शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

पांगोलीचा जुना पूल झाला आता बंधारा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 12, 2021 05:00 IST

शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी (दि.११) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या नाविन्यपूर्ण कामाची प्रशंसा केली. या कामामुळे या ठिकाणी २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे.

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शहरालगत वाहणाऱ्या पांगोली नदीवरील जुन्याचे पुलाचे रुपातंर आता बंधाऱ्यात करण्यात आले. यामुळे पाणीसाठा वाढविणे शक्य होणार असल्याने परिसरातील शेतकऱ्यांना सिंचनाची सोय होणार आहे.शहराच्या पूर्वेस वाहणाऱ्या पांगोली नदीवर गेल्या ४० वर्षांपासून पूल अस्तित्वात असून गोंदिया, चुलोद, नवरगाव, दत्तोरा व इर्री या गावांना जोडणारा हा पूल आहे. जलसंधारण विभागाने या नादुरुस्त पुलाचे पाणी साठवण बंधाऱ्यात रूपांतर केले असून या ठिकाणी बुधवारी (दि.११) जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी भेट देऊन पाहणी केली. या नाविन्यपूर्ण कामाची प्रशंसा केली. या कामामुळे या ठिकाणी २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. जिल्हा जलसंधारण अधिकारी अनंत जगताप, उपअभियंता सोनाली ढोके, शाखा अभियंता तुषार मानकर व शाखा अभियंता वसंत राऊत यावेळी उपस्थित होते. दगडी बांधकाम व पाईपचा वापर करून या पुलाचे बांधकाम करण्यात आले होते. या पुलाची उंची कमी असल्याने पावसाळ्यात अन्य गावांचा संपर्क सुरळीत ठेवण्याकरिता नवीन पुलाचे बांधकाम करण्यात आले.  दगडी बांधकाम असलेला जुना पूल निरुपयोगी पडून होता. जलसंधारण विभागाने जिल्हा नियोजनचा २० लाख रुपये निधी खर्चून या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करून टाकाऊतून टिकाऊ असे नाविन्यपूर्ण काम केले. या ठिकाणी आता २०० स.घ.मी. पाणी साठा निर्माण झाला आहे. नदीच्या दोन्ही बाजूस असलेल्या विहिरी व बोअरवेलची पाणी पातळी वाढण्यास मदत होणार आहे. कधी कधी शेवटच्या एक पाण्यामुळे खरीपाच्या धान पिकाचे नुकसान होते आता शाश्वत पाणी साठा निर्माण झाल्यामुळे नुकसान टाळता येणार आहे. जलसाठा तयार झाल्याने या ठिकाणी मासेमारी करण्यासाठी सुद्धा भरपूर वाव राहणार आहे.८० हेक्टरला होणार सिंचन जिल्हाधिकारी नयना गुंडे यांनी या कामाला भेट देऊन पाहणी केली. जलसंधारण विभागाने जुन्या पुलाचे बंधाऱ्यात रूपांतर करून सिंचन क्षमता वाढीसाठी उचललेले हे महत्वाचे पाऊल असल्याचे मत व्यक्त केले. या परिसरात पर्यटनाला वाव असून या अनुषंगाने विकास करण्याचा मानस त्यांनी व्यक्त केला. या जलसाठ्यामुळे अंदाजे ५० हेक्टर खरीपचे व अंदाजे ३० हेक्टर रब्बीचे क्षेत्र व भाजीपाला पिकाला सिंचित करणे शक्य झाले आहे. शेतकऱ्यांचे लहान गट तयार करून या ठिकाणी सौर ऊर्जा प्रकल्प टाकण्यासाठी महाऊर्जा संस्थेला प्रस्ताव पाठविण्याची विनंती कृषी विभागाला पत्राद्वारे केली आहे. तसेच हा परिसर पर्यटन स्थळ म्हणून विकसित करण्यासाठी नगर परिषदेला पत्र पाठविण्यात आल्याचे जगताप यांनी यावेळी सांगितले.

पर्यटनस्थळ म्हणून विकास करणार - नदीपात्रात खोलीकरण झाल्याने बोटिंग करता येणे शक्य आहे. त्यामुळे हे ठिकाण कौटुंबिक सहलीसाठी विकसित करता येऊ शकते. या परिसरालगत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे स्मृती स्थळ असून या ठिकाणी वर्षातून दोन वेळा अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित असतात. याठिकाणी सौंदर्यीकरण केल्यास हा भाग पर्यटन स्थळ म्हणून विकसित होऊ शकतो अशी माहिती अनंत जगताप यांनी जिल्हाधिकारी यांना दिली.  

टॅग्स :collectorजिल्हाधिकारीIrrigation Projectsपाटबंधारे प्रकल्प