शहरं
Join us  
Trending Stories
1
कर्नाटकात मोठी दुर्घटना, गणेश विसर्जन मिरवणुकीत घुसला ट्रक; 8 जणांचा मृत्यू, अनेक जखमी
2
"भारतावर 50 टक्के टॅरिफ लवणं सोपं नव्हतं"; ट्रम्प म्हणाले, दोन्ही देशांत मतभेद...
3
Phil Salt Fastest Century : टी-२० मध्ये ३०० पारचा आकडा गाठत इंग्लंडनं मोडला टीम इंडियाचा रेकॉर्ड
4
आसाममध्ये टाटा इलेक्ट्रॉनिक्ससमोर नवं आव्हान, घनदाट जंगलात साप आणि हत्तींचा धोका; आता काय करणार TATA?
5
नेपाळमध्ये अखेर ठरले! सुशीला कार्कीच होणार अंतरिम पंतप्रधान, संसदही केली बरखास्त
6
PAK vs OMAN : पाकनं मॅच जिंकली; पण रुबाब अन् दरारा टीम इंडियाचाच! ते कसं? जाणून घ्या सविस्तर
7
गुंडा गावाजवळील ओढ्याला पूर; दोन महिला बेपत्ता, शोध कार्य सुरू
8
घराच्या बाल्कनीतुन जाणारा फ्लायओव्हर बघितला का? नागपुरात ९९८ कोटींच्या इंडोरा-डिघोरी रस्त्याचे विचित्र बांधकाम चर्चेत
9
PAK vs OMAN : पाक फलंदाजांनी ओमान संघासह पंच अन् सामनाधिकाऱ्यांना गंडवलं; नेमकं काय घडलं?
10
“मनसेच्या मदतीची गरज म्हणून उद्धव ठाकरे मातोश्री बाहेर पडले”; शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
11
मॅथ्यू हेडनचं डोकं फिरल्यासारखं वक्तव्य! लेकीचा इंग्लिश बॅटर जो रुटला मेसेज, म्हणाली...
12
भारतानं चीनचं टेन्शन वाढवलं, शेजारील देशाला पुरवणार ब्रह्मोस क्षेपणास्त्र
13
Saim Ayub Golden Duck! ...अन् म्हणे हा बुमराहला सिक्सर मारणार! ओमानच्या गोलंदाजानं काढली हवा
14
अमेरिकेनंतर आता मेक्सिकोची घोषणा! आशियाई देशांवर ५० टक्के टेरिफ लागणार; चीन, भारतावरही परिणाम
15
तोडफोड, जाळपोळ अन् लूटमार; Gen Z आंदोलनामुळे नेपाळच्या हॉटेल व्यवसायाचं मोठं नुकसान!
16
दोन ठाकरे एकत्र येण्याचा मुहूर्त ठरला; या दिवशी... चंद्रकांत खैरेंनी केली घोषणा
17
आरक्षणावरून आरोप-प्रत्यारोप, महायुतीचे असंतुष्ट मंत्री सरकारसाठी डोकेदुखी ठरणार? चर्चा सुरू
18
“मोदींवर टीका करून मोठे होता येत नाही, जनहितासाठी ठाकरे बंधूंनी एकत्र यावे”; भाजपा नेते थेट बोलले
19
पाक विरुद्ध हिट शो देण्याची तयारी! बुमराह-पांड्यासह टीम इंडियातील खेळाडूंनी दिली Bronco Test! इथं पाहा VIDEO
20
दिल्लीतच नाही, देशभरात फटाक्यांवर बंदी येणार? सर्वोच्च न्यायालयाने काय म्हटले...

नऊ गावांनी दोन वर्षांपासून बस पाहिलीच नाही

By admin | Updated: April 23, 2017 01:51 IST

परिवहन महामंडळाची कोणतीच बस अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा या रस्त्यावरून धावत नाही.

बाराभाटी : परिवहन महामंडळाची कोणतीच बस अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा या रस्त्यावरून धावत नाही. यामुळे प्रवाशांच्या अडचणी वाढत आहेत. प्रवाशांना प्रवास करतांना बस दिसत नाही. या मार्गावर नवेगावबांध, देवलगाव, कवठा, डोंगरगाव, येरंडी, बाराभाटी, कुंभीटोला, सुकडी-खैरी या ९ गावातील लोकांनी दोन वर्षापासून बसचा प्रवास केला नाही. सदर मार्गावरून गेल्या २ वर्षापासून परिवहन महामंडळाची बस धावणे बंद झाली आहे. एखाद्या वेळी शालेय विद्यार्थीनीसाठी अहिल्याबाई होळकर योजनेची बस धावते पण तेथे प्रवाशांना बसू दिले जात नाही. हा रस्ता सोडला की तालुक्याच्या क्षेत्रात सर्वत्र बसचा प्रवास होतो. अर्जुनी-मोरगाव ते कोहमारा मार्ग बस प्रवासापासून वंचीत आहे. तरी कोणताच लोकप्रतिनिधी ही समस्या सोडवत नाही. या मार्गावर २ वर्षापासून बस बंद आहे. तेव्हा आॅटोवाले चालक मनमर्जीपणा करतात. ६+१ अशा आॅटोचा प्रवास नियमाने आहे. तर या रस्त्यावर १५+१ असे प्रवासी भरून नेतात. भरगच्छ भरलेला आॅटो हा अपघाताला आमंत्रण देत आहे. सदर मार्गावरील प्रवासी बसच्या प्रतिक्षेत आहेत. प्रवासी निवारे प्रवाशांविना दिसतात. बस समस्या कधी सुटणार याकडे लक्ष आहे. या मार्गावर तत्काळ बस सुविधा सुरु करावी, अशी मागणी नागरिक करीत आहेत. (वार्ताहर)