शहरं
Join us  
Trending Stories
1
भाजप-संघातील घटक नाराज; म्हणे, ‘ऑपरेशन सिंदूर’नंतरचा युद्धविराम ही तर चूक, शत्रुत्व थांबले
2
शूरवीरांचा देश आहे, असा संदेश पाकला देणे आवश्यक होते; RSSचे सुनील अंबेकर यांचे प्रतिपादन
3
कर्नल सोफियांवर टीका भोवली, मंत्री विजय शाहवर FIR; हायकोर्टाने फटकारले, रात्री गुन्हा दाखल
4
न्या. भूषण गवई देशाचे ५२वे सरन्यायाधीश; अनेक महत्त्वपूर्ण निर्णय देणाऱ्या पीठांमध्ये सहभाग
5
अनामिक भीती वाटते, अस्थिर मन शांत होत नाही? कळकळीने स्वामींना हाक मारा, ‘ही’ प्रार्थना कराच
6
ब्रह्मोस अण्वस्त्रांच्या डेपोवर आदळले असते तर काय झाले असते? किती मोठा स्फोट झाला असता?
7
महिला राफेल उडवू शकतात, तर लष्करात त्यांची संख्या मर्यादित का? सुप्रीम कोर्टाचा सरकारला सवाल
8
गरिबांच्या सेवेमुळे माझ्या मुलाला हे पद मिळाले; सरन्यायाधीश गवई यांच्या मातोश्री भावुक
9
२१ दिवसांत ३१ माओवादी यमसदनी; छत्तीसगड-तेलंगणा सीमेवर कारवाईला मोठे यश
10
पाकने २१ दिवसांनी BSF जवानाला भारताच्या ताब्यात दिले; वडील म्हणाले, मुलाची गळाभेट घ्यायची आहे
11
डोनाल्ड ट्रम्प यांचा पाचव्यांदा दावा; म्हणाले, “होय, भारत-पाकमधील युद्ध अमेरिकेनेच संपविले”
12
२०२७ पासून मेट्रोचा मार्ग वेगाने विस्तारेल: मुख्यमंत्री; काशीगाव-दहिसरदरम्यान तांत्रिक चाचणी
13
शरद पवार गटाच्या बैठकीत स्थानिक निवडणुकांवर चर्चा; नेमके काय घडले, कोणता निर्णय झाला?
14
‘लाडक्या बहिणी’च्या नावे खाती उघडून सायबर भामट्यांना ३० हजारांत विक्री; तिघे अटकेत
15
पावसाळी शेडसाठी जैन मंदिर हायकोर्टात; ट्रस्टला महापालिकेकडे निवेदन देण्याचे निर्देश
16
‘सोडूनी सारी लाज, क्यूआर कोडने घेतली लाच’; दोन पोलिस अन् एका खबऱ्याला अटक, नेमके प्रकरण काय?
17
नागरी संरक्षण दलाच्या मानधन प्रस्तावास वित्त विभागाचा अडसर; काही त्रुटी काढून घातला खोडा
18
जम्मू काश्मीरमध्ये सैन्याच्या गणवेशात दिसले काही संशयित; महिलेची पोलिसांत धाव, शोधमोहीम सुरू
19
भारत लष्करी-राजनैतिक दोन्ही पातळीवर जिंकला; अमेरिकेच्या माजी अधिकाऱ्यांनी पाकला जागा दाखवली
20
तुर्कस्तानचा पाकला पाठिंबा, JNUचा मोठा निर्णय; तुर्की विद्यापीठाबरोबचा करार केला रद्द

शाळांमधून एकही विद्यार्थी पॉझिटिव्ह नाही

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 7, 2021 04:27 IST

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या ...

केशोरी : महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने राज्यातील नववी ते बारावी वर्गापर्यंतचे शाळा-महाविद्यालय २३ नोव्हेंबरपासून तर पाचवी ते आठवीपर्यंतच्या शाळा २७ जानेवारीपासून सुरू करण्याचे आदेश दिले. त्यानुसार, शहराप्रमाणे ग्रामीण भागातीलसुद्धा शाळा-महाविद्यालय घाबरत-घाबरत कोरोना संसर्गाच्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत शाळा सुरू झाल्या आहेत. आता १० दिवसांचा कालावधी लोटला असून एकही विद्यार्थी शाळांमधून कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. यामुळे कोरोनाला हरविण्यात शाळा प्रशासनासह शिक्षक यशस्वी ठरले आहेत, असे म्हणणे वावगे ठरणार नाही.

कोरोना विषाणूचा संसर्ग कमी झाल्याने शासनाने लॉकडाऊन शिथिल करून शिक्षणाची दारे उघडी करण्याचा निर्धार घेतला. २३ नोव्हेंबरपासून नववी ते बारावीपर्यंतच्या वर्गासह आणि २७ जानेवारीपासून पाचवी ते आठवी वर्गासह शाळा-महाविद्यालय सुरू करण्याचे आदेश दिले. त्याचप्रमाणे या आदिवासी व ग्रामीण भागातील शाळा नियमित सुरू झाल्या आहेत. शासनाने वेळोवेळी कोरोना संसर्ग रोखण्यासाठी घालून दिलेल्या नियमांचे काटेकोरपणे पालन करत पूर्ण आवश्यक सोयीसुविधांसह शाळा-महाविद्यालये सुरू करण्यात आले आहेत. विज्ञान, गणित व इंग्रजी हे विषय शिकविण्यासाठी अधिक भर दिल्यामुळे या विषयाच्या शिक्षणामुळे विद्यार्थी समाधान व्यक्त करीत आहेत.

सध्या जिल्ह्यातील कोरोनाचा आलेख लक्षात घेता दहशत कायम असून अजूनही विद्यार्थ्यांची उपस्थिती १०० टक्के दिसून येत नाही. मात्र, शाळा सुरू होऊन १० दिवसांचा कालावधी संपला असून शाळांमधून एकही विद्यार्थी कोरोना पॉझिटिव्ह आढळून आलेला नाही. त्यामुळे शाळा प्रशासनासह मुख्याध्यापक, प्राध्यापक व शिक्षकांनी सुटकेचा नि:श्वास सोडला आहे. दरदिवशी थर्मल स्क्रिनिंग व ऑक्सिजन तपासणी प्राधान्याने होत असल्याने शिक्षक कोरोना हटविण्यात यशस्वी ठरले आहेत. वर्गात फक्त तीन विषयांची शिकवणी होत असून एका विद्यार्थ्यांमध्ये किमान तीन फुटांचे अंतर ठेवून बैठक व्यवस्था केली आहे. एकत्र जेवण व खेळांना मनाई आणि पहिल्या दिवसापासून कोरोना नियमावलीचे पालन करण्याविषयी दररोज विद्यार्थ्यांना मार्गदर्शन, मास्कचा वापर इत्यादी गोष्टी कोरोनाला हरविण्यात कारणीभूत ठरल्या आहेत, हे विशेष.