शहरं
Join us  
Trending Stories
1
'दिवाळीत जीएसटीमध्ये होणार मोठे बदल, सामान्यांसाठी अनेक गोष्टी स्वस्त'; पंतप्रधान मोदींची घोषणा
2
“भारताच्या पाण्याने शत्रूंची शेती समृद्ध, सिंधू करार अन्यायकारक”; PM मोदींनी पाकला सुनावले
3
मेक इन इंडिया फायटर जेट इंजिन निर्मितीचे लक्ष्य; PM मोदींचे शास्त्रज्ञांना आवाहन, म्हणाले...
4
"दहशतवाद्यांचे तळ नाहीसे केले, पाकिस्तानची झोप अजूनही उडलेली आहे", PM मोदींनी केले 'ऑपरेशन सिंदूर'वर भाष्य
5
पतीला मारलं अन् तुरुंगात गेली, नवा बॉयफ्रेंड बनवला; कैदेतून बाहेर येताच सासऱ्याचाही खेळ खल्लास केला! नेमकं झालं काय?
6
सचिन तेंडुलकरच्या होणाऱ्या सुनेची पहली झलक; सानिया चांडोकचा सर्वात लेटेस्ट फोटो आला समोर
7
डोनाल्ड ट्रम्प आणि व्लादिमीर पुतिन यांची भेट भारतासाठी फायदेशीर ठरणार? टॅरिफवर होऊ शकतो मोठा निर्णय!
8
आजचे राशीभविष्य, १५ ऑगस्ट २०२५: ५ राशींना शुभ, आर्थिक लाभ; स्वादिष्ट भोजनाचा आस्वाद घ्याल
9
भारत जगात भारी... अमेरिकेच्या टॅरिफचा परिणाम होणार नाही; एस अँड पी ग्लोबल रेटिंग्सचा दावा
10
मुंबईत फक्त मनसे आणि उद्धवसेनेचीच ताकद, तयारीला लागा; राज ठाकरेंच्या कार्यकर्त्यांना सूचना
11
किश्तवाडमध्ये लंगर सुरू असतानाच अचानक ढगफुटी, ४६ जण दगावले; १२० जणांना वाचविले
12
६२ आयआयटी उभ्या राहतील इतके पैसे भारतीयांकडून परदेशी शिक्षणावर खर्च; देशातील शिक्षणाच्या गुणवत्तेवर प्रश्नचिन्ह
13
सरकारला त्यांची जागा दाखवण्याचा निर्धार करू, जनतेला जाणीव करून देण्याची गरज: शरद पवार
14
राज ठाकरेंविरोधात जनहित याचिका; भाषण करु न देण्याची मागणी, लवकरच सुनावणीची शक्यता
15
मुंबईतील घरे विकू नका, बहिणीचेही नाव लावा; धारावीचाही दर्जेदार पुनर्विकास: मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
16
तीन हजार कोटींचा घोटाळा; परिमॅच अॅपप्रकरणी ११० कोटींची मालमत्ता जप्त, ईडीची कारवाई
17
अनिल कुंभारे, नवीनचंद्र रेड्डी यांना राष्ट्रपती पदक जाहीर; महाराष्ट्राच्या ४९ पोलिसांचा गौरव, ७ पोलिसांना शौर्य पदक
18
ऑपरेशन सिंदूर' दहशतवादाविरुद्धच्या लढाईत एक उदाहरण निर्माण करेल : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू
19
वसई-विरार पालिका क्षेत्राची हद्द वाढ; अधिसूचना प्रसिद्ध, अखेर २९ गावांचा महानगरपालिकेत समावेश
20
आम्ही रशियन तेल खरेदी करणे थांबवलेले नाही, जे फायदेशीर असेल ते आम्ही करू; भारतीय कंपन्यांनी स्पष्टच सांगितले

केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:12 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : वैनगंगेचे पात्र पडले कोरडे, बंधाऱ्याचा उपयोग नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना केवळ ७ दिवस पाणी पुरवठा करता येईल ऐवढाच पाणीसाठा वैनगंगेच्या पात्रात शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुढील आठवड्यात पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.महिनाभरापूर्वी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बंधाºयाचा सुद्धा कुठलाच उपयोग झाला नसून विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने यंदा एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागणार आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत १७ कि.मी.अंतरावरील डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहरात प्राधिकरणाचे १२ हजारावर ग्राहक आहे. त्यांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथून वैनगंगा नदीच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुडवा येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईन व्दारे आणले जाते. यामुळे शहरातील जवळपास दीड लाख नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर यंदा ही तिच स्थिती निर्माण झाली आहे.वैनगंगा नदीच्या पात्रात सध्या केवळ ७ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाची सुध्दा चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा होता.त्यामुळे गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. कालव्याच्या माध्यमातून प्रथम ३.०१५ एमएमक्यू आणि दुसऱ्यांदा २.५१७ एमएमक्यू पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहोचविण्यात आले होते. तर यंदा देखील तीच स्थिती असून यावर्षी देखील शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोला धरणावरच आहे.शंभर कोटींची योजना ठरतेय नाममात्रशहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात १०० कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र ज्या वर्षी योजना तयार करण्यात आली त्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी विहीर तयार करण्यात आली आहे. त्या परिसरात पाणी राहात नसल्याने दरवर्षी पाण्याची पातळी खालावते.त्यामुळे या परिसरात पाणी साचून राहावे याकरिता कायमस्वरुपी बंधारा तयार करण्याची गरज आहे.बंधारा तयार करण्याचा प्रस्तावमहाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या समन्वयातून या ठिकाणी बंधारा तयार केल्यास यावर कायम स्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे बंधारा तयार करण्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारला पाठविण्यात आला आहे.या प्रस्तावाला आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीला केव्हा मंजुरी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.दरवर्षी  बंधाऱ्यावर खर्चमागील दोन तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सिमेंटच्या चुंगड्यापासून वैनगंगा नदीच्या पात्रात तात्पुरता बंधार तयार केला जातो.दरवर्षी यासाठी दोन तीन लाख रुपयांचा खर्च केला जातो. मात्र याचा सुध्दा कसलाच उपयोग होत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ जात आहे.सोमवारपासून एकच वेळ पाणी पुरवठावैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सोमवारपासून (दि.१५) शहरवासीयांना दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई