शहरं
Join us  
Trending Stories
1
गुजरातचे 'टायटन्स' बुडता बुडता वाचले! हार्दिकच्या चुकीमुळे MI ची 'सुपर ओव्हर'ची संधीही हुकली
2
"भारताच्या हक्काचं पाणी बाहेर जात होतं, पण आता..."; सिंधू करारावर पहिल्यांदाच बोलले PM मोदी
3
पांड्या तुला सूर्यावर भरवसा नाय काय? मुंबई इंडियन्सनेच जिंकली असती मॅच, पण... (VIDEO)
4
कल्याणमध्ये रिक्षावर झाड कोसळून मोठी दुर्घटना, रिक्षाचालक आणि दोन प्रवाशांसह तीन जणांचा मृत्यू
5
मुंबईत सोसाट्याच्या वाऱ्यासह पाऊस; लोकल खोळंबली
6
"काँग्रेसचे खासदार १५ दिवस इस्लामबादमध्ये राहून आले, भारतात परतल्यावर ९० तरुण-तरुणींना दूतावासात घेऊन गेले’’, हिमंता बिस्वा सरमांचा गंभीर आरोप   
7
MI vs GT : बुमराहनं जबरदस्त इनस्विंग चेंडूवर उडवला शुबमन गिलचा त्रिफळा! मग...
8
‘गुगल पे’वरील हे सिक्रेट फिचर्स आहेत खूप उपयुक्त, असे आहेत त्यांचे फायदे
9
इम्पॅक्ट प्लेयर कर्ण शर्मा; मग प्लेइंग इलेव्हनमध्ये नसणारा Ashwani Kumar अचानक गोलंदाजीला कसा?
10
"जिच्यावर जिवापाड प्रेम केले, तिनेच नको ते आरोप लावले", प्रेयसीकडून विश्वासघाताने खचलेल्या तरुणाने संपवलं जीवन
11
“स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकांमध्ये भाजपाचा वरचा क्रमांक आला पाहिजे”: अशोक चव्हाण
12
आरक्षण आता रेल्वेच्या डब्याप्रमाणे झालंय, सर्वोच्च न्यायालयातील न्यायमूर्तींनी केली परखड टिप्पणी, कारण काय?  
13
MI vs GT : संघ संकटात असताना नमन याने 'धीर' सोडला! डगआउटमध्ये रोहितनं असा काढला राग (VIDEO)
14
पाकिस्तानी म्हणून हिणवले, माराहाण केली, लातुरात खचलेल्या तरुणाने जीवन संपवले
15
Rohit Sharma's Worst Record: कॅप्ड असो वा अनकॅप्ड! डावखुरा पेसर सातत्याने रोहितसमोर ठरलाय 'उजवा'
16
"तीन वर्षांपासून याच क्षणाची वाट पाहत होतो..."; भाजपा प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचे ट्विट
17
बलोचिस्तान वाचवण्यासाठी पाकिस्तानची धावाधाव! काश्मीर हल्ल्यानंतर घेण्यात आला मोठा निर्णय
18
भारत पाकिस्तानवर कधी हल्ला करणार? पाकिस्तानच्या बड्या माजी अधिकाऱ्याने सांगितली नवी तारीख  
19
राहुल गांधी शहीद विनय नरवाल यांच्या कुटुंबाला भेटले; म्हणाले, “दोषींना अशी शिक्षा द्या की...”
20
“प्रदूषण करणाऱ्या वाहनधारकांना यापुढे पेट्रोल पंपावर इंधन बंदी, लवकरच धोरण”: प्रताप सरनाईक

