शहरं
Join us  
Trending Stories
1
ईडीने छापा टाकला,आमदार भिंतीवरून उडी मारून पळून गेले, फोनही नाल्यात फेकला; अधिकाऱ्यांनी केली अटक
2
अखेर ठरलं! एल्फिन्स्टन पूल 'या' दिवशी होणार बंद, वाहतूक विभागाने दिली माहिती
3
'एकीला पाठवून आता पश्चात्ताप करतोय, आता दुसरीला त्यांच्याकडे...'; लेकीच्या आठवणीने निक्कीची आईला अश्रू अनावर!
4
तुमच्याकडेही SBI क्रेडिट कार्ड आहे का? आता 'हे' फायदे कायमचे बंद, १ सप्टेंबरपासून नवा नियम लागू
5
तेल व्यवसायाचा King! अमेरिका पाहत राहिला..; भारताने जगाला विकले ५.३५ लाख कोटींचे तेल
6
शाहरुखसोबत अनेक वर्षांनी मिटला वाद, आता सनी देओलने किंग खानच्या लेकाची केली स्तुती
7
'या'वर लागू शकतो मोठा टॅक्स, महाग होऊ शकतात 'या' वस्तू; पुढील आठवड्यात घोषणा होणार?
8
गर्भनिरोधक गोळ्यांचं ऑनलाइन पेमेंट फेल झालं अन् पतीचं 'लफडं' उघडं पडलं; मग पत्नीनं उचललं टोकाचं पाऊल
9
पाण्याच्या टाकीत लपवले होते ३९ लाख रुपये! जप्त केलेल्या पैशांचे आणि मालमत्तेचे पुढे काय होते?
10
राहुल गांधी विरुद्ध निवडणूक आयोग! 'मतचोरी'च्या मुद्द्यावर जनतेची साथ कुणाला? सर्व्हेतून धक्कादायक खुलासा
11
कधीही पिऊ नका 'हे' ३ ज्यूस, फायद्याऐवजी होईल नुकसान; डॉक्टरांनीच दिला धोक्याचा इशारा
12
Maharashtra Rain: कमी दाबाच्या पट्टा कसा तयार होतो, त्यामुळे महाराष्ट्रात इतका पाऊस का पडतो?
13
खेडचे माजी नगराध्यक्ष वैभव खेडेकर यांच्यासह ३ जणांची मनसेतून हकालपट्टी; राज ठाकरेंचे आदेश
14
सर्वांनी यावेळी तुटून पडा; मनोज जरांगे यांनी मुंबईकडे कूच करण्याचा संपूर्ण प्लॅनच सांगितला!
15
मनसेच्या २ माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेश; एकनाथ शिंदेंच्या उपस्थितीत हाती घेतला धनुष्यबाण
16
"मनोज जरांगे, तुम्हाला एवढीच जर खाज आहे, तर ज्या शरद पवारांनी..."; आमदार लाड, दरेकर का भडकले?
17
गणेश चतुर्थी २०२५: गणेशोत्सवात कोणते नियम अवश्य पाळायलाच हवेत? पाहा, शास्त्र काय सांगते...
18
Asia Cup 2025 : विराट-रोहितच्या खांद्यावरून पाकच्या माजी क्रिकेटरचा सूर्या दादावर निशाणा, म्हणे...
19
Ganpati Invitation Messages: गणेश चतुर्थीला मित्र-नातेवाईकांना WhatsApp, Facebook वर हे खास संदेश पाठवून करा स्पेशल आमंत्रण
20
आयुष्य संपवण्यासाठी नदीत उडी मारली पण नंतर मूड बदलला, मदतीसाठी ओरडला अन्...

संस्कृती टिकविण्यासाठी संस्कार रुजविण्याची गरज

By admin | Updated: October 16, 2016 00:27 IST

देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे.

आमगाव : देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे. संघाला एका तासाच्या शाखेत संस्कृती व कर्तृत्वाचे धडे शिकविले जातात. त्यामधून सुसंस्कृत तरूण घडतात. त्यामुळे संघाचे संस्कार समाजात रुजविण्याची नितांत गरज आहे. हीच तरूण पिढी समाजात समरसता निर्माण करेल व समाजाला तोडण्याचे कृत्य करण्याची तोंड बंद होतील. संघाची याच दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मत अभाविप विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेंद दळवी यांनी व्यक्त केले. आमगावच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. १२ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता हा उत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी लीलाधर कलंत्री, तालुका संघचालक निताराम अंबुले, नगर कार्यवाह दिनेश शेंडे उपस्थित होते. सुरूवात शस्त्र व भारतमातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर स्वयंसेवकानी शारीरिक प्रात्यक्षिके, योगासन व व्यायाम योग सादर केले. वैयक्तिक गीत, सुभाषिते, घोष सादर केले. शैलेंद्र दळवी पुढे म्हणाले, भारत देशाला पराक्रमाची ऐतिहासीक परंपरा लाभलेली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली. तेव्हा येथील युवा पिढीने त्यांच्या शौर्याचे प्रदर्शन करीत देशाला वैभव प्राप्त करून दिले. परंतु देशात सध्या वैचारिक मतभेदाची मोठी लढाई सुरू आहे. जे.एन.यु.सारख्या घटना घडत आहेत. अशा विघातक शक्तीविरूध्द देशातील ७० टक्के युवकांनी त्यांचे योगदान द्यावे. लिलाधर कलंत्री यांनी समाजाला संघाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी प्रास्ताविक केले. अतिथीचा परिचय करून दिला. याप्रसंगी नगरातील नागरिक, स्वयंसेवक, सेविका कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता स्वयंसेवकाचे नगराच्या मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन केले. ठिकठिकाणी त्याच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)