शहरं
Join us  
Trending Stories
1
ठाकरे बंधू एकत्र आले तर मुंबई पालिका निवडणूक काँग्रेस स्वबळावर लढणार? ७ तारखेला निर्णय होणार
2
रेल्वे प्रवाशांना झटका! उद्यापासून ट्रेन प्रवास महागणार; तिकिटांचे दर किती वाढणार? एका क्लिकवर जाणून घ्या
3
कोल्हापुरातील वराच्या फिर्यादीवरून जळगावची वधू व मध्यस्थांविरुद्ध गुन्हा दाखल
4
प्रेयसी मुलासोबत लाॅजमधून बाहेर येताना दिसली, प्रियकराने संपवले जीवन
5
आनंदाची बातमी! सुकन्या, PPF सह अल्प बचत योजनांसंदर्भात मोदी सरकारचा मोठा निर्णय; पटा-पट चेक करा लेटेस्ट व्याज दर!
6
कुटुंबियांना फोन करून आत्महत्येचा प्रयत्न, पोलिसांच्या तत्परतेमुळे वाचला व्यावसायिकाचा जीव
7
तीन पिढ्या काँग्रेसमध्ये, ७० वर्षांनी सोडणार पक्षाची साथ; कुणाल पाटील करणार भाजपात प्रवेश
8
आता सीमेवर असेल भारताचा 'तिसरा डोळा', चीन-पाकिस्तानची झोप उडवेल मोदी सरकारचा जबरदस्त प्लॅन
9
इराणच्या मनात धडकी; इंटरनेट वापरावरही आणली बंदी, न ऐकणाऱ्याला चाबकाचे फटके अन्... 
10
ENG vs IND : टीम इंडियाविरुद्ध खेळलेला डाव फसला! इंग्लंडच्या प्लेइंग इलेव्हनमधून हा गोलंदाज 'गायब'
11
“संजय पवार सच्चे शिवसैनिक, एकनाथ शिंदे यांच्यासोबत आले तर स्वागतच करू”; कुणी दिली खुली ऑफर?
12
सोनम रघुवंशीचं दुसरं लग्नही झालेलं?  तपासादरम्यान सापडलेल्या दुसऱ्या मंगळसूत्रानं गूढ वाढवलं!
13
ENG vs IND : कॅप्टन आयुष म्हात्रेवर 'गोल्डन डक'ची नामुष्की; वैभव सूर्यंवशी टिकला, पण...
14
“ठाकरे बंधूंनी एकत्र येऊ नये असा GR काढलेला नाही”; CM देवेंद्र फडणवीसांचा खोचक टोला
15
ठाकरे बंधू एकत्र येण्याच्या चर्चा असतानाच उद्धवसेना-मनसेला खिंडार; अनेक पदाधिकारी शिंदे गटात सामील
16
५० वर्षांची महिला मुलाच्या वर्गमित्राच्याच प्रेमात पडली, संसार थाटला अन् आता...! अशी सुरू झाली "Love story"
17
“हिंदीचा निर्णय RSSचा अजेंडा राबवायची जनमतचाचणी, भारताची विविधतेतील एकता संपवायचा प्रयत्न”
18
9200 km वेग, 8000 km रेंज, रडारला चुकवण्यास सक्षम; भारत करतोय ब्रह्मोसपेक्षा घातक मिसाईलची चाचणी
19
कोलकाता बलात्कार प्रकरणातील मुख्य आरोपी निघाला ‘हिस्ट्रीशीटर’; मोनोजितवर आधीच दाखल आहेत मोठे गुन्हे!
20
रनवेवरून हवेत झेपावेपर्यंत सर्वकाही ठीक होते; हवेत गेले तरी... एअर इंडिया विमान अपघातावर मोठी अपडेट

दिवाळीला गरिबांच्या झोपडीमध्ये एक पणती लावण्याचेही झाले वांधे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:29 IST

खाद्य तेलाच्या भाववाढीचा परिणाम : सर्वसामान्यांना महागाईच्या झळा

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : दिवाळीचा सण तोंडावर आला असून एकाएकी तेलाचे भाव खूप वाढले आहे. सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलोवर पोहोचले आहे. सर्वसामान्य माणूस सोयाबीनचे तेल खातात. पण, सोयाबीनच्या तेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीला गरिबाच्या झोपडीत एक तरी पणती लागणार का? अशी अवस्था झाली आहे.

दिवाळी म्हणजे तेजोमयी सण असल्याने घरोघरी पणत्यांची रांग लागते. मोठ्या प्रमाणात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. एकाएकी दिवाळीच्या तोंडावर तेलाचे भाव वाढल्याने दिवाळीचे नियोजन कोडमडले आहे. गोरगरिबांच्या झोपडीपुढे आता एक दोनच पणत्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य गोरगरीबही दिवाळीचा सण उत्साहात साजरे करतात. त्यांचेही एक छोटे-मोठे बजेट तयार असते. त्या बजेटमध्येच गरीब माणूस आपली दिवाळी साजरी करतो. अन्नधान्य, किराणा यांचे भाव वाढले की त्याचे बजेट ढासळते. दिवाळीच्या दिवसात शेव, चकली, अनारसे, चिवडा असे पदार्थ गोडधोडासोबत करावे लागतात. मात्र तेलाचे भाव वाढल्याने या फराळाच्या पदार्थावरही कात्री लागणार आहे. यंदाची दिवाळी आटोक्यात साजरी होणार आहेत. 

दिवाळीत करावी लागतेय काटकसरअनेक बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये प्राप्त झाले. काही बहिणींच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. ज्यांना पैसे मिळाले त्या बहिणींनी स्वतः साठी साडी व नवीन कपडे न घेता मुलाबाळांसाठी कपडे खरेदीचे नियोजन केले आहे. काही बहिणींनी आपल्या घरधन्यासाठी काटकसर करून नवीन कपडे खरेदी केले आहे. नाममात्र पेंशात यंदाची दिवाळी गोरगरिबांच्या घरी साजरी होणार असून त्यांना वाढलेल्या तेलाच्या भावाचा व इतरही महागाईचा फटका गरिबांना बसला आहे. तरीही दिवाळीचा सण कुटुंबासह आनंदात आपापल्या परीने साजरा करण्याचा बेत सर्वांनी आखला आहे

टॅग्स :wardha-acवर्धा