शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 13, 2019 21:12 IST

शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे.

ठळक मुद्देशहरवासीयांवर पाणी टंचाईचे संकट : वैनगंगेचे पात्र पडले कोरडे, बंधाऱ्याचा उपयोग नाही

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहराला पाणी पुरवठा करणाऱ्या डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी मोठ्या प्रमाणात कमी झाली आहे. वैनगंगा नदीचे पात्र एप्रिल महिन्यातच कोरडे पडल्याने हा परिणाम झाला आहे. त्यामुळे शहरवासीयांना केवळ ७ दिवस पाणी पुरवठा करता येईल ऐवढाच पाणीसाठा वैनगंगेच्या पात्रात शिल्लक आहे. त्यामुळे शहरवासीयांना पुढील आठवड्यात पाणी टंचाईच्या तीव्र समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.महिनाभरापूर्वी डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने वैनगंगा नदीच्या पात्रात बंधारा तयार करुन पाण्याची पातळी वाढविण्याचा प्रयत्न केला होता. मात्र या बंधाºयाचा सुद्धा कुठलाच उपयोग झाला नसून विहिरीची पाण्याची पातळी खालावल्याने यंदा एप्रिल महिन्यात शहरवासीयांना पाण्यासाठी दूरवर भटकंती करावी लागणार आहे.गोंदिया शहराला महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातंर्गत १७ कि.मी.अंतरावरील डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेतंर्गत पाणी पुरवठा केला जातो. शहरात प्राधिकरणाचे १२ हजारावर ग्राहक आहे. त्यांना दिवसांतून दोन वेळा पाणी पुरवठा केला जातो. डांगोर्ली येथून वैनगंगा नदीच्या पात्रात तयार करण्यात आलेल्या पाणी पुरवठा योजनेचे पाणी कुडवा येथील जलशुध्दीकरण केंद्रापर्यंत पाईप लाईन व्दारे आणले जाते. यामुळे शहरातील जवळपास दीड लाख नागरिकांना शुध्द पिण्याचा पाण्याचा पुरवठा केला जातो. मात्र मागील दोन वर्षांपासून शहरवासीयांना उन्हाळ्यात पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागत आहे. तर यंदा ही तिच स्थिती निर्माण झाली आहे.वैनगंगा नदीच्या पात्रात सध्या केवळ ७ दिवस पुरेल ऐवढाच पाणीसाठा असल्याने महाराष्टÑ जीवन प्राधिकरण विभागाची सुध्दा चिंता वाढली आहे.विशेष म्हणजे मागील वर्षी केवळ ५३ टक्के पाऊस झाल्याने सिंचन प्रकल्पांमध्ये सुध्दा मोजकाच पाणीसाठा होता.त्यामुळे गोंदियापासून ९० कि.मी.अंतरावर असलेल्या पुजारीटोला धरणातून पाणी आणून शहरवासीयांची तहान भागविण्यात आली होती. कालव्याच्या माध्यमातून प्रथम ३.०१५ एमएमक्यू आणि दुसऱ्यांदा २.५१७ एमएमक्यू पाणी डांर्गोली येथील पाणी पुरवठा योजनेपर्यंत पोहोचविण्यात आले होते. तर यंदा देखील तीच स्थिती असून यावर्षी देखील शहरवासीयांची पाण्याची भिस्त पुजारीटोला धरणावरच आहे.शंभर कोटींची योजना ठरतेय नाममात्रशहराला पाणी पुरवठा करण्यासाठी चार वर्षांपूर्वी डांर्गोली येथे वैनगंगा नदीच्या पात्रात १०० कोटी रुपये खर्च करुन पाणी पुरवठा योजना तयार करण्यात आली. मात्र ज्या वर्षी योजना तयार करण्यात आली त्याच वर्षीपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण झाली. डांगोर्ली येथील वैनगंगा नदीच्या पात्रात ज्या ठिकाणी विहीर तयार करण्यात आली आहे. त्या परिसरात पाणी राहात नसल्याने दरवर्षी पाण्याची पातळी खालावते.त्यामुळे या परिसरात पाणी साचून राहावे याकरिता कायमस्वरुपी बंधारा तयार करण्याची गरज आहे.बंधारा तयार करण्याचा प्रस्तावमहाराष्ट्र आणि मध्य प्रदेश सरकारच्या समन्वयातून या ठिकाणी बंधारा तयार केल्यास यावर कायम स्वरुपी तोडगा निघू शकतो. त्यामुळे बंधारा तयार करण्याचा प्रस्ताव मध्य प्रदेश सरकारला पाठविण्यात आला आहे.या प्रस्तावाला आणि त्यासाठी लागणाऱ्या निधीला केव्हा मंजुरी मिळते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. मात्र तोपर्यंत शहरवासीयांना पाणी टंचाईच्या समस्येला तोंड द्यावे लागणार आहे.दरवर्षी  बंधाऱ्यावर खर्चमागील दोन तीन वर्षांपासून पाणी टंचाईची समस्या निर्माण होत असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागातर्फे सिमेंटच्या चुंगड्यापासून वैनगंगा नदीच्या पात्रात तात्पुरता बंधार तयार केला जातो.दरवर्षी यासाठी दोन तीन लाख रुपयांचा खर्च केला जातो. मात्र याचा सुध्दा कसलाच उपयोग होत नसल्याने लाखो रुपयांचा खर्च देखील व्यर्थ जात आहे.सोमवारपासून एकच वेळ पाणी पुरवठावैनगंगा नदीचे पात्र कोरडे पडल्याने डांगोर्ली येथील पाणी पुरवठा योजनेच्या विहिरीची पाण्याची पातळी खोल गेली आहे. त्यामुळे केवळ ७ दिवस पुरेल एवढाच पाणीसाठा शिल्लक असल्याने महाराष्ट्र जीवन प्राधिकरण विभागाने सोमवारपासून (दि.१५) शहरवासीयांना दिवसातून एकच वेळ पाणी पुरवठा करण्याचा निर्णय घेतला आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई