शहरं
Join us  
Trending Stories
1
कोमात आयुष्य की शांतपणे मृत्यू? १३ जानेवारीला सुप्रीम कोर्ट हरीशच्या जीवनावर निकाल सुनावणार
2
राजधानी एक्स्प्रेसचा भयंकर अपघात, धडकेत अनेक हत्तींचा मृत्यू, रेल्वे इंजिनसह डब्बे घसरले
3
भाईंदरमध्ये ७ जणांना जखमी करणारा बिबट्या आठ तासांनी जेरबंद; घरात शिरून धुमाकूळ; पकडल्यानंतर जीव भांड्यात
4
कोकाटेंची शिक्षा कायम, अटक टळली! उच्च न्यायालय म्हणाले, प्रथमदर्शनी पुरावे उपलब्ध, दोषसिद्धीला स्थगिती देता येणार नाही
5
Daily Horoscope: आजचे राशीभविष्य, २० डिसेंबर २०२५: सरकारकडून फायदा, मोठे आर्थिक लाभ होतील
6
ठाण्यात 'क्लब'मध्ये आग; १२०० लग्न वऱ्हाडी बचावले; तासाभरात आगीवर नियंत्रण
7
निवृत्त कृषी शास्त्रज्ञाला १.३९ कोटींचा गंडा; तर हायकोर्टाच्या अधिकाऱ्यास केले डिजिटल अरेस्ट
8
गेली २७ वर्षे झाली तो चालतोच आहे! एका ध्येयवेड्या सैनिकाची अचाट पृथ्वी प्रदक्षिणा
9
'सनबर्न'मध्ये मद्यसेवनास परवानगी कशी? उच्च न्यायालयाचा राज्य सरकारला सवाल
10
शिल्पांतला 'राम' हरपला! पाषाणाला जिवंतपणा देणारा महान कलाकार काळाच्या पडद्याआड
11
मन शांत, बुद्धी तीक्ष्ण, हृदय कोमल करणारे ध्यान! नकारात्मकतेकडून उत्साहाकडे...
12
उजव्या हाताच्या कोवळ्या अंगठ्यांना 'सक्ती'चा आराम! ऑस्ट्रेलियाचा धडा भारत गिरवणार का?
13
नगरपरिषद निवडणुकीचा आज दुसरा टप्पा; रविवारी सर्व निकाल
14
हसिनाविरोधी नेत्याच्या मृत्यूनंतर हिंसाचार, हिंदू तरुणाला जाळले; उठावातील प्रमुख नेत्याचा मृत्यू झाल्याने केली निदर्शने
15
पाण्याची 'महा'काय टाकी फुटली, नागपुरात सात कामगारांचा गेला जीव; १० कामगार गंभीर
16
आमचे ९०० कोटी रुपये परत द्या! इंडिगोची कोर्टात धाव; कस्टम्स विभागाकडून मागितले हायकोर्टाने उत्तर
17
'त्या' ८४ जागा देण्यास भाजपचा नकार; पण मुंबईत शिंदेसेना महायुतीतच लढणार
18
१५ बैठका, ९२ तास काम; १० विधेयके सादर, ८ मंजूर; लोकसभेतील कामकाज, संसदेच्या हिवाळी अधिवेशनाची सांगता
19
नगरसेवक व्हायचंय? लिहा शहर विकासावर निबंध; आयोगाकडे द्यावे लागणार शपथपत्र
20
उद्धवसेना व मनसे नेत्यांच्या चर्चेत काही जागांवरून तिढा; आ. अनिल परब यांनी घेतली राज ठाकरे यांची भेट 
Daily Top 2Weekly Top 5

निवडणूक भत्ता नाहीच

By admin | Updated: July 30, 2015 01:37 IST

संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन शिक्षकांना मिळाले नसल्याने सर्वांमध्ये असंतोष पसरला आहे.

शिक्षकांमध्ये संताप : आशेवर फिरले पाणीकाचेवानी : संपूर्ण जिल्हाभर गेल्या पाच वर्षांपासून ग्रामपंचायत निवडणुकीचे मानधन शिक्षकांना मिळाले नसल्याने सर्वांमध्ये असंतोष पसरला आहे. जवळपास १ कोटी १० लाख रुपयांचे मानधन थकित असल्याचे सांगितले जात आहे.पूर्वी शिक्षकांना या कामाचे मानधन दिले जात नव्हते. त्यामुळे शिक्षक संघटनांनी विरोध दर्शविला होता. त्यावर काही अधिकाऱ्यांनी यावेळी निवडणूक भत्ता (मानधन) रोख स्वरूपात मिळणार असल्याचे सांगितले, मात्र प्रत्यक्षात तसे झालेच नाही.रोख स्वरूपात लगेच मानधन मिळेल या आशेने निवडणूक मतदान अधिकारी म्हणून मतदान केंद्रावर जाताना शिक्षकांसह इतर कर्मचारी खुशीचे होते. मतदानाच्या दिवशी शेवटपर्यंत भत्ता मिळणार असल्याची आशा त्यांनी ठेवली आली. शेवटी साहित्य जमा करताना आपल्याला भत्ता मिळणार अशी आशा सर्वांना होती. मात्र ती आशा निराशेत बदलले. शेवटी नाराज होवून शिक्षकांना खिशातील पैसे खर्च करुन परतावे लागले. आश्चर्याची बाब अशी की, मतदान साहित्य शिक्षक व इतर कर्मचाऱ्यांच्या हाती सोपविताना निवडणूक भत्ता मिळणार असल्याचे चॉकलेट देण्यात आले होते. विशेष म्हणजे निवडणूक कामात असलेल्या शिक्षकांना महसूल कर्मचारी असभ्य वागणूक देतात, अपशब्दाचा वापर करतात. तसेच क्षुल्लक कारणाकरिता कारवाई करण्यात येईल, बरखास्त करण्यात येईल, निलंबित करण्यात येईल अशा धमक्या दिल्या जातात असा अनेक शिक्षकांचा अनुभव आहे. तरीही राष्ट्रीय कर्तव्य समजून शिक्षक या कामात सहभागी होतात.निवडणूक भत्ता त्वरित देण्यात आला नाही तर यानंतरच्या निवडणुकांच्या कामावर बहिष्कार टाकणार असल्याचे काही शिक्षकांनी सांगितले. (वार्ताहर)तरीही शिक्षकांनी बाळगला संयममहिनाभरापूर्वी झालेल्या जिल्हा परिषदेच्या निवडणुकीत गटशिक्षणाधिकारी सुनील मांढरे यांची याच मुद्द्यावरून उपविभागीय अधिकाऱ्यांशी बाचाबाची झाली होती. याचा राग शिक्षकांत होता. तरीपण शिक्षकांनी संयम बाळगला. साहित्य जमा करण्याच्या वेळी निवडणूक भत्यावरुन वादंग निर्माण झाला असता, मात्र त्याला थांबविण्यात काही शिक्षकांना यश आले.