शहरं
Join us  
Trending Stories
1
हिंदीची सक्ती महाराष्ट्रात होऊ देणार नाही; मनसे प्रमुख राज ठाकरेंचा सरकारला इशारा
2
पाकिस्तानच्या सिंधमध्ये जाफर एक्सप्रेसवर हल्ला, रेल्वे ट्रॅकवर भीषण स्फोट; ट्रेन रुळावरून घसरली
3
दिल्लीवरुन बालीला जाणारे Air India चे विमान माघारी परतले; ज्वालामुखी उद्रेकामुळे घेतला निर्णय
4
Ahmedabad plane crash: जीव वाचविण्यासाठी बाल्कनीतून मारल्या उड्या, अहमदाबाद विमान दुर्घटनेबाबत नवी माहिती समोर
5
'ना कधी मध्यस्थी स्वीकारली आणि भविष्यातही स्वीकारणार नाही'; पंतप्रधान मोदींचा ट्रम्प यांना कॉल, काश्मीर मुद्द्यावर स्पष्ट मेसेज
6
Sonam Raghuwanshi: नागा तलवारीने वार! रक्तबंबाळ राजा ओरडायला लागताच सोनम गेली पळून; त्याचा जीव गेल्यावरच आली परत
7
Viral Love Story: सोन्याची नव्हे, प्रेमाची पोत; आजी- आजोबांची हृदयाला भिडणारी लव्ह स्टोरी!
8
"भारताचे तुकडे पाडून १९७१ च्या पराभवाचा बदला घेऊ’’, पाकिस्तानचे लष्करप्रमुख आसिम मुनीर यांची धमकी
9
भारतात किती रेल्वे गाड्या? दररोज किती कोटी लोक प्रवास करतात? आकडे पाहून थक्क व्हाल!
10
Life Lesson: सगळं काही छान सुरळीत सुरु असताना अचानक आयुष्यात संकटं का येतात?
11
Ola नं सुरू केलं 'झिरो कमिशन' मॉडेल; काय आहे ही सुविधा, कसा होणार चालकांना फायदा?
12
अहमदाबादचा दुर्देवी विमान अपघात अन् घटस्फोट कॅन्सल! बॉलिवूड अभिनेत्री सांगितलं यामागचं नेमकं कनेक्शन
13
Global Air Traffic : आकाश विमानांनी भरले, तीन ठिकाणी 'नो फ्लाय झोन'; जागतिक तणावादरम्यान जागतिक हवाई वाहतुकीचा फोटो व्हायरल
14
India- Pakistan: पाकने धमक्या देऊ नये; भारताकडे त्यांच्यापेक्षा १० अधिक अण्वस्त्रे
15
निज्जर हत्या प्रकरणावर PM मोदींसोबत काय चर्चा झाली? कॅनडाचे पंतप्रधान म्हणाले, "सावधगिरी बाळगून..."
16
एअर इंडियाच्या मागचं ग्रहण सुटेना; आता सुप्रिया सुळेंना बसला फटका, संतापून म्हणाल्या...
17
"भाजप भंगार गोळा करुन मोठा झालेला पक्ष, मतांसाठी दाऊदलाही आणतील"; राऊतांची बोचरी टीका
18
चालकाला डुलकी आली आणि घात झाला, कार अपघातात एकाच कुटुंबातील ५ जणांचा होरपळून मृत्यू
19
"फडणवीसांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या आणि माय मराठीच्या छातीत सुरा भोसकून..."; हिंदी सक्तीवरून काँग्रेस प्रदेशाध्यक्षांची जहरी टीका
20
Israel Iran War : "युद्धाला सुरुवात झालीय, आता कोणतीही दया नाही"; खामेनींनी इस्रायलविरुद्ध केली युद्धाची घोषणा

लॉकडाऊन काळात पोषण आहार वाटप करण्याचे आदेश

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2020 05:00 IST

लोकमत न्यूज नेटवर्क गोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी ...

ठळक मुद्देसीईओंचे शाळांना पत्र : विरोधाभासी निर्णय, पालक आणि शिक्षक संभ्रमात

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : कोरोना विषाणू संसर्गांने राज्य व देशच नव्हे तर संपूर्ण जग लॉकडाऊन असताना घराघरातील विद्यार्थी व पालकांना शालेय पोषण आहारासाठी घराबाहेर पडण्यास बाध्य करणारा शासन आदेश धडकल्याने विद्यार्थी, पालकांसह शिक्षकांमध्येही संभ्रमाचे वातावरण आहे. लॉकडाऊनच्या कालावधीत घराबाहेर न पडण्याच्या सूचना शासनाने दिल्या असून आता त्यांनी काढलेल्या आदेशामुळे विद्यार्थी आणि त्यांच्या पालकांना पोषण आहार घेण्यासाठी घराबाहेर पडण्याची वेळ आली आहे. या विरोधाभासी निर्णयामुळे पालक आणि शिक्षकांमध्ये सुध्दा संभ्रमाचे वातावरण आहे.कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोेखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून राज्यातील सर्व व्यवस्थापन व माध्यमाचा शाळा संचारबंदी असेपर्यंत बंद ठेवण्यात आल्या आहेत. या काळात शालेय विद्यार्थी व लहान बालके शालेय पोषण आहारापासून वंचित राहू नये, याकरीता शालेय शिक्षण विभागाचे पत्र क्रं. शापोआ/२०२०/प्रक्र-८२/एस.डी.दि.२७ मार्च २०२० अन्वये ग्रामीण भागातील शाळा स्तरावर शिल्लक असलेला तांदूळ व डाळी, कडधान्ये विद्यार्थ्यांना व हंगामी वसतिगृहातील विद्यार्थ्यांना वितरित करण्याचे आदेश दिले आहे. सदर आदेशान्वये शाळेतील शिल्लक पोषण आहाराचा साठा मुख्याध्यापक, शिक्षकांना शाळा व्यवस्थापन समितीच्या उपस्थितीत वाटप करावयाचा आहे.यासाठी प्रत्येक शाळास्तरावरुन प्रसिध्दी करुन विद्यार्थी व पालकांना रांगेत उभे करुन वाटप करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. विशेष म्हणजे ग्रामीण भागातील शाळांमध्ये शिल्लक धान्यसाठाचे वाटप कसे करावे याबाबतही संभ्रम आहे. शाळांमध्ये तांदूळ वगळता उर्वरीत डाळी, कडधान्याचा फार अन्नसाठा उपलब्ध असतो. सदर पोषण आहार विद्यार्थ्यांना समप्रमाणात वाटप करण्याबाबत शिक्षक वर्गात संभ्रमाची स्थिती आहे. लहान बालकांना कोरोना विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता अधिक असताना विद्यार्थी,पालकांना घराबाहेर पडण्यास प्रवृत्त करणारा निर्णय पूर्णत: विरोधाभासी असल्याची चर्चा जनसामान्यत: आहे. शाळास्तरावर धान्य, डाळी, कडधान्य वाटपाची पुर्वसूचना पोलीस प्रशासनास देण्याचे शासनाचा आदेशात नमूद केले आहे. परंतु संचारबंदी काळात पोलीस प्रशासन व्यस्त असताना त्यांच्यावर धान्य वाटपाप्रसंगी गर्दी टाळण्यासाठी उपस्थित राहण्याचा हा नवीन पिल्लू म्हणजे पोलीस प्रशासनास अशक्यच आहे.संसर्ग होण्याच्या धोकाकोरोना विषाणू प्रादुर्भावाचा संसर्ग होण्याच्या काळात एका विशिष्ट व्यक्तीद्वारे प्रतिबंधक साधने (मास्क, सॅनीटायझर) उपलब्ध नसताना अनेक विद्यार्थी, पालकांच्या संपर्कात येऊन धान्य वाटप केल्याने संसर्ग अधिक पसरण्याची शक्यता आहे. याबाबतीत शासनाने गांभीर्याने निर्णय घेऊन शाळांमध्ये लॉकडाऊनच्या काळात शालेय पोषण आहार वाटपाचा विरोधाभासी निर्णय मागे घ्यावा, अशी मागणी विद्यार्थी चालक वर्गातून केली जात आहे.तर संचारबंदीचे होणार उल्लघंनराज्यात सुमारे ७५ हजार प्राथमिक शाळेत अंदाजे ५ लाखाहून अधिक विद्यार्थी प्राथमिक शिक्षण घेत आहेत. सदर विद्यार्थी यांच्या पालकांसमवेत शालेय पोषण आहार घेण्यासाठी राज्यातील शाळांमध्ये उपस्थित झाल्यास संचारबंदी नियम वाऱ्यावर टाकला जाईल व कोरोना विषाणू संसर्गाची शक्यता अधिक बळावेल, एवढेच नव्हे तर कोरोना विषाणू प्रादुर्भाव रोखण्यासाठी प्रतिबंधात्मक उपाययोजना हरताळ फासला जाईल अनेक विद्यार्थी व पालकांचे आरोग्य सुध्दा धोक्यात येण्याची शक्यता नाकारता येत नाही. 

टॅग्स :Coronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरसSchoolशाळा