शहरं
Join us  
Trending Stories
1
'हवाई तळ सोडा, अफगाणिस्ताची एक मीटरही जमीन देणार नाही'; ट्रम्प यांच्या धमकीनंतर तालिबानने थोपटले दंड
2
Sahibzada Farhan Celebration : पाक सलामीवीराचं 'नापाक' सेलिब्रेशन! सोशल मीडियावर उमटल्या संतप्त प्रतिक्रिया
3
'जीएसटी कपातीमुळे अर्थव्यवस्थेला मोठी चालना'; पंतप्रधान मोदींच्या भाषणानंतर CM फडणवीसांनी मानले आभार
4
कुणाचे लग्न थांबलं, कुणाच्या आईला अश्रू अनावर; ट्रम्प यांच्या H-1B व्हिसाच्या निर्णयाने भारतीय संकटात
5
IND vs PAK मॅचमध्ये Fakhar Zaman च्या विकेटवरुन नवा वाद; नेमकं काय घडलं? (VIDEO)
6
'आमच्यातल्या टॅलेंटला घाबरतात म्हणून...'; ट्रम्प यांच्या एच१-बी व्हिसाच्या निर्णयावर पियुष गोयल यांची रोखठोक प्रतिक्रिया
7
IND vs PAK : हार्दिक पांड्यानं सलामीवीराचं काम केलं होतं तमाम, पण अभिषेक शर्मानं कॅच सोडला अन्...(VIDEO)
8
'उद्यापासून सर्वांचे तोंड गोड होणार'; GST रिफॉर्मची पंतप्रधान मोदींकडून घोषणा, म्हणाले, 'नागरिक देवो भव'
9
IND vs PAK: सूर्यकुमार यादवनं टॉस जिंकला अन् ती चिंताही मिटली! बुमराहसह वरुण चक्रवर्तीचंही कमबॅक
10
इस्रायलला मोठा धक्का; ब्रिटनसह ३ देशांची पॅलेस्टाईनला स्वतंत्र देश म्हणून मान्यता
11
यूपी एटीएसने तीन संशयितांना भिवंडीतून पकडलं; पैसे गोळा करुन पॅलेस्टाइनला पाठवल्याचा आरोप
12
जीएसटी कपातीच्या पूर्वसंध्येलाच घोषणा; MG Hector १.४९ लाख, Gloster  ३.०४ लाख तर Astor एवढ्या हजारांनी कमी झाली...
13
'भारतीयांनी घाम गाळून तयार केलेल्याच गोष्टी घ्या'; ट्रम्प टॅरिफवरुन PM मोदींचे देशवासियांना आवाहन
14
'९९% वस्तू ५% GST स्लॅबमध्ये येणार', PM मोदींनी सांगितले नवीन जीएसटी सुधारणांचे फायदे...
15
खोटी वचनं देऊन नर्सला प्रेमाच्या जाळ्यात ओढलं, लग्नाचा तगादा लावताच खरं रूप दाखवलं! ऐकून होईल संताप
16
२२ सप्टेंबरपासून 'या' वस्तूंच्या किमतीत कोणताही बदल नाही; तुमच्या यादीत आहे का?
17
जातीऐवजी आर्थिक निकषावरील आरक्षणाला सुप्रिया सुळेंचा पाठिंबा? नेमकं काय म्हणाल्या वाचा...
18
उद्यापासून अनेक वस्तू होणार स्वस्त! पाहा तुमच्या घरातील कोणत्या गोष्टींवर किती जीएसटी लागणार...
19
AUS vs IND : वैभव सूर्यवंशीचा ऑस्ट्रेलियात धमाका; हा फक्त ट्रेलर; पिक्चर अजून बाकी!
20
'महानायक' मोहनलाल; एका वर्षात दिले २५ ब्लॉकबस्टर चित्रपट, ५ वेळा मिळाला राष्ट्रीय पुरस्कार

जिल्ह्यात नऊ टक्के रोवण्या-आवत्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2019 00:03 IST

वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या.

