शहरं
Join us  
Trending Stories
1
"जे बाळासाहेबांना आणि इतरांना जमलं नाही ते फडणवीसांना जमलं’’, राज ठाकरे यांचं मोठं विधान
2
"एकत्र आलो एकत्र राहण्यासाठी, आमचं एकत्र दिसणं महत्त्वाचं"
3
Raj-Uddhav Thackeray Vijayi Melava Live Update: भाषेच्या नावाखाली गुंडगिरी सहन करणार नाही - उद्धव ठाकरे
4
जास्त नाटकं केली, तर कानाखाली आवाज काढलाच पाहिजे; पण...; राज ठाकरेंचा 'सैनिकां'ना आदेश
5
मराठीचा विजयी मेळावा, ठाकरे बंधू येणार एकत्र, ऐतिहासिक सभेला सुप्रिया सुळेसुद्धा राहणार उपस्थित
6
सुरतेची "स्वारी" आता हुजरेगिरीसाठी उरली...; अमोल कोल्हेंचा एकनाथ शिंदेवर कवितेतून निशाणा
7
'मुंबई आकर सारी हेकडी निकाल दूंगा', पप्पू यादव यांचे राज ठाकरेंना चॅलेंज!
8
खळखट्याक सुरू; मराठीत बोलणार नाही म्हणणाऱ्या सुशील केडिया यांचं कार्यालय फोडलं
9
त्रिनिदाद आणि टोबॅगोच नव्हे, 'या' २५ देशांनी देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना दिलाय सर्वोच्च सन्मान!
10
"इथेच येऊन बिजनेस करता आणि...", सुशील केडियांवर संतापले भरत जाधव, म्हणाले- "मराठी माणसाने जागं व्हायला हवं..."
11
Zerodha च्या संस्थापकांचा मोठा इशारा, एक्सचेज आणि ब्रोकर्ससाठी वाईट ठरू शकतं हे वृत्त; का म्हणाले नितीन कामथ असं?
12
"…हे तर पुतना मावशीचे प्रेम!’’ भाजपाचा उद्धव ठाकरेंना टोला, ती उदाहरणं देत साधला निशाणा
13
ठाकरे बंधूंचा आज 'विजयी मेळावा'; उद्धव अन् राज २० वर्षांनंतर एकत्र दिसणार! किती वाजता सुरू होणार मेळावा?
14
Raj-Uddhav Thackeray Rally : "मराठी भाषेचा विजय झालाय!"; ठाकरे बंधूंच्या विजयी मेळाव्यात सिद्धार्थ-भरत जाधव, तेजस्विनी पंडित दाखल, व्यक्त केला आनंद
15
आषाढीला करा उपासाची थंडगार रसमलाई; घरचे खुश होतील, पुन्हा पुन्हा मागून खातील!
16
'एअर इंडिया'च्या अडचणी संपेनात! ऐन उड्डाणाच्या वेळीच पायलटला चक्कर आली अन्...; कुठे घडला 'हा' प्रसंग?
17
Ashadhi Ekadashi 2025 Wishes: आषाढी एकादशीच्या मराठी शुभेच्छा, Messages आणि भक्तिपूर्ण Greetings पाठवा आपल्या प्रियजनांना!
18
Uttar Pradesh: चालकाचे नियंत्रण सुटलं अन् कार उलटून थेट भिंतीवर आदळली, आठ जण ठार!
19
बायकोचं सुरू होतं अफेअर; नवऱ्यासह २ मुलांना दिलं विष, वाचल्यानंतर केला चाकूने हल्ला
20
अदानी बदलणार का ₹३ च्या शेअरच्या कंपनीचं नशीब? खरेदी करण्याच्या रेसमध्ये सर्वात पुढे

३७ हजार ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी

By admin | Updated: October 17, 2016 00:28 IST

वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे.

महावितरणची नवी योजना : १ नोव्हेंबरपासून होणार शुभारंभ गोंदिया : वीज देयकाची थकबाकी न भरल्याने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांना ‘अभय’ होण्याची संधी महाराष्ट्र राज्य वीज वितरण कंपनीकडून देण्यात येत आहे. महावितरणची ही नवी योजना येत्या १ नोव्हेंबरपासून सुरू होत असून ग्राहकांनी जेवढ्या लवकर या योजनेचा लाभ घेतला, तेवढा जास्त लाभही योजना देणार आहे. वीजेचे देयक न भरल्याने त्यांची रक्कम वाढत जाते व देयक न भरल्याचा कालावधी वाढत गेल्यास वीज वितरण कंपनीकडून नाईलाजास्तव त्या ग्राहकांची कायमस्वरूपी वीज जोडणी खंडीत केली जाते. जिल्ह्यात हे प्रकार मोठ्या प्रमाणात असून अशा ग्राहकांची संख्या ३७ हजार ६३७ आहे. तर अशा या ग्राहकांवर २१ कोटी २८ लाख ५५ हजार २८५ रूपयांची थकबाकी असून त्यावर तीन कोटी ५४ लाख १० हजार ९८३ रूपयांचे व्याज थकून पडले आहे. वीज पुरवठा खंडीत झाल्याने आणि मूळ व व्याजाची रक्कम मिळून एवढी रक्कम भरणे काहींच्या आवाक्याबाहेरही झाले असावे. परिणामी अशा या ग्राहकांकडून पुढाकार घेतला जात नाही. अशात वीज चोरीचे प्रमाण वाढत जात असल्याचे प्रकारही घडतात. एकंदर यातून वीज कंपनीलाच फटका सहन करावा लागतो. शिवाय ग्राहकांना अंधारात ठेवणेही महावितरणच्या धोरणात नाही. अशात ग्राहकांच्या घरातील दिवे पुन्हा उजळून निघावे व त्यांच्या घरातील अंधार दूर व्हावा यासाठी महावितरणने कायमस्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी ‘अभय’ योजना आणली आहे. येत्या १ नोव्हेंबरपासून ही योजना राबविण्यात येणार असून सहा महिने कालावधीची ही योजना आहे. या योजनेचा लाभ घेत ग्राहकांना पुन्हा एकदा ‘अभय’ होण्याची संधी महावितरणकडून दिली जात आहे. विशेष म्हणजे या योजनेतून कृषी व सार्वजनिक पाणी पुरवठा योजनांना वगळण्यात आले असून फक्त कायम स्वरूपी वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांनाच या संधीचा लाभ घेता येणार आहे. एकंदर ‘अभय’ योजनेच्या माध्यमातून कायम वीज पुरवठा खंडीत करण्यात आलेल्या ग्राहकांसाठी एक चांगली संधी चालून आहे. संधीचा लाभ घेऊन वीज पुरवठा खंडीत असलेले ग्राहक आपल्या घराला पुन्हा एकदा प्रकाशमय करू शकतील. (शहर प्रतिनिधी)