जिल्ह्यातील ५४७ ग्रामपंचायतींचे ऑनलाईन कामकाज झाले ठप्प

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 9, 2022 05:00 IST

१ ते ३३ नमुने अपडेट असेल तरच मानधन काढू अशी भूमिका कंपनीने घेतल्याने या संगणक परिचालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये १ ते ३३ नमुन्यांचा डाटाच नाही तर काही ग्रामपंचायतमध्ये हा डाटा अपूर्ण आहे. त्यामुळे तो ऑनलाईन करायचा कसा असा प्रश्न संगणक परिचालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनीने ही अट रद्द करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील ५५६ संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : ग्रामपंचायतमध्ये कार्यरत संगणक परिचालकांनी थकीत मानधन आणि मानधन काढण्यासाठी लागू केलेली १ ते ३३ नमुन्यांची अट त्वरित रद्द करावी या मागणीला घेऊन जिल्ह्यातील ५८६ संगणक परिचालकांनी ४ एप्रिलपासून काम बंद  आंदोलन सुरू केले आहे. संगणक परिचालकांच्या मागण्या मंजूर न झाल्याने  मागील चार दिवसांपासून जिल्ह्यातील ५५६ ग्रामपंचायतीचे ऑनलाईन कामकाज पूर्णपणे ठप्प झाले आहे. महाराष्ट्र शासनाच्या ग्रामविकास व माहिती तंत्रज्ञान विभागाच्या माध्यमातून २०११ पासून संग्राम संगणीकृत ग्रामीण महाराष्ट्र व सध्याचे आपले सरकार सेवा केंद्र या प्रकल्पात जिल्ह्यातील सर्व ग्रामपंचायती, पंचायत समिती व जिल्हा परिषद स्तरावर संगणक परिचालक म्हणून जिल्ह्यात ५५६ कर्मचारी मानधन तत्वावर कार्यरत आहे. या संगणक परिचालकांच्या माध्यमातून सर्व प्रकारच्या डिजिटल सेवा पुरविणे, जमा खर्चाची नाेंद ऑनलाइन करणे, ग्रामसभा, मासिक सभा याचे ऑनलाइन आणि ऑफलाइन काम संगणक परिचालक करतात. मात्र या संगणक परिचालकांना मागील चार महिन्यांपासून मानधन मिळाले नाही. कंपनीने आता त्यांचे मानधन काढण्यासाठी काही जाचक अटी लागू केल्या आहे. १ ते ३३ नमुने अपडेट असेल तरच मानधन काढू अशी भूमिका कंपनीने घेतल्याने या संगणक परिचालकांवर उपासमारीचे संकट ओढावले आहे. मात्र बऱ्याच ग्रामपंचायतमध्ये १ ते ३३ नमुन्यांचा डाटाच नाही तर काही ग्रामपंचायतमध्ये हा डाटा अपूर्ण आहे. त्यामुळे तो ऑनलाईन करायचा कसा असा प्रश्न संगणक परिचालकांसमोर निर्माण झाला आहे. त्यामुळे कंपनीने ही अट रद्द करावी या मागणीसाठी जिल्ह्यातील ५५६ संगणक परिचालकांनी काम बंद आंदोलन सुरू केले आहे. कंपनीने ही अट रद्द न केल्यास आंदाेलन अधिक तीव्र करण्याचा इशारा संघटनेचे अध्यक्ष जितेंद्र साखरे, जिल्हा सचिव प्रमोदकुमार गौतम, उपाध्यक्ष टोलीराम नेलकर यांनी दिला आहे. 

 ...तर सोमवारपासून राज्यभरात आंदोलन - महाराष्ट्रातील ग्रामपंचायतीमध्ये २७ हजार संगणक परिचालक कार्यरत आहे. कंपनीने संगणक परिचालकांची मागणी मान्य न केल्यास सोमवारपासून संपूर्ण राज्यभरातील संगणक परिचालक आंदोलनात सहभागी होणार असल्याचा इशारा दिला आहे.

आंदोलनाचा विद्यार्थ्यांना त्रास - ग्रामपंचायत अंतर्गत सर्वच प्रकारचे दाखले आता ऑनलाइन दिले जातात. मात्र संगणक परिचालकांचे मागील चार दिवसांपासून आंदोलन सुरू असल्याने विद्यार्थी तसेच गावकऱ्यांना दाखले मिळत नसल्याचे त्यांची कामे खोळंबली आहेत. 

 

टॅग्स :gram panchayatग्राम पंचायतonlineऑनलाइन