शहरं
Join us  
Trending Stories
1
तुळजापुरातील मंदिरात जिंतेंद्र आव्हाड समर्थक आणि सुरक्षारक्षकांमध्ये धक्काबुक्की, नेमकं काय घडलं?
2
काँग्रेसने ३००० मते खरेदी केली, भाजप निवडणूक आयोगात पोहोचला; २०१८ मध्ये CM सिद्धरामय्या १६९६ मतांनी विजयी झाले
3
पगार येताच, ५ मिनिटांनी कर्मचाऱ्याने राजीनामा दिला! एचआरची पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल
4
पुन्हा आयएएस अधिकाऱ्यांच्या बदल्या! सात अधिकाऱ्यांचे खाते बदलले; कोणते खाते कोणाकडे?
5
India-China Flight: भारत - चीन दरम्यान लवकरच थेट विमानसेवा सुरू होणार; सरकारने विमान कंपन्यांना दिल्या या सूचना
6
जगदीप धनखड अचानक पंतप्रधान मोदींना का भेटले? काँग्रेसचा नवा दावा आणखी एक प्रश्न
7
केंद्र सरकारचा मोठा निर्णय; ४ सेमीकंडक्टर प्रकल्पांना मंजुरी, 'या' राज्यांमध्ये हजारो कोटींची गुंतवणूक
8
Aaditya Thackeray: "आम्ही काय खायचं, हे सांगणारे तुम्ही कोण?" आदित्य ठाकरे केडीएमसीवर भडकले!
9
आधी पत्नीचे नग्न फोटो काढले, मग बळजबरी बाप आणि मेहुण्यासोबत ठेवायला लावले संबंध; कारण...
10
"...त्यानंतरच होणार राज ठाकरेंना मविआत घेण्याचा निर्णय", काँग्रेसचे प्रभारी रमेश चेन्निथला स्पष्टच सांगितलं
11
महाराष्ट्राच्या पैठणीला लंडनमध्ये मोठा मान, व्हिक्टोरिया अल्बर्ट संग्रहालयामध्ये दिसणार!
12
आधारबाबत सुप्रीम कोर्टाचं सूचक विधान, बिहारमधील SIRवरून निवडणूक आयोगाला दिलासा 
13
कोण आहेत 'बेडरूम जिहादी', जे सुरक्षा यंत्रणेसाठी बनले डोकेदुखी?; भारतात दहशत पसरवण्याचा नवा डाव
14
बिहारपासून दिल्लीपर्यंत गोंधळ, अखेर १२४ वर्षांची महिला मतदार आली समोर, वयाबाबत म्हणाली...  
15
"शोना, मला मार" फक्त एवढेच ऐकताच प्रेयसीने प्रियकराचं डोकं भिंतीवर आपटलं, त्यानंतर जे घडले...
16
पाकिस्तानी दहशतवादी दक्षिण कोरियात पोहोचला, ओळख बदलून कंपनीत काम करत होता; दहशतवाद्याला अटक
17
"देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री आहेत की निवडणूक आयुक्त? प्रश्न आयोगाला विचारले तर तुम्ही उत्तर का देता?", रमेश चेन्निथला यांचा सवाल   
18
RCB मुळं वर्ल्ड कप स्पर्धेवर संकट! एम. चिन्नास्वामी स्टेडियमवर बंदी; BCCI सह ICC चं टेन्शन वाढलं
19
९ महिने पाठपुरावा केला तरीही ऊसाचे बिल थकवले; चिठ्ठी लिहून तरुण शेतकऱ्यानं आयुष्य संपवले
20
भारतासाठी धोक्याची घंटा; चीन LAC जवळ उभारतोय नवीन रेल्वे प्रकल्प, तणाव वाढणार..?

अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात

By admin | Updated: June 6, 2014 00:05 IST

उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न

गोंदिया : उत्पादन वाढीसाठी घेतात मोठय़ा प्रमाणात केला जात असलेला रासायनिक खतांचा वापर, कारखान्यातील प्रदूषण, जलप्रदूषण, कीटकनाशकांची सततची फवारणी यामुळे पर्यावरण संतूलन साधणारे अन्न साखळीतील सजीव प्रदूषणाच्या विळख्यात सापडले असून, नामशेष होण्याच्या मार्गावर आहे. याचा थेट परिणाम शेतकर्‍यांवर होणार असल्याने शेतकरी व पर्यावरण प्रेमींनी चिंता व्यक्त केली आहे.निसर्गाचा समतोल पशूपक्षी, प्राणी, हवा पर्यावरण या प्रमुख घटकांवर अवलंबून आहे. मात्र माणूस नावाच्या प्राण्याने आपल्या फायद्यासाठी या प्रमुख घटकांवरच आघात करणे सुरु केले आहे.जंगल साफ केले जात असतानाच प्राणी व पक्ष्यांचीही शिकार केली जात आहे. याला प्रदुषणाची जोड लाभल्याने अन्न साखळीतील अत्यंत महत्वाचे घटक आता नामशेष होत आहे. त्यामुळेच पावसाळ्यात शेतात दृष्टीस पडाणारा शेकर्‍यांचा मित्र गांडुळ दुर्मिळ होत आहे. जमिनीची नैसर्गिक मशागत करणार्‍या गांडुळामुळे पाण्याचा निचरा व्हायचा. थोडाफार पाऊस झाला तरी पाणी जमिनीत शोषल्या जात आहे. पण आज पाण्याचे जमिनीत शोषण न होता बरेच पाणी वाहून जात आहे. त्यामुळे जमिनीची धूप थांबत असून जमिनीतील उष्णतेचे प्रमाण कायम राहत आहे.गांडुळासारखे असंख्य सूक्ष्मजीव सुद्धा प्रदूषणाच्या विळख्यात सापडल्याने दूष्परिणामाच्या गंभीरतेचा फटका शेतकर्‍यांना बसत आहे. किडीवर नियंत्रण ठेवणारे बेडूक व अन्नसाखळीतील महत्वाचा घटक साप यांचे अस्तित्व या मानवी कुरापतीमुळे धोक्यात आल्याने पिकांचा नाश करणारे उंदिर, घुसांचे प्रमाण सध्या शेतात वाढले आहेत. उंदराला मारण्याकरिता किटकनाशकांचा वापर केल्याने अन्य मदत करणारे जीव यांचे भक्ष्यस्थानी पडत आहे. नैसर्गिक अन्नसाखळीचे विस्कळीत झाल्याने अशा समस्यांशी शेतकर्‍यांना सामना करावा लागतो. यावर माणसाने आता गांभीर्याने लक्ष घालण्याची गरज आहे. असे न झाल्यास अन्न साखळीतील सजीव पूर्णपणे लोप पावतील व त्याचे दुष्परिणाम मानवजातीलाच भोगावे लागतील यात शंका नाही. याकरिता मानवाला अन्न साखळीतील या सजीवांच्या रक्षणासाठी धडपड करण्याची गरज निर्माण झाली आहे.