शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुणाचा बाप आला... बापाचा बाप आला... आजोबा आला तरी मुंबई...", CM देवेंद्र फडणवीसांनी ठणकावलं
2
बौद्ध भिक्षूंचे 80 हजारहून अधिक अश्लील फोटो-व्हिडिओ; ब्लॅकमेल करून थायलंडमधील महिलेनं कमावले 102 कोटी
3
कॅनडामध्ये विमान हायजॅक! अधिकाऱ्यांमध्ये घबराट; मागून पाठवले F-35 लढाऊ विमान पण...
4
"CM फडणवीसांनी ४० फोन केले पण..."; ठाकरेंनी मतांची माती केली म्हणत एकनाथ शिंदेंनी सगळचं काढलं
5
गोपिचंद पडळकर यांच्या मागणीला मोठं यश, रायगडाजवळील निजामपूर ग्रामपंचायतीचं नाव बदललं
6
"इन्स्टावर ४ लाख फॉलोअर्स पण गावात ४ लोकांनाही..."; गावकऱ्यांनी केली 'त्या' दोघींची पोलखोल
7
'मै हूँ ना'मध्ये होती 'ही' मराठी अभिनेत्री, तिचं नृत्य पाहून शाहरुख खानही झालेला अवाक
8
नितेश राणे यांना मुस्लीम संघटनेने पाठवला कुरानचा मराठी अनुवाद; मुफ्ती फाजिल म्हणाले, 'आपकी क्या औकात है...!'
9
'तो डान्सबार योगेश कदमांच्या आईच्या नावावर'; अनिल परबांचा सभागृहात गंभीर आरोप
10
जयंत पाटील भाजपमध्ये प्रवेश करणार?; CM फडणवीस विधानसभेतच बोलले, म्हणाले, 'हे कठीणच झालंय'
11
इंडिया आघाडीला मोठा धक्का, बड्या पक्षाने सोडली साथ, विरोधी पक्षांचं ऐक्य कमकुवत होणार?  
12
इशान किशनला टीम इंडियापाठोपाठ आणखी एका संघातूनही डच्चू मिळण्याची शक्यता
13
बाजार गडगडला! एकाच दिवसात गुंतवणूकदारांचे २.५७ लाख कोटी बुडाले, फक्त 'हे' ५ शेअर्स वाढले
14
चीनकडून कोण चोरतंय रेअर अर्थ मेटल? का उडालीये ड्रॅगनची झोप, काय आहे प्रकरण?
15
आरोग्याशी नको खेळ! मीठापासून साखरेपर्यंत... 'या' पांढऱ्या गोष्टी तुमच्यासाठी ठरू शकतात विष
16
"पटोलेंनी उल्लेख केलेली व्यक्ती काँग्रेसचीच"; हनी ट्रॅपची कुठलीही तक्रार नसल्याचे CM फडणवीसांचे स्पष्टीकरण
17
"ये लातों के भूत हैं, बातों से मानेंगे नहीं...!"; मोहरम आणि श्रावणाचा उल्लेख करत मुख्यमंत्री योगींचं मोठं विधान
18
"विधानसभेतील राडा हा जाणीवपूर्वक दहशत निर्माण करण्याचा प्रकार’’, बाळासाहेब थोरात यांची टीका 
19
"जितेंद्र आव्हाड राजकारणातून बाहेर पडले तर मला आवडेल, कारण...", पत्नी ऋता नेमकं काय म्हणाल्या?
20
सोन्या-चांदीच्या दरात मोठा बदल, १० ग्रॅमसाठी किती खर्च करावा लागणार; चांदीत ₹१३०० ची तेजी

चारचाकी लावण्यासाठी जागा पुरेना, दुकानसमोरील पार्किंगमुळे अपघातास आमंत्रण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 17, 2021 04:35 IST

गोंदिया : शहरातील लोकसंख्येसह वाहनांच्या संख्येतसुद्धा भर पडत आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य ...

गोंदिया : शहरातील लोकसंख्येसह वाहनांच्या संख्येतसुद्धा भर पडत आहे. त्यामुळे वाहने ठेवण्यासाठी जागा अपुरी पडत आहे. त्यामुळे शहरातील मुख्य रस्त्यांच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने वाहतुकीची कोंडी होत आहे. त्यामुळे शहरातील अपघातांच्या संख्येतसुद्धा वाढ झाली आहे. नगर परिषदेने शहरातील मुख्य रस्त्यांचे सिमेंटीकरण करून त्यांचे रुंदीकरण केले. मात्र, गोरेलाल चौक, दुर्गा चौक, श्री टॉकीज चौक, चांदणी चौक, गांधी चौक, नेहरू चौक या परिसरातील दुकानांसमोर रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी केली जात असल्याने या भागात नेहमीच वाहतुकीची कोंडी होते. दुर्गा चौकाकडे जाणाऱ्या मुख्य रस्त्यावर काही वाहनमालक आपली चारचाकी वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवतात. त्यामुळे या मार्गावरून वाहने काढताना मोठी कसरत करावी लागते. यावर तोडगा काढण्यासाठी नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभागाने अनेकदा प्रयत्न केला; पण त्यांना अद्यापही यश आलेले नाही. शहराची लोकसंख्या दीड लाखावर असून, दुचाकी वाहने ६५२७६, तर चारचाकी वाहनांची संख्या ३५४७६ आहे. दुचाकी आणि चारचाकी वाहनांच्या संख्येतसुद्धा दरवर्षी भर पडत आहे. मात्र, त्या तुलनेत रस्त्यांची रुंदी वाढत नसल्याने वाहतुकीच्या कोंडीची समस्या कायम आहे. शहरातील अनेक नागरिकांनी चारचाकी वाहने खरेदी केली आहेत; पण ती वाहने ठेवण्यासाठी जागा नसल्याने ते सर्रासपणे आपली वाहने रस्त्याच्या दुतर्फा उभी करून ठेवतात. तर शहरातील बाजारपेठेतील रस्त्यांची सुद्धा हीच अवस्था आहे. रस्त्याच्या दुतर्फा दुकानासमोर वाहने उभी करून ठेवली जात आहेत. त्यामुळे वाहतुकीची कोंडी हाेऊन अपघातांच्या संख्येत वाढ होत आहे.

.......

गोरेलाल चौक, दुर्गा चौक परिसरात सर्वाधिक कोंडी

शहरातील मुख्य बाजारपेठ असलेल्या गोरेलाल चौक, दुर्गा चौक, रेल्वे स्टेशन या भागात सातत्याने वाहनांची वर्दळ असते. मात्र, याच भागात वाहन पार्किंगची सर्वाधिक समस्या आहे. रस्त्याच्या दुतर्फा वाहने उभी करून ठेवली जातात, तर काही चारचाकी वाहन मालक आपली वाहने रस्त्याच्या कडेला उभी करून ठेवतात. त्यामुळे रस्ते अरुंद होऊन वाहतुकीची कोंडी होते. यामुळे वाहन चालक व शहरवासीय सुद्धा त्रस्त झाले आहेत; पण यावर तोडगा काढण्यात नगर परिषद आणि वाहतूक नियंत्रण विभाग अपयशी झाले आहे.

.....

वन-वे पार्किंगचा प्रयोग फसला

शहरातील वाहतुकीची कोंडी सोडविण्यासाठी सम-विषय व वन-वे पार्किंगचा प्रयोग राबविला. मात्र, हा प्रयोगसुद्धा जास्त दिवस टिकू शकला नाही. रस्त्यावर वाहने उभे करणाऱ्यांवर वाहतूक नियंत्रण विभागाने दंडात्मक कारवाई केली, तर काहीजणांची वाहनेसुद्धा जप्त केली; पण या मोहिमेतसुद्धा सातत्य न ठेवल्याने पुन्हा जैसे थे चित्र निर्माण झाले आहे. वन-वे पार्किंग आणि सम-विषम पार्किंग दिवसाचा प्रयोगसुद्धा फसला आहे.

......

कारवाई करण्याचा अधिकार, पण अंमलबजावणी करणार कोण?

रस्त्यावर वाहने उभे केल्यास वाहनचालकांवर कलम १२२ अतंर्गत वाहतूक नियंत्रण पोलिसांना कारवाई करण्याचा अधिकार आहे; पण याची अंमलबजावणी करणार कोण असा सवाल आहे. वाहतूक नियंत्रण शाखेतर्फे शहरात अधूनमधून यासाठी मोहीम राबविली जाते; पण त्यानंतर पुन्हा याकडे दुर्लक्ष केले जात असल्याने समस्या कायम आहे.

.....

शहराची एकूण लोकसंख्या

१ लाख ५० हजार २५२

दुचाकींची संख्या

६५,२३४

चारचाकी वाहनांची संख्या

४२,३४६

........