शहरं
Join us  
Trending Stories
1
तुमच्या आकांसमोर झुकू नका, सॅलरी कापणार नाहीत; सुप्रीम कोर्टाने केली IPS अधिकाऱ्याची कानउघडणी
2
चुकीचा निवडणूक डेटा पोस्ट करणं संजय कुमारांना भोवलं; महाराष्ट्र निवडणूक आयोगाची मोठी कारवाई
3
वासनांध भोंदूबाबाचा प्रताप, महिलेसोबत अश्लील कृत्य; तंत्रमंत्राने कुटुंबियांना भस्म करण्याची धमकी
4
पाकिस्तानची झोप उडणार! ५ हजार किमी रेंज असणाऱ्या 'अग्नी ५' मिसाइलची भारतानं केली यशस्वी चाचणी
5
राजधानी दिल्ली तिहेरी हत्याकांडानं हादरली; एकाच घरात ३ मृतदेह सापडले, कारण समजताच पोलीस हैराण
6
ODI Rankings मध्ये गडबड घोटाळा! ICC चा रिव्ह्यू अन् टॉप ५ मध्ये पुन्हा झळकलं रोहित-विराटचं नाव
7
अमेरिकेत ५ तास थांबणे व्लादिमीर पुतिन यांना महागात पडले! डोनाल्ड ट्रम्प यांनी २.२ कोटी आकारले; नेमके प्रकरण काय?
8
खराब अन् खड्डेमय रस्त्यांसाठी टोल घेणे योग्य नाही; सुप्रीम कोर्टाचा ऐतिहासिक निर्णय
9
रुग्णालयाने भरती करण्यास दिला नकार, 12 वर्षाच्या मुलाने बापाच्या खांद्यावरच सोडला जीव
10
जिओ वापरकर्त्यांसाठी वाईट बातमी! दररोज १.५ जीबी डेटासह ८४ दिवसांचा प्लॅन बंद
11
'मी अटक होण्यापूर्वीच राजीनामा दिला होता', अमित शाहांनी सोडलं मौन; वादाचा मुद्दा काय?
12
थयथयाट होणार! रशियाने भारताला कच्च्या तेलावर ५ टक्के सूट सुरुच ठेवली; पुतीन ट्रम्पना भेटून येताच...
13
एरिया मॅनेजरचा पराक्रम! टारगेट पूर्ण करण्यासाठी रेव्ह पार्टी दिली, ३७ जणांना अडकवलं अन्...
14
'ऑनलाइन गेमिंग विधेयक' लोकसभेत मंजूर; Online Games खेळणाऱ्यांसाठी काय आहे शिक्षेची तरतूद?
15
'मोठा धक्का बसला, पण आता...', हल्ल्यानंतर मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांची पहिली प्रतिक्रिया
16
'रॅपिडो'ला जबर झटका! १० लाखांचा दंड, ग्राहकांना पैसे करण्याचे कंपनीला आदेश; प्रकरण काय?
17
महाराष्ट्रातील कोणकोणत्या टोल नाक्यांवर चालणार ३ हजार रूपयांचा वार्षिक FASTag पास? वाचा यादी
18
लोकसभेत मोठा गोंधळ, विरोधकांनी फाडले विधेयक; कागद अमित शाहांच्या दिशेने भिरकावले, काय घडलं?
19
ऑनलाईन दरोडा! दरवर्षी ४५ कोटी भारतीय गमावताहेत २० हजार कोटी रुपये
20
धाडसाला सलाम; पती आणि मुलाचा जीव वाचवण्यासाठी मगरीशी लढल्या, गावातून कौतुकाचा वर्षाव

लॉकडाऊन काळात पोषण आहार वाटप करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी ...

ठळक मुद्देसीईओंचे शाळांना पत्र : विरोधाभासी निर्णय, पालक आणि शिक्षक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहारासाठी घराबाहेर पडण्यास बाध्य करणारा शासन आदेश धडकल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत घराबाहेर न पडण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून आता त्यांनी काढलेल्या आदेशामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोषण आहार घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोेखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाचा शाळा संचारबंदी असेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळात शालेय विद्यार्थी व लहान बालके शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, याकरीता शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रं. शापोआ/२०२०/प्रक्र-८२/एस.डी.दि.२७ मार्च २०२० अन्वये ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशान्वये शाळेतील शिल्लक पोषण आहाराचा साठा मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत वाटप करावयाचा आहे.यासाठी प्रत्येक शाळास्तरावरुन प्रसिध्दी करुन विद्यार्थी व पालकांना रांगेत उभे करुन वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक धान्यसाठाचे वाटप कसे करावे याबाबतही संभ्रम आहे. शाळांमध्ये तांदूळ वगळता उर्वरीत डाळी, कडधान्याचा फार अन्नसाठा उपलब्ध असतो. सदर पोषण आहार विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत शिक्षक वर्गात संभ्रमाची स्थिती आहे. लहान बालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असताना विद्यार्थी,पालकांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त करणारा निर्णय पूर्णत: विरोधाभासी असल्याची चर्चा जनसामान्यत: आहे. शाळास्तरावर धान्य, डाळी, कडधान्य वाटपाची पुर्वसूचना पोलीस प्रशासनास देण्याचे शासनाचा आदेशात नमूद केले आहे. परंतु संचारबंदी काळात पोलीस प्रशासन व्यस्त असताना त्यांच्यावर धान्य वाटपाप्रसंगी गर्दी टाळण्यासाठी उपस्थित राहण्याचा हा नवीन पिल्लू म्हणजे पोलीस प्रशासनास अशक्यच आहे.संसर्ग होण्याच्या धोकाकोरोना विषाणू प्रादुर्भावाचा संसर्ग होण्याच्या काळात एका विशिष्ट व्यक्तीद्वारे प्रतिबंधक साधने (मास्क, सॅनीटायझर) उपलब्ध नसताना अनेक विद्यार्थी, पालकांच्या संपर्कात येऊन धान्य वाटप केल्याने संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता आहे. याबाबतीत शासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन शाळांमध्ये लॉकडाऊनच्या काळात शालेय पोषण आहार वाटपाचा विरोधाभासी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी चालक वर्गातून केली जात आहे.तर संचारबंदीचे होणार उल्लघंनराज्यात सुमारे ७५ हजार प्राथमिक शाळेत अंदाजे ५ लाखाहून अधिक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थी यांच्या पालकांसमवेत शालेय पोषण आहार घेण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये उपस्थित झाल्यास संचारबंदी नियम वाऱ्यावर टाकला जाईल व कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक बळावेल, एवढेच नव्हे तर कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हरताळ फासला जाईल अनेक विद्यार्थी व पालकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा