शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यात नऊ टक्के रोवण्या-आवत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:03 IST

वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळी स्थिती : आतापर्यंत ८० टक्के रोवण्या अपेक्षित

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या. परंतु बळीराजावर आता निसर्गही कोपल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीप पिकासाठी दोन लाख पाच हजार ८६९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी भात पिकासाठी एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सहा हजार ५९१.४० हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली. तर १७ हजार ६३४.४० हेक्टर जमिनीत धानाची नर्सरी लावण्यात आली. यापैकी १० हजार ४१७.९७ हेक्टर रोवणीचे काम झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता आवत्या व रोवणी पकडल्यास फक्त नऊ टक्के काम झाले आहे. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या आटोपायला पाहिजे होत्या. परंतु तसे काही झाले नाही.९ जुलै पासून पावसाने सतत दडी मारल्यामुळे शेतात टाकण्यात आलेले पºहे कोमेजले आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. यासाठी इतर उपाय योजना करणे गरजेचे आहे. दरवर्षीच्या तुलनेत २४ जुलै पर्यंत सरासरी ५६७.१२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. परंतु आतापर्यंत फक्त २५४.६९ मिमी म्हणजेच ४५ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे स्पष्ट चिन्ह आहेत. शासनाने गोंदिया जिल्हा शंभरटक्के दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात उशीरा पाऊस पडला आणि पहिल्या पावसानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पºहे करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात १३ हजार ८२५ क्विंटल कमी कालावधीचे भात बियाणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे आले होते. त्यापैकी नऊ हजार ८०० क्विंटल बियाणे आजही कृषी केंद्र चालकांकडे आहेत. ते बियाणे परत कंपन्यांना पाठवू नये. कारण गोंदिया जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता असल्याचे स्वत: कृषी विभागाने मान्य केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांना पत्र पाठविले आहे.जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव पारितजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात शंभरटक्के दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव बुधवारी (दि.२४) घेण्यात आला. तो ठराव शासनाला पाठविण्यात आला आहे.८०४६ मेट्रिक टन युरिया उपलब्धयंदा पाऊसच न झाल्यामुळे जिल्ह्यात आठ हजार ४६.८६ मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना यावेळी कमी पडणारा युरिया यावर्षी कुणी मागतच नाही. पावसाने दडी मारून शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :agricultureशेती