शहरं
Join us  
Trending Stories
1
Devendra Fadnavis: ४८ तासात पाकिस्तानी लोकांनी देश न सोडल्यास कारवाई करण्यात येणार; मुख्यमंत्र्यांचा इशारा
2
सिंधूच्या पाण्याचा एक थेंबही पाकिस्तानात जाणार नाही...! पण एवढं पाणी भारत कसं वापरणार? ३ पर्यायांवर होतोय विचार
3
CM पदाबाबत आता खुद्द फडणवीसांनी मनातील इच्छा बोलून दाखवली; बावनकुळेंच्या विधानावर म्हणाले...
4
दहशतवाद्यांचे कंबरडे मोडण्याची तयारी, अनंतनागमधून १७५ जण ताब्यात, लष्कराची मोठी कारवाई
5
'लष्करी कारवायांचे थेट वार्तांकन करू नका; पहलगाम हल्ल्यानंतर केंद्राचा मोठा निर्णय, माध्यमांना सूचना
6
VIDEO: सीमेवर युद्धाची तयारी? लोकांकडून जमिनीखालील सरकारी तळघरांची साफसफाई
7
कधी सारा, कधी अनन्या, अनेक अभिनेत्रींसोबत जोडलं गेलं नाव, शुभमन गिल म्हणतो, "मागच्या ३ वर्षांपासून मी…”  
8
पहलगाम हल्ला: पाकव्याप्त काश्मीर ताब्यात घेणे हाच पर्याय!; ठाकरे गटाची स्वाक्षरी मोहीम
9
“शरद पवारांना आणखी काय पुरावा हवा? कटू सत्य...”; ‘त्या’ विधानावरून मनसे नेत्यांचा पलटवार
10
आता तेही नको! भारत-पाक क्रिकेट संदर्भात गांगुलीचं मोठं वक्तव्य; म्हणाला...
11
पहलगामचा हल्ला, भारताचा पाकवरील 'स्ट्राईक' आणि तिसरं महायुद्ध; नॉस्ट्रॅडॅमसचे भाकित काय?
12
पाकिस्तानला ड्रोन हल्ल्याची भीती! सैनिकांना फोन बंद करण्याचे दिले निर्देश
13
इराणच्या राजाई बंदरात भीषण स्फोट; ४०६ जखमी, अनेकांचा मृत्यू झाल्याची भीती
14
पाकिस्तानींना देश सोडण्याचे आदेश, अदनान सामी सोशल मीडियावर झाला ट्रोल, अखेर संतापून म्हणाला...  
15
"सीमा हैदर भारताची सून, तिला पाकिस्तानात पाठवू नका", राखी सावंतची विनंती, म्हणाली...
16
“२०३४ नंतरही फडणवीस CM असावेत, भाजपाची सत्ता अविरत राहावी”; भाजपा नेत्यांची ‘मन की बात’
17
भारताजवळ आहेत दोन शक्तिशाली ब्रह्मास्त्रं, पाकिस्तानमधील लाहोर, कराचीसारखी शहरं क्षणार्धात करू शकतात नष्ट
18
Mumbai Fire: अंधेरीत आठ मजली इमारतीत अग्नितांडव, १ महिलेचा मृत्यू; ६ जण जखमी
19
पाकचे पंतप्रधान आता तटस्थ चौकशीस तयार, CM ओमर अब्दुल्लांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले...
20
पहलगाम हल्ल्याची आधी जबाबदारी घेतली, आता भारताने कारवाई सुरू केल्यावर टीआरएफचा 'यू-टर्न'

