शहरं
Join us  
Trending Stories
1
कल्याणीनगर हिट अँड रन प्रकरण: बिल्डर विशाल अगरवालला अखेर अटक; पुणे पोलिसांची कारवाई
2
भाजपवर एवढे नाराज की, खासदाराने मतदानही केले नाही; प्रचार तर दूरच... पक्षाने नोटीस धाडली
3
क्रूरतेचा भागीदार! इराणने मदत मागितलेली, रईसी यांच्या शोधासाठी अमेरिकेने नकार दिला
4
विराेध असूनही रईसी यांनी इराणला नेले समृद्ध युरेनियमजवळ
5
सर्व रिॲलिटी शोचा बाप! Bigg Boss Marathi 5 येतोय; काही वेळात दिसणार पहिली झलक
6
चेन्नईला बुडविले, तसेच टीम इंडियाला टी20 वर्ल्ड कपमध्येही नाही बुडवले म्हणजे झाले, एवढ्या खराब फॉर्मात
7
आजचे राशीभविष्य, २१ मे २०२४ : मन प्रसन्न राहिल, कामे सफल होतील पण आरोग्याची काळजी घ्यावी लागेल!
8
अर्धे मतदार गेले तरी कुठे? महाराष्ट्रात ५४.३३ टक्के, तर देशात सरासरी ६०.३९ टक्के मतदान
9
मतदान कमी, गोंधळ जास्त, मुंबईत अनेक ठिकाणी ईव्हीएम यंत्रणा बंद, मतदार यादीत नाव शोधताना नाकीनऊ
10
पोलिसांनी अतिरेकी हल्ल्याचा कट उधळला; अहमदाबाद विमानतळावर चार दहशतवाद्यांना अटक
11
मी दारू पितो, माझ्याकडे परवाना नाही; तरीही वडिलांनीच कार दिली; ‘ब्रह्मा ग्रुप’चे विशाल अग्रवाल यांच्यासह चार जणांवर गुन्हा
12
इराणचे राष्ट्राध्यक्ष इब्राहिम रईसी यांचा हेलिकॉप्टर अपघातात मृत्यू; मृतांमध्ये परराष्ट्रमंत्र्यांसह अधिकाऱ्यांचाही समावेश
13
महाराष्ट्रात पाचव्या टप्प्यातील १३ लोकसभा मतदारसंघात अंदाजे ५४.३३ टक्के मतदान  
14
भगवान जगन्नाथ मोदींचे भक्त; संबित पात्रांच्या वक्तव्याने नवा वाद, विरोधकांनी BJP ला घेरले...
15
इराणमधील सत्तासंघर्षामधून इब्राहीम रईसींचा बळी? खोमेनींच्या मुलावर संशय, इराणमध्ये चर्चांना उधाण
16
Narendra Modi : "राजपुत्र उघडपणे सांगत आहेत..."; राहुल गांधींच्या जुन्या Video चा उल्लेख करत मोदींचा घणाघात
17
उत्तर प्रदेशमध्ये बनावट मतदान, अनेक खुलासे; २५ मे रोजी होणार पुन्हा मतदान
18
लोकसभा निवडणुकीदरम्यान बीड आणि बारामतीमध्ये बोगस मतदान, शरद पवारांचा गंभीर आरोप  
19
भोंगळ कारभार! मतदान करता न आल्यानं कलाकार संतापले; सांगितलं नेमकं काय घडलं
20
‘ही लढाई संपलेली नाही, तर आता खरी सुरुवात झालीय’, जयंत पाटील यांचं शरद पवार गटाच्या कार्यकर्त्यांना भावूक पत्र 

आता स्त्रिया व्यासपीठावर बोलू लागल्या...

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 1:05 AM

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला.

ठळक मुद्देगायत्री इरले : भगवान गौतम बुद्ध व बाबासाहेबांच्या पुतळ्याचे अनावरण

लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी भारतीय स्त्रियांच्या उद्धारासाठी केलेले कार्य अतुलनीय आहे. हिंदू कोड बिलाच्या माध्यमातून आणि भारतीय संविधानातील स्त्री-पुरुष समतेच्या कलमांमुळे भारतीय स्त्रियांना न्याय आणि अधिकार प्राप्त झाला. त्यामुळे आज माझ्यासारख्या स्त्रियांना व्यासपीठावर बोलण्याची संधी मिळाली, असे प्रतिपादन सौंदडच्या सरपंच गायत्री इरले यांनी केले.त्रिरत्न बौद्ध विहार समिती श्रीरामनगर (सौंदड) येथे तथागत भगवान गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यांच्या अनावरण सोहळ्यात ते बोलत होते.अनावरण मनोहर चंद्रिकापुरे यांच्या हस्ते, राजेश नंदागवळी यांच्या अध्यक्षतेत करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून डॉ. अजय लांजेवार, रत्नदीप दहिवले, जि.प. सदस्य रमेश चुºहे, सरपंच भरत पंधरे, कृषी उत्पन्न बाजार समिती सदस्य देवचंद तरोणे, शिवदास साखरे, सुखदास मेश्राम, प्रा. सिद्धार्थ रामटेके, केवळराम रहिले, प्रा.आर.के. भगत, अनिल मेश्राम, सरपंच गायत्री इरले, सरपंच रेखा चांदेवार उपस्थित होते.या वेळी मूर्तीदाता रायवंता शंकर रामटेके आणि चित्ररेखा विलास रामटेके यांचा शाल व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. दोन महिलांनी दोन प्रतिमा दान केल्यामुळे सर्व उपस्थित नागरिकांनी त्यांचा गौरव केला. श्रीनगर येथे बौद्ध धम्मीय फक्त चारच घरे आहेत. अशा कमी लोकसंख्येच्या गावात गौतम बुद्ध व डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांची प्रेरणा मिळावी याकरिता गावकऱ्यांनी केलेले सहकार्य उल्लेखनिय असल्याचे मत मान्यवरांनी मार्गदर्शनातून व्यक्त केले. यावेळी गौतम बुद्ध आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारधारेवर अतिथींनी मार्गदर्शन केले.प्रास्ताविक पुरुषोत्तम रामटेके यांनी मांडले. संचालन कैलास रामटेके यांनी केले. आभार विलास रामटेके यांनी मानले. कार्यक्रमासाठी सत्यवान तिरपुडे, प्रेमराज बन्सोड, गौतम रामटेके आदींनी सहकार्य केले.