मात्र मागील दोन वर्षांपासून या शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली नसल्याने ते वेटींगवर आहेत.विशेष म्हणजे, महावितरणने या कामासाठी कित्येकदा निविदा काढली. मात्र त्यात कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आली नाही. यामुळे वीज जोडणी करून देण्याची इच्छा असतानाही महावितरणची अडचण झाली आहे.जिल्ह्यातील शेतीला मागील काही वर्षांपासून निसर्गाची फटका सहन करावा लागत आहे. यात एका पाण्याअभावी पीक हातून गेल्याचे चित्रही कित्येकदा बघावयास मिळाले आहे. अशात सिंचनाची मदत घेऊन पीक वाचविण्याची पाळी शेतकºयांवर येते.विहिरीचे पाणी घेण्यासाठी कृषी पंपाची गरज असते. मात्र ज्यांच्याकडे कृषी पंप नाही असे शेतकरी अवैधरित्या जोडणी घेऊन पाण्याची सोय करतात. हा प्रकार कित्येकदा त्यांच्याच अंगलट येत असल्याचेही प्रकार घडतात.यामुळेच महावितरणकडून शेतकºयांना स्वत:च्या हक्काचे कनेक्शन घेण्यासाठी प्रोत्साहीत करण्यात आले. महावितरणचा हा सौदा फायद्याचा असल्याने शेतकºयांनीही हक्काच्या कनेक्शनसाठी महावितरणकडे अर्ज केले.त्यानुसार, मागील दोन वर्षांपासून महावितरणकडे सुमारे दोन हजार ७७९ अर्ज डिमांड भरलेले आहेत. या शेतकºयांना कृषी पंप जोडणी दिली जावी, यासाठी महावितरणने कित्येकदा निविदा काढली. मात्र कंत्राटदारांकडून निविदा टाकण्यात आल्या नाहीत. अशात इच्छा असूनही महावितरणकडून जोडणी करण्यात आली नाही. परिणामी डिमांड भरूनही जिल्ह्यातील दोन हजार ७७९ शेतकरी वेटींगवरच आहेत.उच्चदाब वितरण प्रणालीचा (एचडिव्हीएस) योजनेला सुरूवातशेतकºयांना योग्य दाब व अखंडीत वीज पुरवठा मिळावा यासाठी महावितरणकडून उच्चदाब वितरण प्रणाली (एचहिडीएस) योजना राबविली जाणार आहे. यासह अन्य २ योजनांचा शुभारंभ मुख्यमंत्र्यांच्या हस्ते मंगळवारी (दि.१६) करण्यात आला. यात, उच्चदाब वितरण प्रणाली या योजनेची जिल्ह्यातही सुरूवात करण्यात आला असून गोरेगाव तालुक्यातील ग्राम झांजीया येथील शेतकरी जियालाल गणपत चन्ने यांना पहिले कनेक्शन देण्यात आले आहे. विशेष म्हणजे, या कामांसाठी कंत्राटदाराला कार्यादेश देण्यात आले असून आता कृषी पंप वीज जोडणीचे काम गती घेणार असल्याचे दिसत आहे.

टॅग्स :mahavitaranमहावितरण