शहरं
Join us  
Trending Stories
1
पडघम वाजले; मात्र प्रत्यक्ष बंधुऐक्य दूरच; उद्धव ठाकरेंना हवीय इंडिया आघाडीची बैठक...
2
शिवसेना, धनुष्यबाण कुणाला मिळणार? आता फैसला महापालिका निवडणुकीपूर्वी 
3
बोइंग विमानांची इंधन लॉकिंग प्रणाली तपासा; अहमदाबाद विमान अपघाताच्या प्राथमिक अहवालानंतर डीजीसीएची सूचना
4
दूध उत्पादक शेतकऱ्यांवर अमेरिकी संकट; दर घसरण्याची शक्यता
5
डम्पिंगप्रकरणी ठाणे पालिकेला १० कोटी दंड; महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाची कारवाई
6
पशुपती राजू गोव्याचे तर असीमकुमार घोष हरयाणाचे राज्यपाल
7
निवडणुकीआधी हत्यांमध्ये वाढ; बिहार हादरले, पोलिसांचा दावा काय...
8
नागरिकांना भाषण, अभिव्यक्ती स्वातंत्र्याची किंमत माहीत असायला हवी : सर्वोच्च न्यायालय
9
गुप्तपणे केलेले फोन रेकॉर्डिंग घटस्फोटाच्या खटल्यात कायदेशीर पुरावा मानता येईल
10
‘मोसाद’चे धाडसी ऑपरेशन्स आणि त्याची खासियत काय?
11
इंजिनिअरिंगच्या प्रवेशासाठी यंदा विक्रमी विद्यार्थी नोंदणी 
12
मुंबईकरांच्या स्वप्नातील मोठ्या घराचे स्वप्न साकारणार : मुख्यमंत्री
13
राज्यात १० ऑटोमेटेड ड्रायव्हिंग टेस्ट ट्रॅक
14
डोंबिवली: पैशाच्या हव्यासापायी 'हॉटेल अटेंडंट' बनला सोनसाखळी चोर; रामनगर पोलिसांनी मुसक्या आवळल्या !
15
नागपूर: नंदीग्राम एक्सप्रेसमधून पिंपळखुटी रेल्वे स्थानकाजवळ धूर; मोठा अनर्थ टळला...
16
सर्व विमानांचे फ्युएल कंट्रोल स्विच तपासा; एअर इंडिया अपघातानंतर डीजीसीआयने कंपन्यांना दिले महत्त्वाचे आदेश
17
'त्या' तरुणींची छांगूरच्या तावडीतून सुटका करून, त्यांना पुन्हा हिंदू बनवणाऱ्या गोपाल राय यांना जीवे मारण्याची धमकी; केली सुरक्षेची मागणी
18
"दोन हाणा पण मला नेता म्हणा' अशी त्यांची अवस्था"; भाजपा आमदार शिवाजी पाटलांचा खोचक टोला
19
कॅनडात इस्कॉनच्या रथयात्रेवर फेकली अंडी; परराष्ट्र मंत्रालयाने केली कॅनेडियन सरकारकडे कारवाईची मागणी
20
IND vs ENG : बुमराहनं ७ महिन्यांनी उघडलं खातं! १ तास ४० मिनिटे केली बॅटिंग

