शहरं
Join us  
Trending Stories
1
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पाकला स्पष्ट शब्दांत ठणकावले; पाहा, भाषणातील ५६ महत्त्वाचे मुद्दे
2
आजचे राशीभविष्य १३ मे २०२५ : या राशींना आर्थिक लाभ, कसा असेल तुमचा आजचा दिवस...
3
एअर मार्शल भारती म्हणाले, “भय बिनु होइ न प्रीति, कोणत्याही आव्हानांचा मुकाबला करण्यास सज्ज”
4
१९७१नंतर प्रथमच पाकला मोठा दणका; ५२हून अधिक वायुसैनिकांचा मृत्यू; १२ एअरबेसवर भारताचे हल्ले
5
‘हे’ तीन दहशतवादी हवेत, मगच थांबेल काश्मीरचा दहशतवाद; भारताची पाककडे सातत्याने मागणी
6
धास्ती: सीमावर्ती गावांत अद्याप शेकडो जिवंत बॉम्ब, ६ ठिकाणी केले निष्क्रिय; नागरिक परतले घरी
7
जे होते ‘ऑपरेशन सिंदूर’चा चेहरा त्यांचे ट्रोलिंग; मिस्रींच्या मुलीची वैयक्तिक माहिती लीक
8
युद्ध झालेलेच नाही, तेव्हा शस्त्रसंधीचा प्रश्नच नाही; भारत-पाकच्या राजनैतिकांनाच श्रेय
9
३२ विमानतळ पुन्हा सुरू करण्याची तयारी; भारत-पाकिस्तान संघर्षामुळे विमान उड्डाणे होती बंद
10
पाकच्या ताब्यातील जवानाच्या पत्नीशी संवाद; सुटकेसाठी प्रयत्न करण्याचे आश्वासन, फोनवर चर्चा
11
संरक्षण दलांना राज्यात सर्वतोपरी मदत: मुख्यमंत्री; तिन्ही दलांच्या अधिकाऱ्यांसोबत बैठक
12
‘ऑपरेशन सिंदूर’नंतर सायबर हल्ल्यांचा आकडा १५ लाखांवर; फक्त १५० यशस्वी, सायबर विभागाचा तपास
13
दहावीचा निकाल आज... मित्रांनो, मनासारखे नाही झाले, तरी हार मानू नका 
14
मराठवाडा, उत्तर महाराष्ट्राला अवकाळीचा तडाखा; पिकांनी टाकल्या माना, शेतकऱ्यांचे मोठे नुकसान
15
घाटकोपर होर्डिंग दुर्घटनेतील जखमी म्हणतात, आजही तेथून जाताना हृदयात चर्रर्र होतं
16
नवीन होर्डिंग धोरण वर्षभरानंतरही कागदावरच! घाटकोपर दुर्घटनेला वर्ष होऊनही महापालिका गप्पच
17
शाहरुख खानच्या ‘त्या’ कर्मचाऱ्याच्या कुटुंबाला ६२ लाखांची भरपाई योग्यच; हायकोर्टाचे आदेश
18
आंतरराष्ट्रीय सीमेवर संशयित ड्रोन दिसले, अनेक ठिकाणी ब्लॅकआऊट केले; ‘त्या’ ४ तासांत काय घडले?
19
डोनाल्ड ट्रम्प यांचा ‘तो’ दावा फेटाळला; भारताने स्पष्टच सांगितले, “चर्चेत ते मुद्दे नव्हते”
20
“भारत-पाकने युद्धविराम केला नाही, तर व्यापार नाही, आम्ही अण्वस्त्रांचे युद्ध रोखले”: ट्रम्प

आणखी ७८४ शेतकऱ्यांची सावकारी पाशातून मुक्ती

By admin | Updated: December 9, 2015 02:07 IST

जिल्ह्यातील आणखी ७८४ शेतकऱ्यांची सावकारांच्या पाशातून मुक्ती करण्यात आली आहे.

प्रस्ताव मंजूर : ९२.८४ लाखांचे कर्ज केले माफ गोंदिया : जिल्ह्यातील आणखी ७८४ शेतकऱ्यांची सावकारांच्या पाशातून मुक्ती करण्यात आली आहे. जिल्हास्तरीय समितीच्या शुक्रवारी (दि.४) पार पडलेल्या बैठकीत ७८४ शेतकऱ्यांच्या कर्जमुक्तीच्या प्रस्तावांना मंजुरी देण्यात आली. यातून या शेतकऱ्यांचे ९२ लाख ८४ हजार ३१० रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. कर्जबाजारीपणामुळे त्रस्त होऊन आत्महत्येच्या दारी पोहोचणाऱ्या शेतकऱ्यांची संख्या विदर्भ व मराठवाड्यात वाढतच आहे. या गंभीर बाबीकडे लक्ष देत शासनाने परवानाधारक सावकारांकडून कर्ज घेतलेल्या शेतकऱ्यांचे कर्ज माफ करण्यासाठी योजनाच हाती घेतली होती. यावर सहकार विभागाच्या शासन निर्णयानुसार कर्जमाफीसाठी प्रस्ताव मागविण्यात आले होते. जिल्हा उपनिबंधक कार्यालयाकडे असे हजारो प्रस्ताव आले होते व आलेल्या प्रस्तावांवर टप्याटप्याने निर्णय घेण्याचे काम जिल्हाधिकारी डॉ.विजय सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेखालील समितीकडून सुरू आहे. शुक्रवारी (दि.४) जिल्हास्तरीय समितीची तिसरी बैठक जिल्हाधिकारी डॉ. सुर्यवंशी यांच्या अध्यक्षतेत पार पडली. या बैठकीत पोलीस अधीक्षकांचे प्रतिनिधी प्रवीण नावडकर, समितीचे सदस्य सचिव तथा जिल्हा उपनिबंधक दिग्वीजय आहेर, जिल्हा विशेष लेखापरिक्षक सुपे व सहायक निबंधक ए.बी.गोस्वामी उपस्थित होते. या बैठकीत समितीने ७८४ शेतकऱ्यांचे कर्जमाफीचे प्रस्ताव मंजूर केले. या प्रस्तावांतील शेतकऱ्यांचे अशाप्रकारे ९२ लाख ८४ हजार ३१० रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहे. जिल्हास्तरीय समितीची ही तिसरी बैठक होती. यापूर्वी झालेल्या दोन बैठकीतील प्रस्ताव मिळून आता जिल्ह्यातील १४६६ शेतकऱ्यांची कर्जमुक्ती करण्यात आली आहे. अशाप्रकारे या शेतकऱ्यांचे एक कोटी ६० लाख ४७ हजार ९२४ रूपयांचे कर्ज माफ करण्यात आले आहेत. यामध्ये अर्जुनी-मोरगाव तालुक्यातील सर्वाधिक ५९४ शेतकऱ्यांचा समावेश आहे, तर सर्वात कमी गोरेगाव तालुक्यातील ७७ शेतकरी आहेत. (शहर प्रतिनिधी)