शहरं
Join us  
Trending Stories
1
मी दिलेला '२५ जागांचा शाप' खरा ठरला!; तेजस्वी यादवांनी तिकीट नाकारले तेव्हा रडणाऱ्या नेत्याचा दावा 
2
“जो जीता वही सिकंदर, पण सिकंदर बनायचे राज समजू शकले नाही”; बिहार निकालावर उद्धव ठाकरे बोलले
3
"सुन लो जयचंदों...! माझ्या वडिलांनी एक इशारा दिला तर...!", रोहिणी आचार्य वादावरून तेजप्रताप भडकले
4
राहुल गांधींमुळे काँग्रेसच्या तरुण खासदारांचे भविष्य धोक्यात; PM मोदींचा घणाघात...
5
लालूप्रसाद यादवांना निकामी किडनी दिली; तेजस्वी यादव अन् बहीण रोहिणी आचार्य यांच्यात तू तू मै मै, चप्पलफेक...
6
ICC WTC Points Table : टीम इंडियापेक्षा लंका भारी! दक्षिण आफ्रिकेची दुसऱ्या स्थानावर झेप
7
सावधान! डिजिटल गोल्डमध्ये गुंतवणूक करताय? 'या' ३ मोठ्या जोखमींमुळे पैसे बुडण्याची शक्यता
8
प्रेमासाठी ओलांडल्या देशासह धर्माच्या सीमा; पाकिस्तानी तरुणावर जडला भारतीय महिलेचा जीव
9
बिहारमध्ये सत्ता स्थापनेच्या हालचालींना वेग; मंत्रिमंडळ वाटपाचा फॉर्म्युला ठरला?
10
पत्नीच्या नावाने म्युच्युअल फंडात SIP करताय? टॅक्स स्लॅब आणि 'कॅपिटल गेन्स'चे नियम स्पष्ट समजून घ्या!
11
जबरदस्तीची मिठी अन् दोन वेळा Kiss...! प्रसिद्ध ज्वेलर्सच्या मुलाचं घाणेरड कृत्य; व्हिडिओ व्हायरल
12
भारताचा लाजिरवाणा पराभव! आफ्रिकेने हरवल्यानंतर उपकर्णधार पंत म्हणतो- "आज झालेला पराभव...
13
दिल्ली स्फोट प्रकरण: डझनभर डॉक्टरांचे फोन बंद; 'अल फलाह' विद्यापीठातील मोठे नेटवर्क उघड
14
IND vs SA : आम्ही जिंकलो असतो तर...! लाजिरवाण्या पराभवानंतर नेमकं काय म्हणाले कोच गौतम गंभीर?
15
‘वंदे भारत’च्या मदतीला TATA कंपनी? ट्रेन बांधणीत ठरणार गेम चेंजर! ‘मेक इन इंडिया’ वेग घेणार
16
टीम इंडियासमोर दक्षिण आफ्रिकेची कमाल! 'लो स्कोअरिंग' टेस्टमध्ये बेस्ट कामगिरीसह मारली बाजी
17
“काही ठिकाणी महायुती झाली, कुठे नाही, परवापर्यंत सगळे समजेल”: CM फडणवीसांनी केले स्पष्ट
18
प्यार किया तो डरना क्या! ८३ वर्षीय आजीच्या प्रेमात वेडा झाला २३ वर्षांचा तरुण, कुटुंबाने दिली साथ
19
याला म्हणतात धमाका शेअर...! फक्त 2 वर्षांत दिला 16000% परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल आता 5 बोनस शेअर वाटणार कंपनी
20
जैश टेरर मॉड्यूलवर मोठी कारवाई: अनंतनागमध्ये छाप्यानंतर हरियाणाची महिला डॉक्टर ताब्यात
Daily Top 2Weekly Top 5

पाण्याचा अपव्यय टाळण्याची गरज

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 25, 2019 20:40 IST

नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.

ठळक मुद्देजनजागृती आवश्यक : वाहन व जनावर धुण्यासाठी मोठ्या प्रमाणात वापर

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नळ आल्यानंतर घरातील संपूर्ण पाणी भरुन झाल्यानंतर अनेकजण थेट नळाला पाईप लावून गरज नसतांनाही चारचाकी वाहन व गोठ्यातील जनावरे रस्त्यावर आणून धूत असतात. पाणी भरुन झाल्यानंतर नळाचे पाणी बंद करणे गरजेचे असताना नळ सुरु आहे म्हणून अनावश्यक पाण्याची नासाडी केली जाते.एकीकडे माठभर पाण्यासाठी पायपीट सुरु असते. तर बऱ्याच ठिकाणी पाण्याचा अपव्यय सुरु असतो. यावर पाबंद घालणे गरजेचे आहे. अन्यथा आपणाला भविष्यात पाण्यासाठी संघर्ष करावा लागणार आहे.नदीतून पाणी आणताना यंत्रणा पाणी शुद्ध करते. यासाठी पाणी आणणे ते फिल्टर हाऊसमध्ये नेणे, तेथे शुद्धीकरण करणे, मग ते पाणी टाकीत साठवून दररोज वार्डानुसार सोडणे, याकरिता पाण्यासाठी काही खर्च आलेला असतो. पण याचा विचार न करता सकाळी उठल्यापासून ते रात्री झोपेपर्यंत एका व्यक्तीला ८ ते ८० लीटर पाणी लागते. अशा तºहेने पाण्याचा वपार केला तर पाणी पुरणार कसे.नळाला पाणी जाईपर्यंत अनेकजण नको तितके पाणी वापरतात. घरातील कामे झाली की पाईप जोडतात, मग ते अंगणात व झाडांना पाणी टाकत असतात. सर्वाधिक पाणी वाहन आणि जनावरे धुण्यासाठी वापरले जाते.अनेकजण आठवड्यातून दोन ते तीन वेळा कार व अन्य वाहन तसेच जनावरे धुतात. त्यामुळे दररोज शेकडो लिटर पाणी वाया जात असते.पाणी बचतीसाठी जनजागृती गरजेचीशहरी तसेच बहुतेक ग्रामीण भागात मोठ्या प्रमाणात पाणीटंचाई आहे. मात्र बहुतेक ठिकाणी पाण्याचा अपव्यय केला जातो. असाच पाण्याचा अपव्यय होत राहिल्यास भविष्यात पाण्यासाठी मोठ्या अडचणींचा समाना करावा लागणार आहे. त्यामुळे पाणी बचतीसाठी जनजागृती करणे गरजेचे आहे.

टॅग्स :water shortageपाणीटंचाई