लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : राष्ट्रीय विधी सेवा प्राधिकरण, नवी दिल्ली व महाराष्ट्र राज्य विधी सेवा प्राधिकरण, मुंबई यांच्या निर्देशानुसार देशभरात १३ मे ते १५ ऑगस्ट दरम्यान साथी मोहीम राबविण्यात येणार आहे. याअंतर्गत रस्त्यांवरील निराधार बालकांनाही आता आधार कार्ड मिळणार आहे. त्यासाठी जिल्हा साथी समितीची स्थापना करण्यात आली. ही समिती सर्व्हे करून विविध ठिकाणी आढळलेल्या १८ वर्षाखालील निराधार बालकांना आधार कार्ड काढून देणार आहे.
गोंदिया जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे अध्यक्ष व प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश आर.एन. जोशी यांच्या मार्गदर्शनाखाली ही विशेष मोहीम राबविण्यात येणार आहे. यात ज्यांच्याकडे कसलेही पुरावे नाहीत, अशा निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख व इतर सेवा मिळणार आहे. ही मोहीम बालहित सर्वोपरी' या तत्त्वावर आधारित आहे. बालकांचे सर्वांगीण पुनर्वसन आणि विकास हे मुख्य उद्देश आहेत. ही मोहीम केवळ आधार कार्ड नोंदणीपुरती मर्यादित नसन यात मलांचे सामाजिक, शैक्षणिक, आरोग्य व कायदेशीर हक्कांचे संरक्षण व त्यांच्या पुनर्वसनासाठी एकात्मिक दृष्टिकोन ठेवून काम करणार आहे.
बैठकीत दिले निर्देशजिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव एन.के. वाळके हे या समितीचे समन्वयक असून १२ जून रोजी या समितीची बैठक घेण्यात आली. सर्व संबंधित अधिकाऱ्यांना मार्गादर्शन करून ही मोहीम प्रभावीपणे राबविण्याचे निर्देश देण्यात आले. यावेळी पाहुणे निवासी उपजिल्हाधिकारी भैयासाहेब बेहेरे व अधिकारी उपस्थित होते.
या बालकांचा आहे समावेश१८ वर्षांखालील मुले ज्यांना कौटुंबिक आधार, पालकत्व किंवा निवारा, संरक्षण आणि आधाराचा स्रोत नाही, तसेच दुर्लक्षित रस्त्यावर राहणारी मुले, झोपडपड्यांमध्ये किंवा रेल्वेस्थानकावर राहणारी मुले, बालसंगोपन संस्थामध्ये राहणारी अनाथ मुले, बेघर मुले, बालकांच्या तस्करीतून सुटका झालेली बालके, निवारगृहे किंवा नोंदणी नसलेली बालसंगोपन गृहे आणि कुटुंबाला परत मिळाली नाहीत, अशा सर्व मुलांचे २६ जूनपर्यंत सर्वेक्षण करून त्यांना २५ पर्यंत आधार नोंदणीद्वारे आधार कार्ड व नोंदणी प्रमाणपत्र दिले जाणार आहे. ही समिती गोंदिया जिल्ह्यातील निराधार बालकांना आधार कार्डच्या माध्यमातून ओळख निर्माण करून देणार आहे.