ठळक मुद्देजिल्ह्यात दुष्काळी स्थिती : आतापर्यंत ८० टक्के रोवण्या अपेक्षित

नरेश रहिले।लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : वरूणराजाच्या अवकृपेमुळे गोंदिया जिल्ह्यातील शेतकरी दुष्काळाच्या संकटात सापडला आहे. ऐन पावसाळ््यात दीड महिना लोटून गेल्यानंतरही पावसाचे समाधानकारक आगमन न झाल्यामुळे जिल्ह्यातील फक्त नऊ टक्के आवत्या व रोवणे झाले आहेत. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या व्हायला पाहिजे होत्या. परंतु बळीराजावर आता निसर्गही कोपल्याने जिल्ह्यात दुष्काळी स्थिती दिसून येत आहे.गोंदिया जिल्ह्यात खरीप पिकासाठी दोन लाख पाच हजार ८६९ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी भात पिकासाठी एक लाख ९६ हजार ८३२ हेक्टर क्षेत्र आहे. यापैकी सहा हजार ५९१.४० हेक्टर क्षेत्रात आवत्या पद्धतीने धानाची लागवड करण्यात आली. तर १७ हजार ६३४.४० हेक्टर जमिनीत धानाची नर्सरी लावण्यात आली. यापैकी १० हजार ४१७.९७ हेक्टर रोवणीचे काम झाले आहे. संपूर्ण जिल्ह्याची परिस्थिती पाहता आवत्या व रोवणी पकडल्यास फक्त नऊ टक्के काम झाले आहे. आतापर्यंत ८० टक्के रोवण्या आटोपायला पाहिजे होत्या. परंतु तसे काही झाले नाही.९ जुलै पासून पावसाने सतत दडी मारल्यामुळे शेतात टाकण्यात आलेले पºहे कोमेजले आहेत. येत्या पाच-सहा दिवसांत पाऊस न आल्यास परिस्थिती गंभीर होणार आहे. यासाठी इतर उपाय योजना करणे गरजेचे आहे. दरवर्षीच्या तुलनेत २४ जुलै पर्यंत सरासरी ५६७.१२ मिमी पाऊस पडणे अपेक्षीत होते. परंतु आतापर्यंत फक्त २५४.६९ मिमी म्हणजेच ४५ टक्के पाऊस पडल्याने जिल्ह्यात दुष्काळाचे स्पष्ट चिन्ह आहेत. शासनाने गोंदिया जिल्हा शंभरटक्के दुष्काळ घोषित करावा, अशी मागणी सर्वस्तरातून होत आहे. मात्र शेतकरी हवालदिल झाला आहे.शेतकऱ्यांवर दुबार पेरणीचे संकटजिल्ह्यात उशीरा पाऊस पडला आणि पहिल्या पावसानंतर पावसाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यांनी शेतात लावलेले पºहे करपण्याच्या मार्गावर आहे. जिल्ह्यात पुरेशा प्रमाणात १३ हजार ८२५ क्विंटल कमी कालावधीचे भात बियाणे कृषी निविष्ठा विक्रेत्यांकडे आले होते. त्यापैकी नऊ हजार ८०० क्विंटल बियाणे आजही कृषी केंद्र चालकांकडे आहेत. ते बियाणे परत कंपन्यांना पाठवू नये. कारण गोंदिया जिल्ह्यात दुबार पेरणीचे संकट उद्भवण्याची शक्यता असल्याचे स्वत: कृषी विभागाने मान्य केले आहे. त्यासाठी कृषी विभागाने जिल्हा व्यवस्थापक महाराष्ट्र राज्य बियाणे महामंडळ (महाबीज) यांना पत्र पाठविले आहे.जिल्हा परिषदेच्या सभेत ठराव पारितजिल्हा परिषदेच्या सर्वसाधारण सभेत जिल्ह्यात शंभरटक्के दुष्काळ सदृश परिस्थिती असल्याचे लक्षात घेऊन जिल्हा दुष्काळग्रस्त घोषित करण्याचा एकमुखी ठराव बुधवारी (दि.२४) घेण्यात आला. तो ठराव शासनाला पाठविण्यात आला आहे.८०४६ मेट्रिक टन युरिया उपलब्धयंदा पाऊसच न झाल्यामुळे जिल्ह्यात आठ हजार ४६.८६ मेट्रिक टन युरिया जिल्ह्यात उपलब्ध आहे. दरवर्षी शेतकऱ्यांना यावेळी कमी पडणारा युरिया यावर्षी कुणी मागतच नाही. पावसाने दडी मारून शेतकºयांच्या आशेवर पाणी फेरले आहे.

टॅग्स :agricultureशेती