शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानवर हसावं की रडावं.... आता म्हणे मोहसीन नक्वीला गोल्ड मेडल देणार, सन्मान करणार !
2
सानिया मिर्झाशी घटस्फोट, आता शोएब मलिकचे सना जावेदशीही लग्न तुटणार? VIDEO मुळे उडाली खळबळ
3
२ वर्षांपेक्षा कमी वयाच्या मुलांना कफ सिरप देऊ नका, केंद्राचा सल्ला; राजस्थान, मध्य प्रदेशात ११ बालकांचा मृत्यू
4
वेळागर समुद्रात आठजण बुडाले; तिघांचे मृतदेह हाती, एकीचा जीव वाचला, किनाऱ्यावर आक्रोश
5
राज्यात अतिवृष्टी, पूरस्थिती; अकरावी ऑनलाइन प्रवेश प्रक्रियेची ४-६ ऑक्टोबरला अंतिम विशेष फेरी
6
शेतकऱ्यांसाठी काँग्रेस रस्त्यावर; नुकसानग्रस्तांना तत्काळ मदत मिळण्यासाठी राज्यभर आंदोलन
7
'फिट' है तो 'हिट' है... बॉलिवूड अभिनेत्रीचा कमालीचा फिटनेस, या वयातही चाहत्यांना करते घायाळ
8
“बावळट-मूर्ख, मनोज जरांगेंसारखा नेता मिळणे मराठ्यांचे दुर्दैव”; लक्ष्मण हाकेंचा हल्लाबोल
9
"तुम्ही आम्हाला शिकवू नका..."; भारताने पाकिस्तानला चांगलंच सुनावलं, UN मध्ये काय घडलं?
10
आशाबाई, अंबिका अन् सुनीता... सोलापुरात दोन दिवसांत तीन महिलांची हत्या, कारण एकच
11
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळाला दि.बा. पाटलांचे नाव; PM मोदींची राज्य सरकारच्या निर्णयाला मंजुरी
12
IND vs AUS : तिलक वर्माचं शतक थोडक्यात हुकलं; ऑस्ट्रेलियाविरुद्ध अभिषेकवर 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
RSS च्या पथसंचलनात ढोल वाजवणाऱ्या स्वयंसेवकाचा हृदयविकाराने मृत्यू; व्हिडिओ व्हायरल
14
वैभव खेडेकरांचा तीनदा भाजपा प्रवेश रखडला, आता शिवसेनेत जाणार? शिंदे गटाचे नेते स्पष्टच बोलले
15
काँग्रेसनेही निवडणुकांसाठी कंबर कसली! नागपुरात ४, ५ ऑक्टोबरला विचारमंथन कार्यशाळा
16
IND vs WI: ‘ध्रुव तारा’ चमकला! पहिल्या सेंच्युरीनंतर बॅटची बंदूक करून 'बाप-माणसाला' सेल्युट! (VIDEO)
17
Business: २ मित्रांनी सोडली कॉर्पोरेट नोकरी, दूध विकून झाले कोट्यधीश, तयार केला मोठा ब्रँड!
18
सणासुदीच्या तोंडावर सोन्या-चांदीचे दर घसरले! तुमच्या शहरात आज एका तोळ्याची किंमत किती?
19
POKमध्ये पाकचे अत्याचार, भारताची पहिली प्रतिक्रिया; असीम मुनीर यांचा घेतला खरपूस समाचार
20
'आता संयम ठेवणार नाही; पाकिस्तानला जगाच्या नकाशावरुन मिटवू...', लष्करप्रमुखांचा पाकला थेट इशारा

अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 6, 2014 00:05 IST

उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न

गोंदिया : उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होणार असल्याने शेतकरी व पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.निसर्गाचा समतोल पशूपक्षी, प्राणी, हवा पर्यावरण या प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. मात्र माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या फायद्यासाठी या प्रमुख घटकांवरच आघात करणे सुरु केले आहे.जंगल साफ केले जात असतानाच प्राणी व पक्ष्यांचीही शिकार केली जात आहे. याला प्रदुषणाची जोड लाभल्याने अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक आता नामशेष होत आहे. त्यामुळेच पावसाळ्यात शेतात दृष्टीस पडाणारा शेकर्‍यांचा मित्र गांडुळ दुर्मिळ होत आहे. जमिनीची नैसर्गिक मशागत करणार्‍या गांडुळामुळे पाण्याचा निचरा व्हायचा. थोडाफार पाऊस झाला तरी पाणी जमिनीत शोषल्या जात आहे. पण आज पाण्याचे जमिनीत शोषण न होता बरेच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबत असून जमिनीतील उष्णतेचे प्रमाण कायम राहत आहे.गांडुळासारखे असंख्य सूक्ष्मजीव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने दूष्परिणामाच्या गंभीरतेचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. किडीवर नियंत्रण ठेवणारे बेडूक व अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप यांचे अस्तित्व या मानवी कुरापतीमुळे धोक्यात आल्याने पिकांचा नाश करणारे उंदिर, घुसांचे प्रमाण सध्या शेतात वाढले आहेत. उंदराला मारण्याकरिता किटकनाशकांचा वापर केल्याने अन्य मदत करणारे जीव यांचे भक्ष्यस्थानी पडत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे विस्कळीत झाल्याने अशा समस्यांशी शेतकर्‍यांना सामना करावा लागतो. यावर माणसाने आता गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. असे न झाल्यास अन्न साखळीतील सजीव पूर्णपणे लोप पावतील व त्याचे दुष्परिणाम मानवजातीलाच भोगावे लागतील यात शंका नाही. याकरिता मानवाला अन्न साखळीतील या सजीवांच्या रक्षणासाठी धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे.