शहरं
Join us  
Trending Stories
1
आर्थिक मदतीशिवाय हल्ला होऊ शकत नाही; पहलगाम हल्ल्यावरुन FATF ने पाकिस्तानला फटकारले
2
Viral Video : रीलसाठी जीवाशी खेळ; धबधब्यावर उभी राहिली तरुणी, पुढे जे झालं ते बघून चुकेल काळजाचा ठोका
3
"माझाही राजा रघुवंशी झाला असता"; गोव्याला जाताना पत्नीसमोर मारहाण, पतीने सांगितली आपबिती
4
आमच्या मागणीपुढे PM मोदींना झुकावे लागले...जनगणनेच्या अधिसूचनेवरुन काँग्रेसचा निशाणा
5
बाप म्हणाला चिंता आहे, मुलगी म्हणाली मी आहे! ३ एकरांत सोयाबीन लावून मुलीची बापाला साथ
6
आता पाकिस्तान अणुबॉम्बची धमकी देण्यापूर्वी शंभर वेळा विचार करेल...! SIPRI च्या अहवालात भारताच्या अण्वस्त्रांसंदर्भात मोठा दावा
7
वृद्ध व्यक्तीला डिजिटल अरेस्ट करून नकली कोर्टात हजर केलं; घातला 'इतक्या' कोटींचा गंडा!
8
इराणचा अमेरिकेच्या दुतावासावर हल्ला अन् अमेरिकेची २८ टँकर विमाने एकाचवेळी झेपावली...
9
NPT मधून बाहेर पडण्याच्या तयारीत इराण, इस्रायलसोबत सुरू असलेल्या युद्धादरम्यान खामेनेई यांचं मोठं प्लॅनिंग?
10
कच्चे तेल ३०० डॉलरवर जाण्याची शक्यता; इराकच्या मंत्र्यांनी जर्मनीच्या कानावर घातला मोठा धोका...
11
"...तर पाकिस्तानकडे युद्धाशिवाय दुसरा पर्याय उरणार नाही!"; पाणी बंद झाल्याने बिलावल बिथरले, दिली अशी धमकी
12
माजी आमदार बच्चू कडू यांना मोठा राजकीय धक्का; जिल्हा बँकेचे अध्यक्ष म्हणून अपात्र
13
प्रेमानेच केला घात! राजावर पाठीमागून केला वार, हत्येसाठी वापरलेला चाकू पोलिसांना सापडला...
14
रितेशच्या आधी जिनिलियाचं जॉनसोबत झालं होतं लग्न? इतक्या वर्षांनी पुजाऱ्याच्या दाव्यावर अभिनेत्रीनं केला खुलासा
15
अविश्वसनीय! अहमदाबाद प्लेन क्रॅशमधून चमत्कारिकरित्या वाचलेल्या रमेश विश्वास यांचा नवा व्हिडिओ; बघा- आगीच्या ज्वाळांतून कसे आले बाहेर?
16
Mumbai Rains Live Updates: मुंबईत मुसळधार! पुढील ३ तासांसाठी रेड अलर्ट जारी, कुठे-काय परिस्थिती?
17
इस्रायलमध्ये पहिल्यांदाच इतका विनाश, इराणच्या हल्ल्यानंतर काय झालं बघाच...
18
Israel Iran War : मोठं काहीतरी घडणार! अमेरिकेचे विमानवाहू जहाज मध्य पूर्वेकडे रवाना; इस्रायल-इराण युद्ध भडकणार?
19
भारतावर पुन्हा युक्रेनसारखी परिस्थिती! १५०० विद्यार्थी इराणमध्ये अडकले; एअर इंडियालाच काहीतरी करावे लागणार...
20
सिट्रोएनने खास स्पोर्ट कार आणली; Citroen C3 चे अंतर-बाह्य रुपडे पालटले... 

कर्जमाफीचे बँकेत आलेले पैसे गेले परत

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 26, 2018 21:35 IST

शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे.

