शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

३७ हजार ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी

By admin | Updated: October 17, 2016 00:28 IST

वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.

महावितरणची नवी योजना : १ नोव्हेंबरपासून होणार शुभारंभ गोंदिया : वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे. महावितरणची ही नवी योजना येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ग्राहकांनी जेवढ्या लवकर या योजनेचा लाभ घेतला, तेवढा जास्त लाभही योजना देणार आहे. वीजेचे देयक न भरल्याने त्यांची रक्कम वाढत जाते व देयक न भरल्याचा कालावधी वाढत गेल्यास वीज वितरण कंपनीकडून नाईलाजास्तव त्या ग्राहकांची कायमस्वरूपी वीज जोडणी खंडीत केली जाते. जिल्ह्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात असून अशा ग्राहकांची संख्या ३७ हजार ६३७ आहे. तर अशा या ग्राहकांवर २१ कोटी २८ लाख ५५ हजार २८५ रूपयांची थकबाकी असून त्यावर तीन कोटी ५४ लाख १० हजार ९८३ रूपयांचे व्याज थकून पडले आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने आणि मूळ व व्याजाची रक्कम मिळून एवढी रक्कम भरणे काहींच्या आवाक्याबाहेरही झाले असावे. परिणामी अशा या ग्राहकांकडून पुढाकार घेतला जात नाही. अशात वीज चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याचे प्रकारही घडतात. एकंदर यातून वीज कंपनीलाच फटका सहन करावा लागतो. शिवाय ग्राहकांना अंधारात ठेवणेही महावितरणच्या धोरणात नाही. अशात ग्राहकांच्या घरातील दिवे पुन्हा उजळून निघावे व त्यांच्या घरातील अंधार दूर व्हावा यासाठी महावितरणने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ‘अभय’ योजना आणली आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना राबविण्यात येणार असून सहा महिने कालावधीची ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेत ग्राहकांना पुन्हा एकदा ‘अभय’ होण्याची संधी महावितरणकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे या योजनेतून कृषी व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना वगळण्यात आले असून फक्त कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. एकंदर ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली संधी चालून आहे. संधीचा लाभ घेऊन वीज पुरवठा खंडीत असलेले ग्राहक आपल्या घराला पुन्हा एकदा प्रकाशमय करू शकतील. (शहर प्रतिनिधी)