शहरं
Join us  
Trending Stories
1
देशात 'अल-कायदा'चे स्लीपर सेल? NIAने ५ राज्यांत १० ठिकाणी छापे टाकले; गुजरात कनेक्शनमुळे खळबळ
2
मोदी सरकारने दिल्ली स्फोटाला दहशतवादी घटना मानले; चौकशीचे दिले आदेश
3
डोक्यात गोळी झाडून मित्रांकडून व्यावसायिकाचा खून; दिघी पोलीस ठाण्याच्या हद्दीत वडमुखवाडी येथील घटना
4
Delhi Blast: दिल्ली स्फोटमध्ये वापरलेल्या कारमध्ये आणखी दोन जण दिसले होते, पोलिसांना ओळख पटली; कारवाईला वेग
5
Video : ज्या लाल 'इकोस्पोर्ट'चा शोध घेतला जात होता, ती सापडली! उमर नबीबद्दलही झाला मोठा खुलासा
6
१५ लाखांची लाच स्विकारताच न्यायाधीशांना कॉल अन्... न्याय देणारे न्यायाधीशच अडकले लाच प्रकरणात!
7
राहुल बनून खुशबूला भुलवलं, लग्न करण्यासाठी धर्म बदलण्याचा दबाव टाकला! कासिमने अखेर तोंड उघडलं
8
देसी गर्ल इज बॅक! 'ग्लोबेट्रोटर'मध्ये 'मंदाकिनी'च्या भूमिकेत प्रियंका चोप्रा, फर्स्ट लूक पाहून चाहते थक्क
9
IPL 2026 Trade Deal : अर्जुन तेंडुलकर मुंबई इंडियन्स संघातून OUT? 'ऑल कॅश ट्रान्सफर डील' चर्चेत
10
‘डिजिटल अरेस्ट’च्या नावाखाली पावणेतीन कोटींची फसवणूक; सहा संशयिताना बेड्या
11
Delhi Blast : ६ डिसेंबरला मोठ्या हल्ल्याची होती तयारी, पण १० नोव्हेंबरला झाला स्फोट; 'डॉक्टर ऑफ टेरर'चा भयानक कट असा झाला अयशस्वी
12
तुम्ही मित्र-मैत्रिणींशी बोलता अन् लगेच त्याच संदर्भात जाहिराती दिसू लागतात; खरंच तुमचा फोन तुमचं बोलणं ऐकतो?
13
धक्कादायक! झिरकपूर उड्डाणपुलावर 'VIP' एस्कॉर्टचा अहंकार; कारने निवृत्त लेफ्टनंट जनरलच्या गाडीला ठोकले, तसेच पळाले...
14
बिहारमध्ये लेट आला पण...! ॲक्सिस माय इंडियाने सांगितले 'तीव्र जातीय ध्रुवीकरण', मतांमध्ये एवढाच फरक...
15
Ratnagiri: 'माझ्या पत्नीला भुताने नेऊन मारले,' पतीचा कट पडला उघडा, न्यायालयाने दिली मोठी शिक्षा
16
लग्नातच झाली बैठक, डॉ. आदिल राठर कसा सापडला, त्याच्या काय होती जबाबदारी? इनसाईड स्टोरी
17
"धनंजय मुंडेंना चौकशीला आणा! नाहीतर महागात पडेल!" जरांगेंचा अजित पवारांना थेट इशारा
18
Bihar Exit Poll : 'बिहार'मधील मागील निवडणुकीतील एक्झिट पोल खरे ठरले? काय होते अंदाज, काय होता निकाल, जाणून घ्या
19
दिल्ली बॉम्बस्फोट प्रकरणात नवा ट्विस्ट, 'i20 कार'सोबत आणखी एक लाल कार होती ? चेकपोस्ट अलर्टवर
20
तीन मुलांची आई प्रेमात पडली, बॉयफ्रेंडला म्हणाली 'माझ्या नवऱ्याला गोळ्या घाल'; मग पुढे जे झालं...

शाळांमधून एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शहराप्रमाणे ग्रामीण भागातीलसुद्धा शाळा-महाविद्यालय घाबरत-घाबरत कोरोना संसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्या आहेत. आता १० दिवसांचा कालावधी लोटला असून एकही विद्यार्थी शाळांमधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. यामुळे कोरोनाला हरविण्यात शाळा प्रशासनासह शिक्षक यशस्वी ठरले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने लॉकडाऊन शिथिल करून शिक्षणाची दारे उघडी करण्याचा निर्धार घेतला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासह आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी वर्गासह शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे या आदिवासी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत पूर्ण आवश्यक सोयीसुविधांसह शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. विज्ञान, गणित व इंग्रजी हे विषय शिकविण्यासाठी अधिक भर दिल्यामुळे या विषयाच्या शिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख लक्षात घेता दहशत कायम असून अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के दिसून येत नाही. मात्र, शाळा सुरू होऊन १० दिवसांचा कालावधी संपला असून शाळांमधून एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे शाळा प्रशासनासह मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरदिवशी थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने होत असल्याने शिक्षक कोरोना हटविण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गात फक्त तीन विषयांची शिकवणी होत असून एका विद्यार्थ्यांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. एकत्र जेवण व खेळांना मनाई आणि पहिल्या दिवसापासून कोरोना नियमावलीचे पालन करण्याविषयी दररोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मास्कचा वापर इत्यादी गोष्टी कोरोनाला हरविण्यात कारणीभूत ठरल्या आहेत, हे विशेष.