शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: देशात जातिनिहाय जनगणना होणार; केंद्रातील मोदी सरकारचा मोठा निर्णय
2
"PM मोदींना लष्कराला फ्री हॅन्ड देण्याचा अधिकारच नाही, तो तर..."; प्रकाश आंबेडकरांचं थेट कायद्यावर बोट
3
देवेंद्र फडणवीसांच्या लेकीला दहावीत 92 टक्के; 'वर्षा'मध्ये गृहप्रवेश केल्यावर अमृता फडणवीसांनी दिली आनंदाची बातमी
4
'अब तो नाम पूछना ही पडेगा...'; भोपाळमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलानं लावले पोस्टर!
5
दहशतवाद्यांचे लॉन्च पॅड, हाफिज सईद, मसूदचे अड्डे, कारवाईदरम्यान या पाच ठिकाणांना भारत करू शकतो लक्ष्य
6
कुछ तो बडा होने वाला है...! पंतप्रधान नरेंद्र मोदींचा रशिया दौरा रद्द; भारताने नाही पुतीन यांच्या खास नेत्याने जाहीर केले...
7
चांगले संकेत असूनही बाजारात घसरण कायम! कोणते शेअर वधारले; कुठे बसला फटका
8
जिद्दीला सलाम! मुलाच्या जन्मानंतर १७ दिवसांनी दिली UPSC; IAS होण्याचं स्वप्न केलं साकार
9
रोहित शर्माच्या आईने 'हे' खास १२ फोटो वापरून आपल्या मुलाला दिल्या वाढदिवसाच्या शुभेच्छा
10
राज्यातील ओबीसी आरक्षण संपल्यात जमा; आरक्षणाला कसलाही धक्का लागू नये, हीच मागणी - लक्ष्मण हाके
11
"सर, माझ्याकडे १२ सेकंदांचा Video..."; आवाज ऐकताच वाजू लागले फोन? NIA टीम एक्टिव्ह
12
सुनील नारायणची विश्वविक्रमाशी बरोबरी; केकेआरसाठी केली खास कामगिरी!
13
पाकिस्तानचं आर्थिक कंबरडं मोडणार? हल्ल्याच्या भीतीने शेअर बाजार धडाम; काय आहे परिस्थिती?
14
अभिनेत्री लग्नानंतर ६ वर्षांनी होणार आई, व्हिडिओ शेअर करत दिली गुडन्यूज; पतीही आहे अभिनेता
15
१ मे रोजी गुरुवार पण बंद राहणार शेअर बाजार; कारण काय? जाणून घ्या
16
राधाकृष्ण विखे पाटलांना दणका; फसवणुकीप्रकरणी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
17
Nashik Crime: हर्षद पाटणकरच्या सांगण्यावरून करण चौरेची हत्या; तपासातून समोर आली खबळजनक माहिती
18
LoC Tensions Escalate: तणाव वाढताच पाकिस्तानी जवानांनी सीमेवरील चौक्या सोडल्या, झेंडेही हटवले
19
मनीष सिसोदिया आणि सत्येंद्र जैन पुन्हा अडचणीत; आता ₹2000 कोटींच्या भ्रष्टाचाराचा आरोप
20
भारत-पाकिस्तान युद्ध झालेच तर पाकिस्तानच्या बाजुने कोणते देश? भारताला कोण मदत करू शकतो...

संस्कृती टिकविण्यासाठी संस्कार रुजविण्याची गरज

By admin | Updated: October 16, 2016 00:27 IST

देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे.

आमगाव : देशात काही लोक समाजाला धर्म व जातीच्या नावावर तोडण्याचे कृत्य करीत आहेत. तर संघ समाजाला संघटीत करून भारतीय संस्कृतीचे जतन करण्याचे निरंतर कार्य करीत आहे. संघाला एका तासाच्या शाखेत संस्कृती व कर्तृत्वाचे धडे शिकविले जातात. त्यामधून सुसंस्कृत तरूण घडतात. त्यामुळे संघाचे संस्कार समाजात रुजविण्याची नितांत गरज आहे. हीच तरूण पिढी समाजात समरसता निर्माण करेल व समाजाला तोडण्याचे कृत्य करण्याची तोंड बंद होतील. संघाची याच दिशेने वाटचाल सुरू आहे, असे मत अभाविप विदर्भ प्रांत संघटन मंत्री शैलेंद दळवी यांनी व्यक्त केले. आमगावच्या विजयादशमी उत्सवात प्रमुख वक्ते म्हणून ते बोलत होते. १२ आॅक्टोबरला सायंकाळी ६ वाजता हा उत्सव कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभागृहात घेण्यात आला. यावेळी प्रमुख अतिथी लीलाधर कलंत्री, तालुका संघचालक निताराम अंबुले, नगर कार्यवाह दिनेश शेंडे उपस्थित होते. सुरूवात शस्त्र व भारतमातेच्या पूजनाने झाली. त्यानंतर स्वयंसेवकानी शारीरिक प्रात्यक्षिके, योगासन व व्यायाम योग सादर केले. वैयक्तिक गीत, सुभाषिते, घोष सादर केले. शैलेंद्र दळवी पुढे म्हणाले, भारत देशाला पराक्रमाची ऐतिहासीक परंपरा लाभलेली आहे. जेव्हा जेव्हा देशावर संकटे आली. तेव्हा येथील युवा पिढीने त्यांच्या शौर्याचे प्रदर्शन करीत देशाला वैभव प्राप्त करून दिले. परंतु देशात सध्या वैचारिक मतभेदाची मोठी लढाई सुरू आहे. जे.एन.यु.सारख्या घटना घडत आहेत. अशा विघातक शक्तीविरूध्द देशातील ७० टक्के युवकांनी त्यांचे योगदान द्यावे. लिलाधर कलंत्री यांनी समाजाला संघाची नितांत गरज असल्याचे मत व्यक्त केले. नगर कार्यवाह दिनेश शेंडे यांनी प्रास्ताविक केले. अतिथीचा परिचय करून दिला. याप्रसंगी नगरातील नागरिक, स्वयंसेवक, सेविका कार्यक्रमाला उपस्थित होते. तत्पूर्वी सकाळी ८ वाजता स्वयंसेवकाचे नगराच्या मुख्य मार्गावरून शिस्तबद्ध पथसंचलन केले. ठिकठिकाणी त्याच्यावर पुष्प वर्षाव करण्यात आला. (शहर प्रतिनिधी)