शहरं
Join us  
Trending Stories
1
गाझापट्टीत ६० दिवस युद्धविराम; अमेरिकेचे राष्ट्रपती डोनाल्ड ट्रम्प यांचा आणखी एक मोठा दावा
2
तीन महिन्यांत ७६७ शेतकरी आत्महत्या; मदत व पुनर्वसन मंत्र्यांची विधान परिषदेत कबुली
3
नाना पटोले अध्यक्षांकडे धावले; राजदंडाला हात लावला, निलंबित
4
पंचतारांकित हॉटेलमध्ये नेऊन विद्यार्थ्याचं लैंगिक शोषण, प्रतिष्ठित शाळेतील शिक्षिका अटकेत  
5
आजचे राशीभविष्य- २ जुलै २०२५: 'या' राशीतील लोकांनी अवैध कृत्यांपासून दूर राहा, वाणीवर संयम ठेवा
6
मुलींचे लैंगिक शोषण; नराधमांना सोडणार नाही; बीड कोचिंग क्लास प्रकरणात एसआयटी
7
"मी ना तिचा बाप आहे ना बॉयफ्रेंड", फातिमा सना शेखसोबतच्या नात्यावर आमिर खानची प्रतिक्रिया
8
शेतकऱ्यांना फसविले, विमा कंपन्या होणार ब्लॅक लिस्ट; कृषिमंत्री माणिकराव कोकाटेंची माहिती
9
‘ठाकरे ब्रँड’चे शनिवारी मेळाव्यानिमित्त शक्तिप्रदर्शन; राज-उद्धव वरळी डोममध्ये एकाच व्यासपीठावर
10
‘खरे सुख श्रमाच्या पोटीच जन्म घेते; विसरू नका!’
11
शालार्थ आयडी, ३ महिन्यांत होणार एसआयटी चौकशी, शिक्षणमंत्री दादा भुसेंची माहिती
12
कोण खरे बोलते आहे? आणि कोणाचे दावे झूठ आहेत?
13
विधिमंडळाची ही आचारसंहिता; पण आमदार तसे वागतात का?
14
कुंडमळा पुलाच्या बांधकामात दिरंगाई झाली; सार्वजनिक बांधकाममंत्री भोसले यांची कबुली
15
बाळासाहेब ठाकरे यांचे महापौर बंगल्यातच स्मारक; उच्च न्यायालयाने आव्हान याचिका फेटाळल्या
16
वसई-विरारमध्ये १६ ठिकाणी ईडीची धाड; अनधिकृत इमारती प्रकरणी आर्किटेक्ट, अभियंते रडारवर
17
मराठी सक्तीचीच, पण हिंदीचाही अभिमान, मराठी माणसाला मुंबईतून कोणी घालविले : मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा हल्लाबोल
18
डेटिंगवरून वाद विकोपाला, मुलीने जीव गमावला; सीसीटीव्ही, साक्षीदारांमुळे तपासाला दिशा
19
टायर-ट्यूबमधून जीवघेणा प्रवास, जव्हार तालुक्यातील प्रकार : पूल तर नाहीच, पण होडीसुद्धा उपलब्ध नाही
20
जहाजाच्या पुढील प्रवासाला ना हरकत देण्यासाठी लाचखोरी ; पोर्ट विभागाच्या ३ कॅप्टनसह दोघे सीबीआयच्या जाळ्यात

संस्कृती टिकविण्यासाठी संस्कार रुजविण्याची गरज

By admin | Updated: October 16, 2016 00:27 IST

देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे.

आमगाव : देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे. संघाला एका तासाच्या शाखेत संस्कृती व कर्तृत्वाचे धडे शिकविले जातात. त्यामधून सुसंस्कृत तरूण घडतात. त्यामुळे संघाचे संस्कार समाजात रुजविण्याची नितांत गरज आहे. हीच तरूण पिढी समाजात समरसता निर्माण करेल व समाजाला तोडण्याचे कृत्य करण्याची तोंड बंद होतील. संघाची याच दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मत अभाविप विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेंद दळवी यांनी व्यक्त केले. आमगावच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. १२ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता हा उत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी लीलाधर कलंत्री, तालुका संघचालक निताराम अंबुले, नगर कार्यवाह दिनेश शेंडे उपस्थित होते. सुरूवात शस्त्र व भारतमातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर स्वयंसेवकानी शारीरिक प्रात्यक्षिके, योगासन व व्यायाम योग सादर केले. वैयक्तिक गीत, सुभाषिते, घोष सादर केले. शैलेंद्र दळवी पुढे म्हणाले, भारत देशाला पराक्रमाची ऐतिहासीक परंपरा लाभलेली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली. तेव्हा येथील युवा पिढीने त्यांच्या शौर्याचे प्रदर्शन करीत देशाला वैभव प्राप्त करून दिले. परंतु देशात सध्या वैचारिक मतभेदाची मोठी लढाई सुरू आहे. जे.एन.यु.सारख्या घटना घडत आहेत. अशा विघातक शक्तीविरूध्द देशातील ७० टक्के युवकांनी त्यांचे योगदान द्यावे. लिलाधर कलंत्री यांनी समाजाला संघाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी प्रास्ताविक केले. अतिथीचा परिचय करून दिला. याप्रसंगी नगरातील नागरिक, स्वयंसेवक, सेविका कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता स्वयंसेवकाचे नगराच्या मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन केले. ठिकठिकाणी त्याच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)