शहरं
Join us  
Trending Stories
1
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
2
सीमेवरील तणावादरम्यान भारताचं मोठं पाऊल, राफेल-एम विमानांसाठी फ्रान्ससोबत करार, अशी आहेत वैशिष्ट्ये
3
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
4
मोठा खुलासा! पहलगाममध्ये हल्ल्यावेळी लष्कराचा मोठा अधिकारी तिथेच होता; गेटकडे धावणाऱ्या लोकांना रोखले...
5
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
6
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार
7
जसं त्याला कळलं, आम्ही हिंदू आहोत, त्याने...; लेफ्टिनंटच्या पत्नीचा पहिल्यांदाच खुलासा
8
मुकेश अंबानी यांच्या एका शेअरने मार्केट फिरवलं; बाजाराची जोरदार उसळी; कुठे सर्वाधिक वाढ?
9
पर्यटकांच्या सुरक्षेसाठी 'महाराष्ट्र पर्यटन सुरक्षा दल' स्थापना; राज्य सरकारचा निर्णय
10
Bank of Baroda मध्ये जमा करा १,००,००० रुपये आणि मिळेल ₹१६,१२२ चा फिक्स्ड रिटर्न, पाहा डिटेल्स
11
५०० रुपयांपेक्षा कमी वार्षिक प्रीमियमवर २ लाख रुपयांचा विमा मिळवा, कोण घेऊ शकतो लाभ?
12
दहशतवादी हल्ला करताना धर्म विचारतात का? वडेट्टीवारांचे विधान; CM फडणवीस म्हणाले, "इथे बसून…"
13
यशस्वी जैस्वालकडे सर्वांचं लक्ष, गुजरातविरुद्ध मोलाचा पल्ला गाठणार
14
'धनंजय मुंडे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला, मग...', अंजली दमानियांचे सरकारला दोन सवाल
15
मुंबई- लखनौ सामन्यानंतर जसप्रीत बुमराहच्या पत्नीला राग अनावर, नेमके काय घडलं?
16
LIC च्या 'या' पॉलिसीत एकदाच गुंतवणूक करा अन् दरमहा २० हजार पेन्शन मिळवा; किती गुंतवणूक करावी लागेल?
17
"काँग्रेस नेते दहशतवाद्यांना 'निर्दोष' ठरवण्याचा प्रयत्न करताहेत का?", बावनकुळे वडेट्टीवारांवर कडाडले
18
चीनला का पडतेय भारतीय कंपन्यांची गरज? 'या' कामासाठी मागताहेत मदत
19
तुम्ही होम लोन घेतलेलं असेल, तर पर्सनल लोन मिळू शकते का? जाणून घ्या
20
एकही युद्ध जिंकले नाही; मग पाकिस्तानी अधिकारी छातीवर पदके लावून का फिरतात? जाणून घ्या...

ओबीसींनी संवैधानिक अधिकारासाठी एकत्र यावे

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 22:01 IST

पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील.

ठळक मुद्देनाना पटोले । कुणबी समाजाचे अधिवेशन उत्साहात

लोकमत न्यूज नेटवर्कसाखरीटोला : सन १९३१ नंतर जातीनिहाय जनगणना करण्यात आली नाही. त्यामुळे ओबीसींची लोकसंख्या किती आहे हे कळायला मार्ग नाही. प्रत्येक जातीची लोकसंख्या किती आहे हे माहिती करुन घेण्याकरिता जातीनिहाय जनगणना होणे महत्वाचे असून बहुजनांनी जातीनिहाय जनगणनेचे कॉलम असेल तर जनगणनेला सहकार्य करा अन्यथा बहिष्कार करा. ओबीसींनी आपसातील मदभेद विसरुन एकत्र येण्याची गरज आहे. तेव्हाच खऱ्या अर्थाने संवैधानिक अधिकार मिळू शकतील असे प्रतिपादन विधानसभा अध्यक्ष नाना पटोले यांनी केले.युवा कुणबी समाज सेवा समितीच्यावतीने येथील जिल्हा परिषद हायस्कूलच्या मैदानात आयोजित कुणबी समाजाच्या अधिवेशनात ते बोलत होते. अध्यक्षस्थानी वरिष्ठ समाजसेवक काशीराम शिवणकर होते. उद्घाटन जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्ष उषा मेंढे यांच्या हस्ते करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा परिषद सभापती लता दोनोडे, विजय बहेकार, अमर वऱ्हाडे, नामदेव किरसान, नटवरलाल गांधी, सरपंच कल्पना बहेकार, प्रभाकर दोनोडे, तुकाराम बोहरे, रमेश चुटे, सभापती दिलीप वाघमारे, डॉ. संजय देशमुख, राजू काळे, उपसरपंच पृथ्वीराज शिवणकर, कमल बहेकार, युगराम कोरे, भूमेश्वर मेंढे, इंदू कोरे, अजया चुटे, वंदना काळे, माजी सरपंच रेखा फुंडे, डॉ. अजय उमाटे, संतोष अग्रवाल, संतोष बोहरे, संजय दोनोडे, शमलाल दोनोडे, डॉ. वाळके, देवराम खोटेले, उपसरपंच फुंडे, पुरुषोत्तम कोरे, टी.जी.फुंडे, प्रा. दखणे, प्रा. काटेखाये, प्रा. भदाडे, एस.के. कोरे उपस्थित होते. कार्यक्रमाची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराज, संत तुकोबा, सुभाषचंद्र बोस यांच्या छायाचित्रांना पूजन करून झाली.पुढे बोलताना पटोले यांनी, पुढील वर्षी प्रत्येक गावात धान खरेदी केंद्र सुरु करण्याचा शासनाचा प्रयत्न राहील, असे सांगितले. शासनाने पहिल्याच दिवशी शेतकऱ्यांच्या कर्जमाफीची घोषणा केली होती. कर्जमाफीसाठी आॅनलाईन अर्ज करण्याची पद्धतनी बंद केली. पीकविमा योजनेत बदल करण्यात येईल हे ही सांगितले. बहुजनांनी पैसे घेवून मते विकण्याची परंपरा निवडणुकीत बंद केली पाहिजे. अन्यथा फक्त पैसेवालेच सत्तेत येतील. लोकशाहीत जनतेची भूमिका महत्वपूर्ण असते. विधानसभा अध्यक्षाच्या रुपाने लोकशाहीला सुदृढ करण्यासाठी राजदंड वापरण्याची ताकद आपल्याला मिळाली आहे. त्यामुळे महाराष्ट्राच्या जनतेला खºया अर्थाने न्याय देण्याची माझी भूमिका राहील, असेही त्यांनी सांगीतले.समितीकडून जाहीर सत्कारयाप्रसंगी समितीच्यावतीने विधानसभेचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याबद्दल नाना पटोले यांचा शाल व श्रीफळ देवून सत्कार करण्यात आला. सोबतच साखरीटोला येथील विविध संघटना, संस्था व शाळा-कॉलेजच्यावतीने भेटवस्तू देवून त्यांचा सत्कार करण्यात आला. तसेच विविध मागण्यांचे निवेदन सुद्धा देण्यात आले. त्याचबरोबर विविध स्पर्धा परीक्षांमध्ये यशस्वी झालेल्या कुणबी समाजातील तरुणांचा पटोले यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.

टॅग्स :Nana Patoleनाना पटोलेOBC Reservationओबीसी आरक्षण