शहरं
Join us  
Trending Stories
1
भारत-फ्रान्स यांच्यात आज होणार Rafale-M jetsचा करार; भारतीय नौदल होणार अधिक सामर्थ्यवान
2
DC vs RCB : भर मैदानात कोहली-केएल राहुल यांच्यात वाजलं? नेमकं काय घडलं? (VIDEO)
3
पाकिस्तानी नागरिकांनी दिलेल्या वेळेत भारत सोडला नाही तर बसणार मोठा दणका, काय होणार शिक्षा?
4
Shocking!! सायबर चौकात दहशत! कोल्हापुरात सराईत गुंडाकडून तलवारीने हल्ला; दोघे जखमी
5
राज्याला हादरवणाऱ्या शिक्षण घोटाळ्याची ईडीने मागविली माहिती; SIT गठीत करण्याच्या हालचालींना वेग
6
ट्रक-बोलेरोच्या भीषण अपघातात चार जण जागीच ठार; एक जण गंभीर जखमी, रुग्णालयात दाखल
7
धक्कादायक! नागपुरातील भोसले घराण्याची ऐतिहासिक तलवार आंतरराष्ट्रीय कंपनीकडून ऑनलाईन विक्रीला
8
"देशाच्या सुरक्षेसाठी शिवसैनिक जवानांसारखा लढेल, ही लढाई..."; DCM एकनाथ शिंदे यांचे वक्तव्य
9
भुवीनं साधला मोठा डाव! IPL च्या इतिहासात सर्वाधिक विकेट्स घेणारा ठरला दुसरा गोलंदाज
10
पाकिस्तानात मोठी कारवाई! खैबर पख्तूनख्वा प्रांतात घुसखोरी करणारे ५४ TTP समर्थक ठार
11
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित एक ओव्हर नाही टिकला; पण दोन चेंडूत विराटची बरोबरी करून परतला
12
मध्य प्रदेशात भीषण अपघात; भरधाव कार विहिरीत कोसळली, 12 जणांचा मृत्यू
13
"शरद पवारांनी जाणीवपूर्वक 'ते' वक्तव्य केले"; पहलगामबाबतच्या 'त्या' विधानावरुन भुजबळांचे स्पष्टीकरण
14
पाकिस्तानात भीतीचे वातावरण; लष्कर प्रमुखानंतर बिलावल भुट्टोचे कुटुंबीय देश सोडून पळाले
15
जसप्रीत बुमराहची रेकॉर्ड ब्रेक स्पेल; मुंबई इंडियन्सकडून 'अशी' कामगिरी करणारा पहिलाच!
16
सीमेवर तणाव वाढताच पाकिस्तानने चीनकडे मागितले १.४ बिलियन डॉलर
17
"लाडक्या बहि‍णी १५०० मध्ये खूष, २१०० रुपये देऊ असं कुणीच म्हटलं नाही"; नरहरी झिरवाळांचे विधान
18
MI vs LSG : बॅटिंग-बॉलिंग सगळ्यात भारी! पुन्हा दिसतोय MI चा चॅम्पियनवाला तोरा
19
IPL 2025: गगनचुंबी षटकार तोही बुमराहला; बिश्नोईचा आनंद गगनात मावेना! पंतची रिॲक्शनही व्हायरल (VIDEO)
20
Suryakumar Yadav : ...अन् सूर्या भाऊ ठरला IPL मध्ये सर्वात कमी चेंडूत ४००० धावा करणारा भारतीय

पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:40 IST

नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.

ठळक मुद्देजनजागृती आवश्यक : वाहन व जनावर धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.एकीकडे माठभर पाण्यासाठी पायपीट सुरु असते. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय सुरु असतो. यावर पाबंद घालणे गरजेचे आहे. अन्यथा आपणाला भविष्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.नदीतून पाणी आणताना यंत्रणा पाणी शुद्ध करते. यासाठी पाणी आणणे ते फिल्टर हाऊसमध्ये नेणे, तेथे शुद्धीकरण करणे, मग ते पाणी टाकीत साठवून दररोज वार्डानुसार सोडणे, याकरिता पाण्यासाठी काही खर्च आलेला असतो. पण याचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लीटर पाणी लागते. अशा तºहेने पाण्याचा वपार केला तर पाणी पुरणार कसे.नळाला पाणी जाईपर्यंत अनेकजण नको तितके पाणी वापरतात. घरातील कामे झाली की पाईप जोडतात, मग ते अंगणात व झाडांना पाणी टाकत असतात. सर्वाधिक पाणी वाहन आणि जनावरे धुण्यासाठी वापरले जाते.अनेकजण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार व अन्य वाहन तसेच जनावरे धुतात. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते.पाणी बचतीसाठी जनजागृती गरजेचीशहरी तसेच बहुतेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जातो. असाच पाण्याचा अपव्यय होत राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा समाना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई