शहरं
Join us  
Trending Stories
1
"कुटुंब आणि लग्न हे केवळ शारीरिक संतुष्टीचे माध्यम नाही तर...", 'लिव्ह-इन रिलेशनशिप'वर मोहन भागवत स्पष्टच बोलले
2
‘ऑपरेशन सिंदूरदरम्यान, अल्लाहच्या मदतीने आम्हाला वाचवले,’ आसिम मुनीरचं मोठं विधान  
3
"७५ टक्के नगराध्यक्ष महायुतीचे, ४८ टक्के नगरसेवक एकट्या भाजपाचे; एवढा मोठा विजय...," CM फडणवीसांनी आकड्यांसह सांगितली ताकद
4
"काँग्रेसचे ४१ नगराध्यक्ष आणि १,००६ नगरसेवक निवडून येणे हा केवळ निकाल नाही, तर..." हर्षवर्धन सपकाळ यांचं मोठं विधान
5
एक फोन कॉल आणि शुभमन गिल झाला वर्ल्डकपच्या संघातून ‘आऊट’, धक्कादायक माहिती समोर
6
मिस्टर अँड मिसेस नगरसेवक! बदलापूरमध्ये डझनभर जोडप्यांनी निवडणूक लढवली; चार जिंकली, तर पाच...
7
भंडारा उधळला आणि भडका उडाला, जेजुरीत विजयी मिरवणुकीला गालबोट; दोघे भाजले, १८ जखमी
8
Smriti Mandhana Record : स्मृती मानधनाचा मोठा पराक्रम! अशी कामगिरी करणारी ठरली पहिली भारतीय बॅटर
9
इलॉन मस्क यांची संपत्ती ७५० अब्ज डॉलर्सच्या पार; भारताच्या टॉप ४० श्रीमंतांएवढी एकट्याची 'माया'
10
"PM मोदींच्या योजनांवरचा आशीर्वाद"; अमित शाहंकडून कौतुकाची थाप, महायुतीच्या विजयाने दिल्लीत जल्लोष
11
“नगरपालिका निकालाने विरोधकांचे पानिपत, आता मनपासाठी एक दिलाने कामाला लागा”: DCM शिंदे
12
"जर व्हेनेझुएला विरोधात कुठल्याही प्रकारची लष्करी कारवाई झाली तर..."; ब्राझीलच्या राष्ट्राध्यक्षांची अमेरिकेला थेट धमकी!
13
Maharashtra Local Body Election Results 2025 Live: सर्वाधिक नगराध्यक्ष भाजपाचे, काँग्रेसलाही किंचित दिलासा! नगरपरिषद निकालांमध्ये कोण 'हिट', कोण 'फ्लॉप'?
14
विनायक चतुर्थी अंगारक योग २०२५: ‘असे’ करा व्रत, गणेश पूजनात ३ गोष्टी हव्याच; पाहा, सोपी पद्धत
15
प्रियकरासोबत मिळून पतीची हत्या, पण एक चूक नडली अन पोलिसांनी ठोकल्या बेड्या  
16
"पक्षाने जे प्रवेश दिले त्याचा फायदाच झाला"; मुनगंटीवारांच्या नाराजीवर CM फडणवीसांचे भरपाई देण्याचे आश्वासन
17
IND vs PAK : मैदानात फुल राडा! आयुष म्हात्रे–वैभव सूर्यवंशीचा पाक गोलंदाजाशी वाद; VIDEO व्हायरल
18
धावत्या ट्रेनमध्ये प्रेमीयुगुलाचा रोमान्स, VIDEO व्हायरल; नेमका कुठे घडला 'हा' लज्जास्पद प्रकार?
19
‘हा महायुतीचा सामूहिक विजय, आम्ही जिथे लढलो तिथे…”, निकालांनंतर अजित पवारांचं मोठं विधान          
20
एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील दोन बालेकिल्ल्यांना भाजपाकडून सुरुंग, अंबरनाथ, बदलापूरमध्ये फुललं कमळ
Daily Top 2Weekly Top 5

व्यक्तीपेक्षा पक्ष तर पक्षापेक्षा राष्ट्र मोठे

By admin | Updated: December 26, 2015 01:54 IST

भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी जाहीर करुन संबंधित विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले, ...

कृषीमंत्री बिसेन : तिरोड्यात सुशासन दिनतिरोडा : भारतामध्ये तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी जेव्हा आणीबाणी जाहीर करुन संबंधित विरोधी नेत्यांना तुरुंगात टाकले, त्यात अटलबिहारी वाजपेयीसुद्धा होते. त्याचा परिणाम नंतरच्या काळात होऊन काँग्रेस सरकार पडून मोरारजी देसाई पंतप्रधान झाले. त्याच कार्यकाळात अटलबिहारी वाजपेयी विदेशमंत्री झाले. त्यांनी विदेशात आपली छाप उमटविली. व्यक्तिपेक्षा पार्टी मोठी व पार्टीपेक्षा राष्ट्र मोठे असते. राष्ट्रासाठी कार्य करणे प्रत्येकाचेच कर्तव्य आहे, असे मत मध्यप्रदेशचे कृषी व सहकारमंत्री गौरीशंकर बिसेन यांनी व्यक्त केले. आ.विजय रहांगडाले यांनी शुक्रवारी तिरोड्यात माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या जन्मदिनानिमित्त आयोजित सुशासन दिन कार्यक्रमात अध्यक्षस्थानावरून ते बोलत होते.आ.रहांगडाले यांच्या कार्यालयासमोरील पटांगणावर घेण्यात आलेल्या या कार्यक्रमात आ.अनिल सोले, भाजपचे जिल्हाध्यक्ष विनोद अग्रवाल यांनी मार्गदर्शन करुन वाजपेयी यांच्या राजकीय जीवनावर प्रकाश टाकला. यावेळी भाजपा महिला आघाडीच्या प्रदेश सचिव सीता रहांग़डाले, माजी आ.हरिष मोरे, भजनदास वैद्य, खोमेश्वर रहांग़डाले, हेमंत पटले, सुनील पालांदूरकर, दिलीप चौधरी, सुरेंद्र बिसेन, जि.प. सदस्य रोहिनी वरखडे, रजनी कुंभरे, पवन पटले, डॉ.बी.एस. रहांगडाले, कृउबासचे डॉ.चिंतामन रहांगडाले, डॉ.वसंत भगत, संजय बैस, रमनिक सोयाम, राणी रहांगडाले, हेमलता पटले हे प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमाचे संचालन मदन पटले यांनी तर आभार अनुप बोपचे यांनी मानले. यशस्वीतेसाठी खडकसिंग जगने, मोनू भूते, प्रभु सोनेवाने, भाऊराव कठाने, सुनील बन्सोड, तेजराम चव्हाण, शुक्राचार्य ठाकरे, स्वानंद पारधी, पंकज रहांगडाले, चंदाताई शर्मा, थानसिंग रहांगडाले, डॉ. रामप्रसाद पटले यांनी सहकार्य केले. (शहर प्रतिनिधी)योजना पूर्ण केल्याशिवाय शांत बसणार नाहीआ. विजय रहांगडाले यांनी प्रास्ताविकातून आपल्या विधानसभा क्षेत्रात सिंचन व्यवस्था कशी परिपूर्ण होईल, अडलेला सिंचन प्रकल्प, खळबंदा जलाशय, चोरखमारा जलाशय, बोदलकसा जलाशय यात पाणी कसे टाकता येईल, तसेच पाईपलाईनचे नियोजन बदलवून रस्त्याच्या कडेने नेवून लवकर या योजना पूर्ण केल्याशिवाय आपण शांत बसणार नाही, असे आश्वासन यावेळी दिले. तिरोडा शहरात लोकसंख्येच्या वाढीमुळे शुद्ध पाणी आवश्यक तेवढे मिळत नाही. त्यासाठी २० कोटी रु.ची योजना पाईपलाईन मंजूर केल्याचे त्यांनी सांगितले. तसेच विविध कामांसाठी आमदार निधीचा वापर होत असल्याचे सांगितले.