शहरं
Join us  
Trending Stories
1
मृत्यूनंतर बाळासाहेब ठाकरेंची विटंबना, तुम्हाला जबर किंमत मोजावी लागेल; संजय राऊतांचा हल्लाबोल
2
सिंगापूरमधील एका हॉटेलमध्ये दोन सेक्स वर्करना बोलावले, रुममध्ये येताच दागिने, पैसे चोरले; दोन भारतीयांना शिक्षा सुनावली
3
या राज्यात धोकादायक कफ सिरपवरही बंदी; मुलांच्या मृत्यूनंतर लगेच कारवाई
4
Gautami Patil: गौतमी पाटीलला उचलायचं की नाही?; मंत्री चंद्रकांत पाटील यांचा डीसीपींना फोन, म्हणाले... (Video)
5
शिंदेसेनेचे सोलापूर जिल्हाप्रमुख महेश चिवटे यांच्यावर हल्ला; एक आरोपी ताब्यात
6
टॅलेंट नाही, खरी समस्या 'इकडे' आहे... चीनपेक्षा इथे भारत पाच पट मागे का? पै यांनी सांगितलं खरं कारण
7
फाटलेले कपडे, चेहऱ्यावर भीती...अभिनेत्री डिंपलच्या पतीनं मोलकरणीसोबत फ्लॅटमध्ये असं काय केले?
8
अमेरिकेने दाढी ठेवण्यावर बंदी घातली, शीख सैनिकांमध्ये चिंता; मुस्लिम आणि ज्यू सैन्यावरही परिणाम
9
राज्यात पुन्हा बरसणार! या जिल्ह्यांमध्ये 'शक्ती' चक्रीवादळाचा इशारा; जोरदार वाऱ्यांसह मुसळधार पाऊस
10
कोजागरी पौर्णिमा २०२५: कोजागरी ते लक्ष्मीपूजन, आर्थिक वृद्धीसाठी सलग १५ दिवस म्हणा 'हे' लक्ष्मी मंत्र!
11
पुतिन यांच्या भेटीआधी भारताला मोठं बळ! S-400 हवाई संरक्षण प्रणालीची एक नवीन खेप येणार
12
कॅश ऑन डिलिव्हरीवर एक्स्ट्रा चार्ज मागितला तर कारवाई होणार, बंपर सेलदरम्यान सरकार अ‍ॅक्शन मोडमध्ये
13
Tarot Card: येत्या आठवड्यात प्रवास योग आणि आप्तेष्टांच्या भेटी सुखावतील; वाचा साप्ताहिक टॅरो भविष्य
14
गुंतवणुकीचा पॅटर्न बदलला: आता लोक बँकांऐवजी शेअर बाजाराकडे वळले? बँकांसाठी मध्यम-दीर्घकाळात आव्हान
15
ज्योती मल्होत्रानंतर आणखी २ युट्यूबर अटकेत; पाकिस्तानसाठी हेरगिरी करत असल्याचा आरोप
16
रश्मिका मंदाना आणि विजय देवरकोंडाने केली गुपचूप एंगेजमेंट, या दिवशी घेणार सातफेरे
17
Step UP SIP: मुलांचं शिक्षण होऊ शकतं फ्री, तरीही वाचू शकतात ५० लाख रुपये; 'हा' प्लान टेन्शनला करेल बाय-बाय
18
रहस्यमय! ६० विमा पॉलिसी, ३९ कोटी अन् ३ हत्या; आई-बाप आणि पत्नीच्या मृत्यूचा 'त्याने' केला सौदा
19
' भारतीय अपमान सहन करीत नाहीत, अमेरिकेच्या दबावापुढे भारत कधीच झुकणार नाही' : पुतिन
20
अमेरिकेच्या 'H-1B' निर्णयाने जगभरातील संधींचे दरवाजे उघडले! कॅनडा-जर्मनीचा नवा गेम प्लॅन, भारतीयांना मोठा फायदा

