शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात मोठी घडामोड! इम्रान खान तुरुंगातून बाहेर येणार? एकाचवेळी आठ प्रकरणांत मिळाला जामीन 
2
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
3
राजनाथ सिंह आणि फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना फोन करून पाठिंबा मागितला; संजय राऊतांचा दावा
4
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
5
Asia Cup 2025 : टीम इंडिया आशिया कप स्पर्धेत पाकविरुद्ध खेळणार का? मोठी माहिती आली समोर
6
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका
7
१ लाखाचे केले १० कोटी रुपये, अनेकदा लागलं अपर सर्किट; एकेकाळी एका रुपयांपेक्षाही कमी होती किंमत
8
सप्टेंबरनंतर देशात अन् राज्यात मोठ्या राजकीय घडामोडी घडतील; अंजली दमानियांचा दावा, म्हणाल्या...
9
रिलायन्समुळे मिळाला आधार; निफ्टी-सेन्सेक्स विक्रमी उच्चांकावर बंद; कोणत्या क्षेत्रात सर्वाधिक वाढ?
10
नजर खाली, काकाचा हातात हात...लग्नासाठी आलेली ५ स्थळे नाकारणारी अर्चना तिवारी घरी कशी पोहचली?
11
ऑनलाइन गेमिंगवर बंदी येण्यापूर्वी झुनझुनवालांची 'या' कंपनीतून एक्झिट; निखिल कामत, मधुसूदन केला यांना अजूनही विश्वास?
12
वाहतूक नियम मोडल्याचे चलन येताच फाईन भरा, ७५ टक्क्यांपर्यंत सूट मिळणार; महाराष्ट्रात विचार सुरु...
13
"पावसाळी अधिवेशनात लोकसभेत केवळ ३७ तास चर्चा, संसदेचा खर्च खासदारांकडून वसूल करा’’, नाराज खासदाराने केली मागणी
14
"बाळासाहेब थोरातांच्या केसालाही धक्का लावण्याची गोडसेच्या औलादीमध्ये धमक नाही", हर्षवर्धन सपकाळ यांनी ठणकावले
15
घरात काय चाललंय ते कळेना! पाक दिग्गज टीम इंडियात डोकावत श्रेयस अय्यरवर बोलला, म्हणे...
16
'का ग कुठे गेली होती?', सुनेत्रा पवारांबद्दलचा प्रश्न ऐकून अजित पवारांनी पत्रकार परिषदेतच जोडले हात
17
१२%, २८% चा GST स्लॅब संपवण्याचा प्रस्ताव राज्यांच्या अर्थमंत्र्यांच्या गटानं स्वीकारला, सामान्यांना मिळणार मोठा दिलासा
18
Raigad Boat Accident: मोठी बातमी! रायगडच्या समुद्रात मासेमारी बोट बुडाली, बचाव कार्य सुरू; व्हिडीओ व्हायरल
19
"वरण-भात माझं आवडीचं जेवण", ट्रोल झाल्यावर विवेक अग्निहोत्रींची पलटी, म्हणाले- "मला अक्कल आली तेव्हा..."
20
Gold Silver Price 21 August: सोन्याच्या दरातील घसरण थांबली, चांदीमध्ये ₹१७४५ ची तेजी, सोनं किती महाग झालं? जाणून घ्या

ओबीसींनी संवैधानिक अधिकारासाठी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 22:01 IST

पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील.

ठळक मुद्देनाना पटोले । कुणबी समाजाचे अधिवेशन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सन १९३१ नंतर जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसींची लोकसंख्या किती आहे हे कळायला मार्ग नाही. प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे माहिती करुन घेण्याकरिता जातीनिहाय जनगणना होणे महत्वाचे असून बहुजनांनी जातीनिहाय जनगणनेचे कॉलम असेल तर जनगणनेला सहकार्य करा अन्यथा बहिष्कार करा. ओबीसींनी आपसातील मदभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संवैधानिक अधिकार मिळू शकतील असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ समाजसेवक काशीराम शिवणकर होते. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, विजय बहेकार, अमर वऱ्हाडे, नामदेव किरसान, नटवरलाल गांधी, सरपंच कल्पना बहेकार, प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, रमेश चुटे, सभापती दिलीप वाघमारे, डॉ. संजय देशमुख, राजू काळे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, कमल बहेकार, युगराम कोरे, भूमेश्वर मेंढे, इंदू कोरे, अजया चुटे, वंदना काळे, माजी सरपंच रेखा फुंडे, डॉ. अजय उमाटे, संतोष अग्रवाल, संतोष बोहरे, संजय दोनोडे, शमलाल दोनोडे, डॉ. वाळके, देवराम खोटेले, उपसरपंच फुंडे, पुरुषोत्तम कोरे, टी.जी.फुंडे, प्रा. दखणे, प्रा. काटेखाये, प्रा. भदाडे, एस.के. कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबा, सुभाषचंद्र बोस यांच्या छायाचित्रांना पूजन करून झाली.पुढे बोलताना पटोले यांनी, पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील. लोकशाहीत जनतेची भूमिका महत्वपूर्ण असते. विधानसभा अध्यक्षाच्या रुपाने लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी राजदंड वापरण्याची ताकद आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला खºया अर्थाने न्याय देण्याची माझी भूमिका राहील, असेही त्यांनी सांगीतले.समितीकडून जाहीर सत्कारयाप्रसंगी समितीच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नाना पटोले यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच साखरीटोला येथील विविध संघटना, संस्था व शाळा-कॉलेजच्यावतीने भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या कुणबी समाजातील तरुणांचा पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेOBC Reservationओबीसी आरक्षण