शहरं
Join us  
Trending Stories
1
पायलटकडूनच मोठी चूक? दोन्ही इंजिनांचा इंधनपुरवठा सेकंदाच्या फरकाने झाला बंद
2
आजचे राशीभविष्य, १३ जुलै २०२५ : आज आर्थिक गुंतवणूक विचार पूर्वक करा
3
तीन वेळा पदमुक्त होण्याची इच्छा व्यक्त केलेली, जयंत पाटलांचा राजीनामा? राष्ट्रवादी, भाजप म्हणतेय...
4
म्हाडाची जाहिरात आली; ५,२८५  घरांची लॉटरी, या दिवशी होणार बुकिंगला सुरुवात...
5
शत्रूचं ड्रोन ५ लाखांचं, पाडायला लागते १० लाखांचं मिसाइल...; ब्रिगेडिअरनी सांगितला ऑपरेशन सिंदूरचा खर्च...
6
मंत्री शिरसाट म्हणाले...पैशांची एखादी बॅग देऊ, आजकल हमारा नाम बहुत चल रहा है 
7
मेक इन इंडियाचे १०वे वर्ष;  येणार १०० रुपयांचे नाणे; कोलकाता टाकसाळीमध्ये तयार होणार विशेष नाणे
8
नवी मुंबई विमानतळाला ३० सप्टेंबरची डेडलाइन; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सिडको, अदानी समूहाला निर्देश
9
खंडाळा घाटातील ‘मिसिंग लिंक’ नोव्हेंबरपर्यंत सुरू करा; मुख्यमंत्र्यांचे आदेश
10
ईडी आरोपपत्रात रोहित पवारांचे नाव; २०२४ मध्येच चौकशी
11
बूट घ्यायलाही पैसे नव्हते; चिखलात सराव केला...
12
भारतीय न्यायव्यवस्थेपुढे अनोखी आव्हाने; सरन्यायाधीश भूषण गवई यांनी व्यक्त केली खंत
13
दुर्घटनेला महिना उलटला तरी अजूनही प्रवासी, नातेवाईक धास्तावलेलेच...
14
पोलंडची इगा स्वियातेक विम्बल्डनची नवी क्वीन
15
बुमराहला रोखण्याच्या नादात इंग्लंड स्वत: अडकला जाळ्यात!
16
ड्युक्स चेंडूंची समस्या म्हणजे ‘मार पायाला आणि मलम डोक्याला!’, टिकतच नाहीय...
17
विमानतळावर येताच तपासणी; बॅगेत सापडले प्राणी-पक्षी
18
सोने आणखी किती भाव खाणार? २०११ सारखीच वाढ, कशाचे संकेत...
19
आमदार, मंत्र्यांना ठोकमध्ये नाइट ड्रेस घेऊन दिले तर..?
20
‘सीसीएमपी’वरून वैद्यकीय क्षेत्रात गोंधळ

३०६६ कामांपैकी एकही काम सुरू नाही

By admin | Updated: May 16, 2016 01:55 IST

भूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले.

दीड महिना लोटला : ७७ गावांसाठी २०७० कामे प्रस्तावित नरेश रहिले  गोंदियाभूगर्भातील पाण्याच्या पातळीत वाढ करण्यासाठी व दुष्काळाचा सामना करण्यासाठी शासनाने जलयुक्त शिवार अभियान सुरू केले. या अभियानाच्या पहिल्या टप्प्याचे उद्दिष्ट पुर्ण करण्याचे प्रयत्न सुरू आहेत. परंतु दुसऱ्या टप्प्यातील एकही काम सुरू न झाल्यामुळे जलयुक्त शिवारची अंमलबजावणी कशी होते याचा प्रयत्य नागरिकांना येत आहे. सन २०१६-१७ या आर्थिक वर्षातील दीड महिन्याचा कालावधी लोटला मात्र जलयुक्त शिवार अभियानाचे एकही काम सुरू झाले नाही.जलयुक्त शिवार अभियानांतर्गत सन २०१६-१७ साठी ७७ गावांचा समावेश करण्यात आला. मंजूर, प्रस्तावित व दुरूस्ती अशा ३०६६ कामांसाठी ९६ कोटी ३५ लाख ८० हजार रूपये खर्च करण्याचे ठरविण्यात आले. यात ७१६ काम मंजूर करण्यात आले. सदर कामांवर २६ कोटी ३३ लाख ४७ हजार रूपये खर्च करण्यात येणार आहे. यात कृषी विभागाच्या २८८ कामांवर ७ कोटी ४३ लाख ९२ हजार, जिल्हा परिषदेच्या लघु सिंचन विभागाच्या ३० कामांवर ३ कोटी ६७ लाख १३ हजार, पंचायत समितीच्या ३९५ कामांवर १४ कोटी ६९ लाख ८१ हजार, जलसंधारणच्या ३ कामावर ५२ लाख ६१ हजार खर्च करण्यात येणार आहे. प्रस्तावित २०७० नवीन कामांवर ५७ कोटी ९६ लाख ९३ हजार खर्च करण्याचे नियोजन करण्यात आले. यात कृषि विभागाचे १३९१ कामांसाठी ३१ कोटी ०९ लाख ३१ हजार, लघु सिंचन विभागाच्या २० कामांसाठी ३ कोटी २३ लाख ५० हजार, लघु सिंचन जलसंधारणाच्या २५ कामासाठी ६ कोटी २४ लाख ३२ हजार, वन विभागाच्या ६३४ कामासाठी १७ कोटी ३९ लाख ८० हजार रूपये देण्याचे ठरले. आता दुसऱ्या टप्याची कामे पावसाळ्यानंतर होणार आहेत. त्यामुळे पावसाळ््यातील चार महिने ही कामे होणार नसून जलयुक्त शिवार योजनेचा दुसरा टप्प्यातील कामे कशी होतात हे बघायचे आहे.