शहरं
Join us  
Trending Stories
1
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
2
‘मोदी-योगी आणि इतरांची नावे घेण्यास भाग पाडले’; साध्वी प्रज्ञा ठाकूर यांचे एटीएसवर गंभीर आरोप
3
राज्यमंत्री मेघना बोर्डीकर पुन्हा वादात; भर सभेत ग्रामसेवकाला कानाखाली मारण्याची भाषा
4
भरधाव बोलेरो कालव्यात कोसळली; ११ जणांचा गाडीतच मृत्यू, बाहेर येण्यासाठी धडपडत राहिले
5
मैदानावर विराट, व्यवसायात विकास! विराट कोहलीच्या १०५० कोटींच्या साम्राज्याचा 'हा' आहे खरा हिरो!
6
'पाकिस्तानात नाही, तर बलुचिस्तानमध्ये तेल सापडले', बलोच नेत्याचे डोनाल्ड ट्रम्प यांना पत्र
7
भारती सिंगने सर्वांसमोर जाळली महागडी 'लाबूबू डॉल'! कारणही सांगितलं, म्हणाली- "माझा छोट्या मुलाला.."
8
पायी जाणाऱ्या दोघांना भरधाव कारने उडविले, दोघांचा जागीच मृत्यू; छत्रपती संभाजीनगरमधील घटना
9
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
10
खुशखबर! रक्षाबंधनपूर्वी RBI देणार मोठी भेट? कर्ज घेणाऱ्यांना दिलासा, तुमचा EMI होणार स्वस्त?
11
जिभेचे चोचले पडतील महागात! अल्ट्रा-प्रोसेस्ड फूडमुळे फुफ्फुसांच्या कॅन्सरचा धोका, रिसर्चमध्ये खुलासा
12
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
13
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचे नागपुरातील घर उडविण्याची धमकी, निनावी कॉलने सुरक्षायंत्रणांची धावपळ
14
सामाजिक न्याय विभागाचे ४१० कोटी लाडक्या बहिणींसाठी वळते : खोब्रागडे
15
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
16
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
17
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
18
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
19
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
20
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या

शाळांमधून एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शहराप्रमाणे ग्रामीण भागातीलसुद्धा शाळा-महाविद्यालय घाबरत-घाबरत कोरोना संसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्या आहेत. आता १० दिवसांचा कालावधी लोटला असून एकही विद्यार्थी शाळांमधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. यामुळे कोरोनाला हरविण्यात शाळा प्रशासनासह शिक्षक यशस्वी ठरले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने लॉकडाऊन शिथिल करून शिक्षणाची दारे उघडी करण्याचा निर्धार घेतला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासह आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी वर्गासह शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे या आदिवासी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत पूर्ण आवश्यक सोयीसुविधांसह शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. विज्ञान, गणित व इंग्रजी हे विषय शिकविण्यासाठी अधिक भर दिल्यामुळे या विषयाच्या शिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख लक्षात घेता दहशत कायम असून अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के दिसून येत नाही. मात्र, शाळा सुरू होऊन १० दिवसांचा कालावधी संपला असून शाळांमधून एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे शाळा प्रशासनासह मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरदिवशी थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने होत असल्याने शिक्षक कोरोना हटविण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गात फक्त तीन विषयांची शिकवणी होत असून एका विद्यार्थ्यांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. एकत्र जेवण व खेळांना मनाई आणि पहिल्या दिवसापासून कोरोना नियमावलीचे पालन करण्याविषयी दररोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मास्कचा वापर इत्यादी गोष्टी कोरोनाला हरविण्यात कारणीभूत ठरल्या आहेत, हे विशेष.