शहरं
Join us  
Trending Stories
1
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
2
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
3
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
4
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
5
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
6
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीची संतापजनक पोस्ट, नेमके प्रकरण काय?
7
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
8
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
9
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
10
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...
11
एकट्याने पाकिस्तानी आक्रमण परतवलेले, त्यानंतर रहस्यमयी मृत्यू; आजही भारतीय सैन्याला सियाचिनमध्ये वाचवितात ओपी बाबा
12
Gold Price on 28 April : अक्षय्य तृतीयेपूर्वी सोनं झालं स्वस्त, पाहा १० ग्रॅम सोन्यासाठी किती खर्च करावा लागणार
13
'पंचायत'च्या मेकर्सची आणखी एक हटके वेबसीरिज, 'ग्राम चिकित्सालय'मधून उडणार हास्याचे फवारे!
14
पहलगामधील हल्ल्याबाबत काश्मीरच्या विधानसभेतून ओमर अब्दुल्लांनी व्यक्त केला संताप, म्हणाले, ‘’मागच्या २६ वर्षांनंतर…’’ 
15
...म्हणून ८ वर्षांनी मोठ्या अविनाश नारकर यांच्यासोबत केलं लग्न, ऐश्वर्या यांनी सांगितलं कारण
16
जीवन संपवण्यापूर्वी डॉ. शिरीष वळसंगकर यांनी चार जणांना केले होते फोन, सीडीआरमधून समोर आली नवी माहिती
17
आईनं हॉस्पिटलसाठी जीवाचं रान केले तरी तिच्यावर ही वेळ आली; मनीषाच्या मुलांची व्यथा
18
पाकिस्तानचे पाणी बंद केले हे पूर्णपणे खोटे; सरकारचे पत्र वाचून दाखवत प्रकाश आंबेडकरांचा दावा
19
शोएब अख्तरसह १६ पाकिस्तानी यूट्यूब चॅनेलवर बंदी; महिन्याला किती कमाई होती?
20
"विधानसभा निवडणुकीत काँग्रेस शहराध्यक्षाची मला मदत"; भाजपच्या सुरेश खाडे यांचा गौप्यस्फोट

दिवाळीला गरिबांच्या झोपडीमध्ये एक पणती लावण्याचेही झाले वांधे

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 25, 2024 17:29 IST

खाद्य तेलाच्या भाववाढीचा परिणाम : सर्वसामान्यांना महागाईच्या झळा

प्रफुल्ल लुंगे लोकमत न्यूज नेटवर्क सेलू : दिवाळीचा सण तोंडावर आला असून एकाएकी तेलाचे भाव खूप वाढले आहे. सोयाबीनचे तेल दीडशे रुपये किलोवर पोहोचले आहे. सर्वसामान्य माणूस सोयाबीनचे तेल खातात. पण, सोयाबीनच्या तेलाच्या भावात प्रचंड वाढ झाली आहे. त्यामुळे येत्या दिवाळीला गरिबाच्या झोपडीत एक तरी पणती लागणार का? अशी अवस्था झाली आहे.

दिवाळी म्हणजे तेजोमयी सण असल्याने घरोघरी पणत्यांची रांग लागते. मोठ्या प्रमाणात पणत्या लावून दिवाळी साजरी करण्याची परंपरा आहे. एकाएकी दिवाळीच्या तोंडावर तेलाचे भाव वाढल्याने दिवाळीचे नियोजन कोडमडले आहे. गोरगरिबांच्या झोपडीपुढे आता एक दोनच पणत्या लागण्याची शक्यता निर्माण झाली आहे. सर्वसामान्य गोरगरीबही दिवाळीचा सण उत्साहात साजरे करतात. त्यांचेही एक छोटे-मोठे बजेट तयार असते. त्या बजेटमध्येच गरीब माणूस आपली दिवाळी साजरी करतो. अन्नधान्य, किराणा यांचे भाव वाढले की त्याचे बजेट ढासळते. दिवाळीच्या दिवसात शेव, चकली, अनारसे, चिवडा असे पदार्थ गोडधोडासोबत करावे लागतात. मात्र तेलाचे भाव वाढल्याने या फराळाच्या पदार्थावरही कात्री लागणार आहे. यंदाची दिवाळी आटोक्यात साजरी होणार आहेत. 

दिवाळीत करावी लागतेय काटकसरअनेक बहिणींना मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचे साडेसात हजार रुपये प्राप्त झाले. काही बहिणींच्या अर्जात त्रुटी असल्याने त्यांना एक रुपयाही मिळाला नाही. ज्यांना पैसे मिळाले त्या बहिणींनी स्वतः साठी साडी व नवीन कपडे न घेता मुलाबाळांसाठी कपडे खरेदीचे नियोजन केले आहे. काही बहिणींनी आपल्या घरधन्यासाठी काटकसर करून नवीन कपडे खरेदी केले आहे. नाममात्र पेंशात यंदाची दिवाळी गोरगरिबांच्या घरी साजरी होणार असून त्यांना वाढलेल्या तेलाच्या भावाचा व इतरही महागाईचा फटका गरिबांना बसला आहे. तरीही दिवाळीचा सण कुटुंबासह आनंदात आपापल्या परीने साजरा करण्याचा बेत सर्वांनी आखला आहे

टॅग्स :wardha-acवर्धा