शहरं
Join us  
Trending Stories
1
T20 World Cup: त्यावेळीच ठरलेलं Shubman Gill संघाबाहेर जाणार; टीम सिलेक्शनची Inside Story
2
नवी मुंबई: संजय नाईक पुन्हा 'भाजपावासी'; मुख्यमंत्री, प्रदेशाध्यक्षांची भेट घेत 'घरवापसी'
3
दाट धुक्यामुळे दिल्ली विमानतळाचे वेळापत्रक विस्कळीत, १३८ विमान उड्डाणे रद्द, श्रीनगरलाही फटका
4
"सत्ता आणि सामर्थ्य याचा अर्थ आता बदलला आहे..."; जागतिक अशांततेवर जयशंकर यांचे मोठे विधान
5
संरक्षण मंत्रालयात खळबळ; लेफ्टनंट कर्नल दीपक शर्मा यांना लाच घेताना सीबीआयने पकडले; घरात सापडले २ कोटींहून अधिक रोख
6
मीरा भाईंदर: "...त्यातूनच लाडकी बहीण योजनेचा जन्म झाला"; एकनाथ शिंदे यांनी सांगितली कहाणी
7
अमेरिकेचं ‘ऑपरेशन हॉकआय स्ट्राइक’, इस्लामिक स्टेटच्या 70 ठिकाणांवर US चे मोठे हल्ले; प्रकरण काय?
8
"नीतीश वडिलांप्रमाणे, बाप-लेकीत..."; बिहार 'नकाब' वादावर राज्यपाल आरिफ मोहम्मद खान स्पष्टच बोलले
9
Ishan Kishan इतके दिवस टीम इंडियात का नव्हता? 'त्या' दोघांची नावं घेत आगरकरने दिलं उत्तर
10
१५०हून जास्त कॉम्प्युटर्स लुटले, कँटीनची तोडफोड; बांगलादेशात जमावाचा मीडिया हाऊसवर हल्ला
11
आर्थिक निकषावरील आरक्षणाची बुलंद तोफ थंडावली; डॉ. शालिनीताई पाटील यांचे ९४ व्या वर्षी निधन
12
मुंबईप्रमाणे सर्व मनपात काँग्रेस स्वबळावर लढणार की महाविकास आघाडीत? रमेश चेन्नीथला म्हणाले…
13
"आसामला 'पूर्व पाकिस्तान'चा भाग बनवण्याचा कट...!"; पंतप्रधान मोदींचा गुवाहाटीतून काँग्रेसवर मोठा हल्ला 
14
७०० वर्षांनी शनिचे ३ नवपंचम योग, २०२६ करणार भरभराट; ७ राशींना अकल्पनीय लाभ, चौपट कमाई-पैसा अन्…
15
मुंबईत भाजप आमदाराचा राडा; चुकीच्या दिशेने येणाऱ्या रिक्षाचालकाला भररस्त्यात कानाखाली मारली; व्हिडिओ व्हायरल
16
“भ्रष्ट महायुती सरकार विरोधात काँग्रेसचा वैचारिक लढा, मनपा निवडणुकीत...”: हर्षवर्धन सपकाळ
17
BMC Elections : "मुंबई महानगरपालिका निवडणूक स्वबळावर लढणार!"; काँग्रेसची मोठी घोषणा, केले गंभीर आरोप
18
"जोवर बांगलादेश अस्तित्वात आहे, तोवर..."; हादी यांच्या अंत्यसंस्कारावेळी युनूस यांचे विधान
19
“मनरेगा योजनेवर सरकारने बुलडोजर चालवला, आम्ही लढणार, २० वर्षांपूर्वी…”; सोनिया गांधींची टीका
20
'त्या' प्रश्नावर सूर्याची बोलतीच बंद! सर्वांसमोर मुख्य निवडकर्ते आगरकरांना म्हणाला; "तुम्हीच सांगा"
Daily Top 2Weekly Top 5

३०६६ कामांपैकी एकही काम सुरू नाही

By admin | Updated: May 16, 2016 01:55 IST

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

दीड महिना लोटला : ७७ गावांसाठी २०७० कामे प्रस्तावित नरेश रहिले  गोंदियाभूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु दुसऱ्या टप्प्यातील एकही काम सुरू न झाल्यामुळे जलयुक्त शिवारची अंमलबजावणी कशी होते याचा प्रयत्य नागरिकांना येत आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी लोटला मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे एकही काम सुरू झाले नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ साठी ७७ गावांचा समावेश करण्यात आला. मंजूर, प्रस्तावित व दुरूस्ती अशा ३०६६ कामांसाठी ९६ कोटी ३५ लाख ८० हजार रूपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले. यात ७१६ काम मंजूर करण्यात आले. सदर कामांवर २६ कोटी ३३ लाख ४७ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. यात कृषी विभागाच्या २८८ कामांवर ७ कोटी ४३ लाख ९२ हजार, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या ३० कामांवर ३ कोटी ६७ लाख १३ हजार, पंचायत समितीच्या ३९५ कामांवर १४ कोटी ६९ लाख ८१ हजार, जलसंधारणच्या ३ कामावर ५२ लाख ६१ हजार खर्च करण्यात येणार आहे. प्रस्तावित २०७० नवीन कामांवर ५७ कोटी ९६ लाख ९३ हजार खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. यात कृषि विभागाचे १३९१ कामांसाठी ३१ कोटी ०९ लाख ३१ हजार, लघु सिंचन विभागाच्या २० कामांसाठी ३ कोटी २३ लाख ५० हजार, लघु सिंचन जलसंधारणाच्या २५ कामासाठी ६ कोटी २४ लाख ३२ हजार, वन विभागाच्या ६३४ कामासाठी १७ कोटी ३९ लाख ८० हजार रूपये देण्याचे ठरले. आता दुसऱ्या टप्याची कामे पावसाळ्यानंतर होणार आहेत. त्यामुळे पावसाळ््यातील चार महिने ही कामे होणार नसून जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्प्यातील कामे कशी होतात हे बघायचे आहे.