पोषण आहाराचे बिल डिसेंबरपासून प्रलंबित

By admin | Updated: May 27, 2014 00:57 IST

शैक्षणिक सत्र संपून पूर्ण महिनाही संपत आहे. मुलांना वेळेवर पोषण आहार शिजवून देणार्‍या तेही कवडीमोल दरात, भाजीपाला विक्रेते ज्यांना काहीही फायदा नाही

काचेवानी : शैक्षणिक सत्र संपून पूर्ण महिनाही संपत आहे. मुलांना वेळेवर पोषण आहार शिजवून देणार्‍या तेही कवडीमोल दरात, भाजीपाला विक्रेते ज्यांना काहीही फायदा नाही व छोट्या धंद्यातून भाजीपाल्याची पूर्ती करणारे विक्रेते इंधनाकरिता काड्यांची पूर्ती करणार्‍या मुख्याध्यापकांना रुपयांकरिता टणटण लावून त्रास देत आहेत. परंतु निधीअभावी बिले काढली नसल्याने मुख्याध्यापक आणि विक्रेते एकदुसर्‍यांवर चीड व्यक्त करतात. त्यामुळे ताणतणावाचे वातावरण निर्माण होत असल्याचे दिसून येत आहे. शालेय पोषण आहार योजना केंद्र शासन आणि राज्य शासन संयुक्तरीत्या राबवीत आहे. मात्र या योजनेचा आर्थिक लाभ शासनाने आतापर्यंत वेळेत दिलेला नाही. पोषण आहाराकरिता दिला जाणारा मेहनताना, इंधन खर्च व भाजीपाल्याचा खर्च मुख्याध्यापकांच्या नावे पूर्वीच जमा करण्याची मागणी अनेकवेळा करण्यात आली. मात्र याकडे शासनाने आणि संबंधित विभागाने तसेच लोकप्रतिनिधींनी लक्ष दिले नाही. तिरोडा पंचायत समिती अंतर्गत येणार्‍या सर्व शाळांना डिसेंंबर महिन्यापर्यंतचा पोषण आहाराचा इंधन खर्च, भाजीपाल्याचा खर्च आणि पोषण आहार शिजविणार्‍या महिलांची मजुरी देण्यात आली. उर्वरित चार महिन्यांचे बिले जसेच्या तसे पडून आहेत. गोंदिया पंचायत समितीमध्ये आॅक्टोबर २०१३ पर्यंतचे पोषण आहारसंबंधी बिले काढण्यात आली आहेत. नोव्हेंबर ते एप्रिल २०१४ पर्यंत सहा महिन्यांची बिले काढण्यात आली नाहीत. पोषण आहाराच्या बिलावरुन मुख्याध्यापकांत, भाजीपाला विक्रेत्यांत आणि पोषण आहार शिजविणार्‍या महिला व पुरुषांमध्ये चांगलाच ताप वाढला आहे. अन्न शिजविणार्‍या महिलांनी लोकमतला सांगितले की, कवडीमोल दरात सकाळी ११ ते ५ वाजतापर्यंत आगीत काम करीत असतानाही वेळेवर रोजी दिली जात नाही. त्यामुळे आपल्या मुलाबाळांचे पोट कसे भरावे, घरी लागणारे साहित्य कसे खरेदी करावे, लग्न समारंभ कसे काय पूर्ण करावे अशा समस्या निर्माण झाल्या आहेत. भाजीपाल्याची पूर्ती करणार्‍या लहान धंदेवाल्यांनी सांगितले की, आपल्या कष्टाच्या मिळकतीतून नगदी घेणार्‍यांना न देता शाळेला पूर्ती करतो. मात्र वेळेवर रक्कम मिळत नसल्याने परिवाराची आर्थिक फजिती होते. टोलवाटोलव करणे हे शासनाचे धोरण निंदणीय असल्याची प्रतिक्रिया त्यांनी व्यक्त केली आहे. उर्वरित महिन्यांचे पोषण आहाराचे बिल काढून त्वरित मजुरी व भाजीपाल्याचे पैसै चुकते करावे, अशी मागणी आहे. (वार्ताहर)