शहरं
Join us  
Trending Stories
1
छ. संभाजीनगर भाजपमध्ये कार्यकर्त्यांचा उद्रेक थांबेना! मंत्र्यांच्या गाड्यांना काळं फासलं, घोषणाबाजी
2
"तैवानला चीनशी पुन्हा जोडणे हे आमचे ऐतिहासिक ध्येय...", चीनने बेटाच्या सीमेवर रॉकेटने केला बॉम्बहल्ला
3
VHT 2025 : सरफराज खानचा धमाका! स्फोटक 'सेंच्युरी'सह NZ विरुद्धच्या वनडे मालिकेआधी ठोठावला टीम इंडियाचा दरवाजा
4
‘अगं, भाजीला काय आणू’... उत्तर येण्यापूर्वीच किंकाळी कानी पडली; पत्नीशी बोलता बोलता प्रशांत शिंदेने सोडला प्राण
5
'जबाबदारीने काम करायचे नसेल तर घरी बसा'; अजित पवारांचा नेत्यांना इशारा
6
घरगड्याच्या उमेदवारीसाठी सुरेश वरपूडकरांनी युती तोडण्याचे पाप केले; शिंदेसेनेचा आरोप
7
शिल्पा शिंदेनंतर 'अनिता भाभी'ही मालिकेत परतणार? 'धुरंधर' फेम सौम्या टंडन म्हणाली...
8
धातू बाजारात 'भूकंप'! चांदी १९ हजार रुपयांनी कोसळली, तर सोने १ हजाराने स्वस्त; किंमत अजून कमी होणार?
9
अहिल्यानगरमध्ये महायुतीत फूट! शेवटच्या क्षणी शिंदेसेनेने डाव टाकला; भाजपा-NCP एकत्र लढणार
10
Navi Mumbai: इन्स्टाग्रामवरुन जडले प्रेम, 'तिने' भेटायला बोलावलं; १५ वर्षाचा मुलगा कॅबमधून उतरला अन् घडला थरार
11
उस्मान हादी हत्या प्रकरणात बांगलादेश तोंडघशी पडला; मारेकरी भारतात नाही तर दुबईत सापडला...
12
२०२६ला गणपती कधी? यंदा १० नाही १२ दिवसांचा गणेशोत्सव; पाहा, गौरी पूजन, अनंत चतुर्दशी तारीख
13
तो म्हणतो, हॅण्डब्रेक काढताच बस उडाली; बसचालक रमेश सावंतला सदोष मनुष्यवधाच्या गुन्ह्यात अटक; ३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी
14
जगायचं कसं? नळाला येत होतं गटाराचं पाणी; इंदूरमध्ये मृत्यूचं तांडव, ३ अधिकारी तडकाफडकी निलंबित
15
'३ इडियट्स'च्या सीक्वलबाबत आर माधवन स्पष्टच बोलला, म्हणाला- "आम्ही आता म्हातारे झालोय..."
16
लोकसंख्यावाढीसाठी गर्भनिरोधकं केली महाग!
17
सरकारकडून दिलासा मिळण्याची अपेक्षा, Vodafone-Idea चे शेअर्स वधारले; AGR वर मिळू शकते गुड न्यूज
18
१० महिन्यांचेच वर्ष होते...! मूळ रोमन कॅलेंडरमध्ये जानेवारी, फेब्रुवारी नव्हतेच...; जुलैचे नाव राजाने आपल्या नावावरून ठेवले...
19
तुमचा फोन हॅक तर झाला नाही ना? फक्त 'हा' एक कोड डायल करा आणि काही सेकंदात सत्य जाणून घ्या
20
'२४ तासांत येमेन खाली ​​करा'; हे दोन मुस्लिम देश एकमेकांच्या विरोधात, जोरदार बॉम्बस्फोट करत केले हल्ले
Daily Top 2Weekly Top 5

केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:12 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : वैनगंगेचे पात्र पडले कोरडे, बंधाऱ्याचा उपयोग नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना केवळ ७ दिवस पाणी पुरवठा करता येईल ऐवढाच पाणीसाठा वैनगंगेच्या पात्रात शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुढील आठवड्यात पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.महिनाभरापूर्वी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बंधाºयाचा सुद्धा कुठलाच उपयोग झाला नसून विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने यंदा एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागणार आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत १७ कि.मी.अंतरावरील डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहरात प्राधिकरणाचे १२ हजारावर ग्राहक आहे. त्यांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथून वैनगंगा नदीच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुडवा येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईन व्दारे आणले जाते. यामुळे शहरातील जवळपास दीड लाख नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर यंदा ही तिच स्थिती निर्माण झाली आहे.वैनगंगा नदीच्या पात्रात सध्या केवळ ७ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाची सुध्दा चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा होता.त्यामुळे गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. कालव्याच्या माध्यमातून प्रथम ३.०१५ एमएमक्यू आणि दुसऱ्यांदा २.५१७ एमएमक्यू पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहोचविण्यात आले होते. तर यंदा देखील तीच स्थिती असून यावर्षी देखील शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोला धरणावरच आहे.शंभर कोटींची योजना ठरतेय नाममात्रशहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात १०० कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र ज्या वर्षी योजना तयार करण्यात आली त्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी विहीर तयार करण्यात आली आहे. त्या परिसरात पाणी राहात नसल्याने दरवर्षी पाण्याची पातळी खालावते.त्यामुळे या परिसरात पाणी साचून राहावे याकरिता कायमस्वरुपी बंधारा तयार करण्याची गरज आहे.बंधारा तयार करण्याचा प्रस्तावमहाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या समन्वयातून या ठिकाणी बंधारा तयार केल्यास यावर कायम स्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे बंधारा तयार करण्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारला पाठविण्यात आला आहे.या प्रस्तावाला आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीला केव्हा मंजुरी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.दरवर्षी  बंधाऱ्यावर खर्चमागील दोन तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सिमेंटच्या चुंगड्यापासून वैनगंगा नदीच्या पात्रात तात्पुरता बंधार तयार केला जातो.दरवर्षी यासाठी दोन तीन लाख रुपयांचा खर्च केला जातो. मात्र याचा सुध्दा कसलाच उपयोग होत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ जात आहे.सोमवारपासून एकच वेळ पाणी पुरवठावैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सोमवारपासून (दि.१५) शहरवासीयांना दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई