शहरं
Join us  
Trending Stories
1
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
2
Latest Marathi News LIVE Updates: काँग्रेसने बारामतीत उमेदवार देणं चुकीचे नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका
3
...त्यामुळेच अमेरिका-इराण युद्ध संपत नाहीये; चीन-रशियाची पडद्यामागून मदत पडतेय भारी?
4
Delhi Assembly: दिल्ली विधानसभा परिसरात मोठी खळबळ, VIP गेट तोडून घुसली अज्ञात कार, तपास सुरू!
5
रन आऊटचा वाद अन् अंपायरचीच केली हत्या! क्रिकेट सामन्यातील भांडणाचा रक्तरंजित शेवट
6
फायद्याची गोष्ट! हेल्मेट घातल्याने खरंच केस गळतात का? जाणून घ्या, यामागचं 'ते' सत्य
7
आयआयटी बाबाने गुपचूप लग्न उरकले! जोड्याने सरप्राईज द्यायला गावी गेले, संन्यास सोडून संसारातील 'अध्यात्म' सांगणार?
8
IPL दरम्यान ICC ची मोठी घोषणा! जसप्रीत बुमराह आणि संजू सॅमसन यांच्यात तगडी फाईट
9
Astro Tips: तुमच्या हाताची ५ बोटं आहेत ५ ग्रहांचे प्रतिनिधी; कोणत्या बोटात अंगठी घालणे अधिक लाभदायी?
10
चीनकडून काहीतरी वेगळेच सुरु आहे...! अमेरिका-इराण युद्धाच्या सावटात सोन्या-चांदीची प्रचंड खरेदी; डॉलरला शह देण्यासाठी नवी चाल?
11
पाकिस्तानचा शांतता प्रस्ताव इराणने फेटाळला; राष्ट्रीय हितांवर तडजोड नाही, इराणची स्पष्टोक्ती...
12
Delhi Assembly: दिल्ली विधानसभेत कार घुसल्यानंतर पुढील ५ मिनिटं काय घडलं? प्रत्यक्षदर्शीनं सांगितला संपूर्ण थरार!
13
सकाळी रडवले, दुपारी हसवले! शेअर बाजाराची 'रॉकेट' भरारी; 'या' ४ कारणांमुळे गुंतवणूकदारांची चांदी
14
जगातील भल्याभल्या देशांना 'या' बाबतीत तगडी टक्कर देतो इराण; अमेरिका तर त्यांच्या आसपासही नाही!
15
इराणचा 'डिजिटल' बॉम्ब! जगाचा इंटरनेट संपर्क तोडण्याची धमकी; समुद्राखालील केबल्स कापल्यास महाभयंकर संकट?
16
Video: शिंदेसेनेच्या ज्योती वाघमारेंना खासदारकीची शपथ घेताना मध्येच थांबवले; संसदेत काय घडलं?
17
Astro: सावधान! नशिबाला दोष देण्यापूर्वी एकदा 'हे' वाचा; तुमच्या कोणत्या साध्या चुकीमुळे कोणता ग्रह कोपतोय?
18
पाकिस्तानात ४ दिवस वर्किंग, बांगलादेशात सं. ७ नंतर मॉल बंद; तेल संकटात शेजारील देशांनी काय केले?
19
Divya Singh : अभूतपूर्व! कडाक्याची थंडी, खांद्यावर सायकल; माउंट एव्हरेस्ट बेस कॅम्प गाठून दिव्या सिंहने रचला इतिहास
20
लोकप्रिय मराठी अभिनेत्रीने दुसऱ्यांदा बांधली लग्नगाठ, इंडस्ट्रीतलाच आहे नवरा; ओळखलंत का?
Daily Top 2Weekly Top 5

राष्ट्रवादीचा तहसील कार्यालयावर ‘हल्लाबोल’

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: March 7, 2018 00:44 IST

तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.६) शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध समस्यांना घेऊन तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला.

ठळक मुद्देमुख्यमंत्र्यांच्या नावे निवेदन : शेकडो शेतकरी, बेरोजगारांची उपस्थिती, शेतकºयांचा सातबारा कोरा करा

ऑनलाईन लोकमतअर्जुनी-मोरगाव : तालुका राष्ट्रवादी काँग्रेसच्या वतीने मंगळवारी (दि.६) शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांच्या विविध समस्यांना घेऊन तहसील कार्यालयावर हल्लाबोल मोर्चा काढण्यात आला. या मोर्च्यात शेकडो, शेतकरी, बेरोजगार युवक, महिला भर उन्हात सहभागी झाले होते. मोर्च्याच्या शिष्टमंडळाने मुख्यमंत्र्यांचे नावे असलेले निवेदन तहसीलदार सी. आर. भंडारी यांना दिले.१६ फेब्रुवारीपासून अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सर्वच गावात यानिमित्ताने गोंदिया जिल्हा राकाँ किसान सभेचे अध्यक्ष मनोहर चंद्रिकापुरे यांचे नेतृत्वात शेतकरी सन्मान दिंडी व जनजागृती अभियान राबविण्यात आले. या अभियानाची सांगता या वेळी झाली. दुपारी १ वाजता स्थानिक दुर्गा चौकातून तहसील कार्यालयावर मोर्चा काढण्यात आला. या वेळी माजी आ. राजेंद्र जैन, माजी आ. दिलीप बंसोड, माजी जि.प.अध्यक्ष विजय शिवणकर, मनोहर चंद्रिकापुरे, रॉकाचे जिल्हाध्यक्ष विनोद हरिणखेडे, म्हाडाचे माजी सभापती नरेश माहेश्वरी, जि.प.चे गटनेता गंगाधर परशुरामकर, तालुकाध्यक्ष लोकपाल गहाणे, यशवंत परशुरामकर, जि.प.सदस्य किशोर तरोणे, भास्कर आत्राम, पं.स.सदस्य जनार्धन काळसर्पे, सुधीर साधवानी, शिशुला हलमारे, जि.प.सदस्य रमेश चुºहे, राकेश लंजे, नामदेव डोंगरवार, बंडू भेंडारकर, मुन्ना पालीवाल, चित्रलेखा मिश्रा, उध्दव मेहंदळे, योगेश नाकाडे, जीवन लंजे, रतिराम राणे, डॉ. अविनाश काशिवार व अनेक कार्यकर्ते, शेतकरी, शेतमजूर व बेरोजगार उपस्थित होते.उपस्थित शेतकरी, शेतमजूर व बेरोजगारांना तहसील कार्यालयाच्या प्रांगणात मार्गदर्शन करताना माजी आ. राजेंद्र जैन यांनी भाजप सरकारच्या कार्यप्रणालीवर कडाडून टिका केली. ते म्हणाले, भाजप सरकार फसवे आहे. शेतकºयांचे दु:ख त्यांना दिसत नाही. एकेकाळी तीन हजार रुपये प्रतिक्विंटल धानाला भाव मागणारे हे सरकार सध्या सत्तेत आहे आता ते १५०० ते १६०० रुपये भाव देतात. एकप्रकारे ते शेतकºयांचा विश्वासघात करीत आहेत. जिल्ह्यातील काही तालुक्यात मध्यम दुष्काळ घोषीत झाला. दुष्काळाची नेमकी व्याख्या काय हे कळायला मार्ग नाही.सरकारमध्ये पालकमंत्र्यांचे काहीच चालत नाही. त्यामुळे जिल्ह्यात कर्जमुक्ती रखडली आहे. माजी आ. दिलीप बंसोड म्हणाले उज्वला गॅस योजनेमार्फत सर्वाना मोफत गॅस कनेक्शन मिळणार होते. त्यांचेकडून १८०० ते २ हजार रुपये घेतले जात आहेत. याचा खरा लाभ लाभार्थ्याना मिळण्याऐवजी तो गॅस कंपन्यानाच मिळत असल्याचा आरोप केला. विजय शिवणकर म्हणाले, भाजप सरकार हे केवळ घोषणाबाज सरकार आहे. कर्जमुक्तीच्या नावावर केवळ जाहिरातीद्वारे गवगवा केला जात आहे. पीकविम्या योजनेच्या नावाखाली शेतकºयांकडून जबर वसूली करुन अंबानीला लाभ मिळवून देण्याचे पाप या शासनाने केले. पिक विम्याचे काम खासगी कंपन्याना दिले मात्र पंचनामे व इतर कमो ही शासकीय कर्मचाºयांकडून करुन घेतली. विनोद हरिणखेडे म्हणाले देशाची दिशाभूल करणारी भाजप सरकार आहे. आरक्षण नष्ट करुन बहुजनांच्या पिढ्या नेस्तनाबूत करण्याचा हा शासनाचा डाव आहे. नरेश माहेश्वरी म्हणाले, अनु. जातीच्या विद्यार्थ्याना उच्च शिक्षणासाठी शासनाने डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्वाधार योजना सुरु केली. याचा लाभ घेण्यासाठी विद्यार्थ्याना समाज कल्याण आयुक्तालयाकडे पायपीट करावी लागते. नगर पंचायतींच्या निर्मित शासनाने केल्या मात्र अनेक नगरपंचायतीत पूर्णवेळ मुख्याधिकारी नाहीत. तालुक्याच्या ठिकाणी उपविभागीय अधिकारी, तहसीलदारांची पदे रिक्त आहेत. शासनाचा संपूर्ण कारभार हा प्रभारावरच सुरु आहे. त्यामुळे हे सरकार इतरांच्या भरवशावरच चालणारे सरकार आहे.यशवंत परशुरामकर म्हणाले, हे सरकार ओबीसी, बहुजनविरोधी आहे. नाना पटोले सारख्या नेत्याला संपविण्याचा डाव त्यांनी केला. संत साहित्य संमेलनाच्या माध्यमातून शासनाच्या निधीचा दुरुपयोग करत पक्ष वाढीसाठी करतात. या संमेलनाचे वेळी रोहयोची कामे बंद ठेवून गोरगरीबांचा घास हिरावतात. शासनामध्ये पालकमंत्र्यांची भूमिका बाहुल्यासारखी आहे. सामाजिक न्याय विभागाचा निधी इतरत्र वळविला जातो. मंत्री मात्र मुकदर्शकाची भूमिका घेतात. कार्यक्रमाचे संचालन गंगाधर परशुरामकर, प्रास्ताविक लोकपाल गहाणे यांनी मांडले.

टॅग्स :NCPराष्ट्रवादी काँग्रेस