शहरं
Join us  
Trending Stories
1
Harsimrat Kaur Badal : "सरकार गरिबांच्या पोटावर लाथा मारतंय...", मनरेगावरून हरसिमरत कौर यांचा जोरदार हल्लाबोल
2
पीएम मोदींना दोन गोष्टींची खूप चीड; 'जी राम जी' विधेयकावरुन राहुल गांधींची टीका
3
धक्कादायक! विमानतळावर भुताटकी, प्रवाशांना त्रास देते एक रहस्यमय सावली, प्रवाशांचा दावा
4
कोण आहे Prashant Veer? MS धोनीसोबत खेळण्याचं स्वप्न पाहणाऱ्या खेळाडूवर CSK नं लावली विक्रमी बोली
5
रोजगार क्षेत्रातून दिलासादायक बातमी; बेरोजगारी 9 महिन्यांच्या नीचांकी पातळीवर
6
VIDEO: पाहावं ते नवलंच... मुलीने चक्क केली ख्रिसमस ट्री हेअरस्टाईल, नेटकऱ्यांना हसू आवरेना
7
बेस प्राईस अवघी ३० लाख, पण लिलावात या ५ खेळाडूंवर पडला पैशांचा पाऊस, बनले करोडपती
8
गीझर-हीटरमुळे तुमचे वीज बिल जास्त येतंय? या स्मार्ट टिप्स वापरून पैसे वाचवा
9
IPL 2026: ऑक्शनमध्ये चेन्नईचा मोठा डाव! १४ कोटी खर्च केले, पण परफेक्ट खेळाडू निवडला, धोनीची जागा घेणार?
10
BJP Assets: 2014 पूर्वी भाजपाच्या तिजोरीत किती पैसा होता? 11 वर्षांत किती वाढला? जाणून थक्क व्हाल!
11
आत्मनिर्भर भारताच्या दिशेने मोठे पाऊल, भारतातील पहिला स्वदेशी 64- बिट मायक्रोप्रोसेसर Dhruv64 लाँच
12
तब्बल ८ कोटी २० लाखांची बोली, दिल्ली कॅपिटल्सने संघात घेतलेला अकीब नबी दार कोण?
13
बाँडी बिचवर हल्ला करणाऱ्या साजिदचं भारताशी कनेक्शन समोर, २७ वर्षांपूर्वी सोडलं होतं हैदराबाद
14
आईने पाय धरले, तर वडिलांनी गळा आवळला; निवृत्त पोलिस अधिकाऱ्याने मुलीला संपवले, कारण...
15
Foldable Smartphones: सॅमसंग गॅलेक्सी ते गुगल पिक्सेलपर्यंत, यावर्षी लॉन्च झालेले प्रीमियम फोल्डेबल स्मार्टफोन!
16
"त्याला वर्षभर संधी, मला २-३ मॅचनंतर बाहेर काढलं..."; शुबमन गिलला संघाबाहेर न केल्याचा संताप
17
धोक्याची घंटा! फोन वाजला, उचलला पण समोरुन आवाजच नाही आला; Silent Calls चा नवा स्कॅम
18
मुंबईत महायुतीची बैठक संपली; भाजपा-शिंदेसेनेचा फॉर्म्युला ठरला, शेलारांनी आकडाही सांगितला
19
18 डिसेंबरपासून 'या' वाहनांवर बंदी! PUC शिवाय पेट्रोल नाही, 7 लाखांचा दंड; दिल्ली सरकारचा निर्णय
20
IPL 2026 Auction: Mumbai Indians ने घेतला पहिला खेळाडू; Rohit Sharma ला मिळाला नवा जोडीदार
Daily Top 2Weekly Top 5

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्प व्याघ्र राज्यात अव्वल

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 1, 2019 14:39 IST

नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे.

ठळक मुद्देदेशात १२ व्या स्थानी प्रभावी उपाययोजनांची दखल

लोकमत न्यूज नेटवर्कगोंदिया : नवेगाव-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात प्रभावीपणे उपाय योजना राबवून योग्य व्यवस्थापन करण्यात या प्रकल्पाला ७८.९१ टक्के रेटिंग मिळाली असून राज्यात अव्वल स्थान पटकाविले आहे.तर देशात १२ वे स्थान प्राप्त केले आहे.राज्यात ६ तर देशात एकूण ५० व्याघ्र प्रकल्प आहेत.या प्रकल्पाचे दरवर्षी केंद्र सरकारकडून रेटींग केले जाते. नवेगावबांध नागझिरा व्याघ्र प्रकल्पाने योग्य व्यवस्थापन आणि प्रभावीपणे उपाययोजना करुन देशात प्रसिध्द असलेल्या जिम कार्बेट, मेळघाट, ताडोबा, पेंच मुदुमलाई, सुंदरवन, बांधवगड, रणथंभोर या प्रकल्पाने मागे टाकले आहे. २९ जुलैला जागतिक व्याघ्र दिनाचे औचित्य साधून पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नव्वी दिल्ली येथे आयोजित चौथ्या अखिल भारतीय व्याघ्र गणना व चौथ्या व्यवस्थापन मुल्याकंन अहवाल जाहीर केला.यात नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पात महाराष्ट्रातून अव्वल तर देशातून १२ वे स्थान प्राप्त झाले. या वेळी नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाचे वनसंरक्षक तथा क्षेत्र संचालक मनिकंड रामानुज उपस्थित होते. देशातील सर्व व्याघ्र प्रकल्पात राबविण्यात येणाऱ्या विविध उपाय योजना आणि व्यवस्थापनाचे केंद्र सरकारकडून चार वर्षांत मुल्याकंन केले जाते.३२ विषय आणि क्षेत्रीय भेटी आणि प्रकल्पातील कर्मचाऱ्यांशी चर्चा आणि कार्यालयीन कागदपत्रांची तपासणी करुन हा अहवाल तयार केला जातो.यासाठी एक समिती तयार करण्यात आली आहे. ही समिती वन्यजीव व्यवस्थापन,अधिवास विकास, वन्यजीव सुरक्षा,लोकसहभागातून विकास कार्य,जनजागृती, निसर्ग पर्यटन व्यवस्थापन आदी विषयांचे निरीक्षण करुन मुल्याकंन केले जाते.केंद्र सरकारने १९७३ मध्ये देशात वाघांची संख्या वाढविण्यासाठी आणि त्यांचे संवर्धन करण्यासाठी या प्रकल्पाची सुरूवात करण्यात आली. त्यावेळी केवळ देशात ९ व्याघ्र प्रकल्प अस्तीत्त्वात होते.आता ही संख्या ५० वर पोहचली आहे. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्प २०१३ अस्तीत्त्वात आला. हा राज्यातील ४६ वा व्याघ्र प्रकल्प होता. महाराष्ट्रातील एकूण सहा व्याघ्र प्रकल्पांपैकी हा एक महत्त्वपूर्ण प्रकल्प असून दरवर्षी देश विदेशातील हजारो पर्यटक येथे भेट देत असून यातून स्थानिकांना रोजगाराच्या संधी प्राप्त होत आहे.

नवेगावबांध-नागझिरा प्रकल्पातील महत्त्वपूर्ण कामेनवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाच्या संरक्षित क्षेत्रात येणाऱ्या पाच गावांचे पुनर्वसन करण्यात आले. बफर झोन क्षेत्रातील १४० गावांमध्ये डॉ.श्यामाप्रसाद मुखर्जी जन वन विकास योजनेतंर्गत मागील चार वर्षात २६ कोटी ५० लाख रुपयांचे अनुदान प्राप्त करुन देण्यात आले.व्याघ्र प्रकल्पाच्या सुरक्षेकरिता ११२ जवान आणि अधिकाऱ्यांचा विशेष व्याघ्र सुरक्षा दल स्थापन करण्यात आला आहे. वन्यजीवांसाठी १३०० हेक्टरवर तन निमूर्लन, २ हजार हेक्टरवर चारा विकास प्रकल्प, ११२ कृत्रिम पाण्याचे स्त्रोत आणि त्यावर सोलर पंपाची व्यवस्था आणि ६५ शिकार विरोधी सुरक्षा कुटी तयार करण्यात आल्या आहेत हे विशेष.नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पाला राज्यात अव्वल तर देशात १२ स्थान प्राप्त होणे ही जिल्हावासीयांसाठी अभिमानाची बाब आहे.या प्रकल्पाचे योग्य व्यवस्थापन करण्यात वन्यजीव विभागात कार्यरत प्रत्येकाचे महत्त्वपूर्ण योगदान असून त्यांच्याच मेहनतीचे हे फलित आहे.- मनिकंड रामानुज,वनसंरक्षक वन्यजीव विभाग गोंदिया.

टॅग्स :Navegaonbandh Sanctuaryनवेगावबांध अभयारण्य