शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

महावितरणच्या विभाजनाला वीज कर्मचारी कृती समितीचा विरोध

By admin | Updated: May 3, 2015 01:24 IST

महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे चार प्रादेशिक विभागीय वीज कंपन्यांत विभाजन करण्यात येणार आहे.

गोंदिया : महाराष्ट्र वीज वितरण कंपनीचे चार प्रादेशिक विभागीय वीज कंपन्यांत विभाजन करण्यात येणार आहे. ऊर्जामंत्र्यांनी ही बाब नुकतीच जाहीर केली असून याचा मात्र वीज कर्मचारी कृती समितीने विरोध केला आहे. शिवाय वीज कर्मचाऱ्यांच्या विविध मागण्या प्रलंबीत असून त्यांचीही पूर्तता करावी अन्यथा कर्मचारी कृती समितीला तीव्र आंदोलन करावे लागणार असा इशारा देण्यात आला आहे. महाराष्ट्रात ऊर्जा क्षेत्रात कार्यरत महावितरण कंपनीचे विदर्भ, मराठवाडा, कोकण व पश्चिम महाराष्ट्र अशा चार प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण राज्याच्या ऊर्जामंत्र्यांनी नुकतेच जाहीर केले. ऊर्जामंत्र्यांच्या या धोरणाचा मात्र महावितरण कर्मचारी संयुक्त कृती समिती अंतर्गत असलेल्या सबॉर्डिनेट इंजिनियर्स असोसिशएन, महाराष्ट्र स्टेट इलेक्ट्रीक वर्कस फेडरेशन (आयटक), महाराष्ट्र वीज कामगार महासंघ, इंटक विद्युत क्षेत्र तांत्रीक कामगार युनियन, वीज तांत्रिक कामगार संघटना, ग्रॅज्युएट इंजिनियर्स असोसिएशन या संघटनांनी विरोध केला आहे. विशेष म्हणजे २६ एप्रिल रोजी कृती समितीने सभा घेऊन तसा निर्णय घेतला असून अगोदर वीज कर्मचाऱ्यांच्या प्रलंबीत मागण्यांची पूर्तता करण्याची मागणी उर्जामंत्र्यांना पत्र लिहून केली आहे. यात प्रादेशिक विभागीय वीज कंपन्या स्थापित करण्याचे धोरण मागे घेण्याचे स्पष्ट करण्यात आले असून याशिवाय फिडर फ्रँचाईसी विषयावर संघटनांशी चर्चा करावी व कमर्शियल परिपत्रकाची अंंमलबजावणी थांबवावी, तिन्ही कंपन्यांतील बदली धोरण संघटनांशी चर्चा करून ठरवावे, अनुकंपा तत्वावर मयत कामगारांच्या वारसांना त्यांच्या शैक्षणिक पात्रतेनुसार पुर्वीप्रमाणे कायम पदावर नेमणूक द्यावी, सामान्य आदेश ७४ च्या तृतीय लाभासाठी रोजंदारी कामगारांची सेवाज्येष्ठता ग्राह्य धरावी, तिन्ही कंपन्यांसाठी स्टाफ नॉर्मस, स्टाफ सेट-अप व कंझूमर नॉर्मस ठरवावे, पारेषण कंपनीचे व्यवस्थापनाबरोबर झालेल्या चर्चेनुसार रिक्त जागा भराव्यात, पात्र चतुर्थ श्रेणी कर्मचाऱ्यांना पदोन्नती द्यावी, सर्व वीज सेवकांना मेडिक्लेम योजना लागू करावी तसेच २५ आॅगस्ट २०१४ रोजीच्या संयुक्त कृती समितीच्या पत्रात नमूद केलेल्या मागण्या व प्रश्नांवर वाटाघाटी करून निर्णय घेण्यात यावा असे कळविण्यात आले आहे. विशेष म्हणजे यातील काही मागण्या फार पूर्वीपासून प्रलंबित असल्यामुळे वीज कर्मचाऱ्यांत तिव्र असंतोष व नाराजी वातावरण आहे. करिता सर्व विषयांवर १५ दिवसांत वाटाघाटी व चर्चा होऊन निर्णय अपेक्षित असून अन्यथा कृती समितीला राज्यव्यापी आंदोलन करावे लागणार असा इशारा देण्यात आला आहे. (शहर प्रतिनिधी)