शहरं
Join us  
Trending Stories
1
महायुती सरकारमध्ये फूट, फडणवीस-शिंदे एकाकी; पाचवीपर्यंत हिंदी नको, अजित पवार गटाची भूमिका
2
पाणी अंगावर उडाले म्हणून कोयता घेऊन धावला; छत्रपती संभाजीनगरात नशेखोराचा धुमाकूळ
3
"उत्तर भारतीयांना तमिळ शिकायला सांगा"; हिंदी शत्रू नाही म्हणणाऱ्या अमित शाहांना कनिमोळींचे प्रत्युत्तर
4
अरे देवा! जीवघेण्या धबधब्याच्या काठावर 'ती' बनवत होती 'रील', थरकाप उडवणारा Video Viral
5
“काँग्रेसचा विचार संपवू शकत नाही, वहिनींना पक्षात घेऊन...”; विशाल पाटलांची भाजपावर टीका
6
आयआयटीच नव्हे, एलपीयूच्या विद्यार्थ्याला मिळाली २.५ कोटींची विक्रमी प्लेसमेंट ऑफर
7
भारताला दिलासा! मित्र देश पाकिस्तानलाच चीननं दिला मोठा झटका; शहबाज शरीफांचं टेन्शन वाढले
8
ठाकरे बंधूंच्या मोर्चात राष्ट्रवादी अजित पवार गट सहभागी होणार का? सुनील तटकरेंचे सूचक विधान
9
पत्नी म्हणाली "अंगाला हात लावू देणार नाही", चिडलेल्या पतीने व्हिडीओ सुरू केला, गळ्यावर पाय ठेवला अन्... 
10
केदारनाथ येथील हेलिकॉप्टर अपघातात पायलट मुलाचा मृत्यू, पुत्रवियोगाने दु:खी आईने १३ दिवसांनी सोडले प्राण  
11
Aadhaar Card वर तुम्ही मोबाइल नंबर ऑनलाइन बदलू शकता का? काय आहे सर्वात सोपी प्रोसेस, पाहा
12
पाकिस्तानात मोठा आत्मघातकी हल्ला; स्फोटात १३ जवान ठार तर २० हून अधिक गंभीर जखमी
13
₹५००० ची सामान्य एसआयपी की स्टेप अप SIP; कोणती पद्धत लवकर बनवू शकते श्रीमंत? पाहा नफ्याचं गणित
14
'लेडी सेहवाग'च्या 'कमबॅक'मध्ये सचिन तेंडुलकरचा हात! जाणून घ्या त्यामागची स्टोरी
15
रशियानं निभावली मैत्री! युक्रेन युद्धात मदत करणाऱ्या हुकुमशाह किमसाठी बनवला सुंदर सागरी किनारा
16
राज्यातील सर्वांत मोठे स्क्रॅपिंग सेंटर STच्या जागेवर उभारले जाणार; प्रताप सरनाईकांची माहिती
17
मालव्य राजयोगाने जूनची सांगता: ८ राशींना मालामाल होण्याची संधी, यश-पैसा-लाभ; जुलै शुभच ठरेल!
18
"भाषा धोरणात भाजपाचा दुटप्पीपणा उघड, गुजरातमध्ये पहिलीपासून हिंदीची सक्ती नाही तर महाराष्ट्रातच कशासाठी?’’ काँग्रेसचा सवाल   
19
प्रेमभंग झालेल्या युवतीनं १२ राज्यातील पोलिसांची झोप उडवली; समोर आली कहाणी, कोण आहे 'ती'?
20
Ashadhi Ekadashi 2025: वारकऱ्यांनी घेतली प्रेमानंद महाराजांची भेट, म्हणाले आमचा विठू तुमचा कृष्ण एकच!

विकासासाठी मानसिकता हवी

By admin | Updated: March 21, 2016 01:28 IST

ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांकडून नियोजन केले जाते. मात्र कितीही

गोंदिया : ग्रामीण विकासाच्या योजनांचा लाभ गावपातळीवर देण्यासाठी शासन आणि यंत्रणांकडून नियोजन केले जाते. मात्र कितीही नियोजन केले, तरी ग्रामपंचायतच्या माध्यमातून संबंधित लाभार्थ्यांना योजनांचा लाभ देण्यासाठी आणि गावाचा विकास करण्यासाठी लोकप्रतिनिधी आणि गावपातळीवर काम करणाऱ्या यंत्रणेच्या कर्मचाऱ्यांची गावाच्या विकासाप्रती चांगली मानिसकता असणे महत्वाचे आहे असे प्रतिपादन आदर्श हिवरेबाजारचे माजी सरपंच तथा राज्यस्तरीय आदर्श गाव समितीचे अध्यक्ष पोपटराव पवार यांनी केले.जवळील ग्राम कटंगीकला येथे शनिवारी (दि.१९) घेण्यात आलेल्या जिल्हास्तरीय सरपंच मेळावा व स्वच्छ भारत मिशन (ग्रामीण) कार्यशाळेत ‘आमचा गाव, आमचा विकास’ या विषयावरील कार्यशाळेत प्रमुख मार्गदर्शक म्हणून ते बोलत होते. यावेळी दुसरे प्रमुख मागदर्शक म्हणून नांदेड जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी अभिमन्यू काळे उपस्थित होते. पुढे बोताना पवार यांनी, गाव स्वयंपूर्ण करण्यासाठी उत्तम आरोग्य, चांगले शिक्षण, शुद्ध पिण्याचे पाणी, चांगल्या प्रकारची शेती आणि गावात सद्भावनापूर्ण वातावरण असणे महत्वाचे आहे. गावाच्या विकासाच्या दृष्टीने यंत्रणा ही सक्र ीय असली पाहिजे. ग्रामसभा ही तेव्हाच यशस्वी होते जेव्हा सरपंच, सचिव आणि ग्रामसभेचा प्रत्येक सदस्य स्वत:ला झोकून देऊन विकासाच्या नियोजनाचे काम करतात. गावाच्या विकासासाठी ग्रामस्थांच्या एकजूटीची आवश्यकता आहे. ग्रामपंचायत ही गावाची मंदीर झाली पाहिजे असे मत व्यक्त केले. सर्वसामान्य व्यक्तीला अन्न, वस्त्र, निवारा, आणि पिण्याचे पाणी देणारी व्यवस्था ग्रामपंचायतमधून निर्माण झाली पाहिजे. ग्रामविकासाची कुंडली लोकप्रतिनिधींनी तयार केली पाहिजे. या कुंडलीमध्ये शिक्षण, आरोग्य, पिण्याचे पाणी, सिंचनाची व्यवस्था आणि रोजगार निर्मितीचे नियोजन असले पाहिजे. तरच ग्रामविकासाला चालना मिळेल असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.तर काळे यांनी, जिल्हा रोगराईमुक्त करण्यासाठी आधी डासांचा नायनाट करणे महत्वाचे आहे. सांडपाण्यामुळे डास आणि घाण तयार होते. यावर मात करण्यासाठी डासांच्या अळ््या प्रथम नष्ट केल्या पाहिजे. त्यांचे जीवनचक्र तोडून डासांची उत्पत्ती थांबविली पाहिजे. सांडपाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी शोषखड्डे तयार केले पाहिजे. गटारे वाहणार नाही याची काळजी घेतली पाहिजे. गटारे कोरडी असली पाहिजे. गावे गटारमुक्त झाली तर कोट्यवधी रु पयांची बचत होईल असे सांगून ते म्हणाले, शोषखड्यांमुळे पाण्याचा निचरा भूगर्भात होऊन भूजल पातळीत वाढ होण्यास शोषखड्डे उपयुक्त ठरणार असल्याचे त्यांनी सांगितले. या कार्यशाळेला जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती समित्यांचे सभापती, उपसभापती, सदस्य, ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच मोठ्या संख्येत उपस्थित होते. (शहर प्रतिनिधी)