जिल्ह्यातील दोन विधानसभा मतदारसंघावर राष्ट्रवादीचा दावा कायम- अनिल देशमुख

By अंकुश गुंडावार | Updated: November 22, 2023 21:44 IST

हिवाळी अधिवेशनाची वाट न पाहता धानाला बोनस जाहीर करा

गोंदिया: खरी राष्ट्रवादी काँग्रेस कुणाची याचा निर्णय लवकरच होईल. पण राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट संपूर्ण ताकीदीने विदर्भासह महाराष्ट्रातील विधानसभेच्या जागा महाविकास आघाडीत लढवेल. गोंदिया जिल्ह्यातील अर्जुनी मोरगाव आणि तिरोडा विधानसभा मतदारसंघावर पुर्वीपासून राष्ट्रवादी काँग्रेसच्या वाट्याला असून या मतदारसंघावर राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचा दावा कायम राहिल. तसेच लोकसभा मतदारसंघाबाबत सुध्दा महाविकास आघाडीच्या बैठकीत निर्णय घेण्यात येईल असे राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते माजी मंत्री अनिल देशमुख यांनी गोंदिया येथे बुधवारी (दि.२२) आयोजित पत्रकार परिषदेत सांगितले.

स्थानिक प्रिन्स लाॅन येथे आयोजित पत्रकार परिषदेला खा. खुशाल बोपचे, राष्ट्रवादी काँग्रेसचे उपाध्यक्ष बजरंगसिंह परिहार, माजी आ. दीनानाथ पडोळे, दिलीप पनकुले, रविकांत बोपचे, जिल्हाध्यक्ष सौरभ रोकडे, जिल्हा कार्याध्यक्ष मिथून मेश्राम उपस्थित होते. अनिल देशमुख म्हणाले महाराष्ट्रात गेल्या दीड वर्षापासून केवळ फोडाफोडीचे राजकारण सुरु आहे. सरकारचे सर्व लक्ष याच गोष्टींकडे आहे. त्यामुळे शेतकरी, शेतमजुर, बेरोजगार व जनतेच्या समस्यांकडे दुर्लक्ष झाले आहे. यामुळे जनतेच्या मनात या सरकारप्रती प्रचंड आकस असून हा आकस २०२४ निवडणुकीत दिसून असा दावा केला. राज्यात महाविकास आघाडीचे सरकार असताना धानाला प्रति क्विंटल ७०० रुपये बोनस जाहीर केला होता. मात्र या सरकारने हेक्टरी बोनस जाहीर करुन शेतकऱ्यांची दिशाभूल केली. धानाला बोनस जाहीर करण्यासाठी हिवाळी अधिवेशनाची प्रतीक्षा न करता त्वरित हेक्टरी २५ हजार रुपये बोनस जाहीर करण्याची मागणी यावेळी केली. यावेळी त्यांनी क्लिन चिट व त्यांची मुलगी आणि सून यांच्यावर दाखल झालेल्या आरोपपत्रावर बोलणे टाळले. तसेच भाजपने आपल्यावर केलेले आरोप हे तथ्यहिन असल्याचे स्पष्ट झाले असल्याचा दावा अनिल देशमुख यांनी केला.

दवाबामुळेच ते नेते महायुतीतराष्ट्रवादी काँग्रेसचा एक गट ना. अजित पवार यांच्यासह महायुती सरकारमध्ये सहभागी झाला. त्यांच्यावर ईडी व सीबीआय कारवाई करण्याची होण्याची शक्यता असल्याने व दबावामुळे तेच महायुतीत सहभागी झाले. याची स्पष्टोक्ती ते आम्ही यंत्रणेच्या दबावामुळे गेलो नसल्याचे सांगून देत असल्याचा टोलाही देशमुख यांनी लगावला.

१२ डिसेंबरला युवा संघर्ष यात्रेचा नागपुरात समारोप

आ.रोहीत पवार यांच्या नेतृत्वात निघालेली युवा संघर्ष यात्रा ८०० किमीचे अंतर पार करुन १२ डिसेंबरला नागपूर येथे दाखल होत आहे. या यात्रेचा नागपूरात समारोप होणार असून यावेळी राष्ट्रवादी काँग्रेसचे खा.शरद पवार हे उपस्थित राहणार असल्याचे अनिल देशमुख यांनी सांगितले.

 

 

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेसgondiya-acगोंदिया