शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतासोबत वाद ओढवून घेणे मोठी चूक, मोदी...; हात पोळलेल्या कॅनडाच्या बिझनेसमनचा ट्रम्पना इशारा...
2
Priyanka Chaturvedi : "जवानांच्या रक्तापेक्षा पैसा महत्त्वाचा..."; भारत-पाकिस्तान मॅचवरून प्रियंका चतुर्वेदींचा हल्लाबोल
3
Ankita Lokhande : "ते आमच्या घराचा..."; अंकिता लोखंडेच्या हाऊस हेल्परची मुलगी बेपत्ता, पोलिसांत केली तक्रार
4
मिड-डे मील भटक्या कुत्र्याने उष्टावले; तसेच मुलांना दिले, ७८ विद्यार्थ्यांना अँटी रेबिज लस टोचावी लागली...
5
हवामान विभागाची मोठी भविष्यवाणी! शेतकऱ्यांनो, सावधान... महाराष्ट्रात पुढील १५ दिवस पाऊस...
6
बलात्कार टाळायचा असेल तर घरीच थांबा; अहमदाबादमध्ये पोस्टर्सने वाद; पोलिसांच्या सूचनेमुळे नागरिकांमध्ये संताप
7
कमाल झाली..! कुणाच्या स्वप्नातही नाही आली; ती गोष्ट टीम इंडियातील या तिघांनी सत्यात उतरवली
8
मालेगाव २००८; बॉम्बस्फोटातील तपासात एटीएस आणि एनआयएचा विरोधाभास 
9
सात महिन्यांत अक्षय कुमारने ११० कोटींची मालमत्ता विकली, कुठे किती रुपयांना केली विक्री? जाणून घ्या
10
महिलांसाठी मोठी संधी! LIC ची नवी योजना, फक्त ‘हे’ काम करा आणि दरमहा ७,००० रुपये कमवा!
11
भारतीय शेतकरी चुकून गेला पाकिस्तानात; न्यायालयाने सुनावली तुरुंगवासाची शिक्षा, वडील म्हणतात....
12
सरकारचा पैसा आहे, आपल्या बापाचं काय जातंय? संजय शिरसाटांचे विधान; सुप्रिया सुळे म्हणाल्या, "इशारा देऊन पण..."
13
कुलगाममध्ये तिसऱ्या दिवशीही चकमक सुरू; आतापर्यंत तीन दहशतवादी ठार, या वर्षातील सर्वात मोठी कारवाई
14
पनवेलमध्ये राडा झाला...! राज ठाकरेंच्या इशाऱ्यानंतर पनवेलमधील लेडीज बारवर मनसेचा हल्ला 
15
भारतीय निवडणूक प्रणाली मृत, निवडणुकीत घोटाळे! विरोधी पक्षनेते राहुल गांधी यांचा निवडणूक आयोगावर पुन्हा हल्लाबोल
16
मुद्द्याची गोष्ट : टॅरिफच्या खेळीने चेकमेट कोण? कुणाला बसणार फटका?
17
आजचे राशीभविष्य ३ ऑगस्ट २०२५ : सांसारिक गोष्टी बाजूला ठेवाल, गूढ रहस्यमय विद्येत रमाल
18
‘भीमराया…’ गीताची जन्मकथा सांगताना सरन्यायाधीश गवईंचा गळा दाटला! सुरेश भटांनी कसे लिहिले भीमरायाचे वंदना गीत? ऐकवली संपूर्ण कहाणी
19
प्रज्वल रेवण्णाला बलात्कारप्रकरणी जन्मठेप, १० लाख रुपयांचा दंडही; पीडित महिलेला ७ लाख रु. भरपाई देण्याचा आदेश
20
"हमे अयोध्या का मंदिर आरडीएक्स से उडाना है, पचास बंदे चाहिए..."; शिरूरच्या तरुणाला कराचीतून मेसेज, १ लाखाची ऑफर! गुन्हा दाखल

जिल्ह्यात नऊ टक्के रोवण्या-आवत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:03 IST

वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळी स्थिती : आतापर्यंत ८० टक्के रोवण्या अपेक्षित

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या. परंतु बळीराजावर आता निसर्गही कोपल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीप पिकासाठी दोन लाख पाच हजार ८६९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी भात पिकासाठी एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सहा हजार ५९१.४० हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली. तर १७ हजार ६३४.४० हेक्टर जमिनीत धानाची नर्सरी लावण्यात आली. यापैकी १० हजार ४१७.९७ हेक्टर रोवणीचे काम झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता आवत्या व रोवणी पकडल्यास फक्त नऊ टक्के काम झाले आहे. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या आटोपायला पाहिजे होत्या. परंतु तसे काही झाले नाही.९ जुलै पासून पावसाने सतत दडी मारल्यामुळे शेतात टाकण्यात आलेले पºहे कोमेजले आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. यासाठी इतर उपाय योजना करणे गरजेचे आहे. दरवर्षीच्या तुलनेत २४ जुलै पर्यंत सरासरी ५६७.१२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. परंतु आतापर्यंत फक्त २५४.६९ मिमी म्हणजेच ४५ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे स्पष्ट चिन्ह आहेत. शासनाने गोंदिया जिल्हा शंभरटक्के दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात उशीरा पाऊस पडला आणि पहिल्या पावसानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पºहे करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात १३ हजार ८२५ क्विंटल कमी कालावधीचे भात बियाणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे आले होते. त्यापैकी नऊ हजार ८०० क्विंटल बियाणे आजही कृषी केंद्र चालकांकडे आहेत. ते बियाणे परत कंपन्यांना पाठवू नये. कारण गोंदिया जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता असल्याचे स्वत: कृषी विभागाने मान्य केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांना पत्र पाठविले आहे.जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव पारितजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात शंभरटक्के दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव बुधवारी (दि.२४) घेण्यात आला. तो ठराव शासनाला पाठविण्यात आला आहे.८०४६ मेट्रिक टन युरिया उपलब्धयंदा पाऊसच न झाल्यामुळे जिल्ह्यात आठ हजार ४६.८६ मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना यावेळी कमी पडणारा युरिया यावर्षी कुणी मागतच नाही. पावसाने दडी मारून शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :agricultureशेती