ठळक मुद्देयोजनेचा फज्जा : शेतकऱ्यांमध्ये असंतोष, बँक अधिकाऱ्यांचे मौन

लोकमत न्यूज नेटवर्कअर्जुनी-मोरगाव : शासनाने शेतकऱ्यांच्या कर्जमाफीला ऐतिहासिक कर्जमाफी अशी बिरुदावली देऊन मोठा गाजावाजा केला. मात्र काही शेतकऱ्यांच्या खात्यात कर्जमाफीचे जमा झालेले पैसे बँक खात्यातून परत गेले आणि आता त्यांच्या नावावर संपूर्ण कर्जाची रक्कम शिल्लक असल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. या प्रकारामुळे तालुक्यातील अनेक शेतकऱ्यांमध्ये असंतोषाचे वातावरण आहे.महाराष्ट्र शासनाने ऐतिहासीक कर्जमाफी जाहीर केली. या योजनेअंतर्गत एकमुस्त समझोता घडविण्याचा केविलवाणा प्रयत्न केला गेला. मात्र यातही अनेक अफलातून प्र्रकार उघडकीस येऊ लागले आहेत. याचे उत्तर ना प्रशासनाजवळ, ना बँक व्यवस्थापनाजवळ आहे.त्यामुळे अनेक शेतकऱ्यांवर अन्याय झाला आहे. शेतकऱ्यांना कर्जमाफीचे गाजर दाखविण्यात आले, मात्र कर्जाचा डोंगर कायमच असल्याने शेतकºयांत नाराजीचा सूर आहे.अनिल लंजे या शेतकऱ्याने १० डिसेंबर २०१४ रोजी स्थानिक विदर्भ कोकण ग्रामीण बँकेतून १ लक्ष ३२ हजाराचे पीक कर्ज घेतले होते. ही कर्जराशी थकीत झाली होती. शासनाने २०१७ मध्ये शिवाजी महाराजांचे नाव देऊन ऐतिहासीक कर्जमाफी केली.लंजे यांना या योजनेतंर्गत लाभ मिळण्यासाठी आपण पात्र असल्याचे विदर्भ कोकण ग्रामीण बँक शाखा अर्जुनी-मोरगाव यांचे २० डिसेंबर २०१७ चे पत्र मिळाले. यात दीड लाख रुपयांचे कर्जमाफ होऊ शकते. मात्र दीड लाख रुपयांच्यावर असलेल्या राशीचा बँकेत रोख भरणा करावा लागेल असा उल्लेख आहे.त्यानुसार लंजे यांनी २२ जानेवारीला बँकेत २० हजाराचा रोख भरणा केला. मात्र या २० हजार रुपयांची लंजे यांच्या बँक खात्यात कुठेही नोंद नाही. याऊलट २७ फेब्रुवारी रोजी त्यांचे खात्यात ९४६५ रुपयांचा भरणा केला आहे व ५ मार्च रोजी या रकमेची कपात करण्यात आली आहे. त्यांचे भरलेले २० हजार रुपये गेले कुठे? हा सुध्दा बुचकळ्यात टाकणारा प्रश्न आहे. आपल्याला कर्जमाफी मिळाली असेल याची शहानिशा करण्यासाठी ते बँकेत गेले तेव्हा कर्जमाफी अद्याप झालेली नाही, असेच उत्तर दिले जाते.बँकाकडून टोलवाटोलवीलंजे यांना यासंदर्भात भंडारा बँक मुख्यालयात जावून चौकशी करावी असे सांगीतल्या गेले. त्यानंतर त्यांनी भंडारा येथे जावून चौकशी केली तर ते अर्जुनी-मोरगावच्या बँकेतच जावून चौकशी करा असे उत्तर देण्यात आले. दरम्यान बँकाकडून नुसती टोलवाटोलवी सुरु आहे. कर्जमाफी मिळेल या आशेने उसनवारी करुन बँकेत २० हजार रुपये रोख भरले मात्र कर्जमाफी मिळाली नाही. उलट बँकेच्या पायऱ्या झिजवून मला मानसिकदृष्ट्या त्रस्त करण्याचा प्रकार बँकेने चालविला आहे. शासनाची ऐतिहासीक कर्जमाफी योजना फसवेगिरीची असल्याचा आरोप लंजे यांनी केला आहे.उच्चस्तरीय चौकशीची मागणीतालुक्यातील अनेक शेतकऱ्यांची कर्जमाफी झाली. बँकेत कर्जमाफीची राशी जमा होऊन शिल्लक राशी दर्शविण्यात आली. या कर्जमाफीच्या जमा झालेल्या राशीची नोंद ४० ते ५० दिवसापर्यंत कर्जदारांच्या खाते पुस्तिकेत राहिली मात्र कालांतराने पुन्हा ही राशी परत घेऊन त्यांचेवर पूर्वीसारखीच कर्जाची राशी कायम आहे. यामागील रहस्याचा उलगडा होऊ शकला नाही. कर्जमाफीच्या या गुत्थात तालुक्यातील अनेक शेतकरी गुरफटलेले आहेत. याची उच्चस्तरीय चौकशीची मागणी शेतकऱ्यांनी केली आहे.

टॅग्स :Crop Loanपीक कर्जFarmerशेतकरी