शहरं
Join us  
Trending Stories
1
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
2
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
3
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
4
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
5
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
6
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
7
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
8
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
9
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
10
Shreyas Iyer : बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
11
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
12
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
13
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
14
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
15
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
16
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
17
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
18
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
19
Nashik House Collapses: नाशकात दुमजली घर कोसळलं, आठ महिलांसह नऊ जण जखमी
20
भारताच्या सीमेवर 'चिनी' पकड मजबूत होतेय? जिनपिंग यांनी तिबेटला दिले 'हे' नवे निर्देश!

वैनगंगेत मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:41 IST

शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देउन्हाळ््यात पाणी पेटणार : यंदाही पुजारीटोलावरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेर मात्र पुजारीटोलाकडे धाव घ्यावी लागणार आहे.मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात पाणी पेटले होते. नदी, नाले व तलावांत पाणी नसल्याने मागीलवर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. तर पाणी टंचाईची झळ गोंदिया शहरालाही बसणार होती. वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहराला पाणी पुरवठा खंडीत होणार होता. त्यामुळे पाणी पुरवठयात कपात करण्याची पाळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर आली होती. अशात कधी नव्हे ते सुमारे ९० किमी.अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडला व त्यामुळे मागील वर्षीसारखीच पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत.यंदा मात्र येत्या मार्च महिन्यापर्यंत पुरणार एवढा पाणीसाठा वैनगंगा नदीत असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मागील वर्षी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते . तीच परिस्थिती यंदाही उद्भवणार आहे. त्यादृष्टीने मार्च महिन्याच्या शेवटी प्रयत्न सुरू केले जाणार आहे. यासाठी मजिप्राने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षित केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंथनजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सभेत शहरातील पाणी टंचाईच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत पुजारीटोला धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी ज्याप्रमाणे कालवे व नाल्यांतून डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाणी पोहचविण्यात आले होते. त्यानुसार यंदाही तशीच योजना केली जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात येणार आहे.शहराला दूषित पाण्याचा पुरवठाशहरात मागील २-३ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील मामा चौकात नालीसाठी खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. यावर मजिप्राने लगेच उपाययोजना केली. मात्र पाईप लाईनमध्ये माती गेल्याने दूषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी