शहरं
Join us  
Trending Stories
1
"आमचे हात अजूनही ट्रिगरवरच आहेत", खवळलेल्या इराणची इस्रायलला खुली धमकी, लेबनाननंतर आक्रमक
2
Video: मुंबई विमानतळाच्या टर्मिनल १ मध्ये आगीचा भडका; प्रवेशद्वार बंद, धुराचे लोट बघून प्रवासी घाबरले
3
KKR vs LSG : अजिंक्य रहाणेचा भन्नाट सिक्सर! बॅट निसटली तरीही चेंडू थेट सीमारेषेबाहेर (VIDEO)
4
Pune Crime: प्रेमात सगळं विसरली अन् प्रियकराच्या मदतीने सहा वर्षांच्या लेकराची केली हत्या, कारण...; पुणे जिल्ह्यातील घटना
5
उपराष्ट्रपती जे.डी. व्हान्स यांना पाकिस्तानात जायला वाटतेय भीती; US-इराण चर्चा फिस्कटणार?
6
Latest Marathi News LIVE: मुंबई विमानतळावर लागली आग, टर्मिनल १ मधून धुराचे लोट; सर्व गेट केले बंद
7
"...तोपर्यंत आम्ही हल्ले करत राहू", इस्रायलचे पंतप्रधान नेतन्याहू यांचा इशारा; हल्ल्याचे व्हिडीओही दाखवले
8
22 वर्षाचा बॉयफ्रेंड, ३५ वर्षाची गर्लफ्रेंड; दोघे रुममध्ये गेले आणि नंतर 'बेड बॉक्स'मध्ये मिळाला तिचा मृतदेह
9
KKR vs LSG: Finn Allen खराब पंचगिरीचा शिकार? दिग्वेश राठीनं टिपलेल्या झेलवरुन वादंग (VIDEO)
10
बुलेट आली! पहिली इलेक्ट्रिक बाईक 'Flying Flea C6' लाँच; किंमत आणि फिचर्स पाहून व्हाल थक्क
11
PSL 2026 : थेट विराट कोहलीशी तुलना! मग Babar Azam चिडला; नेमकं काय घडलं?
12
रशियाच्या पाणबुड्या महिनाभर ब्रिटनच्या समुद्रात लपलेल्या, काय करत होत्या? ब्रिटीशांच्या दाव्याने खळबळ...
13
KKR vs LSG : अर्जुन तेंडुलकरची नुसतीच हवा! Playing XI मध्ये मिळाली नाही जागा; अजिंक्य रहाणेचा गेम प्लॅनही फसला
14
टी-२० सामन्यात तब्बल ९ विकेट्स, एका षटकांत ४ बळी; कधीही न तुटणारा वर्ल्ड रेकॉर्ड कुणी बनवला?
15
ट्रम्प यांच्या दाव्याने खळबळ, १०० मिसाईल...! 'शांतीदूत' म्हणवून घेणारा पाकिस्तान 'बेनकाब'; चीनचा बुरखा फाटला
16
अजबच विनोद...! अमेरिका-इराण सीजफायरनंतर पाकिस्तानची थेट 'नोबेल' शांतता पुरस्काराची मागणी
17
Fashion On Bike: बाईकवर लॉन्ग राईडचा प्लॅन आहे? फॉलो करा 'या' फॅशन टिप्स; दिसाल कूल आणि डॅशिंग!
18
“मला माफ कर, चूक झाली”; प्रेमासाठी तरुणाचा हायव्होल्टेज ड्रामा; कॉलेजच्या भिंतींवर लावले पोस्टर्स
19
सुरक्षित होर्मुझ पार केले...१५,४०० मेट्रिक टन LPG गॅस भरलेले 'ग्रीन आशा' जहाज भारतात दाखल
20
CBSE चा नवा अल्टीमेटम..! आता सहावीच्या वर्गापासून शिकावी लागणार तिसरी भाषा; काय आहे R3 नियम?
Daily Top 2Weekly Top 5

वीज नसलेली वस्ती

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: May 18, 2019 22:06 IST

नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे.

ठळक मुद्देप्रशासनाचे वेळकाढून धोरण । चौदा वर्षांपासून विजेची केवळ प्रतीक्षाच

संतोष बुकावन ।लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी मोरगाव : नवेगावबांध-कोहमारा राज्य महामार्गावर परसोडी हे गाव आहे. डोमाटोली, वडगुरेटोली, परसोडी, रामनगर, पांढरवानी रैयत, झोडेटोली, पांढरवाणी माल, चान्ना कोडका व खोली अशा ९ गाव व टोल्या मिळून परसोडी ग्रामपंचायत आहे. या ग्रामपंचायतमधील लोकसंख्या ३३४७ आहे. ग्रामपंचायत अंतर्गत गावांची विचित्र रचना आहे. सुमारे ७ कि.मी. अंतरावर असलेले चान्ना कोडका हे गाव परसोडी ग्रामपंचायतमध्ये समाविष्ट आहे. एक मात्र धक्कादायक बाब अशी आहे की, या ग्रामपंचायतमधील डोमाटोली येथे विजेची सुविधा अद्यापही नाही.२००५ चे सुमारास परसोडी या गावात संयुक्त कुटुंबातील लोकांना राहायला जागा नाही म्हणून त्यांनी पर्याय शोधला व गावाबाहेर असलेल्या एका जागेवर १३ कुटुंबीयांनी राहूट्या तयार केल्या. २००७ मध्ये प्रशासनाने हे अतिक्रमण हटविले. मात्र पूर्णनिर्धाराने २०१० मध्ये पुन्हा १३ कुटुंबीयांनी तिथे राहूट्या तयार करुन वास्तव्यास सुरुवात केली. या संपूर्ण प्रक्रियेत सुमारे १४ वर्षांचा काळ लोटला. हाल अपेष्ठा सहन करत हे कुटुंबीय येथे राहात आहे. मात्र अद्यापही येथे मुलभूत सुविधा पोहोचलेल्या नाहीत. २००५ चे पूर्वी या जागेवर पुस्तोडे नामक इसमाने शेतजमिन तयार करुन अतिक्रमण केले होते.राज्यमार्गापासून सुमारे ४०० मिटरवर ही वस्ती आहे. मात्र या वस्तीत जायला धड रस्ता नाही. माती काम होऊन कच्चा रस्ता तयार करण्यात आला. मात्र पावसाळ्यात या रस्त्याने जाता येत नाही. चिमुकली शाळकरी पोरं चिखलातून ४०० मीटर अंतर कापून राज्य मार्गावर येतात व तिथून ३ कि.मी.अंतरावरील परसोडीच्या शाळेत पोहोचतात. पावसाळ्यात या रस्त्याची अवस्था एवढी बिकट असते की वस्तीतील मोठी माणसं आपल्या दुचाकी अर्धा कि.मी.वर ठेवून पायी पायी वस्तीत पोहोचतात. म.रा.वीज वितरण विभाग नवेगावबांध कार्यालयाने सर्वेक्षण केले. वीज पुरवठ्यासाठी घर कर पावती, १०० रुपयाचा मुद्रांकपेपर व आवेदन पत्र भरुन दिले. मात्र वी पुरवठा करण्यात आला नाही. या कार्यालयात चौकशी केली तर तहसीलदाराने या वस्तीत पुरवठा करु नये असे पत्र दिल्याचे ते सांगतात. या पत्राची मागणी केली तर ते दिसत नसल्याचा देखावा निर्माण करतात, असा या वस्तीतील रहिवाशांचा आरोप आहे. १३ कुटुंबीय गेल्या १४ वर्षापासून वीज सुविधेच्या प्रतिक्षेत आहेत.मागील जि.प.निवडणुकीचे वेळी जि.प. सदस्या रचना गहाणे यांनी मुलभूत सुविधा पुरवण्यिाचे आश्वासन दिले होते. त्यांनी या वस्तीत एक हातपंप दिल्याने पिण्याच्या पाण्याची सुविधा झाली. केवळ एका हातपंपावर त्यांनी बोळवण केली. मात्र आजही येथील मुलभूत प्रश्न ‘जैसे थे’ आहेत. घर तिथे शौचालय असे शासनाचे धोरण आहे. मात्र परसोडी ग्रा.पं.ने येथील केवळ ४ लाभार्थ्यांना शौचालय दिले.अद्यापही ९ लोकं शौचालयाच्या प्रतिक्षेत आहेत. या वस्तीत दोन घरकुल मंज़ूर झाले खरे. त्यांना घरकुलाचा पहिला हप्ता मिळाला. मात्र फेब्रु. २०१८ मध्ये मंजूर झालेल्या या घरकुल धारकांना कार्यारंभ आदेशच मिळाला नाही. अतिक्रमणाची जागा असल्याचे घरकुल अडकले असल्याचे सांगण्यात येते. वीज नसल्याने वस्तीवासीयांची मोठी अडचण होत आहे. रात्री दिवे लावण्यासाठी केरोसिन मिळत नाही. खाद्यतेल जाळून या वस्तीत रात्रभर दिवे जळतात हे वास्तव आहे. एकीकडे शासन पंतप्रधान आवास योजनेंतर्गत भूखंड खरेदी व घरबांधकामासाठी पैसे देतो. सर्वांना घरे देण्याचे गाजर दाखविले जाते. मग या वस्तीत घरकुल का दिले जात नाही हा खरा प्रश्न आहे.‘‘राष्ट्रपिता महात्मा गांधी यांनी ‘खेड्याकडे चला’ हा मंत्र देशवासीयांना दिला. सारे जग शहरांकडे धावतोय. शहरी जीवन हे अत्यंत धावपळीचे झालयं. शहरवासीयांजवळ कुणाशीही बोलण्यासाठी अजिबात वेळ नाही. मात्र ग्रामीण भागातले चित्र अगदी विपरित आहे. परसोडी ग्रामपंचायत अंतर्गत येथील ग्रामस्थ गावात राहायला जागा नाही म्हणून शहरांकडे धाव न घेता उलट जंगलाकडे धाव घेऊन गांधीजींच्या मुलमंत्राचे पालन करताना दिसताहेत. मात्र हे करताना त्यांना स्मार्ट ग्राम, शायनिंग इंडिया, डिजीटल इंडिया अशी मुक्ताफळे उधळून स्वप्न दाखविणाऱ्या राज्यकर्त्यांच्या राजवटीत वीज नसलेली वस्ती असावी ही खरी शोकांतिका आहे’’मुलभूत सुविधांना प्राधान्य-कुंभरेया वस्तीत मुलभूत सुविधा उपलब्ध करुन देण्याच्या दृष्टीने ग्रामसभेत १२ वीज खांब, रस्ता व पिण्याच्या पाण्याचा प्रस्ताव पारित करण्यात आला आहे. ही जागा वादग्रस्त असल्यामुळे येथे बांधकाम करु नका, असे वस्तीवासीयांना सांगितले होते. तरी सुद्धा त्यांनी बांधकाम केले. या वस्तीत मुलभूत सुविधा पुरविण्यासाठी प्राधान्य राहील,अशी माहिती सरपंच अनिल कुंभरे यांनी लोकमतशी बोलतांना दिली.

टॅग्स :electricityवीज