शहरं
Join us  
Trending Stories
1
'चुका दुरुस्त केल्याशिवाय निवडणुका घेता येणार नाही'; उद्धव ठाकरेंची निवडणूक आयोगावर टीका
2
विद्यार्थिनीने स्वतः टॉयलेट अ‍ॅसिड आणले, वडिलांनीच कट रचला; डीयू विद्यार्थिनी अ‍ॅसिड हल्ला प्रकरणात मोठा ट्विस्ट
3
बांगलादेशात हाफीज सईदची नापाक खेळी; ईशान्येकडे भारतासाठी धोक्याची घंटा, सीमेवर हालचाली वाढल्या
4
रेस्टॉरंटमध्ये भाऊ-बहिणीशी पोलिसांचे गैरवर्तन; व्हिडीओ व्हायरल, एसओने कारणे दाखवा नोटीस बजावली
5
छठ पूजेदरम्यान उत्तर प्रदेशात मोठी दुर्घटना; लोक सेल्फी घेत असतानाच नाव उलटली, अनेक जण बुडाल्याची शक्यता
6
2028 मध्ये अमेरिकन राष्ट्राध्यक्षपदाची निवडणूक कोण लढू शकतं? डोनाल्ड ट्रम्प यांनी स्पष्टच सांगितलं
7
अरुणाचल सीमेपासून ४० किमी अंतरावर चीनने बांधला मोठा एअरबेस; लुंजेमध्ये ३६ नवीन एअरक्राफ्ट शेल्टर तयार
8
करारा जवाब मिलेगा..! पाकिस्तानच्या धमकीला तालिबानचं जशास तसं प्रत्युत्तर; युद्ध पेटणार?
9
Suryakumar Yadav: ऑस्ट्रेलियाविरुद्ध सूर्यकुमार इतिहास रचणार? विराट- रोहितला मागे टाकण्याची संधी!
10
मतदारांनो सावधान! 'ही' कागदपत्रे नसतील तर नाव होणार कट; आयोगाने यादी जाहीर केली
11
देशव्यापी 'मतदार यादी दुरुस्ती मोहिम' का गरजेची? निवडणूक आयोगाने सांगितले SIR चे महत्व....
12
मला जाऊ द्या ना घरी...! राष्ट्रवादीच्या कार्यालयात डान्स करणारी ही महिला कोण?; समोर आला खुलासा
13
"तू त्या कॅचसाठी..." आयसीयूमध्ये दाखल असलेल्या श्रेयस अय्यरसाठी शिखर धवनचा इमोशनल मेसेज!
14
Phaltan Doctor Death: फोटोवरून प्रशांतसोबत वाद, मंदिराजवळ गेली; डॉक्टर तरुणी हॉटेलवर जाण्यापूर्वी घरी काय घडले?
15
अरुणाचल हादरलं! HIV आणि दोन आत्महत्या; फरार आयएएस अधिकारी अटकेत; नेमकं प्रकरण काय?
16
3 दिवसांपासून मालामाल करतोय हा शेअर, सातत्यानं लागतंय अप्पर सर्किट; किंमत १० रुपयांपेक्षाही कमी; आता कंपनीची मोठी तयारीत
17
Video: फलटणच्या २ सख्ख्या बहिणींचा भाजपाचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकरांवर गंभीर आरोप
18
थरारक ट्रेन अपघात; लोकमान्य टिळक भागलपूर एक्सप्रेसचे डबे वेगळे झाले, सुदैवाने मोठा अनर्थ टळला
19
कुठल्याही कोचिंगविना २१ व्या वर्षी पहिल्याच प्रयत्नात UPSC उत्तीर्ण; 'ही' IAS तरूणी आहे कोण?
20
मोठी घडामोड! श्रेयस अय्यरचे आई-वडील ऑस्ट्रेलियाला जाणार, तातडीच्या व्हिसासाठी केला अर्ज

लॉकडाऊन काळात पोषण आहार वाटप करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी ...

ठळक मुद्देसीईओंचे शाळांना पत्र : विरोधाभासी निर्णय, पालक आणि शिक्षक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहारासाठी घराबाहेर पडण्यास बाध्य करणारा शासन आदेश धडकल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत घराबाहेर न पडण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून आता त्यांनी काढलेल्या आदेशामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोषण आहार घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोेखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाचा शाळा संचारबंदी असेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळात शालेय विद्यार्थी व लहान बालके शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, याकरीता शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रं. शापोआ/२०२०/प्रक्र-८२/एस.डी.दि.२७ मार्च २०२० अन्वये ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशान्वये शाळेतील शिल्लक पोषण आहाराचा साठा मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत वाटप करावयाचा आहे.यासाठी प्रत्येक शाळास्तरावरुन प्रसिध्दी करुन विद्यार्थी व पालकांना रांगेत उभे करुन वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक धान्यसाठाचे वाटप कसे करावे याबाबतही संभ्रम आहे. शाळांमध्ये तांदूळ वगळता उर्वरीत डाळी, कडधान्याचा फार अन्नसाठा उपलब्ध असतो. सदर पोषण आहार विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत शिक्षक वर्गात संभ्रमाची स्थिती आहे. लहान बालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असताना विद्यार्थी,पालकांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त करणारा निर्णय पूर्णत: विरोधाभासी असल्याची चर्चा जनसामान्यत: आहे. शाळास्तरावर धान्य, डाळी, कडधान्य वाटपाची पुर्वसूचना पोलीस प्रशासनास देण्याचे शासनाचा आदेशात नमूद केले आहे. परंतु संचारबंदी काळात पोलीस प्रशासन व्यस्त असताना त्यांच्यावर धान्य वाटपाप्रसंगी गर्दी टाळण्यासाठी उपस्थित राहण्याचा हा नवीन पिल्लू म्हणजे पोलीस प्रशासनास अशक्यच आहे.संसर्ग होण्याच्या धोकाकोरोना विषाणू प्रादुर्भावाचा संसर्ग होण्याच्या काळात एका विशिष्ट व्यक्तीद्वारे प्रतिबंधक साधने (मास्क, सॅनीटायझर) उपलब्ध नसताना अनेक विद्यार्थी, पालकांच्या संपर्कात येऊन धान्य वाटप केल्याने संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता आहे. याबाबतीत शासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन शाळांमध्ये लॉकडाऊनच्या काळात शालेय पोषण आहार वाटपाचा विरोधाभासी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी चालक वर्गातून केली जात आहे.तर संचारबंदीचे होणार उल्लघंनराज्यात सुमारे ७५ हजार प्राथमिक शाळेत अंदाजे ५ लाखाहून अधिक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थी यांच्या पालकांसमवेत शालेय पोषण आहार घेण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये उपस्थित झाल्यास संचारबंदी नियम वाऱ्यावर टाकला जाईल व कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक बळावेल, एवढेच नव्हे तर कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हरताळ फासला जाईल अनेक विद्यार्थी व पालकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा