शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai Local: तांत्रिक बिघाडामुळे हार्बर लाईनवर वाहतूक विस्कळीत; प्रवाशांचे प्रचंड हाल, रेल्वेने दिलं स्पष्टीकरण
2
११ वर्षांच्या कार्यकाळात भारत बनला सर्वाधिक वेगाने वाढलेली अर्थव्यवस्था
3
Lenskart आणणार ८५०० कोटी रूपयांचा IPO; कधी करू शकता गुंतवणूक, काय आहेत डिटेल्स?
4
५०० कर्मचाऱ्यांना फर्स्ट क्लास विमान तिकिट, खर्चासाठी ८.५ लाख अन्.. नक्की कोण आहे ही 'दिलदार' महिला?
5
सरकारी नोकरीची सुवर्णसंधी! केंद्र सरकारच्या विविध विभागांमध्ये १४,५८२ पदांवर मेगाभरती...
6
पीडितांनी स्वतःच मिळवला 'न्याय'; बलात्कार करणाऱ्याला महिलांनी दिला वेदनादायक मृत्यू
7
लेकाच्या जन्मानंतर डॉक्टर म्हणाले, 'आता वजन कमी कर'; रेणुका शहाणेला धक्काच बसला
8
खुशखबर! EPFO नं बदलले नियम, PF क्लेम आता लगेच होणार; व्याजही जास्त मिळणार, पाहा डिटेल्स
9
आठ वर्षांनंतर अयोध्येतील जमिनीची किंमत २००% वाढली; जमिनीचे व्यवहार वाढल्याने सर्कल रेटमध्ये मोठी वाढ
10
गाडी वापरणं आता महागणार! थर्ड पार्टी इन्शुरन्समध्ये मोठी वाढ करण्याची तयारी, किती वाढेल खर्च?
11
निकोलस पूरनचा अवघ्या २९व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटला रामराम, तडकाफडकी निवृत्तीची घोषणा
12
"माझ्या मृत्यूच्या गोष्टी करणाऱ्यांनो.."; अमिताभ बच्चन यांनी नेटकऱ्याला सुनावलं, नंतर ट्वीट केलं डिलीट
13
Navi Mumbai Crime: नवी मुंबईतील भयंकर घटना! पत्नीवर चाकूनं सपासप वार करून पतीची आत्महत्या
14
पाव्हणं जेवला काय...! गौतमी पाटीलसोबत सरु आजींनीही धरला ठेका, पाहा भन्नाट डान्स स्टेप्स
15
लिव्हर कॅन्सरवरील सर्जरीनंतर दीपिका पहिल्यांदाच आली समोर, सांगितला वेदनादायी अनुभव
16
बहुतांश लोकांना माहीत नाही की या लोनमध्ये संपूर्ण रकमेवर नाही; खर्च केलेल्या रकमेवरच लागतं व्याज, प्रीपेमेंटवर पेनल्टीही नाही
17
राजा रघुवंशीच्या अंत्यसंस्काराचा धक्कादायक व्हिडीओ; राज कुशवाह सोनमच्या वडिलांना देत होता आधार
18
भय इथले संपत नाही..! जीवन-मृत्यूतील अंतर ५ फूट; वेगात जाणाऱ्या दोन ट्रेनच्या दारात लटकलेले प्रवासी एकमेकांत अडकून पडले
19
विद्यार्थिनीला कॉलेजातून काढण्याचा आदेश रद्द; हायकोर्ट म्हणाले, निर्णय एकतर्फी, ऑपरेशन सिंदूरदरम्यान केली होती पोस्ट
20
'सिंदूर'मध्ये खुलला देशभक्तीचा रंग; औषधी वनस्पती, नर्सरीमध्ये रोपांची मागणी वाढली

आरटीईअंतर्गत फक्त ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित; १२८ शाळांची शिक्षण विभागाकडे नोंदणी

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 26, 2025 16:54 IST

१,००८ विद्यार्थ्यांची निवड : जिल्ह्यात आहेत १,०११ जागा आरक्षित

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आर्थिक दुर्बल घटकांतील बालकांना मोफत शिक्षण मिळावे, यासाठी आरटीई प्रवेश प्रक्रिया राबविण्यात येत आहे. जिल्ह्यात १,०११ जागांसाठी लॉटरी जाहीर करण्यात आली असून, २८ फेब्रुवारीपर्यंत प्रवेश निश्चित करावा लागणार आहे. मंगळवारपर्यंत केवळ ७० विद्यार्थ्यांनी प्रवेश निश्चित केले आहेत. त्यामुळे उर्वरित तीन दिवसात शिल्लक प्रवेश होणार का, असा प्रश्न आहे.

आरटीई प्रवेश प्रक्रियेसाठी जिल्ह्यात १२८ शाळांनी शिक्षण विभागाकडे नोंदणी केली होती. या शाळांमध्ये १,०११ जागा असून, १४ जानेवारीपासून ऑनलाइन अर्ज करण्यास सुरुवात झाली होती. २ फेब्रुवारीपर्यत ३ हजार ३०४ विद्यार्थ्यांचे अर्ज दाखल झाले होते. १४ फेब्रुवारी रोजी पुणे येथून राज्यस्तरीय सोडत जाहीर करण्यात आली. यामध्ये एक हजार आठ विद्यार्थ्यांना निवडीचे संदेश पाठविण्यात आले आहेत. आता या विद्यार्थ्यांची संबंधित पंचायत समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी करण्यात येत आहे.

...या तालुक्यातील प्रवेश निश्चितआतापर्यंत देवरी तालुक्यात १०, तर गोंदिया तालुक्यात ६० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. उर्वरित सहा तालुक्यांमध्ये कागदपत्रांची तपासणी करण्यात येत आहे. ती पूर्ण झाल्यावर विद्यार्थ्यांना पत्र देण्यात येईल. ते पत्र निवड झालेल्या शाळेत दिल्यावर प्रवेशाची प्रक्रिया पूर्ण होणार आहे.

कागदपत्राची झाली पडताळणी, प्रवेश सुरु१५६ विद्यार्थ्यांचे मंगळवारपर्यंत कागदपत्र पडताळणी करून स्वीकारण्यात आले आहेत, तर ७० विद्यार्थ्यांचे कागदपत्र अपलोड करून प्रवेश निश्चित करण्यात आले आहेत. एकंदर प्रवेश प्रक्रियेची गती संथ दिसून येत असून, ९३८ जागांसाठी प्रवेश शिल्लक आहेत.

जागा वाढल्या तरीही उदासिनतामागील वर्षीच्या तुलनेत यंदा जिल्ह्यात आरटीईच्या १०८ जागा वाढल्या आहेत. यामुळे नक्कीच पालकांना दिलासा मिळाला, यात शंका नाही. मात्र, असे असतानाही प्रवेश निश्चितीला घेऊन पालकांमध्ये उदासिनता दिसून येत आहे. हेच कारण आहे की, आतापर्यंत फक्त ७० प्रवेश निश्चित झाले आहेत. केंद्रांवर कागदपत्र पडताळणी करून स्वीकारण्यात आले आहेत. त्यांचे फिडिंग झाल्यावर हा आकडा वाढेल, यात शंका नाही.

२८ फेब्रुवारी डेडलाईन अर्जाद्वारे सोडत काढण्यात आली असून, यात निवड झालेल्या विद्यार्थ्यांना आता २८ फेब्रुवारीपर्यंतच मुदत देण्यात आली आहे. त्यास मुदतवाढ देण्याचा निर्णय राज्यस्तरावरून होईल. त्यानंतर मात्र, प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांना आरटीई प्रवेशासाठी संधी देण्यात येणार आहे.

पंचायत समितीमध्ये कागदपत्रे पडताळणी

  • जिल्ह्यातील आठही १ तालुक्यातील पंचायत समितीमध्ये कागदपत्रांची पडताळणी सुरू करण्यात आली आहे.
  • अर्ज भरतांना जी कागदपत्रे सादर केली तीच कागदपत्रे दाखल करावी लागत आहेत. त्यामध्ये त्रुटी आढळल्यास प्रवेश रद्द करण्यात येत आहेत. दरम्यान, २८ फेब्रुवारीपर्यंत पडताळणी करण्याचे आव्हान आहे.
  • २८ फेब्रुवारी २०२५ची मुदत 3 असली तरी तीन दिवसांमध्ये प्रवेश प्रक्रिया पूर्ण होईल का, असा प्रश्न पालकांना आहे. आरटीई प्रवेश प्रक्रियेला पारदर्शक आणि गती मिळणे आवश्यक आहे. जिल्ह्यात आतापर्यंत फक्त ७० विद्यार्थ्यांचे प्रवेश निश्चित झाले असून तीन दिवसांत प्रवेशासाठी पालकांची धावपळ होणार आहे.

 

टॅग्स :gondiya-acगोंदिया