शहरं
Join us  
Trending Stories
1
'BJP पटेलांच्या वारशाचा अपमान करत आहे; RSS वर पुन्हा बंदी घाला', खरगेंचा सरकारवर हल्लाबोल
2
ऑस्ट्रेलियानं ८० चेंडूत संपवला भारताविरुद्धचा सामना! 'पॉवर प्ले'मध्ये हेजलवूडचा जलवा, अभिषेक शर्मा एकटाच लढला!
3
"दगा फटका झाला तर बच्चू कडू फाशीवर जाईल" आंदोलनाचा विजय झाल्याचा दावा करत बच्चू कडूंनी सरकारला दिला इशारा
4
काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळांवर पोलिसांची पाळत, थेट बेडरुमध्ये घुसून हेरगिरी? आरोपामुळे खळबळ
5
भररस्त्यात पाठलाग, कारची काच फोडली... महिला पत्रकारावर मध्यरात्री हल्ला! अखेर दोघांना अटक
6
'मित्र वणव्यामध्ये गारव्यासारखा…’, आजारी संजय राऊत यांच्यासाठी सुषमा अंधारे यांची खास पोस्ट
7
सरदार पटेल यांना त्यांच्या 150व्या जयंतीनिमित्त शशी थरूर यांचं अभिवादन, महात्मा गांधींच्या नातवाच्या शब्दांत अर्पण केली श्रद्धांजली
8
Mumbai Hostage Case: ‘त्याने फटाके वाजवले आणि बाहेर गोळीबार सुरू असल्याचे सांगितले’; रोहित आर्या प्रकरणी प्रत्यक्षदर्शी वृद्ध महिलेचा खुलासा
9
ट्रम्प यांनी अण्वस्त्र टेस्टिंगचा आदेश देताच रशियाची थेट प्रतिक्रिया, दिला अल्टीमेटम!
10
मित्रांचा आग्रह जीवावर बेतला, पार्टीत बॅक टू बॅक पाजले पेग; २६ वर्षीय युवकाचा संशयास्पद मृत्यू
11
पवईतील आरोपी रोहित आर्यला दीपक केसरकरांनी इतकी मोठी रक्कम का दिली?; सामाजिक कार्यकर्त्यांचा सवाल
12
मुंबई विमानतळावर प्रवाशाच्या बॅगेत सापडली दोन सिल्वर गिबन; कस्टम अधिकारीही झाले अवाक्
13
वाघ अगदी जवळून पाहायचाय? मग, भारतातील 'या' ६ व्याघ्र प्रकल्पांना नक्की भेट द्या!
14
गोळीबार, आग आणि धमकीचं पत्र, फरार कैद्याने आणले पोलिसांच्या नाकी नऊ, नेमकं प्रकरण काय?
15
बाजारात सलग दुसऱ्या दिवशी मोठी घसरण! गुंतवणूकदारांचे २ लाख कोटी बुडाले; सर्वात जास्त कुठे?
16
Extra Marital Affairs:मुलाचं लग्न ठरलं आणि होणाऱ्या सूनेच्या बापावरच जडला महिलेचा जीव; लग्नाआधीच दोघे गेले पळून
17
Rain Alert: कमी दाबाचे क्षेत्र कायम, या राज्यांमध्ये मुसळधार पावसाचा इशारा; महाराष्ट्रात कुठे-कुठे पाऊस पडणार?
18
शेतकऱ्यांना न झुलवता तात्काळ कर्जमाफी करा; उद्धव ठाकरेंची राज्य सरकारकडे मागणी
19
धोनीची गुंतवणूक असलेली कंपनी बाजारात! ६ नोव्हेंबरला उघडणार IPO; प्राइस बँडसह तपशील जाणून घ्या
20
खात्यात ८ लाख जमा केले अन् प्राप्तिकर विभागाची 'टॅक्स' नोटीस; ६ वर्षांच्या लढ्यानंतर करदात्याचा विजय!

प्याऊंवरही आता ‘सेल्फ सर्व्हिस’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 26, 2019 20:31 IST

आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे.

ठळक मुद्देपाणी व ग्लास उपलब्ध : हाताने घ्या व प्या पाणी

कपिल केकत।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’. मात्र बदलत्या काळानुरूप त्यांची ही म्हण देखील बदलली आहे. आज पाण्याच्या पुण्याची व्याख्या बदलून ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे मोठे पुण्य नाही’ अशी झाली आहे. यामुळेच आज प्याऊंवर पाणी पाजण्यासाठी कुणी दिसत नसून ‘सेल्फ सर्वीस’ची प्रथा सुरू झाली आहे. आता प्याऊंवर पाणी व ग्लास उपलब्ध करवून दिले जात असून आपल्या हातून पाणी घ्या व प्या हा फंडा लागू झाला आहे.काळ बदलत चालला आहे व त्यानुसार रिती व परंपराही बदलत चालल्या आहेत. पूर्वी लग्नाचे मंगलाष्टक म्हणण्यासाठी भटजींना बोलवावे लागत होते. आज नवीन काळात मात्र कॅसेट लावून भटजींचे काम उरकले जात आहे. प्रत्येकच बाबतीत नवनवीन संकल्पना काम करू लागली असून त्यालाच आपण ‘अ‍ॅडव्हान्स’ झालो अशी गोड उपमा देत आहोत. यातूनच काळ खरच बदलत गेल्याचेही दिसून येते.बदलत्या काळात प्याऊंची (पाणपोई) संस्कृतीही बदलून गेली आहे. पूर्वी आजी आजोबा म्हणायचे ‘पाणी पाजण्याएवढे मोठे पुण्य नाही’ त्यानुसार तहानलेल्यांना स्वत: हाताने पाणी दिले जायचे. पाण्याचे हे पुण्य कमाविण्यासाठी प्याऊंवर एक व्यक्ती हजर राहून आपल्या हाताने लोकांना पाणी देत असे. पुण्य कमाविण्यासाठी ही धडपड केली जात होती. त्यामुळे प्रत्येकच प्याऊवर एका व्यक्तीची ड्यूटी लावली जात होती.मात्र काळ बदलला असून कुणालाही कुणासाठी वेळ उरलेला नाही. त्यामुळे पाण्याच्या पुण्याची ही व्याख्याही आजच्या पिढीने मोठ्या हुशारीने बदलून टाकली आहे. आज ‘पाणी उपलब्ध करवून देण्याएवढे पुण्य नाही’ अशी म्हण प्रचलीत झाली आहे. कारण वास्तविक प्याऊंची संख्या घटत चालली आहे. त्यातही जी प्याऊ दिसताहेत त्यावर पाणी देण्यासाठी कुणी दिसत नाही. प्याऊ आता ‘सेल्फ सर्वीस’ तत्वावर चालत आहेत.त्याचे असे की, पाण्याचे पुण्य कमाविण्यासाठी आज लोकांकडून घरांसमोर किंवा गर्दीच्या जागेवर पाण्याचे मडके किंवा रांजण भरून ठेवली जात आहे.तेथे पाण्याचे ग्लास उपलब्ध करवून दिले जातात. ज्याला कुणाला पाणी प्यायचे असेल त्याला स्वत: पाणी घेऊन प्यायचे आहे. एकंदर ‘सेल्फ सर्व्हिस’ चा फंडाच आता प्याऊंवर अंमलात आणला जात असल्याचे दिसून येत आहे.प्याऊंवरील ग्लासलाही हतकडीप्याऊंवर पाणी देण्यासाठी कुणी हजर राहत नाही. त्यामुळे स्वत: पाणी घ्या व प्या अशी पद्धत सुरू झाली आहे. अशात मात्र पाणी पिण्यासाठी ठेवलेले ग्लास चोरीला जातात. यावर तोडगा म्हणून ग्लासेसलाही हतकडी लावली जाते. त्याचे असे की, ग्लास चोरीला जाऊ नये यासाठी ग्लासला लोखंडी साखळीने बांधून ठेवले जाते.

टॅग्स :Waterपाणी