शहरं
Join us  
Trending Stories
1
लईराई देवीच्या जत्रोत्सवात चेंगराचेंगरी; ६ भाविकांचा मृत्यू, ४० जण जखमी, उत्सवाला गालबोट
2
पाकिस्तानचे PM शहबाज शरीफ यांच्या यु ट्यूब चॅनलवर भारतात बंदी, मंत्र्याचे X अकाऊंटही ब्लॉक
3
पहलगाम हल्ल्याचा मास्टरमाइंड पाकच; लष्कर, आयएसआय व आर्मीने रचला कट; एनआयएच्या अहवालात दावा
4
भारतीय सैन्यदलामध्ये व्यापक फेरबदल; पाकिस्तानला धडकी
5
Today Horoscope: आजचे राशीभविष्य, ३ मे २०२५: धनलाभ होऊन उत्पन्नात होईल वाढ
6
कांजूर डम्पिंग ग्राउंड बेकायदा, उच्च न्यायालयाचा राज्य सरकार, महापालिकेला झटका; तीन महिन्यांत जैसे थे करा
7
पाकला उत्तर देण्यासाठी गंगा एक्स्प्रेस-वेवरून झेपावतील लढाऊ विमाने; लँडिंग ड्रिल यशस्वी : देशाच्या संरक्षण तयारीत ऐतिहासिक टप्पा
8
विझिनजम बंदरामुळे आर्थिक प्रगती; पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते झाले उद्घाटन
9
चोंडीत ६०० व्हीव्हीआयपी, दोन हजार पाहुण्यांचा खास पाहुणचार; ६ मे रोजी मंत्रिमंडळाची पहिल्यांदा हाेणार बैठक
10
जातगणना : मॅजिक की मंडल?
11
भारताविरुद्ध पाकिस्तानचे सायबर युद्ध, आठवडाभरात १० लाख हल्ले
12
उत्तरेत अवकाळीचा कहर; वादळात सापडून १० ठार; २०० विमानांना उशीर; राजस्थानात कुठे पाऊस तर कुठे उष्णतेची लाट
13
हंड्रेड डेज’ : पास कोण? नापास कोण?
14
‘त्या’ बाळांच्या उपचारासाठी २४ लाख रुपये; बाळांचे वजन खूपच कमी, अतिदक्षता विभागात उपचार सुरू
15
भरपाईशिवाय जमीन ताब्यात घेण्याचे कृत्य बेकायदा; उच्च न्यायालयाची सरकारवर टीका
16
‘अमेरिकन आहात? - बिलावर १०४% सेवाशुल्क द्या!
17
पंतप्रधान मोदी अमरावतीत असं काय बोलले? की मुख्यमंत्री चंद्राबाबूंना रोखता आलं नाही आपलं हसू! बघा VIDEO
18
अनिल कपूरच्या आईचे निधन; वयाच्या 90व्या वर्षी निर्मला कपूर यांनी घेतला अखेरचा श्वास...
19
Heavy Rain In Jammu & Kashmir : जम्मू-कश्मिरात मुसळधार पाऊस, पाकिस्तानचं टेन्शन वाढवलं! ...तर पुराच्या पाण्यात वाहून जाईल PoK
20
Pahalgam Terror Attack : पाकिस्तानी क्रिकेटरनंतर आता पंतप्रधान शहबाज शरीफ यांच्यावरही भारताचे डिजिटल स्ट्राइक

वन्यप्राण्यांंसाठी राष्ट्रीय महामार्ग ठरताहे कर्दनकाळ

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 16, 2018 22:02 IST

नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते.

ठळक मुद्देस्पीडब्रेकर लावण्याची मागणी : अपघाताच्या संख्येत वाढ

राजेश मुनिश्वर ।लोकमत न्यूज नेटवर्कसडक अर्जुनी : नागपूर-रायपूर या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहा लगतच नवेगावबांध राष्ट्रीय उद्यान व नागझिरा अभयारण्याची सीमा लागू आहे. त्यामुळे या मार्गावर नेहमीच वन्यप्राण्यांची वर्दळ असते. या मार्गावर स्पीड ब्रेकरचा अभाव आणि महामार्गालगत ताराच्या कुंपनाचा अभाव असल्याने वाहनाच्या धडकेत वन्यप्राण्यांचा मृत्यू झाल्याच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. त्यामुळे हा राष्ट्रीय महामार्ग वन्यप्राण्यांसाठी कर्दनकाळ ठरत आहे.मागील वर्षभरात या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सहावर दोन बिबट, एक रानगवा, एक अस्वल व एक तडस प्राण्यांचा अपघातात बळी गेला. त्यानंतर शुक्रवारी(दि.१४) सायंकाळच्या सुमारास अज्ञात वाहनाच्या धडकेत एक बिबट्या जागीच ठार झाल्याची घटना घडली. या मार्गावरील अपघातांच्या संख्येत वाढ होत असल्याने वन्यप्राण्यांच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण झाला आहे. महामार्गाच्या दोन्ही बाजूला घनदाट जंगल आहे.डुग्गीपार ते देवपायली व बाम्हणी खडकी ते पुतळी फाटा- मासुलकसा या बफर झोन परिसराच्या पाच कि.मी.अंतरात वन्यप्राण्यांच्या अपघाताच्या घटनांमध्ये वाढ झाली आहे. रस्त्यावरचे गाव परिसरातील काहीजण रात्रभरात त्या प्राण्यांचे अवशेषच गायब करीत असल्याची चर्चा आहे. यासाठी वन्यजीव विभाग व वनविभागाच्या कर्मचाऱ्यांनी रात्रीची गस्त वाढविण्याची गरज आहे. व्याघ्र प्रकल्प व बफरझोन परिसरातील महामार्गावर (गतीरोधक) स्पीड ब्रेकर ठिकठिकाणी तयार करण्याची गरज आहे. कोहमारा गावापासून मुरदोलीपर्यंत विविध वन्य प्राण्यांचे फोटो लावून जनजागृती केली पाहिजे. प्राण्यांचे फोटो लावल्याने वाहन चालकही आपल्या वाहनाच्या वेग नियंत्रीत ठेवतील. त्यामुळे अपघाताच्या घटनांवर आळा घालणे शक्य होईल. मात्र वन्यजीव व वन विभागाच्या अधिकाऱ्यांनी अद्यापही याची दखल घेतली नाही. नवेगावबांध-नागझिरा व्याघ्र प्रकल्पातील काळीमाती, कवलेवाडा व झनकारगोंदी या तीन गावांचा पुनर्वसन झाल्याने आता व्याघ्र प्रकल्पात वन्यप्राण्यांची संख्या बऱ्यापैकी वाढली आहे. दरम्यान राष्ट्रीय महामार्गावरील वन्यप्राण्यांचे वाढते अपघात रोखण्यासाठी वन्यजीव विभागाने वेळीच पाऊले उचलण्याची गरज आहे.

टॅग्स :leopardबिबट्याAccidentअपघात