शहरं
Join us  
Trending Stories
1
"हम खाए काजू बदाम, पानी में उतरे तो..."; उद्धव ठाकरेंच्या दौऱ्यावरून एकनाथ शिंदेंचा टोला
2
Sana Mir Controversial Comment : सनाची Live मॅच वेळी वादग्रस्त कमेंट; ICC तिला नोकरीवरून काढणार?
3
आंतरराष्ट्रीय कुख्यात गँगशी संबंधित १० जणांना अमरावती येथील परतवाड्यातून घेतले ताब्यात
4
ICC Womens World Cup 2025 : बांगलादेशच्या ताफ्यात ३-४ अख्तर! मिळून साऱ्या जणींनी उडवला पाकचा धुव्वा
5
नांदुरा तालुक्यातील सावरगाव नेऊ येथे ट्रॅक्टरखाली चिरडून १० वर्षांच्या चिमुरडीचा मृत्यू
6
ठाणे आयुक्तालयात अवजड वाहनांना सकाळी व संध्याकाळी बंदी; पाेलीस आयुक्तांचे आदेश
7
एकाच समाजातील दोन गटात तुफान हाणामारी; सोनाळा पोलिस ठाण्यात १५ आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल
8
दिल्लीसह अनेक ठिकाणी दसऱ्याला पावसाचा धुमाकूळ, रावण जळण्याऐवजी भिजला
9
सततच्या पाऊस आणि वादळी वाऱ्यांमुळे मच्छिमारी हंगाम ठप्प, शासनाने मच्छिमारांसाठी सानुग्रह मदत जाहीर करावी
10
दसरा मेळाव्यामधून लाडकी बहीण योजनेबाबत एकनाथ शिंदेंचं मोठं विधान, दिला असा शब्द 
11
"इस्त्रीचे कपडे अन् व्हॅनिटी घेऊन दौरा करणारा..."; एकनाथ शिंदेंची उद्धव ठाकरेंवर सडकून टीका
12
"...तुमच्या सारखे '10 जनपथ'ला मुजरे करायला जात नाही!" एकनाथ शिंदेंचा हल्लाबोल, स्पष्टच बोलले
13
"जो माणूस क्रिकेटची तुलना युद्धाबरोबर करतो, तो माणूस बेशरम..."; उद्धव ठाकरेंची तोफ धडाडली
14
"'ही' फळं बघितल्यानंतर, तुमचं समाधान होतंय का?"; उद्धव ठाकरे यांचा थेट मोहन भागवतांनाच सवाल, नेमकं काय म्हणाले?
15
दोन दिवस बाळासाहेबांचं पार्थिव मातोश्रीवर का ठेवलं होतं?, शिंदेंच्या दसरा मेळाव्यातून रामदास कदमांचा सनसनाटी दावा
16
उद्धव ठाकरे-राज ठाकरे एकत्र येणार का? दसरा मेळाव्यात मिळाले उत्तर! म्हणाले, “त्याच दिवशी...”
17
Uddhav Thackeray Speech: "भाजपा म्हणजे अमिबा, कसाही वेडावाकडा पसरत चाललाय, अजेंडा एकच..."; उद्धव ठाकरेंची जहरी टीका
18
Dasara Melava: “नेपाळप्रमाणे GenZ लडाखमध्ये रस्त्यावर, सोनम वांगचूक देशभक्त”: उद्धव ठाकरे, भाजपावर टीका
19
“भ्याडपणा हे BJP-RSSचे मूळ”; राहुल गांधींचा कोलंबियातून हल्लाबोल, सावरकरांचाही केला उल्लेख
20
पाकिस्तानसाठी PoK ठरतंय 'अवघड जागीचं दुखणं'! शाहबाज शरीफने लष्कराला दिले महत्त्वाचे आदेश

वन्यप्राण्यांंसाठी राष्ट्रीय महामार्ग ठरताहे कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:02 IST

नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते.

ठळक मुद्देस्पीडब्रेकर लावण्याची मागणी : अपघाताच्या संख्येत वाढ

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते. या मार्गावर स्पीड ब्रेकरचा अभाव आणि महामार्गालगत ताराच्या कुंपनाचा अभाव असल्याने वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.मागील वर्षभरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन बिबट, एक रानगवा, एक अस्वल व एक तडस प्राण्यांचा अपघातात बळी गेला. त्यानंतर शुक्रवारी(दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.डुग्गीपार ते देवपायली व बाम्हणी खडकी ते पुतळी फाटा- मासुलकसा या बफर झोन परिसराच्या पाच कि.मी.अंतरात वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरचे गाव परिसरातील काहीजण रात्रभरात त्या प्राण्यांचे अवशेषच गायब करीत असल्याची चर्चा आहे. यासाठी वन्यजीव विभाग व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प व बफरझोन परिसरातील महामार्गावर (गतीरोधक) स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी तयार करण्याची गरज आहे. कोहमारा गावापासून मुरदोलीपर्यंत विविध वन्य प्राण्यांचे फोटो लावून जनजागृती केली पाहिजे. प्राण्यांचे फोटो लावल्याने वाहन चालकही आपल्या वाहनाच्या वेग नियंत्रीत ठेवतील. त्यामुळे अपघाताच्या घटनांवर आळा घालणे शक्य होईल. मात्र वन्यजीव व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळीमाती, कवलेवाडा व झनकारगोंदी या तीन गावांचा पुनर्वसन झाल्याने आता व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वन्यप्राण्यांचे वाढते अपघात रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात