शहरं
Join us  
Trending Stories
1
पर्यावरणप्रेमींच्या तीव्र विरोधासमोर केंद्र सरकार झुकलं, ‘अरवली’ला वाचवण्यासाठी घेतला मोठा निर्णय   
2
बीडच्या ‘सह्याद्री देवराई’ला भीषण आग; अभिनेते सयाजी शिंदे यांनी जोपासलेली हजारो झाडे संकटात
3
थायलंड-कंबोडिया सीमेवरील विष्णूची मूर्ती बुलडोझरने पाडली, भारताने घेतला तीव्र आक्षेप  
4
बांगलादेशमध्ये हिंसाचार सुरूच, पेट्रोल बॉम्ब हल्ल्यानंतर आता मध्यरात्री ढाका विद्यापीठात मोडतोड
5
नाताळाच्या पूर्वसंध्येला बांगलादेशची राजधानी हादरली, पेट्रोल बॉम्बच्या स्फोटात एकाचा मृत्यू
6
नवीन वर्षात बदलणार काँग्रेसचं 'पॉवर' समीकरण; प्रियांका गांधींना मिळणार महत्त्वाची जबाबदारी
7
IPL 2026 आधीच RCBच्या स्टार खेळाडूला होणार अटक? तब्बल ५ कोटी मोजून घेतलंय संघात
8
पोलिसांवर गुन्हा दाखल करण्याच्या मागणीसाठी सक्षम ताटेची आई व प्रेयसीचा आत्मदहनाचा प्रयत्न, दिला निर्वाणीचा इशारा...
9
‘प्लॅन २०४९’, चीनची भारताच्या अरुणाचल प्रदेशवर नजर, लष्करी बळावर कब्ज्याची तयारी
10
"आम्हाला मतदान केलं तर प्रश्न सोडवू, पण दुसरीकडे केलं तर..."; नितेश राणेंचा मतदारांना इशारा
11
VIDEO: धावत्या ट्रेनमध्ये WWE स्टाईल राडा! 'इंटरसिटी'मध्ये प्रवाशांमध्ये तुफान हाणामारी
12
Sukesh Chandrashekhar : "माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
13
Vijay Hazare Trophy: ४०० हून अधिक धावांचं लक्ष्य ४७.३ षटकांतच गाठलं, कर्नाटकच्या संघाची इतिहासात नोंद!
14
'मला पंतप्रधान मोदींना भेटायचे आहे', उन्नाव बलात्कार पीडिता राहुल गांधींना म्हणाली...
15
प्रेमविवाह फसला; लग्नाच्या दुसऱ्या दिवसापासून जोडपे झाले वेगळे, ८ दिवसांत घटस्फोट
16
Smartphones: २०२५ मधील 'टॉप ५' पैसा वसूल स्मार्टफोन, यादीत मोठ्या ब्रँड्सचा समावेश!
17
रेल्वे प्रवासादरम्यान माजी मंत्र्यांच्या बॅगवर चोरांचा डल्ला, फोन, रोख रक्कम आणि दागिने लंपास
18
इंडिगोच्या वर्चस्वाला धक्का; केंद्र सरकारकडून ‘या’ दोन नव्या विमान कंपन्यांना मान्यता
19
Prashant Jagtap Resignation: २७ वर्षांची साथ सोडली; प्रशांत जगतापांचा राष्ट्रवादी शरद पवार पक्षाला रामराम
20
“राहुल गांधींसारखे पार्ट टाइम राजकारणी होऊ नका, कठोर मेहनत घेत राहा”; नितीन नबीन यांचा संदेश
Daily Top 2Weekly Top 5

अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 6, 2014 00:05 IST

उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न

गोंदिया : उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होणार असल्याने शेतकरी व पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.निसर्गाचा समतोल पशूपक्षी, प्राणी, हवा पर्यावरण या प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. मात्र माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या फायद्यासाठी या प्रमुख घटकांवरच आघात करणे सुरु केले आहे.जंगल साफ केले जात असतानाच प्राणी व पक्ष्यांचीही शिकार केली जात आहे. याला प्रदुषणाची जोड लाभल्याने अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक आता नामशेष होत आहे. त्यामुळेच पावसाळ्यात शेतात दृष्टीस पडाणारा शेकर्‍यांचा मित्र गांडुळ दुर्मिळ होत आहे. जमिनीची नैसर्गिक मशागत करणार्‍या गांडुळामुळे पाण्याचा निचरा व्हायचा. थोडाफार पाऊस झाला तरी पाणी जमिनीत शोषल्या जात आहे. पण आज पाण्याचे जमिनीत शोषण न होता बरेच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबत असून जमिनीतील उष्णतेचे प्रमाण कायम राहत आहे.गांडुळासारखे असंख्य सूक्ष्मजीव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने दूष्परिणामाच्या गंभीरतेचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. किडीवर नियंत्रण ठेवणारे बेडूक व अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप यांचे अस्तित्व या मानवी कुरापतीमुळे धोक्यात आल्याने पिकांचा नाश करणारे उंदिर, घुसांचे प्रमाण सध्या शेतात वाढले आहेत. उंदराला मारण्याकरिता किटकनाशकांचा वापर केल्याने अन्य मदत करणारे जीव यांचे भक्ष्यस्थानी पडत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे विस्कळीत झाल्याने अशा समस्यांशी शेतकर्‍यांना सामना करावा लागतो. यावर माणसाने आता गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. असे न झाल्यास अन्न साखळीतील सजीव पूर्णपणे लोप पावतील व त्याचे दुष्परिणाम मानवजातीलाच भोगावे लागतील यात शंका नाही. याकरिता मानवाला अन्न साखळीतील या सजीवांच्या रक्षणासाठी धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे.