शहरं
Join us  
Trending Stories
1
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
2
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
3
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
4
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
5
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
6
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
7
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
8
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
9
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
10
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
11
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
12
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
13
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
14
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
15
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
16
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
17
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
18
'हिंदूंनी एकजुटीने...', बांगलादेशातील हिंदू अत्याचारांवर RSS प्रमुख मोहन भागवतांचे मोठे वक्तव्य
19
भाजपाचे ५ आमदार असतानाही काँग्रेसने दिली मात! चंद्रपुरात विजय वडेट्टीवार ठरले किंगमेकर
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

एक लाख महिला उन्नतीच्या मार्गावर

By admin | Updated: January 21, 2016 01:35 IST

महिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम व्हावे आणि त्यातून उन्नती साधावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार बचत गट बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे.

विविध व्यवसायांना चालना : ४४६७ बचत गटांना दिले ९.७९ कोटींचे कर्ज नरेश रहिले गोंदियामहिलांनी स्वत:च्या पायावर उभे राहण्यासाठी सक्षम व्हावे आणि त्यातून उन्नती साधावी यासाठी केंद्र सरकारच्या योजनेनुसार बचत गट बनविण्यासाठी प्रोत्साहन दिले जात आहे. या बचत गटांच्या माध्यमातून शासनाकडून विविध व्यवसायांकरिता कर्ज घेऊन आर्थिक प्रगती साधण्यासाठी जिल्ह्यातील एक लाख ४ हजार ६१० महिला सरसावल्या आहेत. सन २००७ पासून राबविल्या जात असलेल्या या योजनेंत आतापर्यंत ४४६७ बचत गटांना ९ कोटी ७९ लाख रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले.जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव वगळता इतर सात तालुक्यात ९ हजार ५१० बचत गट असून या सात तालुक्यातील ४ हजार ४६७ बचत गटांना ९ कोटी ७९ लाख ९० हजार ६०६ रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. शासनाने बचत गटांना कर्ज उपलब्ध करून दिल्यामुळे ग्रामीण भागातील महिलांचा जीवनाचा आधार मिळाला आहे. सडक-अर्जुनी तालुक्यात ११३१ गटांपैकी ३११ बचत गटांना ६० लाख ८१ हजार ८२६ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. देवरी तालुक्यात १११४ गटांपैकी २७६ बचत गटांना ३० लाख ७ हजार ९२० रूपयांचे कर्ज, सालेकसा तालुक्यात १०७२ गट असून त्यांना ३ कोटी १९ लाख ८८ हजार ५८४ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. आमगाव तालुक्यात १११८ गटांपैकी ३१२ बचत गटांना ६६ लाख ८९ हजार ६५८ रूपयांचे कर्जवाटप करण्यात आले. गोरेगाव तालुक्यात १४५६ गटांपैकी ४१३ बचत गटांना ७६ लाख १६ हजार ६८५ रूपयांचे कर्जवाटप केले आहे. तिरोडा तालुक्यात १६३६ गटांना २ कोटी ८५ लाख ७७ हजार ५९२ रूपये तर गोंदिया तालुक्यात १९८३ गटांपैकी ४३८ बचत गटांना १ कोटी ४० लाख ३४१ रूपयांचे कर्ज वाटप केले आहे. कर्जाच्या स्वरूपात घेतलेल्या रकमेतून महिला जिल्ह्यात सर्वात जास्त शेळीपालनाचा व्यवसाय करीत आहेत. दुग्ध व्यवसाय करणाऱ्या बचत गटांची संख्या त्याखालोखाल आहे. जिल्ह्यातील १५ बचत गटांनी स्वत:च्या दुग्ध डेअरी सुरू केल्या आहेत. महिलांनी कुठलाही पैसा खर्च न करता अगरबत्ती, मेनबत्ती, पोल्ट्री फार्म, आलू लागवड आदी कामे केली आहेत. ग्रामीण भागातील महिला आता बचत गटाच्या माध्यमातून आर्थिकदृष्ट्या सक्षम होऊन उन्नती साधण्याचा ध्यास घेत आहेत.