आता नजरा ‘रॅँकिंग’कडे

By admin | Updated: February 1, 2017 00:31 IST

शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून

शहर स्वच्छता सर्वेक्षण : रॅँकिंगवरून कळणार शहराची स्थिती कपिल केकत ल्ल गोंदिया शहरातील स्वच्छता विषयक काय सोयी उपलब्ध आहेत व शहरवासीयांना आणखी काय हवे आहे हे जाणून घेण्यासाठी शहरात १७ ते १९ जानेवारी दरम्यान स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून हे सर्वेक्षण करण्यात आले असून यात पाच घटकांवर आधारीत प्रश्नावलीत नोंद घेण्यात आली. आता या नोंदींवरून शहराचे ‘रँकींग’ केले जाणार असून त्या आधारे आपले शहर राज्यात कोणत्या स्थानावर आहे हे कळणार. त्यामुळे आता नगर परिषदेच्या नजरा स्वच्छता सर्वेक्षणाच्या या ‘रँकींग’कडे लागल्या आहेत. अवघ्या देशाला स्वच्छ व सुंदर बनविण्यासाठी केंद्र शासनाकडून स्वच्छता मिशन राबविले जात आहेत. त्यातंर्गत टप्याटप्याने काही ना काही नवनवे प्रयोग करून देशवासीयांत स्वच्छतेबाबत जागरूकता आणण्याचे शासनाचे प्रयत्न आहेत. प्रत्येक व्यक्ती स्वच्छतेप्रती आपली जबाबदारी जाणून घेतल्याशिवाय शासनाचे हे प्रयत्न फलितास येणार नाहीत. त्यामुळे देशवासीयांना जागरूक करून त्यांचा सहभाग मिळवून घेण्यासाठी ही सर्व खटाटोप सुरू आहे. यात नागरिकांना काय हवे आहे हे सुद्धा जाणून घेणे तेवढेच गरजेचे आहे. यातूनच केंद्र शासनाच्या गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून राज्यात स्वच्छता सर्वेक्षण हा प्रयोग केला गेला व त्यात ४४ शहरांची निवड करण्यात आली आहे. विशेष म्हणजे स्वच्छता सर्वेक्षणाचा हा दुसरा टप्पा होता व त्यात १७ ते १९ जानेवारी दरम्यान कमलेश मिशाद व अंजन यादव यांनी शहराचे सर्वेक्षण केले. या सर्वेक्षणांतर्गत गुणवत्ता नियंत्रण विभागाने नगर परिषदेकडून शहरातील संपूर्ण स्थिती जाणून घेत तशी माहिती मागवून घेतली होती. या माहितीच्या आधारे विभागाकडून मिशाद यांना सूचना दिल्या जात होत्या व त्यानुसार मिशाद यांनी शहरातील विविध ठिकाणांची पाहणी केली. तर यादव यांनी त्यांना देण्यात आलेल्या प्रश्नावलीत विविध घटकांची नोंद करून त्याचे पुरावे नगर परिषदेकडून घेतले. विशेष म्हणजे अशाच प्रकारे अन्य शहरांतही विभागाच्या पथकाकडून सर्वेक्षण करण्यात आले आहे. पथकाकडून करण्यात आलेल्या पाहणी व प्रश्नावलीतील नोंदी व पुराव्यांच्या आधारावर आता शहराचे ‘रँकींग’ केले जाणार आहे. या ‘रँकींग’वरूनच आपले शहर राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे व आपण कोणत्या घटकात मागे असून कोणत्या घटकात शहराची काय स्थिती आहे हे कळणार आहे. त्यामुळे आता सर्वांच्या नजरा ‘रँकींग’कडे लागल्या आहेत. या घटकांवर होते प्रश्न ४गुणवत्ता नियंत्रण विभागाकडून देण्यात आलेल्या प्रश्नावलीत पाच घटकांवर आधारीत प्रश्नांचा समावेश होता व एकूण २०० गुणांची ही प्रश्नावली होती. यात घन कचरा व्यवस्थापन, घन कचरा प्रक्रीया व विल्हेवाट, वैयक्तीक व उघड्यावरील शौच, क्षमता बांधणी व प्रचार-प्रसार या पाच घटकांवर आधारीत प्रश्न होते. पथकाने या सर्व घटकांची प्रत्यक्ष पाहणी केली तसेच प्रश्नावलीत तशा नोंदी केल्या. एवढेच नव्हे तर यासाठी नगर परिषदेकडे असलेले पुरावे सुद्धा पथकाने घेतले. ही संपूर्ण माहिती व पुरावे पथक आपल्या सोबत घेऊन गेले आहे व त्याआधारे आता शहराला किती गुण मिळतात यावरच त्या शहराची ‘रँकींग’ केली जाणार आहे. ‘रँकिंग’चा असा होणार फायदा ४विभागाकडून देण्यात आलेल्या पाच घटकांच्या प्रश्नावलीच्या आधारे शहराची ‘रँकींग’ केली जाणार आहे. यावरून आपले शहर राज्यात कोणत्या क्रमांकावर आहे हे कळणार आहे. शिवाय पाच घटकांमधील कोणत्या घटकात किती गुण मिळाले व कोणत्या घटकात शहर माघारले हे सुद्धा कळणार आहे. तर कमी गुण असलेल्या घटकांच्या पुर्ततेसाठी शासनाकडून पुढे निधी दिला जाणार असल्याची माहिती आहे. एकंदर या स्वच्छता सर्वेक्षणातून शहराला कोणत्या घटकात आणखी कार्य करण्याची गरज आहे हे स्पष्ट होणार आहे.