शहरं
Join us  
Trending Stories
1
"तीनवेळा 'अल्लाहू अकबर' ओरडून गोळीबार सुरू झाला"; व्हायरल व्हिडीओमधल्या व्यक्तीचा खुलासा
2
नो मॅजिक! क्रिकेटच्या देवाने सांगितले १४ वर्षाच्या पोराच्या वादळी शतकी खेळीत दडलेले 'लॉजिक'
3
पाकिस्तानवर मोठा प्रहार करा! पहलगाम हल्ल्यानंतर जगभरातील भारतीयांची निषेध आंदोलने
4
Vaibhav Suryavanshi : १४ वर्षांच्या पोराचा धुमाकूळ! सिक्सर मारत ठोकली IPL मधील विक्रमी सेंच्युरी
5
विद्यार्थ्यांच्या मनामनात रुजणार भारतीय संविधानाची मूल्ये; नागपूर विद्यापीठाने तयार केला अभ्यासक्रम
6
आनंदाच्या भरात पायाला लागलंय ते विसरला! वैभवच्या शतकी खेळीला द्रविडनं अशी दिली दाद (VIDEO)
7
वेटिंगवाल्या प्रवाशांचा चक्क लिनन बॉक्समधून प्रवास! रेल्वे पोलिसांनी सहा जणांना केली अटक
8
IPL 2025 : वैभव सूर्यंवशीच्या ऐतिहासिक खेळीच्या जोरावर २०० पारच्या लढाईत राजस्थानचा 'रॉयल' विजय
9
विविध रेल्वे गाड्यांमधून दारूच्या एकूण १० हजार बाटल्या जप्त! मद्य तस्करीविरोधात मोठी कारवाई
10
लातूर जिल्ह्यातील हाडोळती येथे युवकाच्या खून प्रकरणी न्यायालयाकडून दाेघांना पोलीस काेठडी
11
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
12
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
13
बोगस डॉक्टरांविरोधात प्रशासनाने कसली कंबर; तालुकापातळीवरही समिती सक्षम होणार!
14
जिल्हा पोलिस दलातील सांगलीच्या सहा जणांना महासंचालक सन्मानचिन्ह; १ मे रोजी प्रदान सोहळा
15
हिवराच्या शेंगा खाल्ल्याने २६ मेंढ्यांचा मृत्यू; साताऱ्याजवळील फलटण तालुक्यातील घटना
16
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
17
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
18
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
19
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
20
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय

वैनगंगेत मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:41 IST

शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देउन्हाळ््यात पाणी पेटणार : यंदाही पुजारीटोलावरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेर मात्र पुजारीटोलाकडे धाव घ्यावी लागणार आहे.मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात पाणी पेटले होते. नदी, नाले व तलावांत पाणी नसल्याने मागीलवर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. तर पाणी टंचाईची झळ गोंदिया शहरालाही बसणार होती. वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहराला पाणी पुरवठा खंडीत होणार होता. त्यामुळे पाणी पुरवठयात कपात करण्याची पाळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर आली होती. अशात कधी नव्हे ते सुमारे ९० किमी.अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडला व त्यामुळे मागील वर्षीसारखीच पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत.यंदा मात्र येत्या मार्च महिन्यापर्यंत पुरणार एवढा पाणीसाठा वैनगंगा नदीत असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मागील वर्षी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते . तीच परिस्थिती यंदाही उद्भवणार आहे. त्यादृष्टीने मार्च महिन्याच्या शेवटी प्रयत्न सुरू केले जाणार आहे. यासाठी मजिप्राने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षित केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंथनजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सभेत शहरातील पाणी टंचाईच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत पुजारीटोला धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी ज्याप्रमाणे कालवे व नाल्यांतून डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाणी पोहचविण्यात आले होते. त्यानुसार यंदाही तशीच योजना केली जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात येणार आहे.शहराला दूषित पाण्याचा पुरवठाशहरात मागील २-३ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील मामा चौकात नालीसाठी खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. यावर मजिप्राने लगेच उपाययोजना केली. मात्र पाईप लाईनमध्ये माती गेल्याने दूषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी