शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आपल्या प्रजेचं रक्षण करणं हा राजाचा धर्म! लोक लक्षात ठेवतील"; मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
Pahalgam Terror Attack: मोठाच पेचप्रसंग! ‘त्या’ महिला आता पाकिस्तानात जाऊ शकत नाहीत; नेमका काय आहे ‘लाँग टर्म व्हिसा’?
3
सर्वार्थ सिद्धी योगात चैत्र अमावास्या: १० राशींवर धनलक्ष्मीची कृपा, लाभच लाभ; भरघोस भरभराट!
4
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
5
Prabhsimran Singh ची कडक फटकेबाजी; नरेनच्या गोलंदाजीवर 'उलटा' फटका मारला अन्... (VIDEO)
6
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
7
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
8
"एकनाथ शिंदेनी मला पुन्हा जिवंत केलं, कधीच शिवसेना सोडणार नाही"; निलेश राणेंचे विधान
9
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
10
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
11
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
12
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
13
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
14
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
15
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
16
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
17
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
18
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
19
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
20
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  

भरडाईसाठी धानाची उचल नाही, ३४ राईस मिलर्सला बजावल्या नोटीस

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 21, 2024 17:05 IST

सहा राईस मिलर्सनी जमा केली बँक गॅरंटी; पण अद्याप धानाची उचल नाहीच

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : शासकीय धान खरेदी केंद्रांवर खरेदी करण्यात आलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ जमा करण्यासाठी करारनामे करून भरडाई न करणाऱ्या ३४ राईस मिलर्सला जिल्हाधिकाऱ्यांनी नोटीस बजावित काळ्या यादीत टाकण्याचा इशारा दिला. यानंतर ३४ पैकी ६ राईस मिलर्सनी बँक गॅरंटी जमा करून धानाची भरडाई करण्याची तयारी दर्शविली आहे; पण अद्यापही धानाची उचल केली नसल्याची माहिती आहे.

जिल्हा मार्केटिंग फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळांतर्गत सहकारी संस्थेच्या धान खरेदी केंद्रांवरून हमीभावाने धान खरेदी केली जाते. यानंतर खरेदी केलेल्या धानाची भरडाई करून तांदूळ जमा करण्यासाठी राईस मिलर्ससह करार केला जातो; पण गेल्या सहा महिन्यांपासून राईस मिलर्स आणि शासन यांच्या भरडाई व वाहतुकीचे दर आणि करारनाम्यातील अटी-शर्तीवरून वाद सुरू आहे. या वादावर अद्यापही तोडगा निघालेला नाही. त्यामुळे फेडरेशन आणि आदिवासी विकास महामंडळाने खरेदी केलेला ४० लाख क्विंटल धान तसाच पडून आहे. बऱ्याच प्रमाणात धान उघड्यावर पडून असल्याने तो खराब होण्याची शक्यता आहे. तर यामुळे रब्बीतील धान खरेदीसुद्धा अडचणीत आले आहे. खरिपातील धानाची भरडाई करण्यासाठी जिल्ह्यातील ३४ राईस मिलर्सने करारनामे केले होते; पण त्यांनी अद्यापही धानाची भरडाईसाठी उचल केली नाही. त्यामुळे जिल्हाधिकाऱ्यांनी या ३४ राईस मिलर्सला काळ्या यादीत टाकण्याची नोटीस बजाविली आहे. नोटीस हातात पडताच यापैकी सहा राईस मिलर्सने बैंक गँटी जमा करून भरडाईसाठी धानाची उचल करण्याची तयारी दर्शविल्याची माहिती आहे. तर उर्वरित राईस मिलर्ससुद्धा आता तयारीला लागले असल्याची माहिती आहे.

२९६ राईस मिलर्स करतात करारजिल्हा मार्केटिंग फेडरेशनअतर्गत खरिपात ४० लाख क्विंटलपर्यंत धान खरेदी केली जाते. त्यानंतर या धानाची भरडाई करण्यासाठी दरवर्षी २९६ राईस मिलर्ससह करार केला जातो. त्यामुळे वेळेत धानाची भरडाई करूनरब्बीतील धान खरेदी वेळेत सुरू करण्यास मदत होते; पण यंदा केवळ ३४ राईस मिलर्सने करार केले असल्याने खरेदी केलेल्या संपूर्ण धानाची भरडाई कशी होणार, असा प्रश्न आहे.

आचारसंहिता संपल्यानंतरच निर्णयशासनाने राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा काढण्यास विलंब केला. त्यातच लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागू झाल्याने आता हा निर्णय लांबणीवर पडला. लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता संपेपर्यंत राईस मिलर्सच्या मागण्यांवर तोडगा निघण्याची शक्यता कमी असून, तोपर्यंत यावर निर्णय होण्याची शक्यता कमी आहे. 

टॅग्स :gondiya-acगोंदिया