शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकेच्या 'टॅरिफ'विरुद्ध चीन भारतासोबत उभा! चीनच्या राजदूताने डोनाल्ड ट्रम्प यांच्यावर टीका केली
2
"शेर हमेशा शेर ही रहता है..."  २०२६ ची निवडणूक स्वबळावर; DMK, भाजपासोबत युती नाही, विजयची घोषणा
3
१८ किमी अंतर, २० मिनिटांचा वेळ...फिल्मी स्टाईलनं अर्चना तिवारीनं बदलला लूक, CCTV मध्ये कैद
4
रेल्वे प्रवाशांना नियमापेक्षा जास्त सामानावर दंड भरावा लागणार? रेल्वेमंत्री वैष्णव म्हणाले...
5
रशियन सैन्यात अजूनही भारतीय...एस जयशंकर यांची रशियाकडे मागणी; 'मॉस्को'नेही दिला शब्द
6
धुळे: तरुण-तरुणीचं होतं जीवापाड प्रेम, पण घरच्यांनी...; लग्नाला चार वर्ष झाल्यानंतर एकत्रच मृत्यूला कवटाळले 
7
KGF Gold Mine : KGF मधून आतापर्यंत किती सोने काढले? आकडा ऐकून धक्का बसेल, भारतातील सर्वात खोल खाण
8
नागपुरात ‘छम छम बार’, अश्लील नृत्य करणाऱ्या ‘डान्सर्स’वर पैशांची उधळण; २५ जणांविरोधात गुन्हा
9
'रशियाकडून भारत नाही, चीन सर्वाधिक तेल खरेदी करतो', जयशंकर यांचा अमेरिकेवर निशाणा
10
हे महाराष्ट्रात घडलं! ताटात उष्टे अन्न ठेवले म्हणून मुलाने वडिलांचे कुऱ्हाडीने केले तुकडे, पोत्यात भरून...
11
मोठी बातमी! पालघरमधील मेलोडी फार्मा कंपनीमध्ये वायू गळती; चार जणांचा मृत्यू
12
ट्रम्प खोटारडे निघाले! अमेरिकेच्याच दूतावासाने उघडे पाडले; भारतात निवडणूक फंडिंग केल्याचा केलेला दावा
13
२ लग्नानंतरही 'ती' थांबली नाही, तिसऱ्यासाठी दबाव टाकला; माजी सरपंचाशी वैर महिलेला जीवावर बेतलं
14
कोकणात जाणाऱ्या गणेशभक्तांसाठी टोलमाफीची घोषणा; वाहनधारकांना कुठे मिळणार विशेष पास?
15
Shreyas Iyer: बापानं व्यक्त केलं लेकाच्या मनातील दु:ख! कॅप्टन्सीची इच्छा नाही; फक्त संघात घ्या!
16
नागपुरात आई अन् मुलानेच सुरू केलं सेक्स रॅकेट, व्हॉट्सअ‍ॅपवर फोटो पाठवायचे; रात्री...
17
12th Pass Job: बारावी उत्तीर्णांसाठी हायकोर्टात चांगल्या पगाराची नोकरी; ८१,१०० पर्यंत पगार मिळणार!
18
स्वतःच्याच जाळ्यात अडकले डोनाल्ड ट्रम्प...! अमेरिकेत याच वर्षात 446 कंपन्या झाल्या दिवाळखोर!
19
मोदी सरकारच्या टार्गेटवर कोण?; दोषी PM, CM, मंत्र्यांना पदावरून हटवणाऱ्या विधेयकाची इनसाइड स्टोरी
20
'मुघल आणि ब्रिटिशांनंतर जे काही उरले, काँग्रेस-सपाने लुटले', योगी आदित्यनाथांची बोचरी टीका

यशासाठी सहा मूलभूत तत्वांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:51 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण केल्यास लक्ष्यपूर्ती होते,

ठळक मुद्देलखनसिंह कटरे : चोपा येथील रविंद्र विद्यालयात बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण केल्यास लक्ष्यपूर्ती होते, असे प्रतिपादन साहित्यिक तथा सेवानिवृत्त जिल्हा निबंधक लखनसिंह कटरे यांनी केले.तालुक्यातील ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्रेहसंमेलन घेण्यात आले. दरम्यान बक्षीस वितरण सोहळ्यात ते पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य बी.ओ. वासनिक होते. बक्षीस वितरक म्हणून भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक हरिहर मानकर होते. पाहुणे म्हणून डी.आर. कटरे, रमेश कावळे, इंद्रराज बहेकार, गोविंद खंडेलवाल, उपसपरंच बरकत अली सैयद, हेमराज कोरे, बिसराम बहेकार, प्राचार्य आर.आर. डे, पर्यवेक्षक एच.बी. राऊत, स्नेहसंमेलन प्रभारी एल.बी. मेश्राम, डी.डी. लोखंडे, प्रा.टी.जी. पटेल, एस.जी. पटले उपस्थित होते.पुढे बोलताना कटरे यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात ज्ञानप्राप्तीला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञान प्राप्त करुन भावी जीवन यशस्वी करणे हा मार्ग होय. यश प्राप्तीसाठी सहा मुलभूत तत्वांची गरज असते ही तत्वे म्हणजे परिश्रम, निष्ठा, संयम, विवेक, नैतिकता व गणितीय वृत्ती हे होत. या सहा मूलभूत तत्वांचा आधार घेऊन विद्यार्थी यशोशिखर गाठू शकतो व भावी जीवन समृद्ध करु शकतो, असे सांगीतले.भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक, माजी पंचात समिती सभापती तथा बक्षीस वितरक हरिहर मानकर यांनी, परिश्रमातून मिळविलेले यशचं खरे यश असते. जीवनात अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरू नये. पहिल्यापेक्षा अधिक परिश्रम घेवून यश मिळवावे, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य भाऊराव वासनिक यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात पालक, शिक्षक व विद्यार्थी हे तिन्ही घटक महत्वाचे आहेत. यात शिक्षकाची भूमिका ही संयमशील व विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना मांडून शिकविण्याची असावी, असे मत व्यक्त केले.या वेळी हरिहर मानकर व कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते स्नेह संमेलनांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार प्रा.टी.जी. पटेल यांनी मानले.