शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदी सरकारनं 'मनरेगा'चं नाव बदललं, आता 'या' नव्या नावानं ओळखली जाणार योजना; फायदाही वाढला! केला मोठा बदल
2
ट्रम्प, क्लिंटन ते बिल गेट्स; एपस्टीनच्या 'काळ्या' डायरीतील बड्या नेत्यांचे फोटो बाहेर, आक्षेपार्ह वस्तूंचाही समावेश
3
"भय ओळखून त्यावर विजय मिळवणाराच खरा वीर"; अमित शाहांकडून वीर सावरकरांच्या शौर्याला सलाम
4
'मत चोरी'च्या मुद्द्यावर काँग्रेसचा हल्लाबोल; साडे 5 कोटी लोकांनी केल्या स्वाक्षऱ्या, आता मोठ्या रॅलीची तयारी
5
"वर्षभर विमान भाड्यावर मर्यादा घालणे शक्य नाही"; इंडिगो संकटादरम्यान केंद्र सरकारचे लोकसभेत स्पष्टीकरण
6
कोर्टाची टीम दरवाजावर, आत आईसह दोन मुलांचे मृतदेह; घर जप्त होण्याच्या भीतीने कुटुंबाचा सामूहिक अंत.
7
पुतिन यांनी पाकच्या पंतप्रधानांना ४० मिनिटे ठेवले ताटकळत; चिडलेले शरीफ अखेर जबरदस्तीने बैठकीत शिरले
8
चीन-जपान तणाव वाढला; रशियानं Su-30, Su-35 विमानं उतरवताच अमेरिकाही अ‍ॅक्शन मोडवर, तैनात केले B-2 बॉम्बर्स!
9
IND vs UAE U19 Asia Cup 2025: जे कुणाला जमलं नाही ते आयुष म्हात्रेच्या कॅप्टन्सीतील टीम इंडियानं करुन दाखवलं
10
भारताने पाकिस्तानचा घुसखोरीचा कट उधळला; नियंत्रण रेषेवर BSFकडून संशयित दहशतवाद्याला अटक
11
"मी राजकारणी नाही, पण 5-10 कोटी...!" मतदारांसंदर्भात नेमकं काय म्हणाले बाबा रामदेव? टीव्ही अँकरवर जोरदार भडकले
12
सरपंच देशमुख हत्याकांडाचा क्रूर घटनाक्रम हायकोर्टात पुन्हा समोर; पत्नी, भावास अश्रू अनावर
13
स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या भव्य पुतळ्याचे अमित शाह, मोहन भागवत यांच्या हस्ते अनावरण
14
जनगणनेसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय, 11718 कोटी मंजूर; शेतकऱ्यांसाठीही खुशखबर!
15
२०२६ च्या पहिल्याच दिवशी ‘हा’ उपाय नक्की करा, घरावरील अशुभ नजर टळेल; वर्षभर शुभ-लाभच होईल!
16
IAS अधिकारी तुकाराम मुंढे यांना क्लीन चीट ! महिला आयोगाचा अंतिम चौकशी अहवाल येणे बाकी
17
“मुंबईत येणार जगातील सर्वांत मोठा GCC प्रोजेक्ट, ४५ हजार रोजगार निर्माण होणार”: CM फडणवीस
18
"10 हजार द्या किंवा 1 लाख द्या, कुणीही मुस्लीम...!"; हिमंत बिस्वा सरमा यांचं मोठं विधान; स्पष्टच बोलले
19
एक नंबर! WhatsApp युजर्ससाठी खुशखबर; कॉल न उचलल्यास पाठवा व्हॉइस किंवा व्हिडीओ नोट
20
रेल्वे अपघातांमध्ये विक्रमी घट! 'या' स्वदेशी तंत्रज्ञानामुळे सुरक्षेच्या दृष्टीने मोठं पाऊल
Daily Top 2Weekly Top 5

वैनगंगेत मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 10, 2019 23:41 IST

शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे.

ठळक मुद्देउन्हाळ््यात पाणी पेटणार : यंदाही पुजारीटोलावरच भिस्त

लोकमत न्यूज नेटवर्क्नेगोंदिया : शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी मागील वर्षी उन्हाळ््यात पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही तीच स्थिती निर्माण होणार असल्याचे स्पष्ट आहे. सध्या स्थितीत वैनगंगा नदीच्या पात्रात मार्चपर्यंत पुरेल एवढाच पाणीसाठा उपलब्ध आहे. त्यामुळे मार्च महिन्याच्या अखेर मात्र पुजारीटोलाकडे धाव घ्यावी लागणार आहे.मागील वर्षी कमी पाऊस पडल्याने जिल्ह्यात पाणी पेटले होते. नदी, नाले व तलावांत पाणी नसल्याने मागीलवर्षी दुष्काळी स्थिती निर्माण झाली होती. तर पाणी टंचाईची झळ गोंदिया शहरालाही बसणार होती. वैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने शहराला पाणी पुरवठा खंडीत होणार होता. त्यामुळे पाणी पुरवठयात कपात करण्याची पाळी महाराष्ट्र जीवन प्राधीकरणावर आली होती. अशात कधी नव्हे ते सुमारे ९० किमी.अंतरावरील पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते. यंदाही जिल्ह्यात पाऊस कमी प्रमाणात पडला व त्यामुळे मागील वर्षीसारखीच पाणी टंचाईची चिन्हे दिसू लागली आहेत.यंदा मात्र येत्या मार्च महिन्यापर्यंत पुरणार एवढा पाणीसाठा वैनगंगा नदीत असल्याचे महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाचे उपविभागीय अभियंता राजेंद्र मडके यांनी लोकमतशी बोलतांना सांगितले. मागील वर्षी शहरातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पातून पाणी आणावे लागले होते . तीच परिस्थिती यंदाही उद्भवणार आहे. त्यादृष्टीने मार्च महिन्याच्या शेवटी प्रयत्न सुरू केले जाणार आहे. यासाठी मजिप्राने शहरवासीयांची तहान भागविण्यासाठी पुजारीटोला प्रकल्पात पाणी आरक्षित केले आहे.जिल्हाधिकारी कार्यालयात मंथनजिल्हाधिकारी कार्यालयात पार पडलेल्या सभेत शहरातील पाणी टंचाईच्या विषयावर चर्चा करण्यात आली. याच बैठकीत पुजारीटोला धरणाचे पाणी पिण्यासाठी आरक्षीत ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला. मागील वर्षी ज्याप्रमाणे कालवे व नाल्यांतून डांर्गोलीजवळ वैनगंगा नदीत पाणी पोहचविण्यात आले होते. त्यानुसार यंदाही तशीच योजना केली जाणार आहे. यासाठी पाटबंधारे विभागाला पत्र देण्यात येणार आहे.शहराला दूषित पाण्याचा पुरवठाशहरात मागील २-३ दिवसांपासून दूषित पाणी पुरवठा होत आहे. शहरातील मामा चौकात नालीसाठी खोदकाम करताना पाईपलाईन फुटली. यावर मजिप्राने लगेच उपाययोजना केली. मात्र पाईप लाईनमध्ये माती गेल्याने दूषीत पाण्याचा पुरवठा होत असल्याची माहिती आहे. दूषीत पाणी पुरवठ्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

टॅग्स :riverनदीWaterपाणी