शहरं
Join us  
Trending Stories
1
'शांतता चर्चा केली नाही तर युक्रेनचा आणखी भाग बळकावू'; व्लादिमीर पुतीन यांची धमकी, युरोपीय नेत्यांना म्हणाले डुकराच्या औलादी
2
अमेरिकेची आणखी २० देशांना 'नो एंट्री'; राष्ट्रीय सुरक्षेसाठी डोनाल्ड ट्रम्पच्या सरकारने घेतला निर्णय
3
Ram Sutar: शिल्पकलेचा उपासक काळाच्या पडद्याआड! महाराष्ट्र भूषण राम सुतार यांचे निधन
4
'धुरंधर'ला मिळालेलं प्रेम पाहून अखेर अक्षय खन्नाने दिली पहिली प्रतिक्रिया, तीन शब्दांत म्हणाला-
5
दिल्ली-एनसीआर दाट धुक्यात बुडाले, IND विरुद्ध SA चौथा T20I सामना रद्द; दृश्यमानता शून्यावर
6
SEBI नं तीन दशकं जुन्या ब्रोकिंगच्या नियमांत केले महत्त्वाचे बदल; अनेक मोठ्या सुधारणांनाही मंजुरी, जाणून घ्या
7
...तर पाकिस्तानात उद्रेक होणार?, फिल्ड मार्शल असीम मुनीर संकटात सापडले; अमेरिकेचा दबाव वाढला
8
नाशिकमध्ये भाजपा-शिंदेसेना महायुतीत ८५-३७ चा फॉर्म्युला; उद्धवसेना-मनसेचं तगडं आव्हान
9
आजचे राशीभविष्य, १८ डिसेंबर २०२५: या राशींना धनप्राप्ती होईल, आज यांचे विवाह जुळतील
10
आता कुठे गेले कोपर-ढोपर? आयपीएलचे करोडोंचे लिलाव आणि हतबल शेतकऱ्याची 'किडनी' विक्री
11
जास्त पीक! शेतात तयार झाल्या प्रचंड 'विहिरी'! तुर्कीतील शेतकऱ्यांनी स्वतःहून ओढवून घेतलेली आपत्ती
12
शरद पवार गट काँग्रेसची साथ सोडून ठाकरे बंधूंच्या आघाडीत सहभागी?
13
कोकाटेंना भोवला सदनिका घोटाळा; आमदारकी गेली, खाते काढून घेतले!
14
कार्गो वाहतूक नवी मुंबईहून झाल्यास राज्याला फायदा; वाहतूककोंडीवर मात करण्यास होणार मदत
15
किडनी विक्रीमागे सावकारी की आंतरराष्ट्रीय तस्करी?; शेतकऱ्याला कंबोडियाला पाठविणारा डॉ. क्रिष्णा पोलिसांच्या रडारवर
16
डॉ. आंबेडकर यांचा पुतळा युनेस्कोच्या मुख्यालयात हे देशासाठी गौरवास्पद! मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे उद्‌गार 
17
काँग्रेस 'मविआ'त नाही; आता मनसे, उद्धवसेनेची आघाडी, मुंबई महापालिकेचे गणित बदलले
18
भारतीय चवीचा जागतिक गौरव! जगभरातील सर्वोत्तम गोड पदार्थांत कुल्फी, फिरनीचा समावेश
19
आता टोल नाक्यांवर एआय, जाता येणार ८०च्या स्पीडने; थांबण्याची अन् ट्रॅफिकची कटकट संपणार, २०२६ मध्ये अंमलबजावणी
20
अणुऊर्जा क्षेत्र आता खासगी क्षेत्रासाठी खुले होणार; शांती विधेयक लोकसभेत बहुमताने मंजूर!
Daily Top 2Weekly Top 5

यशासाठी सहा मूलभूत तत्वांची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 2, 2018 23:51 IST

विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण केल्यास लक्ष्यपूर्ती होते,

ठळक मुद्देलखनसिंह कटरे : चोपा येथील रविंद्र विद्यालयात बक्षीस वितरण

लोकमत न्यूज नेटवर्कगोरेगाव : विद्यार्थ्यांचे शैक्षणिक जीवन अनेक खडतर परिस्थितीतून मार्गक्रमण करीत असते. समाजातील चांगल्या-वाईट अनुभवांची जाण त्यांच्यासोबत असते. पण विद्यार्थ्यांनी आपले लक्ष्य निर्धारित करुन यशासाठी परीक्षणासह पाच मुलभूत तत्वांचा वापर करुन शैक्षणिक कार्यकाळ पूर्ण केल्यास लक्ष्यपूर्ती होते, असे प्रतिपादन साहित्यिक तथा सेवानिवृत्त जिल्हा निबंधक लखनसिंह कटरे यांनी केले.तालुक्यातील ग्राम चोपा येथील रविंद्र विद्यालय व कनिष्ठ महाविद्यालयात स्रेहसंमेलन घेण्यात आले. दरम्यान बक्षीस वितरण सोहळ्यात ते पाहुणे म्हणून मार्गदर्शन करीत होते. अध्यक्षस्थानी सेवानिवृत्त प्राचार्य बी.ओ. वासनिक होते. बक्षीस वितरक म्हणून भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक हरिहर मानकर होते. पाहुणे म्हणून डी.आर. कटरे, रमेश कावळे, इंद्रराज बहेकार, गोविंद खंडेलवाल, उपसपरंच बरकत अली सैयद, हेमराज कोरे, बिसराम बहेकार, प्राचार्य आर.आर. डे, पर्यवेक्षक एच.बी. राऊत, स्नेहसंमेलन प्रभारी एल.बी. मेश्राम, डी.डी. लोखंडे, प्रा.टी.जी. पटेल, एस.जी. पटले उपस्थित होते.पुढे बोलताना कटरे यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक जीवनात ज्ञानप्राप्तीला अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञान प्राप्त करुन भावी जीवन यशस्वी करणे हा मार्ग होय. यश प्राप्तीसाठी सहा मुलभूत तत्वांची गरज असते ही तत्वे म्हणजे परिश्रम, निष्ठा, संयम, विवेक, नैतिकता व गणितीय वृत्ती हे होत. या सहा मूलभूत तत्वांचा आधार घेऊन विद्यार्थी यशोशिखर गाठू शकतो व भावी जीवन समृद्ध करु शकतो, असे सांगीतले.भवभूती शिक्षण संस्थेचे संचालक, माजी पंचात समिती सभापती तथा बक्षीस वितरक हरिहर मानकर यांनी, परिश्रमातून मिळविलेले यशचं खरे यश असते. जीवनात अपयश आले म्हणून विद्यार्थ्यांनी घाबरू नये. पहिल्यापेक्षा अधिक परिश्रम घेवून यश मिळवावे, असे मत व्यक्त केले.अध्यक्षीय भाषणात माजी प्राचार्य भाऊराव वासनिक यांनी, विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक कार्यात पालक, शिक्षक व विद्यार्थी हे तिन्ही घटक महत्वाचे आहेत. यात शिक्षकाची भूमिका ही संयमशील व विद्यार्थ्यांना नवनवीन संकल्पना मांडून शिकविण्याची असावी, असे मत व्यक्त केले.या वेळी हरिहर मानकर व कार्यक्रमाला उपस्थित इतर मान्यवरांच्या हस्ते स्नेह संमेलनांतर्गत घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांमध्ये सहभागी व विजेत्या विद्यार्थ्यांना प्रशस्तीपत्र व पारितोषिक देऊन गौरविण्यात आले. उपस्थितांचे आभार प्रा.टी.जी. पटेल यांनी मानले.